५ सप्टेंबर, २०१२

काकध्वनी


This has to be a person-to-person level; you can't do it in a large group. And this is not an interpretation of anybody's teaching; it does not throw new light on anybody's teaching or any spiritual text. I am not putting forth an intellectually constructed set of ideas. It is born out of my own spiritual experience - if I may use the term, for want of better or more adequate one - that has put an end to the experiencing structure once and for all.
❦❦❦
Actually, what I am saying here is something you bring out. That what is said here is your property, not mine. The limitations, the frontiers are all gone. It is all one. Whatever is happening for the whole of human consciousness. You don't have to do a thing. You don't have to start a foundation or society. It is not for you to preserve the teaching for posterity.
❦❦❦
I have no teaching. There is nothing to preserve. Teaching implies something that can be used to bring about change. There is no teaching here, just disjointed, disconnected sentences. What is there is only your interpretation, nothing else. For this reason there is not now, nor will there ever be, any kind of copyright for whatever I am saying. I have no claims on this.
❦❦❦
निष्पर्ण तरूच्या वरती
कावळा ध्यान ते धरतो
रणरणत्या तप्त दुपारी
निष्पर्ण तरू मोहरतो
भय व्याकूळ झळा पांघरती
निष्पर्ण तरूची छाया
एकाक्ष कावळा कधीचा
ध्यानस्थ उसासे भरतो
ओकून काहिली मित्र
चूपचाप लयाला गेला
अंधार पसरता अवघा
निष्पर्ण तरू घाबरला
अलक्ष्‍य काकध्वनी तो
सतत सुखाने उठतो
करकरीत शांतता भंगे
तडकत नभाशी जाते
निष्पर्ण तरूच्या वरती
काळोख्या नभांच्या मागे
ती शुभ्र कोर उगवते
त्या शीतल चांदण्यांसंगे
निष्पर्ण तरूच्या वरती
कावळा फड फड फड फडतो
दिगंत दिशाहीन उडतो
निष्पर्ण तरूच्या वरती...
------------------------------------------------------------------------
युजी कृष्‍णमूर्तीनी केलेलं एकूण बोलणं ऐकल्यानंतर युजींची प्रतिमा व त्यांना ऐकणारा यांच्या सरमिसळीतून काही शब्द बाहेर पडले ते म्हणजे ही कविता. ही कविता केलेली नाही, तरीही मला आतल्या आत जाणणारं काहीतरी मुद्दाम भकास प्रतिमांच्या वापरातून व्यक्त करण्‍याचा प्रयत्न आहे. भकास प्रतिमा यासाठी की युजींचं सगळं बोलणं 'नकार' केंद्रित आहे, त्यातून काही हाती लागतच असेल तर ते स्वत:ला गमावून बसल्यावर, एक-एक जुनी संकल्पना आणि आपल्यातील संकल्पना निर्माण करणारी यंत्रणा भग्न झाल्यानंतर. आधीच्या आपण जमवलेल्या, आपलं अस्तित्व सजवण्‍यासाठी इथेतिथे मांडलेल्या संकल्पनांच्या मूर्ती युजी एक-एक करुन फोडत जातात, मनाला त्याच्या उपजत स्वभावाप्रमाणे फुटणारी प्रत्येक पालवी जाळून टाकतात - तेव्हा‍ आपला निष्पर्ण वृक्ष उभा रहातो, सगळी हिरवळ झडून गेलेला - किर्रर्र उन्हात झाडाला आग लाऊन ते झाड अर्धमुर्धं जाळून टाकल्यानंतर जेव्हा तो मागे राहून जाणारा गंध येतो त्यावेळी युजींच्या रुपातील कावळा पिंडावर उतरतो. म्हणून पहिल्या चार ओळी.
युजींना ऐकत, वाचत रहाण्‍यातून जुन्या स्वभावाप्रमाणे मनात कसल्याही संकल्पना मांडून पहाण्याचीही भीती वाटू लागते आणि दरक्षणी वाटत रहाते म्हणून भय व्याकूळ झळा झाड अर्धवट जळून गेल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं असेल त्यावर निष्पर्ण तरुची छाया पांघरतात. काहिली ओकणारा 'मित्र' हे युजीच, कारण There is no difference in my talking & grunting of a pig or barking of a dog.. This is a Dog Barking, All doctors should be shot on site & at site, Every cell in human organism is selfish to its core, As long as you seek happiness, so long you will remain unhappy, You don't eat food, you put ideas in your stomach - eat anything - eat mud, saw dust, don't ask what is right food हे उदाहरणादाखल आणि असेच असंख्‍य निखारे वाक्यावाक्यातून फेकणारे युजी त्यांचं डोकं फिरलंय म्हणून असं बोलत नव्हते - हेच जळजळीत सत्य आहे. पण ते आपल्यात भिनल्यानंतर आपण तोच जुना माणूस राहू शकत नाही. हाडांच्या, पेशींच्या आतपर्यंत ते घुसत जातं - This is mutation. युजी कितीही दाहक बोलत असले तरी त्यांनी उगाच कुठलंतरी थोतांड उभं करुन हंगामा माजवला नाही. ऐकायचंय तर निमुटपणे जसं सांगतोय तसं ऐका नाहीतर उठा आणि निघा, पुन्हा परत येऊसुद्धा नका - हे conviction त्यांच्याकडं होतं. एक प्रश्न विचारल्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाच जाणार आहे, तिसराही, चौथाही आणि पाचवाही.. हजारावासुद्धा. जीवनाच्या सर्व अंगांमध्‍ये हे का घडतं आणि सततच घडत रहातं तर 'विचार' ही शेंडाबुडखा नसलेली process आहे, ती अखंड चालूच रहाणार आहे, पण ही प्रोसेस ज्या यंत्रणेत चालते त्या मानवी शरीरालाही तिच्यासोबत फरफटत नेते. विचार नेहमी कसल्यातरी 'अनंतत्वाच्या' दिशेने हवेत फेटा उडावा तसा सतत जात असतो - हे 'अनंतत्व' एक भास आहे, जो मरेपर्यंत थांबत नाही. ज्ञान असं वेगळं अस्तित्त्वात नसतंच, ज्यापर्यंत आपण कधीतरी का होईना पोहोचू शकू, फक्त तशी आशा असते so we live in hope & die in hope. या सगळ्या नकारार्थी भडीमारात कधीतरी आपण एकाक्ष होतो, युजींच्या मूळ आशयावर केंद्रीत होतो म्हणून एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो. पुढच्या तीन चार कडव्यांत 'नकारात्मकतेतूनही' दिसू शकणार्‍या कोर, चांदणे वगैरे प्रतिमांतून as it is reality मध्‍ये उतरल्याचा संकेत केला आहे; पण ही कोर, चांदणं मनानं हार स्वीकारल्यानंतर पर्याय नाही म्हणून स्वत:चीच काढलेली कोरडी समज नाही, तो तरु निष्पर्ण झाला तरी मरत नाही, तो तसाच उभा असतो. सगळ्या पातळ्यांवरील सगळी उचकपाचक संपल्यानंतर 'फोकस' किंवा आपल्या अवधानाला 'शरीर' या पैलूच्या अगदी तळाशी, गुदमरा होईल इतपत खोलवर (पण फक्त शरीर म्हणजे शरीरच, पुन्हा इथे मंतव्यांना संधी नाही) घुसावं लागतं आणि तिथे तळ गाठला की शरीराच्या प्रत्येक पेशीचा प्रॅक्टीकली, व्हिजीब्ली स्फोट व्हायला लागतो This is starting of mutation process (in fact reason behind expression of these odd words is I am at the moment going through it & anybody over here interested in these affairs can have chance to see all these things in the making because I don't know how I will be after whole this thing completes its natural course.. Its speeding day by day & I am literally collapsing now & then when there is scope for this thing to happen in my daily routine ). या कडव्यांतील आशय मनात उमटून मनाचा वापर 'साऊंडिंग बोर्ड' प्रमाणे प्रतिध्‍वनित व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. तो व्यक्तीपरत्वे वेगळा असेल, हे ओघानं आलंच. या सगळ्या पार्श्वभूमीवर वर लिहिलेल्या इंग्रजी अवतरणांची संगती कदाचित लागेल. पुढे काय होतं? तर ते फक्त कावळा जसा उतरला आणि बसला तसाच, उडताना पंख फडफड करतो आणि सहज दिगंताच्या दिशेने झेप घेतो..There remains just simply living as it is.
मला हे नीट मांडता आलेलं नाही, पण असोच.

( पूर्वप्रकाशित, मिपा )

७ जून, २०१२

तुम इक गोरख धंदा हो


नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्‍या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्‍टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्‍टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्‍टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्‍या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्‍टींमध्‍ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्‍टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्‍ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्‍याच खाणाखूणा. काल शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्‍ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या.



कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा
तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा
गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन
किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा

हो भी नहीं और हर जा हो
हो भी नहीं और हर जा हो
तुम इक गोरख धंदा हो

हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है
हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है?
तुम इक गोरख धंदा हो

तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता
मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है
तुम इक गोरख धंदा हो

जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं
फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना
तुम इक गोरख धंदा हो

कोई फत में तुम्हारी खो गया है
उसी खोए हुए को कुछ मिला है
न बुतखाने ना काबे में मिला है
मगर टूटे हुए दिल में मिला है
अदम बनकर कहीं तु छूप गया है
कहीं तू हस्त बनकर आ गया है
नहीं है तू तो फिर इनकार कैसा
नफिली तेरे होने का पता है
मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती
अगर वो तू नहीं है तो क्या है?
नहीं आया खयालों में अगर तू
तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है
तुम इक गोरख धंदा हो

हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो?
हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो
अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ
जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ
फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं
छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं
छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम
जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम
बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम
जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम
हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा
हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम
ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं
हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम
तुम इक गोरख धंदा हो
दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है
एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है
कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है
खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है
रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है
दे के तदबीर के पंछी को उडाने तूने
दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है
कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है
लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे
नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है
ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है?
जुर्म आदम ने किया और सजा बेटों को
अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है
दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है
अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है
तुम एक गोरख धंदा हो
नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो
कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो
जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो
खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई,
तूर ही बढके तजल्ली से जला देते हो
नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील
खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो
चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं
नूर याकूब की आंखो का बुझा देते हो
दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे
आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो
जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई
बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो
खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर
खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो
अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है
अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो
कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो,
जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो,
जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो,
सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो,
ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो!
तुम इक गोरख धंदा हो
जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा
फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा
चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर
तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा
किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को
खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा
दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा
हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत
मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा
कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर
है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा
ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन
इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा
तुम इक गोरख धंदा हो
राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं
वही हालात और खयालात में अनबन देखूं
बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की
ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं
एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने
कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं
कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां
कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं
कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़
कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं
खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे
कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं
जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़
रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं
कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के
और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं
रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है
मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र
तुम ये कहते हो तेरा क्या है?
तुम इक गोरख धंदा हो

२० मे, २०१२

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह


गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे  ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी  सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. मंटोंबद्दल मराठी साहित्यिक राजन खान यांची लोकसत्ताने छापलेली ही मुलाखत वाचली, माझ्या जुन्या पेपरमध्ये आमचे  'न्यूजरूम इंचार्ज' असलेल्या, अजित वडनेरकर या भोपाली बाबूंचा मूळ हिंदीत लिहिलेला, पण अनुवादकाच्या शब्दकृपेकरुन अंमळ असह्य मराठीत अनुवादित केलेला हा लेख वाचला - असं बरंच काही  वाचलं (अर्थात ऑफिसची बॅण्डविड्थ जाळून ;-) ).
आणि सप्ताहांत होता जुन्या इंदूरमध्ये फिरत असताना एका जुन्यापुराण्या पुस्तकांच्या दुकानात मंटोंच्या आठ कथा असलेल्या  'गर्भ बीज' या  संग्रहावर अचानक नजर पडली तेव्हा वाटलं - हे खरोखर मस्त झालं ! मकबूल फिदा हुसेन यांनी बोधचिन्ह काढून दिलेल्या 'वाणी प्रकाशन' ने काढलेला हा संग्रह मस्त आहे. म्हणजे वाणी प्रकाशनचा लोगो मकबूल फिदा हुसेन यांनी काढलाय हे मला माहित नव्हतंच. पुस्तकाच्या लोगोखाली एक विशेष ओळ आहे : वाणी प्रकाशन का लोगो विख्यात चित्रकार मकबूल फिदा हुसेन की कूची से - म्हटलं बरंय च्यायला - लोगो मकबूल फिदा हुसेनने काढून दिला नसता आणि दुसर्‍याच अविख्यात चित्रकाराने काढला असता तर या लोकांनी त्याचं नाव लोगोखाली टाकलं असतं का? हा एक जोकच झाला. असो.
उर्दू-हिंदी शब्द देवनागरी लिपित कोणा जनाब मुशर्रफ आलम जौकींनी लिहिलेली प्रस्तावना वाचली तेव्हा वाटलं आज चार पाच  १२०/३०० पाने आणावी लागणार - मंटो या लेखकाचं एवढं खानदानी, रसरशीत उर्दू नुसते आवंढे गिळत वाचत पडण्यात काय मजा? पुरेशी रसनिष्पत्ती झाली तेव्हा वाचायला जी सुरुवात केली ती संग्रहातली आठवी कथा संपली तेव्हाच पुस्तक खाली ठेवलं  - आणि आज आत्ता हा निवांत पुस्तक परिचयः




है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे
कहते है की गालिब का है अंदाजे-बयां और

गालिब का अंदाजे - बयां और था, सब जानते है. लेकीन सच पूछें, तो यही बात मंटो पर भी लागू होती है. दुनिया में सुखनवरों की कमी नहीं है. एक से बढकर एक. लेकीन मंटो का अंदाजे-बयां शायद सब से अलग. मंटो इंसानी कमजोरियों से वाकिफ है. छोटी-सी उम्र में मर जाने बावजूद जो दुनिया मंटो ने अपने मुशाहिदे से देखी थी, वो शायद कम लोगों ने देखी थी. इंसानी मनोविज्ञान की जो पकड मंटो में थी, शायद अभी भी ये पकड बडे-बडे कथाकारों में नजर नहीं आयेगी. जैसे मंटो की 'पटाने' या 'फंसाने' के बारे में आम राय - 'निनावे प्रतिशत लडकियां मर्दानी-शराफत से नहीं काबू में आतीं. उन्हें बेढब बाते ज्यादा पसंद है.' या फिर 'काली औरतों के मुकाबले आप गोरी सुंदर महिलाओं को ज्यादा आसानी से 'फांस' सकते है.'
लेकीन प्रत्येक कहानी के साथ एक चीज 'कॉमन' है. मंटो शरीफ आदमी था. इसलिये जब भी, कहीं भी मंटो अपना चरित्र रचने की कोशिश करता है, हम एक बेहद शरीफ आदमी से रु-ब-रु होते हैं. क्या यह मंटो की कमी थी? जहां उसके चरित्र एक से बढकर एक आवार्गियां, शरारतें, बदमाशियां या 'हरामीपन' करते है, वहां मंटो का अपने चरित्र के बारे में यह शरीफाना रवैया कुछ ज्यादा 'हजम' नहीं होता. किसी तवायफ को वह बहन कह रहा है. वह अपनी लेखनी या 'स्क्रिप्ट राईटिंग' में व्यस्त रहता है और दुसरे कमरे में, बकौल इस्मत, लिहाफ में हाथी फुदक रहा है. लेकीन मंटो की शराफत यह... कि बस, सारा कुछ कहानी लिखने तक सिमित. लेकिन यही शरीफ मंटो जब अपने नायाब चरित्रों के कपडे उतारता है तो अक्ल हैरान रह जाती है. मंटो के बाद से आज तक शायद किसी भी भारतीय साहित्य में इकठ्ठे इतने चरित्र नहीं आयें होंगे, जितने मंटो ने रचे. हर कहानी में एक नया चरित्र. नया मनोविज्ञान, नयी औरत और मंटो की नई भाषा.. कभी-कभी मंटो मुझे चेखव, मोपासां जैसे रचनाकारों से भी मीलों आगे नजर आता है. क्योंकी कहानी कहने की जो कला या चरित्रों को कमाल के साथ तहरीर में उतारने का जो फन मंटो के पास था, वो शायद न चेखव में था, न मोपासां में. मंटो चरित्रों के मनोविज्ञान से गुजरते हुए जब कसाई की तरह बकरे (कहानी) की 'बोटी-बोटी' अलग करता है तो आंखे हैरान रह जाती है. शायद अपने चरित्र को इतनी इमानदारी से देखने और निभाने की कला विदेशी कथाकारों में भी नहीं. जरुरत इस बात की भी है कि मंटो का समूचा साहित्य अंग्रेजी में अनुवाद होकर विश्व-बाजार में पहुंचे, जहां उसका सही मूल्यांकन हो सके.
इस संगृह की कहानियां पाठकों को 'निर्ममता' ही हद तक रुलायेंगी, चौकायेंगी. इन कहानियों का अनुवाद नबी अहमद ने किया है.
- मुशर्रफ आलम जौकी
(प्रस्तावनेतून)

'बाबू गोपीनाथ', 'मेरा नाम राधा है', ' गर्भ-बीज', 'पीरन', 'खूरशीट, 'बासित', 'शारदा' या एकूण आठ कथा संग्रहात आहेत - त्यापैकी पहिल्या 'बाबू गोपीनाथ' या कथेत मंटोंनी बाबू गोपीनाथ हे जगावेगळे व्यक्तिचित्र रंगवले आहे. कथाकार मंटोंकडे  या बाबू गोपीनाथला घेऊन येणारे अब्दुर्रहीम सैंडो हे मंटोंचेच पात्र बाबू गोपीनाथ आणि मंटोंची एकमेकांना अशी ओळख करुन देते - 'मंटो साहब! बाबू गोपिनाथ से मिलिये. बाबू गोपीनाथ तुम हिन्दुस्तान के नंबर वन राईटर से हाथ मिला रहे हो. लिखता है तो धडन तख्ता हो जाता है. लोगों को ऐसी-ऐसी  'कंटिन्यूटली' मिलाता है की तबीयत साफ हो जाती है - हे मंटोंबद्दल. आणि बाबू गोपिनाथची ओळख म्हणजे - 'आप है बाबू गोपिनाथ. बडे खाना खराब. लाहोर से झक मारते-मारते बम्बई तशरीफ लाए है. साथ कश्मीर की एक कबूतरी है. नंबर वन बेवकूफ हो सकता है तो वो आप है. लोग उनको मस्का लगाकर रुपया बटोरते है. मै सिर्फ बाते कर के उन से हर रोज पोल्सन बटर के दो पैकेट वसूल करता हूं.'
  
बापजाद्याची दहा लाख रुपयांची दौलत गाठीशी आहे म्हणून श्रीमंत असलेला हा बाबू गोपीनाथ लाहोरमधल्या कंजूस बनियाचा मुलगा आहे - तो त्याचे अंगवस्त्र लाहोरहून सोबत घेऊन मुंबईत आला आहे. याचा मूळ स्वभाव 'पीर का मजार' आणि 'रंडी का कोठा' या दोन जागी मन रमणारा आहे. बाबू गोपीनाथच्या 'दिल को सुकून' देणार्‍या या दोनच जागा आहेत, तो म्हणतो - 'मुझे उनसे (पीर का मजार आणि रंडी का कोठा) कुछ मुहब्बत सी हो गई है. मै उनके बिना नहीं रह सकता. मैने सोच रखा है कि जब मेरी दौलत बिल्कुल खत्म हो जायेगी तो किसी तकिये में जा बैठूंगा. रंडी का कोठा और पीर का मजार. ये दो जगहें हैं जहां मेरे दिल को सुकून मिलता है. रंडी का कोठा तो छूट जायेगा. इसलिये की जेब खाली होनेवाली है. लेकीन हिन्दुस्तान में हजारों पीर है. किसी एक की मजार में चला जाऊंगा.'
हा बाबू गोपीनाथ जेव्हा पूर्ण वाचून संपला तेव्हा 'प्रेमाची परमावधी' काय असते हे मंटोंच्या लेखणीतून उतरलेल्या या बाबू गोपीनाथने मला शिकवलं. हा बाबू गोपीनाथ, त्याने जिच्यावर (जीनत ) प्रेम केलं तिची, स्वत: च्या उधळ्या, बेवकूफ, नालायक स्वभावामुळे कंगाल, फकीर झाल्यानंतर परवड होऊ नये यासाठी तिला एक चांगला आश्रयदाता स्वतः शोधून देण्यासाठी मुंबईपर्यंत आला आहे.
 या बाबू गोपीनाथबद्दल शब्दांत काहीही लिहिलं तरी ते फिकं ठरेल. हा बाबू गोपीनाथ नाहीच, बाबू गोपीनाथच्या पात्रातून 'प्रेम' हे मूल्य in all its extremities वाहात आलेलं  आहे - त्याबद्दल काहीच लिहिता येणारं नाही, ते  स्वतः जगण्याची गोष्ट आहे.

'मेरा नाम राधा है' या कथेत 'राधा' या फिल्मी दुनियेतील अदाकाराचं 'राजकिशोर' या त्याकाळच्या सुपरस्टार, विवाहित, गांधीवादी, दानशूर, फिल्मी दुनियेत असूनही 'लंगोट का पक्का' असलेल्या या नटावर प्रेम जडलं आहे. ही राधा सादिकची ( स्वतः मंटोच ! दुसरं कोण) सुद्धा   मैत्रिण आहे. पण व्यक्तिगत मंटोंना का कोण जाणे, नजरेत न आलेल्या गोष्टीमुळं हा राजकिशोर उगाच आवडत नाही. ही नवागत अभिनेत्री राधा मात्र त्याच्यावर प्रेम करते, ती राजकिशोरला 'तु मला बहिण मानू नकोस' असं सगळ्या पब्लिक समोर म्हणते. राजकिशोरवर फिदा असलेली ही राधा आजारी पडते तेव्हा राजकिशोर त्याच्या बायकोला घेऊन राधाकडे येऊन तिच्याकडून राखी बांधून घेतो, पण परत जाताना त्याची पिशवी राधाकडेच विसरते. राखी बांधून झाल्यानंतर ती विसरलेली पिशवी घेण्यासाठी परत आल्यानंतर राजकिशोरला राखी बांधून झाल्यानंतरही त्याच्या 'लंगोट का पक्का' असण्याची सत्वपरिक्षा घेते, आणि त्या दोघात जे घडतं ते मंटोंनी 'कंटिन्यूटली';-) कसं रंगवलंय ते स्वतः वाचून पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही.


'गर्भ- बीज' या कथेत मंटोंनी पुन्हा एकदा 'बाबू गोपीनाथ, आणि ' मेरा नाम राधा है' मधल्या 'सादिक' च्याच भाव-भावना, त्यांच्या जगण्याचा in their all extremities असा काही आडवातिडवा पट उभा केला आहे की 'बाबू गोपीनाथ', 'सादिक' हे सगळं मंटोंच्याच लेखन गर्भातून उद्भवलेलं बीज आहे, ती वेगळी माणसं नाहीत, पण केवळ 'मंटो या लेखकाची कल्पना' असं म्हणावं एवढीही लेचीपेची दिसतील अशी मंटोंनी रंगवलेली नाहीत. गर्भ बीज या कथेत सादिक या मंटोंच्याच पात्राने मंटोंशी संवाद साधला आहे आणि आणखी बरीच पात्रे त्यात उभी केली आहेत, ज्यांना मी तरी 'कंटिन्यूटली' पाहू शकलेलो नाही, एखाद्या गोष्टीचं बीज समजलं असेल तर, फार तपशीलात शिरून समजून घेण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी या कथेबद्दल इथं तपशीलवार लिहू शकत नाही.

'पीरन' या कथेत मंटोंनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील मजेदार संबंधाचा पट उभा केला आहे. बृजमोहन मंटोंकडून पैसे उसने घेऊन दर रविवारी पीरनला भेटायला जातो. हा बृजमोहन पीरनचा प्रियकर असला तरी पीरनच्या मते 'निकम्मा' आहे, आणि बृजमोहनच्या मते पीरन 'मनहूस' आहे - कारण बृजमोहनने कितीही चांगली नोकरी मिळवली आणि पुढच्या रविवारी पीरनची भेट घेतली रे घेतली की सोमवारी त्याला कामावरून काढून टाकण्यात येतं. हे असं अनेकदा झाल्यानं बृजमोहन पीरनला 'मनहूस औरत' म्हणतो, पण तो तिच्या भेटीला जाणं टाळू शकत नाही. बृजमोहनला एक चांगल्या पगाराची   नोकरी मिळते तेव्हा अचानक पीरनचं पत्र येऊन धडकतं की 'रविवारी भेटायला ये, फार महत्वाचं काम आहे.' ह्या बलेची भेट घेतल्यानंतर नेहमीच नोकरी जाण्याच्या ' सिलसिल्यामुळं' बृजमोहन कावतो आणि पीरनची टाळताच न येणारी भेट घेतल्यानंतर नोकरी जाणारच, त्यापेक्षा स्वतःच राजीनामा द्यावा हे ठरवून पीरनची भेट घेऊन आल्यानंतर त्याच्या सेठकडे स्वतः होऊन राजीनामा सोपवतो त्यानंतर काय होतं हे वाचण्यासारखं आहे. मंटोंची नेहमीची खास ब्रॅण्डेड आतिषबाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाक्यावाक्यात झालेली आहेच हे वेगळे सांगणे नको.

'खूरशीट' या कथेत खूरशीट आणि सरदार जोरावरसिंगमधील प्रणयसंबंधांचा पट आहे. ही कथा बहुतेक मंटोंच्या दिल्लीतील वास्तव्यात घडलेली असावी. या कथेत मंटोंचा नेहमीचा दारूगोळा, शैलीचा नंगानाच नेहमीप्रमाणे असला तरी extreme म्हणता येईल असं मला काही आढळलं नाही - मला ही आपली नेहमीसारखीच एक साधी कथा वाटली. एक विवाहित बाई, तिचा नवरा, खुरशीटचं गायन आवडतं म्हणून तिच्या गाण्यावर  (आणि खूरशीटवरही हे ओघानं आलंच ;-) )  फिदा असणारा त्याचा एक सरदार दोस्त - शेवटी खूरशीट आणि हा सरदार लग्न करुन मुंबईत हनिमूनला येऊन मुंबईत स्थलांतरित झालेल्या मंटो पती- पत्नीला 'ताजमहल' हॉटेलमध्ये भेटायला बोलावतो. आणि ती दिल्लीची विवाहीत खूरशीटच सरदाराची आता बायको झाल्याचं मंटो पती-पत्नींना कळतं तेव्हा खूरशीट आणि सरदार जोरावरची 'रुख्सत' (निरोप) न घेताही मंटो पती-पत्नी ताजमधील खोलीबाहेर पडतात. This is not Manto!

'बासित' या कथेत लग्नाला राजी नसणारा, पण आईच्या आग्रहामुळे एकदाचे चिडून लग्न उरकून टाकणारा एक बासित रंगवला आहे. बासित लग्नाला तयार होतो तर तिकडे त्याची होणारी सासू लग्न थोडे पुढे ढकलण्याच्या मनःस्थितीत असते. शेवटी बासीतची आई अल्टीमेटम देते तेव्हा बासित आणि सईदा यांचं लग्न होतं. बासितची नई दुल्हन सईदा मात्र लग्न होऊन आल्यानंतर सतत कुठल्यातरी गोष्टीला घाबरलेली असते. बासित तिला मोकळेपणाने सगळ्या गोष्टी विचारतो पण ती काहीही स्पष्ट सांगत नाही. शेवटी सईदा बाथरूम मध्ये गेलेली असताना नालीतून रक्ताचा ओघळ बाहेर येताना दिसतो. बासितला लग्नासाठी बाध्य करुन सईदाशी लग्न लाऊन दिलेल्या बासीतच्या आईला थेट सईदाचं अर्भक पडलेलं दिसतं आणि ती खलास होते - बासितला समजदार व्हावे लागते. अर्थात कथा मुळातून वाचण्यासारखीच.

'शारदा' या कथेत नजीर हे रंडीबाज पात्र आणि त्याची शारदा या परिस्थितीनं नाडलेल्या, विवाहित पण नवर्‍यानं टाकलेल्या बाईची कुंटणखान्यावर भेट होते. ही शारदा तिच्या 'शकुंतला' या कुंटणखान्यापर्यंत पोहोचलेल्या तिच्या बहिणीला परत घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. ही शकुंतलाच कुंटणखान्यावर नजीरला 'पेश' केलेली असते पण ती या प्रकारात अगदी आश्रमहरिणी असते.  नजीर तिला काही करु शकत नाही. पण बहिणीला कुंटणखान्यातून परत न्यायला आलेल्या, विवाहित तरीही पती सोडून गेलेल्या शारदाचं   आणि नजीरचं भलतं म्हणजे भलतंच जमतं. पण पुढे शारदा तिच्या शकुंतला या बहिणीला त्या नरकातून काढून रीतीप्रमाणे विवाह वगैर लाऊन देण्यासाठी परत जयपूरला घेऊन जाते. नजीर शारदाच्या मनातून जात नाही. ती जयपूरवरून त्याला पत्रे पाठवते.      फाळणीच्या वेळी नजीरची बायको पाकिस्तानात पुढे निघून जाते तेव्हा नजीर आणि शारदाचा एकत्र रहाण्याचा मार्ग मोकळा होतो. ते महिनाभर एकत्र रहातातही. पण नजीरच्या मनावर त्या कुंटणखान्यात दर्शन झालेल्या शारदाचं चित्र पक्कं आहे - तो तिला या आत्ताच्या घरी सोबत रहाणार्‍या शारदाला बायकोच्या स्थानी  पाहू शकत नाही - कंटाळतो. पण नजीरच्या प्रेमात पूरेपूर रंगलेली शारदा मात्र नजीरच्या बायकोचीच भूमिका निभावत रहाते. आणि नजीर खरोखर कंटाळल्याचं तिच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या आवडत्या सिगारेटचा ब्रॅण्ड टेबलावर ठेऊन, नजीरकडून दमडीही न घेता, शब्दाचाही निरोप न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जाते...


❖❖❖


कथासंग्रह संपला पण या आठ कथांतून अंगावर आलेल्या मंटोनं मात्र झपाटलंय. कथांचं सोडा, मंटोबद्दलच खूप लिहावं वाटतंय, पण पुन्हा कधीतरी..

१४ मे, २०१२

विस्‍टिरिया लॉज - 2

आमच्या पाहुण्‍यांना निरोप दिल्यानंतर काही वेळ आम्ही शांत बसून राहिलो. बारीक झालेल्या डोळ्यांवर भूवया पाडून नेहमीप्रमाणे त्याचे डोके पुढे काढून होम्स जोरजोराने धूम्रपान करु लागला.
'' तर वॉटसन'' माझ्याकडे अचनाक वळून तो म्हणाला,
''या सगळ्यातून तुला काय कळले?''
''स्कॉट एक्लसच्या गूढाबद्दल मला काहीच समजले नाही''
''पण गुन्ह्याबद्दल?''
''त्या माणसाचे साथीदारही गायब आहेत त्याअर्थी, मी असे म्हणेन की तेदेखील या खूनात सहभागी होते, म्हणूणच ते फरार आहेत''
''एका दृष्‍टीकोनातून हेदेखील शक्य आहे. पण असे असले तरी, त्याच्या दोन नोकरांनी गार्सियाविरुद्ध संगनमत करावे आणि त्याच्याकडे पाहुणा आलेल्या रात्रीच त्याच्यावर हल्ला करावा, हे विचित्र आहे हे तू पण कबूल करशील. गार्सियावर हल्ला करायचा असता तर हा नेमका दिवस सोडून तो कधीही त्यांच्याच तावडीत होता ना?''
''मग ते फरार का झाले?''
''अगदी अचूक! ते फरार का झाले? हा एक मोठा मुद्दा आहेच. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे आपला अशील स्कॉट एक्लसचा अनाकलनीय अनुभव. या दोन्ही ठळक मुद्यांना सांधणारे विश्लेषण देता येणं हे मानवी बुद्धीमत्तेला शक्य आहे काय? शब्दांचा विचित्र वापर करुन लिहिलेली ती गूढ चिठी विचारात घ्‍यायचीच असेल, तर ती तात्पुरते गृहितक म्हणूनच विचारात घेण्‍याच्या लायकीची असेल? आपल्याला कळणारी नवी तथ्‍ये, आपोआप आपल्या गृहितकाच्या साच्यात बसली तर आपले गृहितक हळूहळू या प्रकरणाची उकल करु शकेल.''
''आपले गृहितक आहे तरी काय?''
त्याच्या खुर्चीत मागे झुकून होम्सच्या डोळ्यांची मुद्रा मंगोल झाली.
''या स्कॉट एक्लसची कुणीतरी मुद्दाम मजा घेतलीय, हे अशक्य आहे हे तुलाही जाणवत असेल. घटनाक्रमातून दिसते त्याप्रमाणे पुढे गंभीर घटना घडणार होत्या आणि स्कॉट एक्लसला विस्‍टिरिया लॉजमध्‍ये घेऊन जाण्‍याचा त्यांच्याशी संबंध आहे.''
''पण कसला संबंध संभवतो?''
''आपण यातल्या प्रत्येक मुद्यावर विचार करु. तो तरुण स्पॅनियार्ड आणि स्कॉट एक्लसच्या विचित्र आणि अचानक झालेल्या ओळखीमध्‍ये काहीतरी खटकतंय. या स्पॅनियार्डनेच मैत्रीसाठी पुढाकार घेतला. स्कॉट एक्लसची त्याच्याशी ओळख झाल्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी त्याने लंडनच्या दुसर्‍या टोकाला जाऊन स्कॉट एक्लसची भेट घेतली, आणि त्याला इशरला घेऊन येईपर्यंत त्याने एक्लसशी सतत संपर्क ठेवला. आता, त्याला या एक्लसकडून काय मिळण्यासारखे होते? मला त्या माणसात दम दिसत नाही. तो तेवढा बुद्धीमानही दिसत नाही - हजरजबाबी लॅटीन माणसाचा मित्र होण्‍याएवढा तरी नाहीच. मग गार्सियाला मिळू शकणार्‍या इतर लोकांमधून यालाच का बरे निवडण्‍यात आले? हेतू तडीस जाईल असे काय या स्कॉट एक्लसमध्‍ये आहे? त्याच्यामध्‍ये वेगळा उठून दिसणारा गुण आहे का? मी म्हणतो असा गुण स्कॉट एक्लसमध्‍ये आहे. खानदानी
ब्रिटीश अदबशीरपणाचा तो उत्तम नमुना आहे, आणि हाच माणूस दुसर्‍या ब्रिटीश माणसावर छाप पाडू शकतो. स्कॉट एक्लसचे कथन कितीतरी विचित्र होते तरी या दोन अधिकार्‍यांनी चकार शब्दाने स्कॉट एक्लसला प्रश्न विचारला नाही, हे तू पाहिले असशीलच.''
''पण तो कशाचा साक्षीदार बनणार होता?''
''घटना जशा घडल्या त्यानुसार तो कशाचाच साक्षीदार बनला नाही. त्या जशा योजल्या होत्या तशा त्या घडल्याच नाहीत. हे प्रकरण मला दिसते ते हे असे!''
''तो alibi ठरु शकला असता, असे काही आहे का?''
''अगदी अचूक! वॉटसन, तो निश्चितच एक alibi ठरु शकला असता. केवळ युक्तीवादासाठी आपण असं मानू की विस्‍टिरिया लॉजमधले लोक संगनमत करुन कसलातरी बनाव रचत होते. हा बनाव, मग तो कशाचाही
असो, एक वाजण्यापूर्वीच तडीस जाण्‍याची योजना होती. काही घड्याळांचे काटे फिरवून त्यांनी स्कॉट एक्लसला त्याला वाटले त्यापेक्षा कितीतरी आधीच झोपी घातले असेल हे अगदी सहज शक्य आहे, पण काहीही झालेले असले तरी, बारापेक्षा जास्त वाजलेले नाहीत हे सांगायला जाणारा गार्सियाच होता हेही शक्य आहेच. गार्सियाला बाहेर जाऊन जे काय करायचे होते ते करुन उल्लेख केलेल्या वेळेपर्यंत तो परत येऊ शकला असता तर कसल्याही गंभीर आरोपावर त्याच्याकडे देण्यासारखी त्याच्याकडे जबरदस्त तोड होती. त्याच्याकडे कोणत्याही न्यायालयासमोर शपथेवर सांगू शकणारा एक इंग्लिश माणूस होता की गार्सिया रात्रभर घराच्या बाहेरच पडला नाही. वाईटात वाईट घडले तर संरक्षण म्हणून स्कॉट एक्लसच्या खांद्यावर बंदूक ठेवता आली असती.''
''होय, हे लक्षात आले, पण फरार झालेल्या इतरांबद्दल काय?''
''अद्याप वास्तविकता काय ते आपल्याला काहीच माहित नाही, पण यात फार मोठ्या अडचणी असतील असे मला वाटत नाही. तरीही, पूर्ण माहिती न घेताच युक्तीवाद करीत सुटणे चूक आहे. असे केले तर ती माहिती
आपण आपल्या गृहितकाशी जुळण्‍यासाठी उगाच त्यात फेरफार करतो.''
''आणि ती मध्‍येच आलेली चिठी''
''त्यात काय लिहिलं होतं बरं? आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा - रेसींगसारखं काहीतरी वाटतंय. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा हा एक सुस्पष्‍ट संकेत आहे. मुख्‍य पायर्‍या, पहिला कॉरीडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ - हा कुठेतरी करण्‍यात आलेला निर्देश आहे. या सर्वांच्या मागे आपल्याला कदाचित टाळके सरकलेला नवरा आढळू शकतो. खरोखर हा एक धोकादायक पाठलाग  होता. तसं नसतं तर तिने 'लवकर' हा शब्द लिहिला नसता. ''डी'' हे कदाचित खूण म्हणून.''
''तो माणूस स्पॅनियार्ड होता, ते डी डोलोरेसमधले डी आहे, स्पेनमध्‍ये आढळणारे सर्वसामान्य नाव!''
''उत्तम, वॉटसन, फारच उत्तम! पण हे अशक्य आहे. एक स्पॅनियार्ड दुसर्‍या स्पॅनियार्डला स्पॅनिशमध्‍येच लिहील ना! या चिठीचा जो कुणी लेखक असेल तो निश्चितच इंग्लिश आहे. असो तर. तो हुशार इन्स्पेक्‍टर
आपल्याकडे परत येईपर्यंत आपण थंड बसावे हे उत्तम. दरम्यान काही तासांसाठी तरी आळसटलेल्या वातावरणातून बाहेर पडल्याबद्दल, आपले नशीब जोरावर आहे असे मानू.
सरे पोलीस ठाण्याचा अमलदार येण्‍यापूर्वीच होम्सच्या तारेचे उत्तर आले होते. होम्सने ते वाचले आणि त्याच्या वहीत ठेवण्‍यापूर्वी माझा आशाळभूत झालेला चेहेरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
''आपण बड्या वर्तुळात शिरत आहोत,'' तो म्हणाला.
ती तार म्हणजे नावे आणि पत्त्यांची यादी होती:
लॉर्ड हॅरिंगबी, दि डिंगल; सर जॉर्ज फॉलॉइट, ऑक्झशॉट टॉवर्स; मिस्‍टर हेन्स हेन्स, जे. पी, पर्डी प्लेस; मिस्टर जेम्स बेकर विल्यम्स, फॉर्टन ओल्‍ड हॉल; मिस्‍टर हेन्‍डरसन, हाय गॅबल, रेव्हरंड जोशुआ स्टोन, नेथर
वॉल्सलिंग.
''आपली कारवाई मर्यादीत वर्तुळात ठेवण्‍याचा हा अत्यंत सूस्पष्‍ट मार्ग आहे,'' होम्स म्हणाला.
''बेयन्सच्या पोलीसी खाक्याच्या मनाने आधीच अशी काहीतरी योजना वापरली असेल यात संशय नाही.''
''मला नीटसं कळलं नाही.''
''हे बघ मित्रा, आधीच आपण या निष्‍कर्षावर आलेलो आहोत की गार्सियाला जेवताना मिळालेला संदेश म्हणजे भेट किंवा भेटीचे नियोजन होते. आता, त्यातून पक्का अर्थ कळतो तो अचूक असेल तर, गुप्तता ठेवण्यासाठी, जाणार्‍याला मुख्‍य पायर्‍या चढून कॉरीडॉरमधला सातवा दरवाजा शोधावा लागणार, मग घर खूपच मोठे आहे हे अगदी उघड आहे. अगदी तसेच हेही निश्चित आहे की हे घर ऑक्झशॉटपासून एक किंवा दोन  मैलांच्या आत आहे, कारण गार्सिया त्याच दिशेने चालत होता आणि, मी तथ्‍ये जशी पहातो त्याप्रमाणे, तो विस्‍टिरिया लॉजमध्‍ये alibi ची पाठराखण मिळवण्यासाठी परत येणार होता, जे त्याला एक वाजेपर्यंतच मिळू शकणार होते. ऑक्झशॉटच्या जवळील घरांची संख्‍या मर्यादित असायलाच हवी, म्हणून मी स्कॉट एक्लसने नमूद केलेल्या एजंटला तार पाठवून त्यांची यादी हस्तगत करण्‍याची सुस्पष्‍ट पद्धत वापरली. ती या तारेत आहे
आणि आपल्या गुंत्याची उकल करणारे टोक निश्चित त्यांत असायला हवे.''
इशरमधील त्या सुंदर सरे गावात इन्स्पेक्टर बेयन्सला सोबत घेऊन पोहोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले.
होम्स आणि मी मुक्काम पडणार या अंदाजानेच निघालो होतो आणि बुल येथे झोपण्‍याची मस्त सोय केली होती. शेवटी डिटेक्टीव्हसोबत आम्ही विस्‍टिरिया लॉजची पाहणी करण्‍यासाठी निघालो. झोंबरा वारा आणि
चेहेर्‍यावर सपकारे मारणारा दमदार पाऊस असलेली ती मार्चमधली थंडगार, किर्रर्र सायंकाळ होती. आम्ही ज्या भयंकर ध्‍येयाकडे निघालो होतो त्यासाठी हे वातावरण अगदीच जुळून आले होते.

2. सॅन पेद्रोचा वाघ


थंडगार, उदास वातावरणातून काही मैल चालल्यानंतर आम्ही एक उंच लाकडी दरवाज्यासमोर पोहोचलो, जो चेस्‍टनट्सच्या पडछाया पडलेल्या रस्त्याच्या तोंडावर उभा होता. वळणा-वळणाच्या, पडछाया पडलेल्या त्या
रस्त्यावरुन आम्ही एका बसक्या, काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तसल्याच काळपट दिसणार्‍या घरासमोर आलो. दरवाज्याकडील डाव्याबाजूस असलेल्या बाहेर उघडणार्‍या खिडकीतून मंद उजेडाची तिरीप पडत होती.
''कॉन्स्‍टेबल आहे बंदोबस्तावर,'' बेयन्स म्हणाला. ''मी खिडकी वाजवतो.'' त्याने गवताचा पट्‍टा ओलांडला आणि खिडकीच्या काचेवर टकटक केली. धूसर काचेतून मला आतला माणूस आगीसमोर ठेवलेल्या खुर्चीतून
धाडकन उठताना अस्पष्‍टसा दिसला, आणि खोलीतून तीव्र आरोळी उठली. लगेच झटकन एक पांढर्‍याफटक, श्वास गुदमरलेल्या पोलीसाने दरवाजा उघडला, त्याच्या थरथरत्या हातात मेणबत्ती हेलकावे खात होती.
''वॉल्टर्स, काय झालंय?'' बेयन्सने जरबदार आवाजात विचारले.
त्या माणसाने हातरुमाल कपाळावरुन फिरवला आणि सुटका झाल्यासारखा श्वास बाहेर टाकला.
''तुम्ही आलात हे बरंच झालं, सर. खूपवेळ झाली सायंकाळ उलटून, आणि माझा तर धीरच सुटत होता.''
''धीर सुटत होता वॉल्टर्स? मनगटात दम असलेला माणूस आहेस असं मला उगाच वाटलं म्हणायचं.''
''आहेच, सर, पण हे रिकामे घर आणि किचनमधली ती विचित्र गोष्‍ट. तुम्ही खिडकी वाजवलीत मला वाटलं, ती बला पुन्हा एकदा आली. ''
''कसली बला आली?''
''भूत, भूतच म्हणायला पाहिजे त्याला. इथं खिडकीत होतं.''
''काय होतं खिडकीत, आणि कधी?''
''आत्ता दोन तासांपूर्वी. अंधार पडत आला होता. मी खुर्चीत वाचत बसलो होतो. माझी नजर वर का गेली ते कळलं नाही, पण पण खिडकीतून एक चेहेरा माझ्यावर रोखला होता. एवढा भयानक चेहेरा, तो नक्की माझ्या
स्वप्नात दिसणार.''
'' छ्‍या:, छ्‍या: वॉल्टर्स, पोलिस-कॉन्स्‍टेबल असे बोलत नसतात.''
''होय, सर, होय; पण मी ते पाहून हादरलो, मग घाबरलोच नाही असं दाखवण्यात काय अर्थ. ते धड पांढरंही नव्हतं सर, ना काळं - मी कधी पाहिलेल्या रंगाचं नव्हतंच ते - शाडूवर दुधाळ पट्‍टे मारल्यासारखा विचित्र रंग होता. आणि त्याचा आकार, तुमच्या चेहेर्‍यापेक्षा नक्कीच दुप्पट मोठा होता, सर. भुकेजलेल्या श्वापदासारखे पांढरे दात, आणि त्या बटबटीत डोळ्यांनी माझ्यावर नजर रोखली होती. शपथ घेऊन सांगतो सर, तिथून ते मागे होऊन निघून गेलं तोपर्यंत मला बोटसुद्धा हलवण्‍याची बुद्धी झाली नाही - माझा श्वास जसा बंदच पडला होता. मी बाहेर झुडूपांमध्‍ये जाऊन आलो, पण ईश्वराची कृपाच तिथं कुणीही नव्हतं.''
''तुला ओळखत नसतो ना मी, वॉल्टर्स, तर तुझ्या नावासमोर मी काळी खूण ठोकली असती असल्या फालतूपणासाठी. भूतच दिसलं तर ड्यूटीवर असलेल्या कॉन्स्‍टेबलने ते पकडता आलं नाही म्हणून देवाचं नाव घेऊ  नये. एकांतामुळे झालेला हा सगळा भासच हा?''
''किमान एवढं तरी सहज उकलायला हवं,'' होम्स त्याच्या हातातील बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. गवताच्या पट्‍ट्याची झर्रकन पहाणी करुन ''होय,'' तो म्हणाला, ''बारा नंबरचा बूट असणार. त्याच्या पायाइतकाच इथून
तिथून भरभक्कम असला तर निश्चितच तो अगडबंब होता असं म्हणायला पाहिजे.''
''गेला कुठे तो?''
''झुडूपं ओलांडून रस्त्यावर उतरून पसार झाला असणार.''
''जाऊ द्या,'' इन्स्पेक्‍टरने गंभीर व करारी चेहेर्‍याने म्हटले, ''तो कुणीही असो, आणि त्याला काहीही हवे असो, आत्ता तो इथून गायब आहे, आणि आपल्याला बर्‍याच गोष्‍टी पहाव्या लागणारेत. आता, श्रीयुत होम्स,
तुमची हरकत नसेल तर, एकदा घरात चक्कर टाकून येऊ.''
विविध बेडरुम आणि बैठकांची बारकाईनं पाहणी करुनही काहीच हाती लागलं नाही. तिथे रहाणार्‍यांनी सोबत थोड्याच वस्तू असाव्यात किंवा काहीही आणलं नसावं, आणि छोट्यातलं छोटं फर्निचर घरासोबतच घेण्‍यात आलेलं दिसतं होतं. मार्क्स आणि कं., हाय हॉलबर्न असा शिक्क्याच्या गाद्यागिराद्या तशाच मागे ठेवलेल्या दिसत होत्या. तार पाठवून आधीच चौकशी करुन झाली होती आणि त्यात मार्क्स यांच्याकडे या ग्राहकाबद्दल तो पैसेवाला होता यापेक्षा काहीही जास्त मिळू शकली नाही. सटरफटर सामान, काही पाईप्स, काही कादंबर्‍या, त्यापैकी दोन स्पॅनिश, जुन्या प्रकारची पीनफायर रिव्हॉल्व्हर, आणि एक गिटार एवढ्या वस्तू तिथल्या जंगम मालमत्तेपैकी होत्या.
''यात काहीच नाही,'' बेयन्सने प्रत्येक खोली तपासताना मेणबत्ती या हातातून त्या हातात हलवत म्हटले, ''पण श्रीयुत होम्स, किचनमध्‍ये काय आहे ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे.''
घराच्या मागच्या बाजूस असलेली ती एक अंधारी, उंच सिलींगची, कोपर्‍यात काड्यामुड्‍यांचं गचपन पडलेली खोली होती, स्वयंपाकी तिथे झोपत असावा असं दिसत होतं. टेबलावर खरकटी ताटं आणि प्लेट, काल रात्रीचं
शिळं अन्न पडलेलं होतं.
''हे पहा बरं,'' बेयन्स म्हणाला. ''हे इथे का असावं?''
ड्रेसिंग टेबलच्या बाजूस ठेवलेल्या एका विचित्र आकारावर त्याने मेणबत्ती धरली. खूप सार्‍या सुरकुत्या, कडकडीतपणा आणि वाळून गेलेला तो आकार नेमका काय असावा ते सांगणं अवघड होतं. काळपट, कातडीदार आणि मानवी आकृतीशी साधर्म्य दाखवणारं काहीतरी आहे असं म्हणता आलं असतं. पहिल्यांदा मी त्या आकाराचं निरिक्षण केलं तेव्हा, मला वाटलं ते ममी सारखा मसाला भरलेलं ते निग्रो मूल असावं, नंतर वाटलं ते खूप वेडंवाकडं आणि प्राचीन माकड असावं. शेवटी तो प्राणी आहे की माकड आहे अशा संशयात मी गोंधळलो. पांढर्‍या शिंपल्यांच्या दोन माळा त्या आकाराच्या मध्‍यभागी बांधल्या होत्या.
''कमाल आहे -- कमालच आहे, ही! त्या विचित्र अवशेषाकडे पहात होम्स म्हणाला. ''आणखी काही?''
बेयन्स काही न बोलता सिंकच्या दिशेने निघाला आणि मेणबत्ती पुढे धरली. कुठल्यातरी मोठ्या, पांढर्‍या पक्ष्याचे अवयव आणि शरीराचे त्यावर पंख तसेच त्यावर ठेऊन निघृणपणे तुकडे केलेले होते. होम्सने त्या पक्ष्याच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या डोक्यावर आलेली सूज दाखवली.
''सफेद मुर्गा,'' तो म्हणाला. ''खूपच मजेदार! खरोखर ही केस विचित्र आहे.''
पण बेयन्सने त्यापैकी सर्वात विचित्र वस्तू सर्वात शेवटी ठेवली होती. सिंकच्या खालच्या बाजूने जस्ताची बादली बाहेर काढली ज्यात रक्त भरुन ठेवलेले होते. त्यानंतर त्याने हाडाचे जळके तुकडे भरुन ठेवलेले तबक
घेतले.
''काहीतरी मारण्‍यात आले आणि काहीतरी जाळण्‍यात आले. या वस्तू आम्ही आगीतून बाहेर काढल्या. सकाळी डॉक्टर येऊन पाहून गेले. ते म्हणतात यापैकी काहीही मानवी नाही.''
होम्स असला व त्याने हातावर हात चोळले.
''इन्स्पेक्‍टर, अभिनंदन करायला हवं तुमचं, एवढी विलक्षण आणि सूचक केस हाताळल्याबद्दल. तुमची एकंदर तयारी आणि मिळत असलेल्या संधींचा मेळ बसलेला नाही, असं मी खरोखर म्हणेन.
इन्स्पेक्टर बेयन्सचे बारीक डोळे आनंदाने चकमले.
''खरे आहे, श्रीयुत होम्स. ग्रामीण भागात धूळ बसतेच. या प्रकारची केस हीच माणसाला संधी मिळवून देते, आणि मला वाटते मी ती सोडणार नाही. ही हाडे कशाची असावीत बरे?''
''मेंढी, किंवा मी म्हणेन, एखादा चिमुकला.''
''आणि तो पांढरा मुर्गा?''
''कमाल आहे, श्रीयुत बेयन्स, खूपच कमाल आहे. जवळ जवळ एकमेवाद्वितीयच म्हणायला हवं.''
''होय, सर, या घरात अत्यंत विचित्रप्रकार करणारे अत्यंत विचित्र लोक असले पाहिजेत. त्यापैकी एक तर गेला. त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करुन त्याला संपवला असेल काय? असेल तरी ते जातील कुठे, कारण  प्रत्येक बंदरावर बातमी पाठ‍वलीय. पण माझा स्वत:चा दृष्‍टीकोण वेगळा आहे. होय, माझा दृष्‍टीकोण खूपच वेगळा आहे.''

(क्रमश:)

१३ मे, २०१२

एक वाचनानुभव


दि. 6 मे 2012
काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती.
त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो. तर कुठेतरी उचकपाचक करताना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' ची लिंक सापडली. पण ती करप्ट लिंक होती. आता उत्सुकता चाळवली गेली होतीच, म्हणून 'माझा प्रवास' साठी सर्च मारला, लगेच मिळून गेले.
मग अकरापासून साडेतीन चार पर्यंत ती 196 पाने वाचण्‍यात गेली. 1857 च्या बंडाच्या सुमारास प्रवासाला निघालेल्या गोडसे भटजींचा मुक्काम महूला पडला होता. आमच्या कॉलनीच्या रेल्वे स्टेशनमधून महूला रोज रेल्वे जाते. मला वाटले गोडसे भटजी महूहून पुढे इंदूरला येणार आणि 1857 मधल्या इंदूरच्या हकीगती वाचायला मिळणार; पण तसं काही झालं नाही. गोडसे भटजी हे 1857 च्या बंडाच्या काळचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या प्रवासाच्या हकीगतीमध्‍ये बंडामुळे त्या काळातील लोकांच्या जीवनाची झालेली फरफट, नष्‍टचर्य नि:संशय प्रतिबिंबीत झाले आहे पण त्यांची हकीगत ऐतिहासिक दस्तऐवज मानता येईल की नाही हे इतिहास तज्ञांनाच सांगता येईल - कारण प्रत्येक ठिकाणी गोडसे भटजी प्रत्यक्ष हजर असतीलच, आणि बंडादरम्यान उठलेल्या अफवा, बाजारगप्पा किंवा जनमानसात झालेल्या खळबळीमुळे ऐकीव बातम्यांचा सुळसुळाट यांचा त्यांच्या कथनावर प्रभाव पडलाच नसेल असे म्हणवत नाही.
पण एवढ्यावरच हे पुस्तक निकालात काढता येत नाही. गोडसे भटजी झाशीच्या राणीला प्रत्यक्ष भेटले आहेत. त्यांनी झाशीच्या राणीची स्वभाव वैशिष्‍ट्ये, कारभाराची रीत, त्यांची दिनचर्या, अगदी झाशीची राणी बालपणी कशी होती, त्यांच्या मातोश्री गेल्यानंतर झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत तांबे यांनी तिचे पालनपोषण कसे केले होते, तिचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत विवाह कसा जुळून आला होता हा सर्व इतिहास गोडसे भटजींना माहित असण्‍यासह ते पुढे ती राणी झाल्यानंतर झाशीच्या राणीच्या आश्रयाला राहिले आहेत. अगदी झाशीच्या किल्ल्यावर तोफगोळे पडत असताना गोडसे भटजींनी झाशीच्या किल्ल्यामध्‍ये निवास केला आहे.
झाशीचा पाडाव होऊन झाशीची राणी तेथून निघून गेल्यानंतर इंग्रजी कत्तलीपासून वाचण्‍यासाठी ते लादणीत लपून बसले आहेत - गोडसे भटजी नि:संशय 1857 च्या बंडामध्‍ये होरपळलेल्या लोकांपैकी एक, पण मराठी साहित्यात ज्यांचे लिखाण उपलब्ध आहे असे एकमेव आहेत. गोडसे भटजींची अत्यंत प्रांजळ निवेदनशैली असलेल्या त्या कथनात मी पूर्णपणे रंगून गेलो. यज्ञ होऊन दक्षिणा पदरी पडेल या आशेने उत्तरेत गेलेले गोडसे भटजी दुसर्‍याच कुठल्यातरी राजाकडून दक्षिणा पदरी पडूनही चोरट्यांकडून लुटले जातात. बंडामुळे उत्तरेत अनागोंदी माजलेली असल्याने दिसेल त्या प्रवाशाला पकडणे, आणि बंडात सामील असेल तर सरळ फाशी देणे असे आदेश तत्कालीन गर्व्हर्नरने काढलेले असतात. गोडसे भटजींनाही संशयीत म्हणून इंग्रजी सैन्याच्या तुकडीकडून पकडले जाते, पण हे खरोखर भिक्षुक आहेत हे स्पष्‍ट झाल्याने फाशीबिशी न होता त्यांची सुटका होते. अशा परिस्थितीत भिक्षुकीसाठी त्या प्रांतात देशाटन करण्‍याऐवजी गोडसे भटजी, पैसे गेले तर गेले काही तीर्थाटन करावे, पुण्‍य पदरी पाडावे, महाराष्‍ट्रात असलेल्या आईवडीलांचे इहलौकीक कर्ज प्राप्त परिस्थितीत पैसा मिळत नसल्याने दूर होत नसेल तर नसो - पण गंगेच्या पाण्‍याने आईवडीलांना स्नान घालून पारलौकीक पुण्‍य तरी कमवावे म्हणून गंगेच्या पाण्‍याची कावड खांद्यावर घेऊन ते पेण तालुक्यातील वरसई पर्यंतचा प्रवास पायी करतात.
मुळात तत्कालिन पुणे-मुंबई प्रांतात रहाणारे गोडसे भटजी झाशी-काल्पी-ग्वाल्हेर-काशी-लखनौ-अयोध्‍या एवढा दूरचा प्रवास करतातच का? कारण गोडसे भटजींच्या कथनातच स्पष्‍ट दिसत होते. पुणे-मुंबई प्रांतातले भिक्षुक, तत्कालिन विद्वज्जनांची संभावना होणारे सत्ता आणि संपत्ती केंद्रच इंग्रजी राजवट आल्याने भारतामध्‍ये उत्तरेत स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे हे लोक उत्तरेत येणार हे आजही स्थलांतराची जी मूळ प्रेरणा दिसते त्याप्रमाणे उघड आहे. आणि ही तत्कालिन सत्ताकेंद्रे, सत्ताधिश कशा परिस्थितीत होती आणि काय करीत होती? तर इंग्रजांसारख्या प्रबळ शत्रूने सत्ता हिसकाऊन घेतली म्हणून ब्राह्मणांना मंदीर, राजवाड्‍यांमध्‍ये अनुष्‍ठाणाला बसवून 1857 च्या बंडाच्या रुपात यथाशक्ती लढा देत होती. ब्राह्मणांच्या अनुष्‍ठाणात अनाठाई द्रव्यापव्यव करण्‍यापेक्षा इंग्रजांपेक्षा वरचढ शस्‍त्रे, होतील तिथून पैदा करुन सत्ता हिसकाऊन घेणार्‍या इंग्रजांचे नामोनिशाण मिटवूनच टाकण्‍याचा विचार त्यांच्या मनात का आला नाही? तर त्या काळात स्वप्रयत्न नव्हते असे नव्हे, तर त्यापेक्षाही धर्म, धर्माचरण, पाप-पुण्‍य, भोग-दैव, पूर्वसुकृत, कर्मकांड, आचार यांचा पगडा होता - नव्हे या काळातली बहुतांश हिंदू माणसे ही याच श्रद्धा आणि धारणांचे मूर्तीमंत रुप होती. त्यामुळे विजयश्री संपादित करण्यात स्वपराक्रम, प्रयत्न यांच्यापेक्षाही धर्मसंयुक्त कृत्यांना प्राधान्य होते. राज्ये, संस्‍थानांमध्‍ये देश विभागला गेला, एकरुपता - एक विचार नव्हता होता हेही आहेच. झाशीचा पडाव व नृशंस लुटीनंतरच्या दिवसांचे व तो का झाला याचे वर्णन करणारा गोडसे भटजींचा खालील उतारा पहा -
तिसरे दिवशी शहरात पलटणी लोक शिरलें, त्यांनी धान्य लुटण्‍यास प्रारंभ केला. त्याणीं बरोबर मोठमोठे बैल आणिले होते. बैल दरवाज्यापाशी उभा करुन लोकांचे घरी जोंधळे, बाजरी, तांदूळ, डाळी वगैरे जी धान्ये सापडतील तीं भरुन नेली. धान्यादिकांनी भरलेली मडकी ओतून घेऊन तेथेंच फोडून टाकीत असत. चवथे दिवशी सर्व प्रकारची लूट करण्‍यास आरंभ केला. ज्यास जें नेण्‍यासारखे वाटे, ते तो घेऊन जाई. लोकांचे घरी उपयोगी वस्तू एकही ठेविली नाही; विहिरीचे राहाटही काढून नेले. राहाटाचे दोरखंडही नेले. दारची केळीची केळवंडे, आंब्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, लाकडी खुर्च्या वगैरे सामान याप्रमाणे सर्व जिनसांची लूट मांडली. ते दिवशी आम्हापाशी काहीएक खाण्‍यास नव्हते. जुजबी धान्य होते ते सरून गेले होते. बाजारात कोठे विकत घेऊ म्हटले तर कोठेच मिळण्‍यासारखे नव्हते. सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळे व वैशाखमास असल्यामुळे जीव अगदी हल्लक होऊन गेला. सायंकाळानंतर थंड पाण्‍यानी स्नान करुन अतिशय भूक व तहान लागल्यामुळे निरुपायास्तव थंडा फराळ केला ! हरहर! काय हा दु:खाचा प्रसंग ! सर्व शहरात हजारो लोक उपाशी होते. लाखो मेले होते. शहर जळत होते. लोक तर अगदी नागवून गेले होते. कोणाचे घरात भांडे अगर मडके अगर धान्य अगर वस्‍त्र कांही उरले नव्हते. परमेश्वराच्या घरचा न्याय मोठा चमत्कारिक आहे. ज्या गरिब लोकांनी इंग्रज सरकारचा कोणत्याही प्रकारें अपराध केला नव्हता त्यांस निरर्थक किती भयंकर शिक्षा ही ! परंतू इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोल काय म्हणून लावावा? शुक्रनितीमध्‍ये शत्रूचे पारिपत्य असेच करावे म्हणून सांगितले आहे. परमेश्वराने तरी काय अन्याय केला आहे? झांशीच्या लोकांचे पदरी पूर्व दुष्‍कृतच फार मोठे असले पाहिजे. बुंदेलखंडात व्याभिचाराचे पातक पूर्वीपासूनच सांचत आले होते. भंगिणीचा इतिहास मागचे भागात वर्णन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दल लक्ष्मीबाईचे निमित्ताने ईश्वराने ही भूमि शुद्ध केली असे आम्हांस वाटू लागले.
म्हणजे एवढ्या प्राणांतिक यातना, लूट, नष्‍टचर्य, मानहानी, वित्तहानी होऊनही त्या काळची माणसे स्वत:च्या आयुष्‍यातील घटनांबद्दल स्वत:च्या कर्मांना दोषी धरायला तयार नाहीत. ती पाप मानतात, ईश्वर पापकृत्यांबद्दल दंड देऊन शुद्धी करतो असे मानतात. आपल्या धारणाही थेट अशाच नसतील, पण यापेक्षा फार वेगळ्या नसतील, हे नक्की. म्हणूनच हा वाचनानुभव नुसते वाचन न रहाता ते प्रॅक्टीकली लागू होऊ शकतं. खुद्द झाशीची राणी लक्ष्मीबाईच तिने केलेला प्रतिकार मोडून पडल्याचा अंदाज आल्यानंतर काय म्हणते ते पहा -
काल्पीचा रस्ता धरल्यानंतर जातां जातां एके दिवशी सायंकाळी एका खेडेवस्तीस येऊन पोंचलो. तेथून काल्पि सुमारे सहा कोश राहिली होती. गांवाबाहेर चिंचेची झाडी आहे. तेथे स्वयंपाक तयार करुन भोजनें झाल्यावर स्वस्थ निद्रा केली. पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकी मोठा गलका झाला. त्यासरसे उठून पहातो तों शेकडो स्वार रस्त्याने उधळत चालले आहेत असे दृष्‍टीस पडले. हें काय अरिष्‍ट आले आहे याची कल्पना होईना. आम्हीही घाईघाईने आपले सामान गुंडाळून, काखोटीस मारुन, शिपाई लोकांच्या बरोबर पळ काढू लागलो. काही वेळाने असे समजले की, पेशव्यांची व इंग्रजांची चरखारीवर लढाई होऊन त्यात पेशव्यांचा मोड झाला. त्यात झाशीवाली राणीही होती. ती फौज परत काल्पीवर चालली आहे. मग आम्ही किंचीत स्वस्‍थ होऊन झुंजूमुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमार्जन करण्‍यास बसलों. तों पांच-चार स्वार विहिरीवरुन जात होते. त्यांत झाशीवाली दृष्‍टीस पडली. तिने सर्व पठाणी पोषाख केला होता, व सर्व अंग धुळीने भरले होते, व तोंड किंचीत आरक्त असून म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे तिने घोड्यावरुनच आम्हांस तुम्हीं कोण आहां असा प्रश्न केला. तेव्हा आम्ही पुढे होऊन हात जोडून विनंती केली की, आम्ही ब्राह्मण आहो, आपल्यास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली व खाली उतरल्या. मी रसी मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तो बाईसाहेब म्हणाल्या की, तुम्ही विद्वान ब्राह्मण, तुम्ही मजकरिता पाणी काढू नका. मीच काढून घेते. हे तिचे उदासपणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. परंतु निरुपायास्तव मडके खाली ठेवले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृण्‍मय पात्रातून ओंजळीने पाणी पिऊन, तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की,
मी अर्धा शेर तांदुळाची धणीन, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून, हा उद्योग करण्‍याची काहीच जरुर नव्हती. परंतू हिंदूधर्माचा अभिमान धरुन या कर्मास प्रवृत्त झाले, व याज‍करिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली. आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हास ईश्वर यश देत नाही. चरखारीवर मोठी लढाई झाली. परंतू आम्हांस यश आले नाही. काल्पीवरही इंग्रज चालून येत आहे.
माधवराव व नारायणराव पेशवे बंडात सामील नसूनही, इंग्रजांबद्दल त्यांच्या मनात कुठलाही वाईट विचार नसताना ते इंग्रजांचे कैदी बनण्‍याचा प्रसंग पहा -
*श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इंग्रजांशी बिघडले नव्हते; परंतू त्यांचा दिवाण राधाकिसन म्हणून परदेशी होता तो बिघडला होता. प्रथम जेव्हा इंग्रज सरकारवर गहजब गुदरला तेव्हा तेथील कलेक्‍टर वगैरे साहेबलोकांनी चित्रकुटाखालचा 25 लक्षांचा मुलूख व डंघाईचा मुलूख श्रीमंत नारायणराव पेशवे यांचे स्वाधीन करुन दप्तर स्वाधीन केले, व आपण जीवभयास्तव पळून गेले. मुलूख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरिता म्हणून नवीन शिपाई ठेविले. बिघडलेल्या पलटणांस आश्रय दिला व दारुगोळा, तोफा वगैरे सामान तयार करण्‍याचा कारखाना सुरु केला. परंतु नारायणाराव पेशवे यांचे मनात कोणत्याही प्रकारचा किंतू आला नव्हता. इत्यादि हकीगती आम्हांस चित्रकूटास आल्यावर समजल्या होत्या. आम्ही अनुष्‍ठाणाचे आमंत्रण घरी घेऊन आलो तो अशी बातमी समजली की कपतानसाहेब बरोबर दोन पलटणी घेऊन पयोष्‍णी गंगेपलिकडे दोन कोशावर येऊन उतरला आहे. साहेबाने स्वाराबरोबर पत्र पाठवून श्रीमंतास कळविले की, आम्हास तुमचे भेटीचे प्रयोजन असल्यामुळे तुम्ही उदईक सायंकाळपर्यंत उभयंता बंधू दिवाणजींस बरोबर घेऊन आमचे गोटांत येऊन भेटावे. बरोबर हत्यार किंवा शिपाई आणू नये. श्रीमंताचे मनात स्वताविषयी कोणत्याही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण निर्दोषी आहो असे पूर्ण जाणून व इंग्रजांचे न्यायावर पूर्ण भरवंसा ठेऊन श्रीमंतानीही लागलीच त्याच पत्रावर उदईक येऊन भेटतो असा शेरा लिहून पत्र परत पाठवून दिले. तत्रापि, या भेटीपासून काय होते याची काळजी लागल्यामुळे उभयतां बंधूस सर्व रात्र झोप आली नाही. ही बातमी शहरात पसरताच शहरचे लोक अगदी तजा-वजा होऊन गेले. जिकडे तिकडे याच गोष्‍टी चालू होऊन हालचाल होऊन राहिली. कैक लोकांचे अभिप्रायांत श्रीमंतांनी जाऊ नयें, गेल्यास व्यर्थ कैदेत पडून कदाचित प्राणासही मुकतील व सर्व शहर लुटले जाईल असें होते. कित्येक श्रीमंत निर्दोषी आहेत व खरे रितीने वागल्यास त्यांस भय नाही असेही म्हणत होते. रात्रौ बारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस न जाण्‍याबद्दल उपदेश करु लागला. ''उदईक तुम्ही जाऊं नयें हेच फार चांगले आहे. गेल्यास मूठभर दारु खर्च न होता इंग्रजांचा मनोदय साध्‍य होऊन तुम्ही कदाचित प्राणास मुकाल; तुमची जिंदगी सर्व लुटली जाईल. याजपेक्षा आपल्यापाशी दारुगोळा आहे, लढवई लोक आहेत, आपण येथेच राहून जंग करु. यांत लौकिक आहे. मनुष्‍यास कधीतरी मरणें आहेच. परंतू रांडमरणाने मरुन जाणे हे तुमच्या शूर कुलास उचित नाही, अशी अनेक प्रकारची शूरत्त्वाची भाषणे करुन पेशव्यांचे मन वळविण्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा काही ठसा पडला नाही. शेवटी राधाकिसन परदेशाने कळविले की, आम्ही तर तुम्हाबरोबर येत नाही. आतांच आम्ही येथून दारुगोळा तोफा फौज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे घेऊन जाणार. परंतू तुम्ही आम्हास खर्चाकरिता दोन लक्ष रुपये दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊ. हें ऐकतांच श्रीमंतांनी विचार केला की, हा मनुष्‍य जीवावर उदार झाला आहें, त्यांजला आपण स्वखुशीने रुपये न‍ दिले तर वाड्‍याबाहेर फौज आणिली आहे, ती सर्व लुटून फस्त करुन टाकिल. याजकरिता सामोपचाराने रुपये द्यावे हे बरें. असा विचार करुन रुपये तेव्हांच दिले. ते रुपये घेऊन दिवाण वाड्‍यातून बाहेर पडून सर्व फौज बरोबर घेऊन मध्‍य रात्रीस जंगलात निघून गेला. दाहा बारा कोशावर पहाडी किल्ला बंदोबस्ताचा होता, त्यांचा आश्रय करुन राहिला. इकडे श्रीमंतांनी ज्योतिषीबुवांस बोलावून आणून त्यांस असें विचारलें की, उदईक सायंकाळपर्यंत आम्हांस साहेबाचे भेटीस जाण्याचा मुहूर्त केव्हा आहे तो सांगावा. तेव्हा जोशीबुवांनी मुहूर्त उजाडतां साडेपांच वाजता लग्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्याचा चांगला नाही, मर्जीस येईल तसे करावे. असे सांगितल्यावरुन नारायणराव व माधवराव साहेबांनी साडेपांच वाजता जावे असा निश्चय केला.
आम्ही हरिपंत भावे यांचे माडीवर निजलो होतो. तेथे पहाटेच्या सुमारास जागे होऊन गोष्‍टी बोलत बसलो आहो, इतक्यात स्वारांच्या घोड्‍यांच्या टापांचा टप-टप आवाज कानीं पडतांच धामधूम काय आहे हे पहाण्‍याकरिता रस्त्याकडील खिडकी उघडून पहातो, तो श्रीमंताची स्वारी साहेबांकडे जाण्‍यास निघाली आहे, असे दृष्‍टीस पडले. बरोबर शिबंदीचे लोक सुमारे दोनशें बिनहत्यार होते. खुद्द श्रीमंत माधवराव व नारायणराव मेण्‍यात बसले असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरिता शेकडो मशाली पेटविल्या होत्या. या बिनहत्यार स्वारीचा थाट पहातांच आम्हास झाशीवालीबाई किल्ल्याबाहेर पडून शत्रूचा घेर फेडण्‍याकरिता निघाली त्यावेळचे स्मरण होऊन फार वाईट वाटले, व हे लोक केवळ अपमान व दु:ख पदरी घेण्‍याकरिता जात आहेत असें वाटूं लागलें. स्वारी झराझर चालून उजेडताचे सुमारास पयोष्‍णीचे पार गेली. स्वारी साहेबाचे तंबूपाशीं जाऊन पोचलीं तों सहा घटका दिवस आला. पुढे जाणार इतक्यात साहेबांकडील स्वार येऊन असे कळविले की, सर्व लोकांनी येथे राहून फक्त नारायणराव व माधवराव साहेबांनी मेण्‍यांतून उतरून पायीच भेटीस यावे. बरोबर एकही मनुष्‍य घेऊ नये. तें समयीं श्रीमंतास अति दु:ख झाले, परंतू येथवर आल्यावर दुसरे गत्यंतर नाही व आपण निर्दोषी आहोत असे मनात आणून निरुपायास्तव मेण्‍यांतून खाली उतरले. व बरोबर एकही मनुष्‍य न घेता तंबूकडे निघाले. श्रीमंत लोकांबरोबर छत्री धरण्‍याकरिता एक मनुष्‍य असतो, तोही बरोबर घेऊ दिला नाही. दिवस ऐन ग्रीष्‍म ऋतूचे असल्यामुळे सूर्याचा प्रखर ताप सुरु झाला होता. श्रीमंतास उन्हात जाण्‍याचा कधीही प्रसंग नसल्यामुळे व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असल्याकारणाने त्यांची मुखकमले आरक्त होऊन गेली, डोळे लाल झाले, श्रीमंत तंबूसमोर येऊन पोचले तो साहेब खाना खात बसला होता. व पुढेही चार घटका श्रीमंताची दाद घेतली नाही. त्याजमुळे भर दोन प्रहरच्या उन्हात तंबूसमोर छत्रीशिवाय श्रीमंतांस उभे रहावे लागले. त्यांस बसावयास खुर्चीही कोणी आ़णून दिली नाही. अशी त्यांची दीनावस्‍था पाहून त्यांचे लोक दूर उभे होते, त्यांस अति त्वेष येऊन त्यांचे डोळ्यांस अश्रू येऊ लागले. परंतू त्यांचा कोणत्याही प्रकारचा इलाज चालेना. या शरीराच्या व अपमानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय धरणी ठाय झालें. जीव कासावीस होऊन सर्वांगास घाम सुटला. अति क्षुधा व तृषा उत्पन्न झाली, परंतू स्वीकारलेला मार्ग सोडणे गैर आहे, असे समजून त्या सत्वशील पुरुषांनी होणारा ताप गट्ट करुन तसेच धीर धरुन उभे राहिले. शेवटी साहेब बाहेर येऊन एकदम तुम्हास सरकारचे हुकुमावरुन कैद केले आहे असे सांगितले व लागलीच गोरें शिपायांस भोंवताली गराडा घालण्‍यास हुकूम केला.
असेच कितीतरी प्रसंग पुस्तकभर..
पुस्तक वाचून संपले पण त्यातून उमटलेली हलती बोलती चित्रे, ते सगळे प्रसंग माझ्या मनात रुंजी घालू लागले. या सगळ्या इतिहासाबद्दल अंतर्मुख वगैरे म्हणतात तसे आपोआप झालो - हे अर्थातच त्या पुस्तकातील निर्मळ, थेट ह्रदयाला जाऊन भिडणार्‍या निवेदनामुळे. नुकताच युजींसोबतचा मृत्यू म्हणजे काय त्याबद्दलचा संवाद अनुवादित केला होता. त्यात एक विचार असा होता -
असं म्हणतात की विचार टिकून रहातात.
होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे.
पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती.
हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? नुसता भल्याबुर्‍या आठवणींचा साठा आहे. हेदेखील आपल्याला शिवलिंगावरील भांड्‍यातून पाण्याची धार जशी बाहेर पडत असते त्याप्रमाणे मनातून बाहेर स्रवणार्‍या 'विचारा'तून आपल्याला जाणवतंय.
आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. त्यामध्‍ये मात्र मी अगदी ठरवून खोलात शिरणार नाही, त्याची कारणे वेगळी आहेत - तो सगळा 'मिस्टिकल कंटेंट' आहे आणि त्याचं विश्लेषण केलं नाही तरी चालू शकेल - खरं म्हणजे आता बर्‍याच गोष्‍टी केल्या नाहीत तरी चालू शकेल.
कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच.
कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! Wink
-------------------------------------------------------------
जिज्ञासूंसाठी : * मला वाटतं या घटनेबद्दल स्वा. सावकरांचं वेगळं विश्लेषण आहे, ते सावकरांच्याच आवाजात येथे ऐकायला मिळू शकते.
*कुठलीही गोष्‍ट तीव्रतेनं करणं या अर्थाने - त्या पुस्तकात जादू वगैरे आहे असं म्हणायचं नाहीय.

९ मे, २०१२


Leading Marathi Newspapers

Maharashtra Times                         Loksatta               Sakal                     Kesari                   Tarun Bharat
Lokmat E Paper                                 Saamna                Prahar                   Deshonnati        Aikya
Lokmanthan                                       Deshdoot            Dainik Yuvawarta
Links to Newspapers in Maharashtra     

Leading English Newspapers

Times of India                   Indian Express                  Asian Age                            Economic Times              
Business Standard           Central Cronicle               Deccan Cronicle               Deccan Herald
Financial Express             Hindustan Times             The Hindu                         The Hindu (National)
Indian Business Times     Media Newsline              Headlines India                Mid Day
Mumbai Mirror                Herald Goa                      Sunday Observer             The Statesman
The Tribune                       The Telegraph Calcutta                                          Sentinel, Guwahati
E Gujrat Times                  Bihar Times                        Cristian Messenger        Daily Excelsior
Headlines India                                Indian Muslim Observer                                              The Pioneer
      
Leading Hindi Newspapers
Dainik Bhaskar                  Raj Express                         Rajasthan Patrika                             Navbharat Times
Jagran                                   Punjab Kesari                    BBC Hindi                                            Ranchi Express
Pratah Kal                           Rajdhani Times                 Rashtriya Sahara                              Samay Live        
Dakshin Bharat Rashtramat                                         Haribhumi                                          Naiee Duniya
Khas Khabar                       Janpath Samachar
Leading Newspapers of Britain
Reuters                                Guardian             Telegraph                           The First Post    The Times
Mirror                                                   News of The World        The Observer
London Evening Standard            Financial Times                                The Independent
Daily Mail Online                            Belfast Telegraph            Economist          


Leading Newspapers of USA
New York Times               Wall Street Journal         Washington Post
NY Daily News                  New York Post

Leading Newspapers of Pakistan

Leading English Magazines
Time                      Forbes                  National Geographic                      National Geographic Photography
Readers Digest                                 India Today                                        Tehelka                              
Hardnews                                           Frontline                                            Outlook
Business World                                                Business Today                                 Business Line
Beyond The News                           Electronics For You                         Enterprise          
Hindi

Aaj Tak                                 Panchjanya


Marathi
Lokprabha                                           Marmik