<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093</id><updated>2012-01-30T20:48:38.858+05:30</updated><category term='राज ठाकरे'/><category term='Prime Minister'/><category term='वाजेद अली शाह'/><category term='किस्सा'/><category term='महेश भट'/><category term='अजिज नाजां'/><category term='गझल'/><category term='यु.जी. कृष्णमूर्तीं'/><category term='गांधी'/><category term='मर्सिडिझ'/><category term='माईंड इज ए मिथ'/><category term='युजी कृष्णमूर्ती'/><category term='उर्दू'/><category term='हिस्ट्री'/><category term='वारु'/><category term='अ‍ॅसिलम'/><category term='हटातटाने बटा'/><category term='शब्द़'/><category term='ओशो'/><category term='हॉलीवूड'/><category term='रामजोशी'/><category term='भाषा'/><category term='ईस्टर'/><category term='कविता'/><category term='लव्ह अफ्येयर'/><category term='प्रेषित मुहम्मद'/><category term='Maharshi Mahesh Yogi'/><category term='कव्वाली'/><category term='वचन'/><category term='तप'/><category term='मंगेश पाडगावकर'/><category term='शिवाजीराव भोसले'/><category term='गुंज'/><category term='रजनीश'/><category term='इस्लाम ची जन्मकथा'/><category term='यु.जी. कृष्णमूर्ती'/><category term='दिलखुलास'/><category term='परिक्रमेमागील तत्त्वे'/><category term='काजळमाया'/><category term='कामजीवन'/><category term='बातम्या'/><category term='भोपाळ'/><category term='राष्ट्रपिता'/><category term='मशीद'/><category term='एन्लायटन्मेंट'/><category term='प्राचार्य शिवाजीराव भोसले'/><category term='Dialogoues'/><category term='म.न.से.'/><category term='दत्तकमानसिक प्रसुतीशास्त्र'/><category term='मॉर्निंग पोस्ट'/><category term='Imran Hashmi'/><category term='म.टा.'/><category term='Swami Vivekananda'/><category term='कोअर'/><category term='शरीर'/><category term='ख्रिश्चनिटी'/><category term='आर्थर कॉनन डॉयल'/><category term='रिपोर्ट'/><category term='राहुल महाजन'/><category term='मॅड'/><category term='धोंडोपंत'/><category term='Osho'/><category term='टाईम्स'/><category term='मजल'/><category term='साधना'/><category term='तमाशा'/><category term='स्कॉच'/><category term='शेर'/><category term='प्रेम'/><category term='letter'/><category term='अफेअर विथ मुंबई'/><category term='रोल्स  राइस'/><category term='गुडबाय'/><category term='चढता सूरज'/><category term='नाना फडणवीस'/><category term='शेरलॊक होमस'/><category term='संत तुकाराम'/><category term='व्यंकटेश माडगुळकर'/><category term='प्रेमपाठ'/><category term='किस्से'/><category term='दर्दी'/><category term='शास्त्रज्ञ'/><category term='फटकळपणा'/><category term='अनुभव'/><category term='Paramhans Yogananda'/><category term='Mahesh Bhatt'/><category term='योगानंद महाराज'/><category term='औरंगाबाद'/><category term='मुस्लिम'/><category term='फिल्म दि मेसेज'/><category term='गाड्या ओढणे'/><category term='शाहिरी काव्य'/><category term='इंद्रधनुष्य'/><category term='ऑरगॅजम'/><category term='ग.दि. माडगुळकर'/><category term='युजिनी'/><category term='ब्लॉगर्स'/><category term='रमण महर्षी'/><category term='Enlightenment'/><category term='उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती'/><category term='उत्कर्ष प्रकाशन'/><category term='Osho International Foundation'/><category term='secret'/><category term='स्त्रीमुक्ती'/><category term='आचार्य रजनीश'/><category term='Ekta Kapoor'/><category term='आवडी'/><category term='सिध्दयोगी'/><category term='विचार'/><category term='मन'/><category term='इंग्लंड'/><category term='उपसंहार'/><category term='Rajneesh'/><category term='OIF'/><category term='जेड अ‍ॅडम्स'/><category term='फिलिपाईन्स'/><category term='तुका जातो वैकुंठाला'/><category term='ओमकारेश्वर'/><category term='हस्ताचा पाऊस'/><category term='मनी मॅक्झीम्स'/><category term='पेशंट'/><category term='जे. कृष्णमूर्ती'/><category term='भगवान श्री रजनीश'/><category term='सवाल-जवाब'/><category term='विटंबना'/><category term='शेरलॉक होम्स'/><category term='कॉन्फिडेन्शियल'/><category term='अतिंद्रिय अनुभव'/><category term='यु.जी.कृष्णमूर्ती'/><category term='दिवाळी'/><category term='चंपाशष्‍ठी'/><category term='मिड डे'/><category term='केव्हीन रूड'/><category term='क्यूरेटिव्ह पिटीशन'/><category term='सवाल'/><category term='बाबूकाका'/><category term='शरीरसंबंध'/><category term='शंकराचार्य'/><category term='अलीफ लैला'/><category term='चिंतामणी महाराज'/><category term='Once Upon A Time In Mumbai'/><category term='निकाल चुकीचा'/><category term='सर आर्थर कॉनन डॉयल'/><category term='पेपरातलं काम'/><category term='सांडा'/><category term='शब्द'/><category term='नेकेड अ‍ॅम्बिशन'/><category term='हरीपाठ'/><category term='ऑब्झर्व्हर'/><category term='सत्यसाईबाबा'/><category term='Narmada Parikrama'/><category term='च‍र्हाट'/><category term='सट'/><category term='गर्भधारणा'/><category term='विदूषक'/><category term='सिनेमा'/><category term='‍जी.ए. कुलकर्णी'/><category term='हिंदू'/><category term='ग्राम'/><category term='जे कृष्णमूर्ती'/><category term='नर्मदा परिक्रमा'/><category term='ध्यान'/><category term='मध्‍य प्रदेश'/><category term='UG Krishnamurty'/><category term='चारोळ्या'/><category term='येशू'/><title type='text'>यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni</title><subtitle type='html'>Get Lost AND Stay Lost</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>94</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-3608490528946734501</id><published>2012-01-30T20:48:00.001+05:30</published><updated>2012-01-30T20:48:38.894+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><title type='text'>एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;(एकदा निरोप घेतल्यानंतर, पुन्हा एकदा अचानक हाती पडलेल्या माहितीचा हा वृत्तांत.. आत्मशून्यशी झालेल्या बोलण्यावर आधारित) &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यशवंतकडे पाठ फिरवुन मी पुढे जायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी नर्मदामाईच्या कृपेने डोळे भरुन आले होते. अशी व्यक्ती जिला मी केवळ १ आठवड्यापूर्वी भेटलो होतो (यशवंता सोबत त्या आधी माझे कोणतेही वैयक्तीक असे संभाषण कधीच चालु नव्हते). त्याने माझा खर्चाचा अंदाज चुकला असताना मला लागणार्यात सर्वच गोष्टीं ची मदत अत्यंत सढळ हाताने मी न मागताच दिली होती. हातात काठी, स्वेटर, लुंगी, व झोपायला चटई त्यानेच घेउन दिली. निरोप घेताना येशुने मला हवे तेवढे पैसे सोबत देण्याची तयारी (सक्ती) केली होती. ती नाकारुन मी माझ्याकडची त्याने आधीच दिलेली ५०० ची नोटही त्याला परत केली. पण त्याने काही सुट्टे पैसे (१०० च्या दोन नोटा व १० च्या दोन व २० ची एक व काही नाण्यांचा खुळखुळा) मात्र माझ्याकडेच राहु दिले. आता सोबतीला कोणच नाही, वाटेत काहीही विकत घेउन खायचं नाही, मिळालं तर गिळायच नाहीतर पुढे जात रहायचं. अन्न शिजवत बसायचं नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकटाच मी सदाव्रत मागुन आणा, मग बिन रॉकेलची चुल पेटवायचा कुटाणा करा, मग अन्न नीट शिजवा, जेवा, भांडी घासा व मग विश्रांती घ्या व पुढे चला. असले वेळखाऊ उद्योग दिवसातून किमान एकदाही माझ्यासारखा आळशी माणुस एकट्याने करणंच शक्य नाही. नर्मदामातेला जगतानंदी म्हटले जाते. तर तिच्या काठावर&amp;nbsp; मी दु:खी राहणे शक्यच नाही ती काळजी घेईल असा ठाम विश्वास असला तरी पोटातले कावळे भल्या भल्यांच अध्यात्म केरात लोटतात. तर माझ्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आंडु-पाडुंची काय गत होईल ? आज पोट पुजेचं काय होणार?&amp;nbsp; काहीही असो स्वतःच्या सिध्दांतावर विश्वास, श्रध्देवर शुध्द असे पर्यंत ठाम रहायच असा विचार करत करत नर्मदेच्या किनार्याीने पुढे सरकु लागलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तितक्यात ते ३ मस्कटीटिअर्स (टिप: आपले मागचे ओमानी म्हातारे) जराशा अंतरावर एका काठावर विश्रांती घेताना दिसले. सुर्य डोक्यावर आल्याने त्यांनी आता आन्हिक उरकले होते. पण त्यांनी मला थोडे पुढे चालत जा व कंटाळा आला कि स्नान करायला थांब आम्ही पोचतोच असे सांगीतले. मला कटवण्याचा त्यांचा इरादा आवाजात स्पष्ट&amp;nbsp; दिसत होता. शेवटची भेट होताना येशुने त्यांच्या हातात १५० रुपये बळेच कोंबले होते त्यावरुन काही काळ परिक्रमा गाडीने करायची सोय झाली असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांनी आधीही बोलताना सांगीतलं होतं की काही काळ ते परिक्रमा वाहनाने करत जाणार म्हणुन. त्यांची साथ सुटेल हे आधीच माहीत होतं. पण हे अचानक वेगळं होणं ? रस्ता व्यवस्थीत नव्हता म्हणुन जरासा वर आलो. अजुन मोरटक्का संपलं नव्हतं. तिथे मिलीटरीच्या गणवेशात दिसणार्या् लोकांच काहीतरी काम चालु होतं. एकदोन समवयस्क गणवेशधारींसोबत नजरानजर झाली. त्यांच्या चेहर्याावर काही भाव नव्हता. पण माझ्याकडे बघुन एकदोघांच्या नजरेत मात्र छ्द्मी हास्य उतरलय असा भास मला झाला. फार चौकशी केली नाही.&amp;nbsp; चालत राहीलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/jUnDwAmLWi46Rfy8Sb4StNMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="300" src="https://lh3.googleusercontent.com/-3tFkjvmbGuw/TyawJCqsQ7I/AAAAAAAABNo/AvqxZqHfEYo/s400/narmada_parikrama_bandrabhan.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/DropBox?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;परिक्रमींचा साधारण पेहराव असा असतो. फोटो जालावरुन साभार.&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोबतच्या साहित्यामुळे आता टिपीकल परीक्रमावासीचा ड्रेसकोड आपोआप जमुन गेला होता. बस फक्त आता माझं वय कसं वाढलेलं दिसेल याचा विचार करत होतो. परीक्रमेबाबत काहीही गृहीत धरु नये हेच बरं. बस चालत रहायच. आई नर्मदा वेगवेगळे अनुभव देत असते. त्यात आपलाच फायदा आहे. रखरखत्या उन्हात नर्मदेच्या काठने मी अनेक काटे व तापलेली (असावीच) वाळु दगड गोटे कॅनव्हासचे बूट घातलेल्या पायानी तुडवत बराच काळानंतर एका निर्जन जागी येऊन थांबलो. दमलेलो होतो, सुर्याची जागा हेच घड्याळ मानुन अंदाज केला.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुर्य डोक्यावरुन इतका पुढे सरकलाय म्हणजे दीड तरी वाजले असणार. तो वाटेत एक जण भेटला "अकेली मुर्ती है"? म्हणुन कुतुहलाने विचारले. मी आपोआप "अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो. मग तो म्हणाला "अच्छा ठीक" करुन पुढे सरकला. चटकन मागे वळुन हसुन म्हणाला,&amp;nbsp; ''ओ अच्छा आप नर्मदाजी की बात कर रहे थे?'' म्हणुन माझ्याकडे आदराने व अजीजीने बघुन हसला व निघुन गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची! आधी उगाच वाटलं होतं की आपण फारच टिपीकल उत्तर दिलयं :) तिथेच काठावर अंघोळ केली (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे). आरती नर्मदाष्टकक वगैरे झाले व बेंबीच्या देठापासुन शक्य तेवढा दीर्घ "ओम्" किंचाळायचा आनंद उद्बत्ती संपे पर्यंत घेत बसलो. मस्त एकांत समोर प्रचंड विस्ताराचे नदीचे पात्र, तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या ओमची त्याच्याशी जुगलबंदी (ही माझी समजुत ). &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाढलेल्या श्वासाने , भोवतालच्या रितेपणामुळे, वा सतत ओम केकाटल्याच्या प्रभावाने&amp;nbsp; अचानक मी निर्वीचार बनुन मटकन खाली बसलो. बसुन राहीलो हळु हळु अवसान आलं. नजर सभोवताली टाकली. पुढे नर्मदा वळत होती म्हणुन लोकवस्ती कुठे लागेल याचा अंदाज येत नव्हता. चार एक किलोमीटर वर दुर एकच झोपडी दिसत होती. पोचलो तर कदाचीत तिथेच काही खायला मिळेल अशी आशा होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;साहित्य सॅक मधे टाकुन मी पोटभर पाणी पिले. आता थकवा जाणवु लागला. कालचे फरसाण आपल्याकडेच ठेवले असते तर बरं झालं असतं म्हणत पुढे सरकु लागलो. शक्यतो किनारा सोडत न्हवतो पण कधी आत येणार्याठ मोठमोठ्या घळी असतात. काट्यांच्या झाडीचा दाटपणा प्रचंड असतो. पाण्याची पातळी वाढुन निर्माण झालेल्या ओलीची निसरडी दलदल अथवा भौगोलीक परिस्थिती वा इतर कारणाने बरेचदा वाट ही नदीपासुन काहीशी दुर जात लगतच्या टेकडीच्या चढ उतारांच्या आधाराने पुढे सरकत असते.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे काट्यांच जंगल आडवं आलो म्हणुन मीळेलत्या वाटेने शेजारील टेकाडावर चढलो. छोट्याशा झाडीने भरलेल्या टेकडीच्या पठारावर पोचल्यावर मी पुढची वाट कुठे आहे याचा अंदाज घेत एका जुनाट व निर्मनुष्य भासणार्याे काटेरी कंपाऊंडपाशी पोचलो. सहजच नर्मदे हर ची हाक दिली. व वाट पाहु लागलो, आत एक नुकतंच बांधण्यात आलेलं छोटसं मंदीर दिसत होतं. आतुन आवाज आला अंदर आइये पहले आसन तो लगाईये. फिर बात करते है. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आत गेलो तर मंदीरात अजुन मुर्ती नव्हती. पण टाईल्सवर राम-सीता-हनुमान यांची चित्रे होती. शेजारी जुनी पडकी खोली होती. त्यात गेलो तर तिथे जमीनीवरच हनुमानाची पुजा झालेली दिसत होती. सोबतीला गीता प्रेस (?) अथवा तत्सम प्रकाशकांची साधना सिध्दीला वगैरे विषयांना वाहिलेली पुस्तके (जी अक्षरधाराच्या प्रदर्शनातही एका ठिकाणी ठेवलेली असतात अशी) ज्यावर हनुमानाचे चित्र होते. ती ही ठेवलेली होती. बाहेर आलो तर पलीकडे दोन माणसे एका माणसाला लाइटच्या वायरींगमधे मदत करण्यात अत्यंत मग्न होती अन तिथुनच कानावर शब्द आदळले "भोजन पाओगे ?"..... आई शप्पथ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकतर टेकाडावरती झाडीच्या आत लपलेली व बहुदा डागडुजी चालु असलेली ही जागा आधी दिसलीच नव्हती. ज्या झोपडीत जायचे ठरवले. तिथपर्यंतची वाट बघता किमान दोन अडीच तास लागणे स्वाभाविक वाटत होतं. मी चालायला सुरुवात करुन २० मिनीटेही झाली नसावीत. अन समोर "भोजन पाओगे ?" पाओगे म्हणजे काय. पावणारच. मानेने हो म्हटलं अनं मग कोणतही संभाषण झालं नाही. लगेच काम सोडुन एक जण माझ्यासाठी जेवण आणायला त्या पडक्या खोलीत पळाला. आतील भागातुन माझ्या समोर त्याने २ जाडजुड टिक्कड व तिखट वरण समोर ठेवले. टिक्कड म्हणजे डोमीनोझच्या रेग्युलर साइझच्या पिझाचा बेस असतो त्या एवढा अथवा थोडा&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;जाडजुड व आकाराने तेवढीच अशी चुलीवर भाजलेली खमंग भाकरी होय. गव्हाचीही करतात. आडवा हात मारला. मग भाताची विचारणा झाली. अरे यार आधी नाय सांगायचं भातही बनवलाय ते ? ३रा टिक्कड मागितलाच नसता. आज यही रुक जाओ म्हणुन आग्रह झाला, सर्वांनाच होतो. पण एक तर अजुन साडेपाच वाजायला बराच वेळ होता&amp;nbsp; म्हणुन म्हटलं नको, "मैय्याकी इच्छासे आगे जाना है". पुढची वाट विचारली एकाने सोबत येऊन किनार्यााला पोचायचा रस्ता दाखवला, नर्मदे हर हर असं मनापासुन किंचाळुन अत्यंत सद्गदीत होउन त्याला निरोप देउन चालु लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चालत होतोच. किती चालत राहीलो, कळलं नाही. नर्मदेसोबत वाटेनेही दिशा बदलली. मी थोड्या टेकाडावर येऊन पोचलो. चला आज दुसरा दिवस उपास घडला नाही पाय दुखत होते. पण मन प्रसन्न होतं. चालताना एका वळणावर नर्मदामातेचे मंदीर दिसलं. जागा थोडी उंचावर होती नर्मदा काहीसी खालुन वहात होती. पांढर्याए रंगाच साधं मंदीर समोर. छोटी दरी व लगेच नर्मदेचे विस्तृत पात्र अप्रतीम&amp;nbsp; &lt;br /&gt;देखावा. पण पायाचा शिनवटा जास्त प्रभावी म्हणुन चटकन मंदीराच्या छोट्याश्या अंगणात पाऊल टाकले. समोर घोरत पडलेली (?)&amp;nbsp; &lt;br /&gt;तीनचार कुत्री त्वरीत जागी होऊन माझ्या दिशेने प्रचंड त्वेषाने भुंकत धाऊन आली. कुत्र्यांची पहील्यापासुनच भीती वाटत नाही. म्हणजे खास प्रशिक्षण न दिलेल्या. रात्री अपरात्री येणार्यार जाणार्यान वाहनाच्या, लोकांच्या अंगावर धाऊन जाणार्याी कुत्र्यांच्या लोळक्यातून मी अनेकदा एकट्यांनेच अनेकांसमोर बिधास्तपणे गेलो आहे, आणि कोणत्याही अपयाशिवाय सहज बाहेरही पडतो. पण इथे एक गंमत झाली.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;कुत्री अंगावर आली व सवयीने मी ही मागे न हटता गेटमधुन आत पुढेच जात राहीलो. कुत्री माझ्या भोवती कोंडाळे करुन भुंकुन भुंकुन वातावरण दणाणुन सोडत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, मी जागेच्या मध्य भागी येऊन इथे कोण आहे काय याचा अंदाज घेत होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कारण मंदिराला लागुनच स्वयंपाक घर दिसत होतं. कुत्र्याच्या गलक्याने एक मुलगा आतुन धावत आला. मला आतमधे पाहीले व हसुन म्हणाला नर्मदे हर बोलो, वोह सांत हो जाएंगे. आपल्याला काय? नर्मदे हर केलं अनं ती कुत्री ताबडतोब आल्या जागी परतुन अंग गुरफटुन उताणी पडली. मला गंमत वाटली. त्याने विचारले कौनसा जिला ? म्हटलं महाराष्ट्र. त्याने भुवया उंचाउन वहां से आये हो ?&amp;nbsp; &lt;br /&gt;म्हटलं हो. अकेला ही हुं. मंदिरात नर्मदामाईचे दर्शन घेतले. निघालो तर तेव्हड्यात त्याने चहा बनवला होता. आवड नाही पण नकारही देत नाही. त्याला विचारलं परिक्रमावासीसांठी संध्याकाळी थांबायची सोय कुठे आहे? तो म्हटला थोडं पुढे टोकसर म्हणुन एक गाव आहे. तिथे मोठा आश्रम आहे. थांबता येईल. जेवण दुपारी असते पण संध्याकाळी स्वतःला बनवावे लागेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;३ टिक्कड पोटात होते. रात्रीच्या जेवणाची चिंताच नव्हती. वाटेतली लहान गावे, वस्त्या पार करत ४.३० ला टोकसरला पोचलो सांगितलेल्या आश्रमात गेलो. अत्यंत रमणीय व प्रशस्त जागा मोठी व स्वच्छ धर्मशाळा परंतु ओस पडलेली. आश्रमात गेलो. भगव्या वस्त्रात असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रेमाने स्वागत केले. कोण, कुठ्ले, केव्हा सुरु केली परीक्रमा वगैरे झालं. त्यांच्याकडुन&amp;nbsp; प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. त्यांनीही विचारलं भोजन पाओगे ? आयला ! चमत्कारच आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी तर ऐकलं होते दुपारी बारा एकलाच जेवण असतं इथं म्हणुन.&amp;nbsp; म्हटल "रातको". अन त्यांनी दिलेल्या स्वच्छ अशा खोलीत येऊन आडवा झालो. अर्धा तास झाला अन त्याने माझ्या खोलीत अजुन एका परिक्रमावासीला आणलं. हसत म्हणाला ये भी अकेले है और महाराष्ट्रं से ही है. तो आणी मी एकदमच हसलो. कोण कुठले वगैरे झालं. मुंबैकर होता. म्हणाला तुमच्या सोबतचा कुठाय? म्हटलं तो सोबतीसाठीच होता. परतला मोरटक्याहुन. हा म्हणाला तुम्हाला ओंकारेश्वरला पाहिलं होतं. मी सुध्दा थोड्या वेळाने तिथेच परिक्रमा सुरु केली. मी त्याला ओळखणे शक्यच नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचं वय ६०. त्यांच्या कमरेपर्यंत येईल अशी भलीमोठी जाडजूड सॅक पाठीला होती. पुन्हा मनात म्हटलं हिमालयात नाही परीक्रमेत जातोय याचा याला नक्कीच विसर पडलाय. पण माणुस तरतरीत होता बोलायला. बसला आणि गप्पा सुरु. परिक्रमा का सुरु केली? त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले मी एकांतात राहून बर्यापच काळापासून एका देवतेची साधना केली आहे. गेली दहा वर्षे मी कूटूंबापासुन दुर आहे (संपर्कात आहेच पण राहतो दुसरीकडे). त्या देवतेचं मंदीरही बांधलं आहे व पुजारीही आहे. अनेक लोक त्यांच्या अडचणी घेऊन गेले व त्यांना फायदा झाला. पण आयुष्यभर जे त्यांनी मिळवलयं ते लोकांना वाटायची आता वेळही आली आहे म्हणुनच परिक्रमा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या गाडी, घर, उत्तम नोकरी वगैरे सर्व काही आहे. पण साधनेत तीव्र स्फूर्ती आल्याने व नंतर परिक्रमेसाठी अनुकूल गोष्टीग आपोआप घडत गेल्याने ते परीक्रमेत कसे आले त्याची माहीतीही त्यांनी दिली. अर्थातच ते जे बोलले ते माझ्यासाठी क्रिप्टीक होते वा सविस्तर नव्हते. पण मुळात मी स्वतः परीक्रमेचा संकल्प उघड करणे वा न पाळणे याबाबत कमालीचा संवेदनशील असल्याने याबाबतीत कधीच कोणत्याही परीक्रमावासीच्या चौकशीच्या खोलात गेलो नाही. माझ्या बाबत बोलाल तर असा प्रयत्न झाल्यास मी सरळ थापा ठोकुन दिल्या आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ते मला थोडे अस्वस्थ भासले. कारण त्यांची पाठ फार दुखत होती मी त्यांना त्यांची राक्षसी सॅक इथंच टोकसरच्या आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला व केवळ मोजकेच सामान सोबत बाळगण्यास सांगितले. इतक्यात आश्रमाची व्यवस्था पाहणारे प्रेमळ गृहस्थ आत येऊन आम्हाला म्हणाले भोजन पाओगे? माझं तेच उत्तर "रातको". तर, "अरे नारायण कब की रात हो गयी" म्हणुन खेकसले. सुर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता. ५.४५ ला त्या दिवशी सुर्यास्त होता. म्हणजे सात वाजायला आले असावेत. त्यांचं बरोबरच आहे तिकडे ती वेळ नक्कीच रात्रीची होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी हो म्हटल्यावर आम्हाला त्यांनी भाजी आणि टिक्कड पोटभर खायला दिले. संध्याकाळी मंदीरात पुजेला जायचे&amp;nbsp; &lt;br /&gt;त्राण नव्हतेच. म्हणुन नर्मदा मातेची पुजा वगैरे आटोपुन तो त्याने सोबत आणलेल्या स्लिपींग बॅगच्या गुहेत शिरुन चेन ओढून घेतली तर मी माझ्याकडच्या चटईवर छोटी सतरंजी टाकून त्वरीत निद्राधीन झालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमश:)&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-3608490528946734501?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/3608490528946734501/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_30.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3608490528946734501'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3608490528946734501'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_30.html' title='एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/-3tFkjvmbGuw/TyawJCqsQ7I/AAAAAAAABNo/AvqxZqHfEYo/s72-c/narmada_parikrama_bandrabhan.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-7754472773211248197</id><published>2012-01-16T22:24:00.003+05:30</published><updated>2012-01-22T15:16:22.487+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><title type='text'>एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.&lt;br /&gt;झपाट्याने पुढे गेलो.&lt;br /&gt;मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली. डगरीवर केळीचा बाग आणि चार दोन शेडस दिसत होती - तोच आश्रम.&lt;br /&gt;डगरीवर पसरलेल्या झाडांच्या मुळांना पकडून वर गेलो. अंधारात जेसीबी लाऊन आश्रमाचं काही काम चालू होतं. आश्रमाचे गोल गरगरीत स्वामी शंकराचार्यांच्या फोटोत असतो तसा डोक्यावर कफनीचा पदर घेऊन कामावर लक्ष ठेऊन उभे होते. जेसीबीवाल्याला कुठली माती ओढायची त्याच्या मधूनमधून सूचना चालू होत्या.&lt;br /&gt;शेजारीच आठदहा खोल्या असलेली एक प्रशस्त इमारत बांधून झालेली दिसत होती.. समोर बांधकामाचे बांबू, फळ्या, सिमेंट पडलेलं होतं. &lt;br /&gt;त्या शेडमध्‍ये पाचपंचवीस गाद्यागिराद्याही थप्पी लाऊन ठेवल्या होत्या.&lt;br /&gt;आम्ही तिथंच आगंतुकासारखे जाऊन बसलो. आमच्या पुढे असलेल्या त्रिमूर्तीमध्‍ये कुजबूज झाली. एकजण उठला व त्या भगवे वस्‍त्रधारी स्वामींकडे गेला. आज रात्री इथे थांबणार आहोत वगैरे विचारले असावे. कारण लगेच स्वामीजींनी त्या परिक्रमीला नमस्कार वगैरे केला आणि लगेच आश्रमाच्या सेवेकर्‍यानं आम्हाला एक सतरंजी आणून दिली. त्या नवीन ईमारतीच्या व्हरांड्यात ती टाकली.&lt;br /&gt;आतापर्यंत नर्मदेच्या पात्रातून जो पुल नजरेत होता त्यावरुन वहानांच्या लाइटचा प्रकाश ये-जा करताना दिसत होता. तोही आम्ही चालत होतो तिथून तीन कि.मी. वर होता. हा पुल नर्मदेच्या अल्याड-पल्याड पाच-पाच किलोमीटरवर असलेल्या बडवाह आणि सनावद या गावांना जोडतो असे सकाळी पुढे गेल्यावर दिसले. पुलावरुन बडवाहला येऊन इंदूरला जाणारी बस पकडता येणार होती. मोरटक्क्‍याचा रेल्वे पुल मात्र तिथून आणखी चार किलोमीटरवर होता.&lt;br /&gt;त्यामुळं मोरटक्क्‍यावरुन रेल्वेनं इंदूरला परतण्‍याचा प्लॅन रद्द केला.&lt;br /&gt;दिवसा नर्मदेतून सरळ पुलाकडे जाता आलं असतं. पण आता रात्र पडल्यानं वरच्या कच्च्या रस्त्यावरुन भलतीकडेच गेलो असतो. तिथं असलेल्या एकदोन मोकळ्या लोकांना स्टेशनचा रस्ता विचारला तर त्यांनाही तो नीट माहित नव्हता. आशूपण ''जाऊ दे, सकाळी जा..'' म्हणाला. मग थांबलो.&lt;br /&gt;मग प्रश्न आला रात्री खायचं काय? या आश्रमात सोय होते की नाही वगैरे काही माहित नव्हतं. म्हटलं ओंकारेश्वरातून आणलेल्या भज्यांचं पार्सल आणि टहाळ आहेच.&lt;br /&gt;आणि रात्री थंडीत पांघरायचं काय? आशूकडं फक्त एक सतरंजी आणि माझ्‍याकडे विकत घेतलेली पुस्तके व अंगावरल्या कपड्‍यांशिवाय काही नव्हतं. त्या नव्या ईमारतीच्या व्हरांड्‍यात टाकलेल्या सतरंजीवर गप्पा मारीत बसलो.&lt;br /&gt;सोबतच्या त्रिकुटाने सायंपूजेसाठी नर्मदा जलाच्या आपपल्या बाटल्या काढल्या.&lt;br /&gt;त्यांच्यापैकी एकाकडे असलेल्या मोबाईलच्या उजेडात नर्मदाष्‍टक काही सापडेना. निरांजन, उदबत्त्या लाऊन त्यांना मुखपाठ होती ती आरती म्हणून त्यांची नर्मदा पूजा आटोपली. आशून त्याच्याकडच्या पुस्तकात शोधून नर्मदाष्‍टक म्हटले. तेवढ्‍यात एक माणूस 'भजन के लिये चलिये.. भगवान ने बुलाया है'' सांगत आला.&lt;br /&gt;ऐन डगरीच्या कडेवर बांधलेल्या शेडमध्‍ये ते स्वामी रहात होते आणि आश्रमातले पंधरावीस लोक त्यांना भगवान म्हणत होते.&lt;br /&gt;पेटी, ढोलक, टाळांच्या तालावर भजन सुरु होते, पेटीवर ते स्वामीजी.&lt;br /&gt;भजन संपले. नर्मदेकडे तोंड करुन, सर्वांनी रांगेने ताट हातात घेऊन केलेली आरती झाली त्यावेळी खाली नर्मदेचे पाणी पल्याडच्या तुरळक दिव्यांमुळे अंधारात लकाकत होते.&lt;br /&gt;स्वामीजींनी प्रसाद म्हणून सेवेकर्‍याला आतल्या शेडमधून चिकू आणि चिकू न सापडल्यास जांब आणायला सांगितले. पेटी, ढोलक वगैरे आत गेले.&lt;br /&gt;तो प्रसाद घेतला.&lt;br /&gt;मग स्वामीजींनी कहां से आये है वगैरे विचारणा केली.&lt;br /&gt;साडेपाच सहा फुट उंची, बेचाळीस - पंचेचाळीच वय, एकूणच शरीराचा गोल गरगरीत घेर आणि दोन्ही डोळे बारिक करुन, बोलताना दोन्ही बुब्बुळे डाव्या-उजव्या कोपर्‍यात जाणारी, निष्‍पापपणा दाखवणारी लकब.&lt;br /&gt;मी माझं नाव, इंदुरात काय करतो वगैरे सांगितलं तेव्हा ''हां वो ममता कुलकर्णी...'' हे बोलून स्वामीजींनी ते वाक्य मध्‍येच तोडले. मग आशू पुण्‍यातून आलाय हे ऐकून त्यांनी परिक्रमेबद्दल रितसर, तपशीलवार मार्गदर्शन केलं.&lt;br /&gt;आपको नर्मदा के तट पर जीवन के सभी रुप दिखेंगे. सभी प्रकार के लोग है. कहीं आश्रम समृद्ध होकर भी आपको कुछ पूछे बिना हकाल दिया जायेगा, कहीं बहुत आदर सत्कार मिलेगा. शांती से सब देखना है और मईया का स्मरण करते हुये आगे बढते रहना है वगैरे बर्‍याच महत्त्वाच्या गोष्‍टींची त्यांनी आठवण करुन दिली.&lt;br /&gt;स्वयंपाक तयार होतोय, जेऊन जा हेही सांगितले.&lt;br /&gt;पांघरण्‍यासाठी काही नाहीय हे कळल्यानंतर सेवेकर्‍याला ''अभी वो सुरत से नये चद्दर आये है उसमें से इनको दो'' म्हणून सांगितले. &lt;br /&gt;आमची चिंता मिटली.&lt;br /&gt;त्या ओमानी म्हातार्‍यांसारख्‍या दिसणार्‍या त्रिकुटाला त्यांनी नाव गाव विचारले.&lt;br /&gt;गाडरवारा हे त्यांच्या गावाचे नाव ऐकून ''रजनीश की जनमभूमी'' म्हटल्यावर मला ते तिथून आल्याचे कळले. मी आधीही त्यांच्या गावाचे नाव विचारले होते, पण मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा च्या हिंदी चालीत त्यांनी सांगितल्याने मला ते नीट कळाले नव्हते.&lt;br /&gt;रजनीशांच्या जन्मगावातून आलेली ती त्रिमुर्ती माझ्‍यासाठी इंट्रेस्‍टिंग विषय होती.&lt;br /&gt;स्वामींना पुन्हा एकदा नर्मदाष्‍टक म्हणण्‍याची इच्छा झाली. पेटी, ढोलक बाहेर आले.&lt;br /&gt;तिथे रहाणार्‍या दोन लहान मुली व एक मुलगाही होते. त्यांना मी तुमचे नाव काय, शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारले तेव्हा स्वामींजींनी ''अरे वो स्कुल में जाते है.. लेकीन वहां कुछ सिखाया नहीं जाता.. हमने कहा शिक्षा हम देंगे.. स्कुल से सिर्फ डिग्री ले लेना..'' म्हणून लोकांना हसवले.&lt;br /&gt;थोड्या वेळाने केळीची पानं मांडली गेली. गरमागरम वरण, चवीला धपाट्यासारखा, पण थोडा जाड 'टिक्कड' नावाचा परिक्रमींचा पेटंट पदार्थ आणि स्वामीजींने मुद्दाम आतून मागवलेले फरसाण यावर आम्ही थकलेले, भुकेजलेले लोक तुटून पडलो. मी तर नर्मदाकिनारच्‍या त्या काकडून टाकणार्‍या थंडीत सूप पिल्यासारखे ते गरमागरम, तिखट वरण ओरपले.&lt;br /&gt;जेवणं झाल्यावर आम्ही सकाळी पाच वाजताच निघू हे सांगितल्यानंतर स्वामीजींनी पुन्हा एकदा आम्हाला नीट मार्गदर्शन केले. सू्र्योदय झाल्याशिवाय बिलकुल रस्त्यावर चालायला सुरुवात करायची नाही. सूर्यास्त झाल्यावरही चालायचे नाही. तुम्हाला पूर्णत: अनोळखी रस्त्यात काटेकुटे, साप-किरडू, घळ काहीही असू शकते वगैरे काळजी घ्यावी अशा गोष्‍टी सांगितल्या. लवकर जायचे आहे तर जा, पण सूर्योदय &lt;br /&gt;होऊ द्या वगैरे.&lt;br /&gt;आम्ही त्यांच्या अगत्याबद्दल, केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुन:पुन्हा आभार मानले, त्यांचं दर्शन घेतलं.&lt;br /&gt;त्यावर -&lt;br /&gt;''अरे हम तो भुक्कड बाबा है... हमारे गुरुने यहां बिठाया है तो हो गये हम भगवान'' असे प्रांजळपणे सांगितले.&lt;br /&gt;आठ एकरांचा आश्रम आहे. इंदुर जिल्ह्यातले धार आणि सुरतेत आणखी एका ठिकाणी मोठे आश्रम आहेत. नर्मदेच्या तटावर रहाण्‍याची इच्छा झाली, आता कायम मुक्काम इथेच. मध्‍ये मध्‍ये तिकडे जातो वगैरे व्यक्तिगत गोष्‍टी त्यांनी सांगितल्या.&lt;br /&gt;तुम्हाला फोर व्हिलर चालवता येते काय असा प्रश्नही मध्‍येच मला विचारला. त्यांना जवळ कुठेतरी जाऊन यायचे असावे.  त्यांची  स्कॉर्पिओ पार्क केलेली होतीच. पण मला गाडी चालवता येत नव्हती.&lt;br /&gt;आम्ही निरोप घेऊन परत त्या ईमारतीत आलो. पाठोपाठ रगी घेऊन माणूस आलाच. मी परिक्रमावासी नाहीय, फक्त सोबत आलोय हे कळाल्याने त्यांनी दोघांसाठी 3 रगी पाठवून दिल्या होत्या.&lt;br /&gt;तुम्ही शेजारीच टाकलेल्या कॉटवर झोपा असे सांगून, थोडावेळ गप्पा मारुन तो माणून निघून गेला. पण सतरंजी प्रशस्त होती, आणि परिक्रमेला निघाले नसलो तरी उगाच स्पेशल ट्रिटमेंट घ्‍यावी वाटेना. &lt;br /&gt;माझ्या अंगावर तरी रेक्‍झीनचे जॅकेट होते. आशूकडे तर फक्त एकावर एक घातलेले दोन शर्ट. &lt;br /&gt;त्याला त्या दोन रगी आग्रह करुन घ्‍यायला लावल्या. आशू ध्‍यान, नामस्मरण करु लागला व मी झोपेची आळवणी.&lt;br /&gt;रजनीशांच्या गावचे त्रिकुट सोबत आणलेल्या रगीमध्‍ये गुरफटुन कधीच घोरु लागले होते.&lt;br /&gt;थोड्या वेळाने आशूही झोपला. मला काही त्या थंडीत झोप लागेना. रात्रभर या कुशीवर-त्या कुशीवर होत उजाडले. सकाळी सहा-सव्वासहाला नव्या बांधकामावर पाणी टाकण्‍यासाठी आश्रमाची माणसे आली. आम्हाला उठवले.&lt;br /&gt;आपल्याला निघून जायला सांगत आहेत असा त्या त्रिकुटाचा गैरसमज झाला व ते चंबूगबाळे आवरुन डगरीच्या खाली गेले. मग आम्हीही रगी, सतरंजी घडी घालून त्या माणसांकडे सोपवल्या व त्या त्रिकुटामागेच डगर उतरलो. दिशा पुरेशा फटफटल्या नव्हत्या.&lt;br /&gt;डगरीखाली जाऊन तिथे पडलेले आयचन गोळा करुन शेकोटी पेटवली व शेकत बसलो. त्या त्रिमूर्तीला मी रजनीशांबद्दल माहिती विचारली. पण रजनीशांच्या बाकी जगातल्या ख्‍यातीबद्दल त्यांना काही गम्य नव्हते. ज्याच्या नावाने गावात एक शाळा आहे तोच हा रजनीश एवढीच माहिती त्यांना होती. हिंदी चित्रपटात सहसा चंबळ खोर्‍यातल्या डाकुंच्या तोंडी असलेले 'कछू' सारखे शब्द ते बोलण्‍यात वापरत होते आणि त्यांची बोलीही दोन-दोनदा विचारून समजून घ्‍यावी लागत होती.&lt;br /&gt;सूर्य बराच वर येईपर्यंत शेकत बसलो. त्रिकुटाने चहाची तयारी केली. त्यांनी सोबत असलेला गांजा बाहेर काढला.&lt;br /&gt;''इ चीज अपने को चलत नाही.. कभी गलती से पी लिये तो एक पैर कछू इधर गिरे तो दुसरा उधर''&lt;br /&gt;असे म्हणून त्यातल्या पोक्त म्हातार्‍याने दुसर्‍या दोघांची आमच्यासमोर थट्टा केली. सूर्य बराच वर आला होता. &lt;br /&gt;त्या म्हातार्‍यांनी आशूला परिक्रमेत एक रग, खाली अंधरायला पोत्यांचे चव्हाळे, पाण्यासाठी कडी असलेला डबा, स्वेटर आणि हातात काठी असायलाच पाहिजे हे पटवून दिले.&lt;br /&gt;आम्ही त्या तिघांचा निरोप घेतला आणि ''नर्मदे हर'' करुन निघालो. नर्मदेचा तट पक्क्या खडकांचा होता, म्हणूनच वर पुल बांधला होता. त्या पुलाच्या दिशेने निघालो. वाटेत खडकात खोदलेल्या चरामध्‍ये नर्मदेच्या पाण्‍याची चिंचोळी धार आडवी आल्याने आशूला वरुन शेतातून लांबलचक चाल करावी लागली. मी ती धार पार करुन त्याची वाट पहात वर डगरीवर थांबलो.. तेव्हा ती मागे सोडून निघालेली त्रिमूर्ती त्याच्यासोबत येताना दिसली.&lt;br /&gt;हळूहळू चालत बडवाहच्या पुलापर्यंत आलो. ते तिघे पुढे निघुन गेले.&lt;br /&gt;आम्ही वर आलो आणि मी चहा बिस्कीट घेतले. आशू मात्र काही घेणार नाही यावर ठाम. म्हटले असो.&lt;br /&gt;आशूला पुलाशेजारच्या घाटावर बसवले कारण त्याला नर्मदा ओलांडता येणार नव्हती. मी बडवाह गावात निघालो. सकाळचे साडेनऊच वाजले होते तरी मार्केटमधली सगळी दुकाने उघडली होती.&lt;br /&gt;एका दुकानात वजनाला अत्यंत हलकी पण गरम रग, स्वेटर घेतले. चटई विचारली. त्याला वाटले मी नर्मदा किनारी श्राद्ध घालण्यासाठी आलोय आणि श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणाला देण्‍यासाठी मला त्या वस्तू पाहिजेत. पण मी परिक्रमेत जाणार्‍या माणसासाठी या वस्तू घेऊन चाललोय हे सांगिल्यानंतर तो दुकानदार स्वत:च माझ्‍यासोबत मला काय काय हवे त्याचा योग्य भाव करीत मार्केटमधून हिंडू लागला. दुसर्‍या दुकानदारांना पटवून त्याने योग्य त्या भावात सगळ्या वस्तू घेऊन दिल्या. &lt;br /&gt;त्याने ही मदत करीत त्या बाजारातून हिंडत असताना तेवढ्‍यातल्या तेवढ्‍यात आमची गट्टी जमली.&lt;br /&gt;सगळ्या वस्तू घेऊन झाल्यानंतर पुन्हा त्याच्या दुकानात नेऊन आग्रहाने चहा पाजला. त्यांना नमस्कार करुन तिथून निघालो आणि सहा आसनी रिक्षात बसून परत आशू बसला होता त्या घाटावर आलो.&lt;br /&gt;अडचण अशी आली की या सामानामुळे आशूकडचे ओझे वाढले.&lt;br /&gt;त्याने शेवटी दोन जीन्सच्या पॅंटी आणि शर्ट तिथेच घाटावर ठेऊन दिले. सोबत घेतली नाहीत तरी चालतील अशी पुस्तके माझ्‍याकडे दिली. सॅक उचलून पाहिली तेव्हा वजन सांभाळता येईल एवढे झाले होते. पाठीवर सॅक, एका हातात कमंडलूसारखा कडी असलेला डबा आणि दुसर्‍या हातात ''?'' या आकारासारखी आजोबांची काठी. रस्‍त्यात अचानक कुत्रे, साप समोर आल्यावर, ओबडधोबड खडकांवरुन, चिखलातून चालताना काठी पाहिजेच. मीच आग्रह करुन त्याला ती घ्‍यायला लावली, त्याने सोबत ठेवली असेल की नाही देवजाणे. &lt;br /&gt;शेवटी एकदाची आत्मशून्याचा निरोप घ्‍यायची वेळ आली.&lt;br /&gt;निघतो म्हणालो. त्याने छातीशी धरले. भडोचला पोहोचल्यानंतर फोन कर म्हणालो.&lt;br /&gt;मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला. &lt;br /&gt;मी घाट चढून आलो नर्मदेकडे पहात सिगारेट संपवली. पुल ओलांडून बडवाहकडे निघालो तेव्हा दूरवर नर्मदेच्या डगरीशेजारुन आशूची संथ परिक्रमा सुरु झालेली होती. &lt;br /&gt;समाप्त&lt;br /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/qGTZle5cxvuTm4haF3do4xM4xGJbljOH7EdszQZtSms?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="349" src="https://lh5.googleusercontent.com/-vvSAmyN9cFg/TxRIhbanUfI/AAAAAAAABNA/Xt9o5Vmo49c/s800/parikrama.JPG" width="710" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/Y7K2SkP9oTiSUExxoyvBPxM4xGJbljOH7EdszQZtSms?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="381" src="https://lh5.googleusercontent.com/-hV6aFjmMnKA/TxRHiYfrH1I/AAAAAAAABMk/MYL5EFiTVMY/s640/departing%252520point.JPG" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;आशू थांबलेला घाट निळ्या ठिपक्यावर व बडवाह गाव वर्तुळात&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-7754472773211248197?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/7754472773211248197/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_16.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7754472773211248197'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7754472773211248197'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_16.html' title='एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh5.googleusercontent.com/-vvSAmyN9cFg/TxRIhbanUfI/AAAAAAAABNA/Xt9o5Vmo49c/s72-c/parikrama.JPG' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-7722972025758389734</id><published>2012-01-13T21:50:00.001+05:30</published><updated>2012-01-22T15:16:51.104+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><title type='text'>एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.&lt;br /&gt;..... पूर्वसूत्र &lt;br /&gt;रस्त्यात बोलायला तोंड चालत नसेल तेव्हा खाण्‍यासाठी चालवावे म्हणून भाजलेल्या हरभर्‍याचा हिरवा टहाळ आणि केमिस्‍ट-कम-भजेवाल्याकडून स्‍वादिष्‍ट भजिये सोबत बांधून घेतले होते. भक्त निवासाची खोली तिथल्या औपचारिकता पूर्ण करुन नर्मदा पूजनाला निघतानाच सोडली होती. त्यामुळे आता आम्ही निघायला मोकळे होतो.&lt;br /&gt;डाव्या बाजूच्या रस्त्याने नर्मदेच्या पात्रात उतरलो आणि आमच्या मागे वाळूत परिक्रमेची पावले सुटत जाऊ लागली. मागे दूरवर ओंकारेश्वराचे शुभ्र रंगातील शिखर चमकत लहान होत जात होते. काही अडचणी सोडता अखेर परिक्रमेला निर्विघ्न सुरुवात झाल्याने आत्मशून्य सुखावला होता.&lt;br /&gt;भक्त निवासातून निघताना शेवटच्या क्षणीही आहे त्या स्‍थितीत परिक्रमेला निघण्‍यासाठी मी शेवटचे हातपाय मारुन पाहिले. ऑफिसला न कळवता एक दिवस इकडे थांबलो होतो. ऑफिसमधून सहकार्‍यांनी फोन केले होते. मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.&lt;br /&gt;दुधाची तहान ताकावर म्हणून मोरटक्क्‍यापर्यंतचे 12 कि.मी. चालू लागलो. वाळू, खडक, कधी गवताळ डगरींच्या उतारावून पुसट दिसणार्‍या पायवाटेने निघालो. मध्‍ये काठावर नर्मदेच्या पुराने क्षरण झालेले संगमवराचे रंगीत खडक दिसत होते. नर्मदा कुठे संथ, कुठे कलकलाट करीत पुढे जात होती.&lt;br /&gt;ओमकारेश्‍वरापासून पुढे एक-दीड किलोमीटरवर नर्मदेत कावेरी (दक्षिण भारतातील नव्हे) येऊन मिळते. पैलतीरावर तो संगम दिसत होता. तिथेही गर्दी दिसत होती. दोन्ही तीरांवरची नजरेच्या आवाक्यात येईल तेवढी शोभा पहात पुढे जाऊ लागलो.&lt;br /&gt;मध्‍ये एक ओघळ लागला. त्यातल्या खडकांवरुन मी तो ओलांडला.&lt;br /&gt;आत्मशून्य मात्र मागेच थांबला.&lt;br /&gt;नर्मदा, तिच्यातून निघालेली पाण्‍याची चिंचोळी पट्टीही कुठेच ओलांडायची नाही. ती जिथपर्यंत पसरली असेल तिथपर्यंत चालत जाऊन जमिनीवरुनच पुढे जायचे. नर्मदेत येणार्‍या इतर नद्या, ओहोळ, झरे ओलांडले तर हरकत नाही असे जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकात लिहीले आहे.&lt;br /&gt;हा ओढा ओलांडावा की कसे या द्विधा मन:स्‍थितीत आत्मशून्य गांगरला आणि तंतोतत शास्‍त्रोक्त परिक्रमाच करायची असल्याने त्याला तो ओढा ओलांडायचा धीर होईना. त्याने ओढा कुठपर्यंत आहे ते पहाण्‍यासाठी त्याच्या काठावरुन आत जंगलात जायला सुरुवात केली. मी चिडलो होतोच. पण त्याची स्‍थिती समजू शकत होतो. वाद घालणार नव्हतो. सोबत घेतलेल्या हरभर्‍याच्या ओंब्या सोलून तोंडात टाकत मी आपला ओढ्‍याच्या पलिकडे बसलो.&lt;br /&gt;खूप वेळाने तो परत आला. ओढा दूरपर्यंत गेला आहे हे त्याला दिसले असावे.&lt;br /&gt;आत्मशून्याने सॅकमधील कुंटेंची पुस्तके काढून शंका निरसनासाठी पाने चाळत ओढ्‍यापलिकडील खडकांमध्‍ये बसकण मारली. अर्धा तास उलटला तरी त्याला समाधानकारक उत्तर सापडले नसावे. मी कंटाळलो. शेवटी चिडून ओरडलो - जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.&lt;br /&gt;ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला आणि माझ्‍याकडचा फोन घेण्‍यासाठी त्याने मला ओढ्‍यापलिकडे बोलावलो. गेलो आणि फोन दिला. रेंज नव्हती. तो नर्मदेतल्याच एका टेकाडावर गेला आणि तिथून त्याने पुस्तकात दिलेल्या प्रकाशकांच्या नंबरवर पुण्‍याला फोन लावला. कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत, दोन मिनिटात तिथला नंबर एसएमएसने पाठवतो असे पलिकडून उत्तर मिळाले.&lt;br /&gt;मी पुन्हा ओढा ओलांडून इकडे येऊन बसलो.&lt;br /&gt;कुंटे नाशिकला थांबलेल्या ठिकाणचा नंबर सांगणारा एसएमएस आला. त्याने त्यावर फोन लावला तर कुंटे आत्ताच झोपले असून साडेपाच वाजता उठतील असे उत्तर मिळाले. म्हणजे कल्याणमस्तू! आता हा महात्मा साडेपाच वाजेपर्यंत किंवा समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ओढ्यापलीकडेच बसून रहाणार आणि त्यात कल्पांतही उलटू शकतो. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे हा ही नंतरच्या परिक्रमावासियांना अधूनमधून दर्शन देणार असा विचार करुन मी माझे मनोरंजन करीत शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली.&lt;br /&gt;तासभर उलटला. शेवटी त्याला ओरडून म्हणालो - ''दहा मिनीट ध्‍यान कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर.''&lt;br /&gt;त्याला ते काही पटले नसावे.&lt;br /&gt;शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही.. तसं पहायला गेलं तर नर्मदेवर धरण आहे त्यातल्याच पाण्‍याचा हा ओढा असू शकतो..असेल किंवा नसेलही.. पण अशी साखरेची साल काढत बसले तर परिक्रमाच पूर्ण होणार नाही..असे कितीतरी ओढे तुला रस्त्यात ओलांडावे लागतील वगैरे युक्तीवाद करुन पाहिले... तो काही बधेना.&lt;br /&gt;मी कंटाळून पुन्हा ओढ्‍यापलीकडे जाऊन बसलो. दहा-पंधरा मिनिटांनी त्याला पुस्तकात उत्तर सापडले. त्याने मला पुन्हा तिकडे बोलावले. नर्मदेतून निघालेला ओघळ ओलांडू नये, इतर झरे, नद्या ओलांडायला हरकत नाही असे काहीतरी वाक्य होते. &lt;br /&gt;तो नर्मदेचा ओहोळ नसून कुठून तरी वाहात आलेला ओढा आहे - ओलांडायला काहीच हरकत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो एकदाचा  पलिकडे आला आणि पुन्हा निर्वेधपणे अंतर कापले जाऊ लागले. आता त्याच्यासोबत वाद घालायला काहीच हरकत नव्हती.&lt;br /&gt;मी मटीअरिलिस्टीक आयुष्‍य मनसोक्त जगून पाहिले आहे.. हे सुरु करतोय तेव्हा ते शास्‍त्रोक्तच असायला पाहिजे हा माझा अट्‍टाहस आहे. उत्तर सापडले नसते तर मी साडेपाच वाजेपर्यंतच काय, रात्रभर तिथेच बसून राहिलो असतो वगैरे उत्तरे त्याने दिली आणि मी या माणसासोबत येऊन कृतकृत्य झालो आणि त्याच्या कर्मठतेला मनोमन नमस्कार केला.&lt;br /&gt;मी पुन्हा एकदा मिपावर हे सगळे लिहिण्‍याचा मुद्दा काढला. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. त्याला वाटले मी टिका करण्‍यासाठी हे मिपावर लिहिणार आहे.&lt;br /&gt;''माझ्‍यावर काय हवी ती टिका कर.. पण माझ्‍या गुरुंना यात ओढू नको'' कळवळून आत्मशून्य म्हणाला.&lt;br /&gt;मी असे काही करणार नव्हतोच.&lt;br /&gt;हा प्रसंग लिहीला तो आत्मशून्यावरची टिका म्हणून नव्हे हे वेगळे सांगायला नको. प्रसंगातून काय व्यक्त झाले आहे ते वाचकांनीच मला सांगावे.&lt;br /&gt;पुढे चालत राहिलो. तीन-चार कि.मी. मागे पडले असावेत.&lt;br /&gt;नर्मदेचे आता अनेक डोह दिसत होते. डोक्यावरचे केस पिकलेल्या आजोबांसारखे दिसणार्‍या डोंगरांच्या पायथ्‍यापर्यंत जाऊन नर्मदा सागरासारखा भासणार डोह करुन संथपणेपुढे जात होती. उन्हं कलायला उशीर असताना पात्रात जिकडे तिकडे गूढ-गंभीर शांतता दाटली होती. ते दृश्य पाहून ''चानी'' या चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नावाडी जशी आरोळी मारतो तशी आरोळी मारुन पहावी वाटली.&lt;br /&gt;''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!!&lt;br /&gt;प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.&lt;br /&gt;पात्रातील जमिनीच्या पट्ट्‍यांवर टरबूज, काकड्‍या, मका ही पिके घेऊन राखणीला झोपडी करुन रहाणारे लोक दूरवर दिसत होते. माकडे त्या पिकांवर टपून असणारच. ती डगरींवरच्या खैराच्या झाडांवर शेपट्या खाली सोडून निवांत काहीतरी चावत, बगला खाजवत बसलेली दिसत होतीच.&lt;br /&gt;उन्हानं रापलेली शेताची एक कारभारीण सामोरी दिसली. एकटीच पिकाच्या राखणीला थांबलेली असावी. तिला साद घातली -&lt;br /&gt;''नर्मदे हर ''&lt;br /&gt;''हर हर नर्मदे'' तिने उत्तर दिले आणि तिच्या रस्त्याने गेली.&lt;br /&gt;परिक्रमेदरम्यान माणूस दिसला की त्याला ''नर्मदे हर'' म्हणायचे. म्हणजे हा परिक्रमावासी आहे हे त्याला कळते.&lt;br /&gt;चालत राहिलो. &lt;br /&gt;आता पायवाट चढाची आली होती आणि रस्ता प्रशस्त दिसत होता. तो चढून वर आलो. धुळीत दुचाक्यांच्या टायरच्या खूणा उमटल्या होत्या. हा रस्ता एखाद्या आश्रमाच्या दिशेने जात असावा. काही वेळ चालत राहिल्यानंतर आश्रम दिसलाच. त्या वावभर रस्त्याला जोडून असलेल्या डगरीतून सिमेंट विटांनी पायर्‍या बांधून वर प्रशस्त जागी उतारावरच आश्रम होता.&lt;br /&gt;केस पूर्ण पांढरे झालेले, पिकलेले, थकलेले व काठीच्या आधाराने उभे राहून नर्मदेच्या संथ डोहाकडे पहात उभे असलेले एक वृद्ध साधूबाबा दिसले. त्यांना ''नर्मदे हर'' केले.&lt;br /&gt;क्षीण आवाजात त्यांनी उलट ''हर हर नर्मदे'' केले.&lt;br /&gt;म्हणाले - ''खाना खावो.. उपर''&lt;br /&gt;भूक नव्हतीच.&lt;br /&gt;''खाना तो नहीं... पानी है तो पी सकते है'' आशू म्हणाला.&lt;br /&gt;पायर्‍या चढून वर गेलो. एका बाजूला मांडव घातला होता. दोन-पाच भगवे कपडे घातलेले साधू इकडे तिकडे विखरुन होते. एक आमच्याएवढाच तरुण, दाढी-मिशा राखलेला, डोळ्यात काजळ घातलेला साधू यज्ञकुंडाजवळ बसून अंगाला राख फासून घेत होता. अंगावर फक्त लंगोट. राख फासून झाल्यानंतर त्यानं भगवा पंचा गुंडाळला आणि यज्ञकुंडाजवळ काहीतरी खालीवर करीत बसला.&lt;br /&gt;आश्रमात परिक्रमावासी थांबलेले होते. मंडळींची जेवणं नुकतीच आटोपलेली दिसत होती. कारण नळावर गेलो तेव्हा पांढर्‍या कपड्यातले पाच-सात परिक्रमावासी खरकटी भांडी तिथे आणून ठेवत होते.&lt;br /&gt;ओंजळ करुन दोघेही पाणी प्यालो.&lt;br /&gt;ते खालचे वृद्ध साधुबाबा काठी टेकीत वर मांडवात येऊन बसले.&lt;br /&gt;त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी परिक्रमा कहां से उठाई म्हणजे कुठून चालायला सुरुवात केली वगैरे विचारणा केली. उत्तर दिले. मोरटक्का किती दूर राहिले ते त्यांना विचारले. त्यांनी मैल आणि किलोमीटर अशा दोन्ही मापात मोरटक्क्‍यापर्यंतचे अंतर किती राहिले त्याचे उत्तर दिले. साधूबाबा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत टिकले होते असे ताडले. पण जास्त काही विचारणा केली नाही.&lt;br /&gt;खाली उतरुन नर्मदे हर म्हणून चालायला सुरुवात केली.&lt;br /&gt;पुढे गेलो तर तारेचे कुंपण घातलेले होते. तारेखालून एक घळ सापडली. मी त्यातून घसरत पुढे गेलो व तारा ओलांडल्यावर अलिकडे उभ्या आशूकडून पिशवी घेतली. तो वर जाऊन तारांत अंतर जास्त होते तिथून आला.&lt;br /&gt;पुढे चालू लागलो.&lt;br /&gt;पायवाटेभोवती पसरट पाने असलेल्या खैर, ऐन किंवा धावड्याच्या झाडांचे जंगल पसरले होते. जमिनीवर जिकडेतिकडे पडलेली पांढरी पाने उदास वाटत होती. वनविद्येचा अभ्यास नाही म्हणून नक्की झाडे कोणती ते कळले नाही.&lt;br /&gt;चालत राहिलो. नर्मदा खाली सोबतीला होतीच.&lt;br /&gt;समोर पसरलेल्या पायवाटेवर उमटलेल्या प्राण्‍याच्या पायाच्या खूणा पाहून आशू म्हणाला - ''पगमार्क... वाघ असेल की बिबट?''&lt;br /&gt;वाघ-बिबट्‍याच्या पाऊलखूणा तळहातापेक्षा थोड्या मोठ्‍या उमटतात. समोर मातीत उमटलेल्या खुणा लहान होत्या.&lt;br /&gt;लांडगा, कोल्हा किंवा कुत्राही असेल. पुढे चालू लागलो.&lt;br /&gt;आता पायवाट नर्मदेच्या पात्रात उतरून वाळूतून जात होती. औंदुबरासारखी दिसणारी काही खुरटी, काही उंच गेलेली झाडे नर्मदा जिकडे जाते त्या दिशेने वाकली होती. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. ही झाडे वाकडी-तिकडी वाकल्याने का होईना पण टिकून राहिली होती.&lt;br /&gt;आणखी दोन-अडीच किलो मीटर मागे पडले असावेत.&lt;br /&gt;एक झाड पाहून बसलो आणि सिगारेट पेटवली. थोडावेळ गप्पा मारुन पिशव्या काखोटीला मारल्या व पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या पाण्‍यात यू टर्नसारखा एक प्रचंड प्रस्तर शिरला होता. त्याच्या मागच्या बाजूने आत जाता येणार नाही अशी झाडांची किर्रर्र दाटी. जवळ गेल्यानंतर पायवाट त्या प्रस्तराच्या कडातून वर चढत गेलेली दिसत होती. मी पुढे व तो मागे राहून हळू हळू ते प्रचंड खडक चढू लागलो. वरुन नर्मदेचा पंचवीस तीस फुट खाली पसरलेला डोह भयानक वाटत होता. पण हीच पायवाट बरोबर आहे असा संकेत करणारे छोटे भगवे ध्वज चाळीस-पन्नास फुटांवर त्यात रोवून ठेवलेले दिसले. हळूहळू चढलो आणि पुढच्या मोकळ्या जागी उतरलो. समोर एक कुलुप लावलेले मंदिर दिसले. चालत राहिलो.&lt;br /&gt;समोर नर्मदेचे विशाल पात्र दूरवर नजरेत येत होते आणि नर्मदेच्या दोन्ही डगरी जोडणार्‍या पुलाची पुसट रेष लांबवर दिसत होती. तो पुल मोरटक्क्‍याचा होता. नेमका किती अंतरावर असेल तो पाहून अंदाज येत नव्हता.&lt;br /&gt;पुढे आणखी एक छोटा आश्रम लागला. कसलीतरी अनोळखी मूर्ती शेंदूर फासून एका झाडाखाली उभी केलेली होती. शेजारी ओटा करुन  समाधी बांधलेली होती आणि वर महादेवाची पिंड होती.&lt;br /&gt;थकवा आल्याने मी त्या ओट्यावर जाऊन बसलो. तिथे झोपडीत एक माणूस बसलेला आशूला दिसत होता, तो माझ्‍या नजरेआड होता.&lt;br /&gt;तिथे समाधीच्या ओट्यावर बसू नको, तो चिडेल असे आशू म्हणाला. थकलोच एवढा होतो की कुणी काही चिडत नाही म्हणालो.&lt;br /&gt;थोड्या वेळाने लाकडी फाटक ओलांडून झोपडीकडे गेलो. इथे साधू वगैरे कुणी नव्हते. तो एकटाच माणूस पँट-बनियनवर बसला होता.&lt;br /&gt;''नर्मदे हर''.. ''हर हर नर्मदे'' झालं.&lt;br /&gt;त्या माणसाला मोरटक्का किती दूर राहिले विचारले तर त्या माणसाने हाताने दाखवत -&lt;br /&gt;''सामने पुल दिख रहा है बस वही मोरटक्का.. पांच किलोमीटर है''&lt;br /&gt;असे उत्तर मिळाले. झोपडीपलीकडचं फाटक ओलांडून पुढे गेलो. काही वेळ चालत राहिलो.&lt;br /&gt;पुढे नर्मदेचा सपाट तीर होता. पसरट पात्रात अनेक लहान लांबट मोटरबोटी नर्मदेतील वाळू काढण्‍याच्या कामात गुंतल्या होत्या. त्यांच्या एंजिन्सचा आवाज घुमत होता. वाळूच्या ओझ्यानं एक बोट तर एका बाजूनं एवढी काठोकाठ बुडली होती की तीत बसलेली माणसे आतलं पाणी उपसून बाहेर फेकत होती. मला वाटलं पाणी आत शिरतंय आणि ती बोट बुडत आहे. पण बोटीत भरलेल्या वाळूतून पाझरलेलं पाणी ते बाहेर फेकत होते.&lt;br /&gt;सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.&lt;br /&gt;तिकडे नाशिकमध्‍ये असलेले जगन्नाथ कुंटे उठले असतील म्हणून आशूने त्यांना फोन लावला.&lt;br /&gt;तु जवळ उभा राहू नको म्हणाला. त्याला वाटले मी मध्‍ये काही बोलून नसता घोळ करणार. त्याला बरंच मागे सोडून पुढे आलो.&lt;br /&gt;कुंटेंनी आशूला ''परिक्रमेत आहेस की मजा म्हणून भ्रमणात आहेस? नर्मदेतून फोन कसा काय लावता येतोय? सुरुवातीला नर्मदेचा असा कोणताही ओघळ नाहीय.. तु नक्की नर्मदा परिक्रमेतच आहेस काय? ‍वगैरे विचारून आशूची टोपी उडवली.&lt;br /&gt;ओढे, नाले पार करावे लागतातच असे समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेवटी हा त्रस्त समंध शांत झाला. &lt;br /&gt;पुढं गेल्यावर एक आश्रम लागला. त्यात वस्तीला राहिलेले परिक्रमा‍वासी पुढे निघत होते. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत अर्ध्‍या पायर्‍यापर्यंत येऊन थांबले होते.&lt;br /&gt;''नर्मदे हर'' ''हर हर नर्मदे'' झालं.&lt;br /&gt;त्यांनी कुठुन परिक्रमा सुरु केली वगैरे विचारणा केली. ''प्रमाण-पत्र'' आणलंय काय तेही विचारलं.&lt;br /&gt;''यहां रुकना है तो रुक सकते हो, लेकीन खाना खुद बनाके खाना होगा.. अगर रुकने की इच्छा नहीं है तो तीन किलोमीटर पर अगला आश्रम है.. सूर्यास्त होनेवाला है.. असं म्हणून आमच्या उत्तराची वाट न पाहता ते आत निघून गेले.&lt;br /&gt;तेवढ्‍यात मागच्या आश्रमात नळावर खरकटी भांडी आणून ठेवणार्‍या परीक्रमींनी आम्हाला मागून येऊन गाठलं.&lt;br /&gt;सात-आठ लोकांचा तो गट होता.&lt;br /&gt;इथे थांबायचे की पुढे जायचे यासाठी त्या गटाच्या म्होरक्याने सगळ्यांना विचारणा केली व त्यांचे तिथेच रहायचे ठरले.&lt;br /&gt;त्यातला एक निबर म्हातारा क्या है.. क्या है म्हणून म्होरक्यासमोर येऊन थांबला. त्यांना कमी ऐकू येत असावं. कारण म्होरक्या जे काही बोलला त्याचा भावार्थ असा - ''काही नाही झालं.. थांबायचं की पुढे जायचं ते सगळ्यांना विचारतोय.. तु लोड घेऊ नको. तुला एक गोष्‍ट चार वेळा सांगितली तरी तुझ्‍या टकुर्‍यात शिरत नाही.''&lt;br /&gt;मग ते चार पाच जण वर आश्रमात निघून गेले.&lt;br /&gt;आत्ताच म्होरक्याची बोलणी खाल्लेला वृद्ध तो म्होरक्‍या जे बोलला ते खरंच आहे असा भाव चेहेर्‍यावर घेऊन त्याचं बोचकं पायरीवर ठेऊन आमच्या सोबतच थांबला.&lt;br /&gt;मी सिगारेटचं पाकिट काढून एक त्यांना दिली. माचीस पुढे केली तर ते म्हणे - ''माचीस है.''&lt;br /&gt;आम्ही दोघांनी त्या पायर्‍यांवर बसून थोडावेळ धूम्ररेषा काढल्या.  &lt;br /&gt;मग मागून आलेल्या एका तुरुतुरु चालणार्‍या, दंताजीचे ठाणे उठून गेलेल्या सत्तरीच्या बाबांनी अगदी तोंडासमोर तोंड जवळ आणून आमची विचारपूस केली.&lt;br /&gt;''किन्नु परकम्मा उठाई? एथ्‍थे र्‍हो.. सूर्यदेव रास्ता काट निकल्या'' म्हणाले.&lt;br /&gt;आप कहां से आये है? विचारल्यानंतर पंजाबातील कुठल्यातरी अवघड नावाचा जिल्हा सांगितला.&lt;br /&gt;कितने दिन से परिक्रमा शुरु है विचारल्यानंतर आमची परिक्रमा तर विनाकांक्ष आहे.. वाटेल तेव्हा सुरु, वाटेल तेव्हा बंद.. संकल्प वगैरे काही सोडलेला नाही असे त्यांनी त्यांच्या अपरिचित तरी कळू शकणार्‍या पंजाबीत सांगितले आणि वर आश्रमात निघून गेले.&lt;br /&gt;मागून आलेल्या गटामधल्याच, ओमानी म्हातार्‍यांसारखा पेहराव केलेल्या तीन वृद्धांनी, बोलण्‍यात वेळ न घालवता पुढे झटझट रस्ता कापला आणि सायंकाळच्या निस्तेज होत जाणार्‍या उजेडात दिसेनासे झाले. ही अगदी राकट-रासवट त्रिमूर्ती एका जगद्विख्‍यात व्यावसायिकाच्या जन्मगावचे रहिवासी आहेत हे पुढे कळले.&lt;br /&gt;आमच्या जवळ शिजवून खाण्यासारखे काही नव्हते. चुलीत नुसता जाळ फुंकला असता तरी इतर परिक्रमींनी आम्हाला उपाशी ठेवले नसते. पण आशूला शेजारच्याच छोट्याशा वस्तीतील घराकडे परतणार्‍या लोकांनी पुढे चांगला आश्रम आहे तिथे थांबायला सांगितले होते.&lt;br /&gt;पुढे निघालो.&lt;br /&gt;(पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-7722972025758389734?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/7722972025758389734/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/4.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7722972025758389734'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7722972025758389734'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/4.html' title='एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-2475061313757693681</id><published>2012-01-12T20:40:00.003+05:30</published><updated>2012-01-22T15:17:43.780+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><title type='text'>एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="color: #999999;"&gt;&lt;i&gt;बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;भक्त निवास गाठण्यापूर्वी मला चहा प्यायची हुक्की आली. माझ्यासोबतचा महानुभाव "पहिल्यापासूनच उत्तेजक पेयापासून अलिप्त" होता. पण परिक्रमेत चहा प्यावाच लागणार आहे तेव्हा आतापासूनच सवय कर म्हणून आशूवर मी दर तासाला चहाचा मारा सुरु केला होता. &lt;br /&gt;घाटावरच टपरी होती. समोर रात्रीच्या वेळी झळाळून निघालेला ओमकारेश्वराचा पैलतीर आणि मध्ये संथपणे वाहाणारी नर्मदा. डोक्यावर जटाभार राखलेले साधू, इकडेतिकडे पहात घाटावर हिंडणारे फॉरेनर्स अशी तुरळक गर्दी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: 194px;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td 12january2012?authuser="0&amp;amp;feat=embedwebsite&amp;quot;" align="center" https:="" picasaweb.google.com="" style="background: url(&amp;lt;a href=; height: 194px;" yekulkarni=""&gt;&lt;img height="255" src="https://lh3.googleusercontent.com/-oZBtOy4Hag4/Tw70SWKgXsE/AAAAAAAABMI/S7f3w4JtGus/s160-c/12January2012.jpg" style="margin: 1px 0 0 4px;" width="475" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/12January2012?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite" style="color: #4d4d4d; font-weight: bold; text-decoration: none;"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;टपरीसमोर टाकलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. आम्ही चहा घेताना त्या टपरीसमोर दोन लहानग्या मुली टपरीसमोर ठेवलेल्या पदार्थांकडे आशाळभूतपणे पहात होत्या. अंगावर फाटके कपडे आणि थंडीने काकडतही होत्या. त्यांच्याकडे नजर लाऊन थोडावेळ पहात राहिलो. &lt;br /&gt;इकडे या आणि तुम्हाला काय खायला पाहिजे ते घ्या असे त्यांना सांगायला उठणार तेवढ्यात एक जीन्सपँट-जॅकेट-कानटोपी घातलेला बाप्या मध्येच उपटला व त्या दोन्ही चिमुकल्यांना त्याने पाठीवर दोन-दोन धपाटे घातले -&lt;br /&gt;"भागो यहां से, घर जा के मरो.."&lt;br /&gt;असे बडबडत आमच्याकडे तिरस्काराने पाहून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यात टपरी मालकाने त्या बाप्याला झापले -&lt;br /&gt;"अरे उनको काहे भगाया? वो बर्तन माँजने और कुछ खाने के लिये इधर आती है.. "&lt;br /&gt;"पानी में उतर गई थी - ठंड से मरमरा रही थी..बर्तन काहे माँजती..&amp;nbsp; " असे म्हणत तो बाप्या घाटावरच्याच एका गल्लीत निघून गेला. त्या लहान मुली त्याच्याच किंवा त्याच्या भाईबंदांपैकी कुणाच्या तरी असाव्यात.&lt;br /&gt;थोडावेळ तिथे बसून राहिलो व टपरीवाल्याला पैसे देऊन निघालो. टपरी वाल्यानं परत दिलेल्या जीर्णशीर्ण नोटा घेतल्या. त्या नोटा पाहून आत्मशून्य हसू लागला. इकडे फाटक्या नोटा सर्रास वापरल्या जातात. देणाराही काही बोलत नाही व घेणाराही. कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.&lt;br /&gt;"नोट फटी हुयी है.. दुसरी दो.." असे आपण म्हणालो तर इकडच्या लोकांना तो लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे वाटते.&lt;br /&gt;लक्ष्मी को फटा हुआ कहते हो - पापी कहीं के - कहां से आये हो ? असा भाव त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतो. पण इथून तिथून फाटक्याच नोटा का वापरल्या जातात त्याचे शास्त्रीय कारण आमच्या कँटीनवाल्याने माझ्या अंगावर फेकून मला निरुत्तर केले होते. इथे नवा होतो तेव्हा त्याच्याकडून रोज-रोज फाटकी नोट परत घेऊन मी चिडलो होतो. कधीतरी धडकी नोट देत जा, इकडे चांगल्या नोटा वापरूच नयेत असा नियम आहे काय असे काहीबाही बोललो होतो.&lt;br /&gt;"खोटे सिक्के चलन में लिये दिये जाते है तब खरे सिक्के ब्यवहार से बाहर होकर तिजोरी में बंद हो जाते है.. आप हम को अच्छी नोट दो - हम भी आपको अच्छी नोट देना शुरु करेंगे.."&amp;nbsp; असा यक्षप्रश्न मांडून त्याने बोळवण केली होती. आता सगळेच फाटक्या नोटा परत देत असतील तर कोर्‍या नोटा मी काही प्रिंटरमधून काढणार नव्हतो. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांचे ओझे कधी या, कधी त्या हातावर तोलत आम्ही भक्त निवास गाठला. शास्त्रीजींनी साडेसात आठला पुन्हा मंदिराकडे यायला सांगितले होते. उद्या सकाळच्या "नर्मदा पूजन - कढाई" च्या विधीची ते त्यांच्या भावाशी भेट घालून देऊन तजवीज करून देणार होते. आठ वाजायला अजून वेळ होता म्हणून आणलेली पुस्तके कुठे, कधी घेतली त्याच्या तारखा पुस्तकांवर घातल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालपर्यंत परिक्रमेचे कसे होईल, काय होईल ही चिंता करणारा शून्य काल बाळाशास्त्रींची गाठ पडून योग्य तो मार्ग सापडल्याने निर्धास्त झाला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साडेआठ कधी वाजले ते कळले नाही. तिकडच्या तीरावर जाऊन यायचे होते. तो झुलता पुल ओलांडून ओमकारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.&lt;br /&gt;तिथे झांज, ढोलक, पेटीवर त्या विशिष्ट उत्तर भारतीय ठेक्यावर भजन रंगले होते आणि लोक टाळ्या वाजवत डुलत होते.&lt;br /&gt;भजनात प्रचंड जोरात टिपेला जाणारा तो ढोलक आणि भजनाला चढलेल्या त्या रंगातून शिवशंभोच्या तांडव नृत्याची झाक दिसत होती. गाभार्‍यात ओंकारेश्वराची शयनपूजा सुरु होती त्यामुळे दारावर मखमली पडदा टाकलेला होता. भजन संपून आरती सुरु झाली. शंकराचार्यांनी रचना केलेले नर्मदाष्टक आणि कुणा शिवानंद स्वामींनी रचलेली प्रासादिक आरती सुरु झाली. दोन्हींची लय एवढी सुंदर होती की मन आतल्या आत उड्या मारू लागले आणि डोळे आपोआप मिटले जाऊन त्या तालासुरावर लोक डुलायला लागले -&lt;br /&gt;&lt;br /&gt;सबिन्दु सिन्धु सुस्खलत् तरंग भंग रंजितम &lt;br /&gt;द्विषत्सुपापजातकं आरिवारि संयुतम् &lt;br /&gt;कृतान्तदूत कालभूत भीतिहारि नर्मदे &lt;br /&gt;त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे &lt;br /&gt;त्वदाम्बुलीन दीन मीन दिव्य संम्प्रदायकं &lt;br /&gt;कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकम् &lt;br /&gt;सुमस्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे &lt;br /&gt;त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर आरती सुरु झाली&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओम् जगतानंदी.. हो मय्या जय जगतानंदी.. हो रेवा जगतानंदी&lt;br /&gt;ब्रह्मा हरिहर शंकर.. रेवा शिवहर शंकर रुद्री पालंती&lt;br /&gt;हरि ओम जय जगतानंदी&lt;br /&gt;देवी.. नारद शारद तुम वरदायक अभिनव पदचंडी&lt;br /&gt;हो मय्या अभिनव पदचंडी.. हो रेवा अभिनव पदचंडी&lt;br /&gt;सुरवर मुनिजन सेवत.. मुनिजन ध्यावत शारद पदवंती&lt;br /&gt;देवी धूम्रक वाहन राजत वीणा वाजयंती&lt;br /&gt;हो मय्या वीणा वाजयंती.. हो रेवा वीणा वाजयंती&lt;br /&gt;&lt;br /&gt;झुमकत झुमकत झुमकत&lt;br /&gt;झनन झनन झनन रमती राजंती&lt;br /&gt;देवी बाजत तालमृदंगा सुरमंडल रमती&lt;br /&gt;हो मैय्या सुरमंडल रमती .. हो रेवा सुरमंडल रमती&lt;br /&gt;तोडिताम् तोडिताम् तोडिताम् &lt;br /&gt;तुडडड तुडडड तुडडड&amp;nbsp; रमती सुरवंती&lt;br /&gt;हरि ओम जय जगतानंदी..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आरती-प्रसाद-दर्शन झाले आणि आम्ही शास्त्रीजींना शोधू लागलो. इकडे तिकडे पाहिले पण ते कुठेच दिसेनात. शून्य अस्वस्थ व्हायला लागला. उद्याचे नियोजन ठरणे महत्वाचे होते. अर्धा तास शोधाशोध आणि विचाराविचारात गेला. शेवटी त्यांना फोन लावलाच. त्यांना विचारले "कहां है आप? हम मंदिर में आपके लिये रूके है.." &lt;br /&gt;तर तिकडून उत्तर मिळाले, "हम तो घर में विश्राम कर रहें है.."&lt;br /&gt;दिवसभराच्या लगबगीनं थकून ते घरी परतले होते आणि त्यांच्या भावाला त्यांनी आमच्यासाठी मंदिरात थांबवून ठेवले होते. गर्दी फार नव्हती तरी त्यांच्या भावाला आम्ही ओळखू आलो नाही आणि हुकाचूक झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता सकाळी साडेसात किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मंदिरात या व सापडलो नाही तर फोन करा असे सांगून त्यांनी नर्मदे हर म्हणून फोन ठेवला. आत्मशून्याची धाकधुक पुन्हा सुरु झाली - काय होईल.. कसे होईल. परिक्रमेच्या रस्त्यावर पाय ठेवेपर्यंत त्याला सुख झाले नाही.&lt;br /&gt;पुन्हा घाटांवर इकडेतिकडे फिरण्यात वेळ घालवला. भक्त निवासात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. तिथली प्रसादाची वेळ उलटून गेली होती.&lt;br /&gt;भक्त निवासासमोरच्या हॉटेलमधून काहीतरी घेतले आणि रूम जवळ केली.&lt;br /&gt;---------&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री पडल्यापडल्या ईशावास्योपनिषदाचा हिंदी अनुवाद उलटून पाहिला. पहिल्याच श्लोकात आकाश दाखवणारं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदाच हातात पडलं होतं -&lt;br /&gt;&lt;br /&gt;ईशावास्यमित्यादयो मन्त्रा:&lt;br /&gt;ईशादि - कर्मस्वनियुक्ता: |&lt;br /&gt;मन्त्राणां तेषामकर्मशेष्स्यात्मनो विनियोगः&lt;br /&gt;याथात्म्य प्रकाशकत्वात् याथात्म्यं चात्मनः |&lt;br /&gt;शुद्ध्त्वापापाविद्ध्त्वैकत्व नित्यत्वा शरीरत्व सर्वगतात्वादि वक्ष्य माणम् &lt;br /&gt;तच्च कर्मणा विरुध्येतेति युक्त एवेषां कर्मस्विनियोगा: |&lt;br /&gt;&lt;br /&gt;ईशावास्यम् इत्यादी मंत्रांचा कर्मात विनियोग होत नाही - कारण ते आत्म्याच्या यथार्थ रुपाचे प्रतिपादन करतात, जो कर्माचा भाग नाही. &lt;br /&gt;&lt;u&gt;आत्म्याचे यथार्थ स्वरूप शुद्ध, निष्पाप, एकत्व, नित्यत्व, अशरीरत्व आणि सर्वगतत्व इत्यादी &lt;/u&gt;असून त्याबद्दल पुढे सांगण्यात आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;न ह्येवंलक्षणमात्मनो याथात्ममुत्पाद्यं विकार्यं माप्यं संस्कार्यं कर्तृभोक्तृरुपं वा ये कर्मशेषता स्यात् |&lt;br /&gt;सर्वासामुपनिषदा मात्मयाथात्मा निरूपणे नैव उपक्षयात्&lt;br /&gt;गीतानां मोक्षधर्माणां चैव परत्वात् |&lt;br /&gt;तदात्मानोनेकत्व कर्तृत्वभोक्तृत्वादी चाशुद्ध्त्व पापविद्ध्त्वादि चोपदाय लोकबुद्धी सिध्दं कर्माणी विहितानी |&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;u&gt;आत्म्याचे अशा लक्षणांचे यथार्थ स्वरूप उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य किंवा कर्ता-भोक्ता रुप नाही, जेणेकरून तो कर्माचा भाग रूप होईल. &lt;/u&gt;संपूर्ण उपनिषदांची परिसमाप्ती आत्म्याच्या यथार्थ स्वरुपाचे निरूपण करण्यातच होते आणि गीता व मोक्षधर्म यासाठीच अस्तित्वात आहेत&lt;u&gt;. त्यामुळे आत्म्याची सामान्य लोकांच्या बुद्धीतून अनुभवास येणार्‍या अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व तसेच अशुद्धत्व आणि पापमयत्व यांना विचारात घेऊनच कर्माचे विधान&lt;/u&gt; करण्यात आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या वाक्यांची फोड करुन त्यांचा अर्थ मनात भिनला, भिनत जाऊ लागला. आत्मा जर शुध्द, निष्पाप, एक, नित्य, अशरीरी आणि सर्वगत आहे तर तो अनुभवण्यास एवढा दुस्तर का आहे? कर्माशी आत्म्याचं काही देणं-घेणं नाही हे ही आहेच. मग नेमकी काय भानगड आहे? खरंच काही अडचण आहे की मुळात काहीही अडचणच नाही? हे एवढं सोपं असेल तर मुदलातच काही घोळ होतो आहे एवढं निश्चित. बुद्धीला ताण देण्यापेक्षा ही वाक्ये पुन्हा-पुन्हा मनात भिनवू लागलो व झोप डोळ्यांवर उतरु लागली पण मध्येच आपोआप दोन्ही नाकपुड्यांतून एकदाच श्वासोश्वास सुरु होऊन अंधार व्हायला लागला आणि मरण जवळ आलं असं दर श्वासाला वाटू लागलो. रात्रभर हेच चालू. नसती भानगड झाली. या कुशीवरुन त्या कुशीवर होता होता साडेचार-पाचला कधीतरी झोप लागली. तेव्हा आत्मशून्य जागा होऊन काहीतरी खुडबूड करीत होता. &lt;br /&gt;-----------&lt;br /&gt;&lt;br /&gt;काल रात्री हॉटेलातून घेतलेल्या रतलामी सेव फरसाणानं पोट बिघडल्याचे शुभवर्तमान त्याने साडेसात- आठला उठल्यावर जाहीर केले. माझी पण रात्रभर झोप झाली नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चहापाणी आवरुन पटकन ओमकारेश्वर मंदीर गाठलं. बाळाशास्त्रींना फोन लावला.&lt;br /&gt;"हम जरा बालक को पाठशाला में छोडने आये है, बंधू आप ही की ओर निकले है.. "&amp;nbsp; &lt;br /&gt;ओमकारेश्वराच्या पुजार्‍यालाही बालक को पाठशाला छोडने जाना पडता है हे पाहून हसू आलं.&lt;br /&gt;पंधरावीस मिनिटांत बाळाशास्त्रींचे बंधूराज शोधत आलेच. समोरच्या घाटावर जाऊन "क्छौर" करुन घ्या, मी प्रसादाचा शिरा व पूजेचं साहित्य घेऊन पोचतो म्हणाले. दक्षिणा वगैरेबद्दल विचारून घेतलं आणि पुन्हा एकदा पुलावरुन अलीकडच्या काठावर आलो.&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/tsQRQfCPmL9lpauf4r8t4NMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="800" src="https://lh3.googleusercontent.com/-aEdxl0G8-rM/TwxbEs3wAgI/AAAAAAAABJo/nAsQUEenf2o/s800/Image20.jpg" width="535" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/10January2012?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्छौर" केलेला तो गुटगुटीत आत्मशून्य वैदिक काळच्या बटू सारखा पण अनोळखी दिसू लागला. पैसे काढावे लागणार होते. एटीएम मशीनकडे गेलो तर कुणा येठनछाप माणसानं त्या गावातल्या एकुलत्या एक एटीएम मशीनचं वायर उपटून फेकलं होतं. शून्याच्या अस्वस्थपणाचा पारा पुन्हा १२० अंशांवर गेला. हे एटीएम दुरुस्त व्हायला दुपारचे बारा वाजतील पण नक्की होईल अशी माहिती त्या भल्या पहाटे एकटाच बँकेत काही खुडबूड करणार्‍या इसमाने दिली.&lt;br /&gt;एटीएम असलेलं दुसरं गाव तिथून १२ कि. मी. वर असल्याची माहिती एका सज्जन दुकानदारानं दिली.&lt;br /&gt;शेवटी आशूकडे असलेल्या हजार-दीड हजारात शास्त्रीजींना तात्पुरतं संतुष्ट करु असं ठरवून घाटावर परत आलो व त्यांना अडचण सांगितली तर - "कोई समस्या नहीं.. पहले पूजा निपटा लेते है"&amp;nbsp; म्हणून स्नानं करुन घ्यायला सांगितले.&lt;br /&gt;घाटावर पूजेचं साहित्य आणि कपडे ठेवले होते. नर्मदेच्या लाटा तिथपर्यंत येऊन आदळल्या आणि कुंकुम, अक्षता ठेवलेलं ताट सोबत घेऊन गेल्या.&lt;br /&gt;"इनकी पूजा लेने के लिये नर्मदाजी आतूर हो गई है" असं शून्याकडे पाहून म्हणालो तेव्हा शास्त्रीजी हसू लागले. नर्मदेत रोजच्या रोज वर जवळच असलेल्या धरणातून पाणी सोडलं जातं.&amp;nbsp; &lt;br /&gt;नर्मदेचे पंचामृताने पूजन करताना आत्मशून्य गडबडून गेला - त्यात पुन्हा शास्त्रीजींचे १२० च्या स्पीडने होणारे मंत्रोच्चार आणि नेमके काय करायचे त्याबद्दल मध्ये मध्ये सूचनांचा मारा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/7IaOGGNGol3zF4smPmL5ydMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="362" src="https://lh6.googleusercontent.com/-Wm9TxF6_Lbs/Tw73JiYdMjI/AAAAAAAABMQ/20Pw1hP9P5E/s640/Image19.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/10January2012?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नर्मदा मैय्या को जल चढाईये ऐकल्यानंतर हा पठ्ठ्या गडू नर्मदेत टाकू का असे विचारता झाला.&lt;br /&gt;त्याला काठावर उभं करुन पंडितजींनी पंचामृताचे द्रोण त्याच्या हातात पोहोच करण्याकामी उघड्याबंब असलेल्या आमची नेमणूक केली. पाणी सतत वाढत असल्याने काठापासून दूर एका बाकड्यावर पूजा सुरु होती.&lt;br /&gt;नर्मदेची पूजा संपन्न झाली आणि कुमारिकांच्या रुपातील नर्मदेचे पूजन सुरु झाले. घाटावरच्या यात्रेकरूंच्या दोन मुली आणि काल त्या टपरीसमोर दिसलेल्या दोन आणि आणखी त्यांच्यासोबतची एक अशा पाच जणींनी दक्षिणा व प्रसाद स्वीकारून आशूच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला. पंडीतजींनाही दक्षिणा पावली.&lt;br /&gt;परिक्रमीला ओंकारेश्वर नगर परिषदेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाटेत काही संशयात्मे "प्रमाण - पत्र" पाहिल्याशिवाय थांबायला परवानगी देत नाहीत आणि परिक्रमा करणार्‍याने ते&amp;nbsp; सोबत ठेवणे चांगलेच. परिक्रमेदरम्यान काही ठराविक गावात थांबल्यावर त्या प्रमाणपत्रावर तिथला शिक्का घ्यावा लागतो. प्रमाणपत्रावर पूजा सांगितलेल्या गुरुजींचीही स्वाक्षरी असते. ते तयार करण्यासाठी आशू व पंडीतजी घाटावरच असलेल्या नगर परिषदेकडे निघाले आणि एटीएमकडे सुटलो. एटीएमचे वायर जोडले गेले होते. परत येऊन त्या दोघांना गाठले व पंडीतजींना राहिलेली दक्षिणा देऊन मार्गस्थ केले. &lt;br /&gt;आता पोटात काव-काव सुरु झाली होती. हॉटेलमध्ये ताजा पदार्थ काहीच दिसेना पण त्याने त्याचे भजे फार स्वादिष्ट असतात असे सांगून समोरच्या "स्वादिष्ट भजिये" वाल्याकडे जायची शिफारस केली. लिंबू, मीठ मारलेले ते भजे एकट्याने हादडले. पोट बिघडल्याने शून्याने&amp;nbsp; फक्त संत्र्याच्या रसावर समाधान मानले. भजिये वाल्याला मेडिकल विचारले तर त्याने त्याच्याकडच्याच गोळांचा साठा धुंडाळला. तो केमिस्टही होता. पण हवी ती गोळी मिळाली नाही. त्याने सांगितलेली पावरबाज गोळी दुसर्‍या मेडीकलवर जाऊन आणली.&lt;br /&gt;आता आशूचा निरोप घेण्याची वेळ आली होती. घाट उतरला की त्याची नर्मदा परिक्रमा सुरु होणार होती. पण मला जावे वाटेना. शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-2475061313757693681?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/2475061313757693681/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_12.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2475061313757693681'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2475061313757693681'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_12.html' title='एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/-oZBtOy4Hag4/Tw70SWKgXsE/AAAAAAAABMI/S7f3w4JtGus/s72-c/12January2012.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-5265084645954943853</id><published>2012-01-11T03:26:00.000+05:30</published><updated>2012-01-22T15:18:53.394+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मध्‍य प्रदेश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='परिक्रमेमागील तत्त्वे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओमकारेश्वर'/><title type='text'>परिक्रमेमागील तत्त्वे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;h3&gt;&lt;b&gt;परिक्रमेमागील तत्त्वे&lt;/b&gt;&lt;/h3&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमेचे जे नियम नमूद केले आहेत ते मानून चालाव्या लागणार्‍या आध्‍यात्मिक पठडीतील आहेत. उदा. गुरुंची आज्ञा, परिक्रमेला जाण्याची प्रचंड अंतस्फूर्ती, प्राणायामाचे प्रकार, नर्मदा न ओलांडणे इत्यादी मोघमपणे पाळायचे ते नियम आहेत. त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकांत सांगितलेल्या अनुभवांची संगती आपण तसा विचार करण्‍याकडे झुकत असू तर गुरुकृपा आणि नर्मदामाईची कृपा एवढाच किंवा निव्वळ योगायोग असा लाऊ शकतो.&lt;br /&gt;वास्तविक नर्मदेचीच परिक्रमा कशासाठी करायची? पौराणिक किंवा आध्‍यात्मिक कारणं जी मानली जात असतील ती असोत - पण त्या 10-12 कि.मी. मध्‍ये त्या जीवनाची मला जी झलक मिळाली त्यातून आणि आठवडाभरातील चिंतनातून परिक्रमा हा प्रकार मला आवडला. तो कशामुळे हे थोडक्यात आटोपतो. हे मूळ कथनाला सोडून अवांतर आहे पण हेच परिक्रमेचं सार आहे.&lt;br /&gt;1. परिक्रमा ही एक एकदा का होईना करुन पहावी अशी मूलभूत रुपातील आगळी जीवनपद्धती आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या संगतीत राहून सगळंच करुनही विशेष असे काही साधत नाही. कशामुळे तरी कुठल्याही वयात असणार्‍या कुणाचाही श्‍वास थांबतो आणि तोंडाचे बोळके उघडे राहून त्याची निष्‍प्राण हाडं-आतडी शिल्लक रहातात. त्यापुढे कुठलाही शोध, संवाद, प्रयत्न अगदी सगळ्यालाच पूर्णविराम लागतो. पण सगळे काही व्यवस्‍थित चालू असताना एकटे राहून ज्ञाताच्या सीमेवरुन जो पुढे पाऊल टाकू इच्छितो त्याला परिक्रमेचा मार्ग मोकळा आहे. असं काही न मानता  'फॉर ए चेंज' वाल्यांनाही तो मोकळा आहे.&lt;br /&gt;2. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या गावांमध्‍ये किंवा आश्रमांमध्‍ये ते लोक परिक्रमावासियांच्या जेवणाची सोय करतात. धपाट्यापेक्षा थोडा जाड आणि चवीला अगदी धपाट्यासारखाच 'टिक्कड' नावाचा पदार्थ आणि वरण हे दोन साधे पदार्थ आश्रमांमधून परिक्रमावासियांना दिले जातात - तोच त्यांचा सर्वसामान्य आहार. कुठंतरी निघुन जायचं आहे, पण तिथं गेल्यावर खायचं काय अशी चिंता कोणाही त्याच त्या  रुटीनला विटलेल्या, कुठेतरी निघुन जाऊ इच्छिणार्‍या माणसाला सतावते. ही चिंता अशी आपोआप मिटली की परिक्रमावासी 'त्याचा त्याला' ध्‍यान करण्‍यासाठी स्वतंत्र असतो - हे एक.&lt;br /&gt;याचीच दुसरी बाजू म्हणून ध्‍यान वगैरे काहीही न करता फक्त पोटभरीच्या माफक आशेनं परिक्रमेत फिरणारे लोकही आहेत. कारण नर्मदेच्या तीरावरील गावातील आणि आश्रमांतील लोक जेवणाची वेळ असेल आणि परिक्रमावासी नजरेस पडला तर कोणत्या का रुपात होईना, त्याला खाऊ घालतातच. तीरावर गावे जास्तीत जास्त 20-25 कि.मी. च्या टप्प्‍यांत असली तरी दर 3-5 कि.मी. वर एखादा तरी आश्रम हा प्रकार नर्मदेच्या तीरावर अद्याप टिकून आहे. आश्रमांची ही संख्‍या वाढतही आहे.  &lt;br /&gt;3. परिक्रमेदरम्यान आयुष्‍य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज घडणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्‍ये बांधले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. या दोन अपरिहार्यतांमुळे चालणं आणि एका ठिकाणी थांबणं या दोन क्रियांवर नैसर्गिक बंधनं येतात. चालण्‍यामुळं श्रम होतात, शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होतो.. आणि रात्री नैसर्गिकपणे येणार्‍या थकव्यानं प्रचंड नैसर्गिकपणे आलेली झोप लागते आणि 'ब्राह्ममुहूर्त' नावाचं जे काही आहे त्यावेळी आपोआप जागही येते. नैसर्गिक ठरलेल्या क्रमाने ध्‍यानाला बसता येतं. काही दिवसांचे अपवाद सोडले तर हा दिनक्रमच होतो - हा परिक्रमेचा गाभा. &lt;br /&gt;4. परिक्रमेत चालताना रोज पुढे काय येईल हे माहित नसते. कित्येक पायवाटा, प्रस्तर, जंगल या असंख्‍य ठिकाणाहून प्रवास होतो.   त्या-त्या भागाच्या बोलण्‍या-चालण्‍याच्या पद्धती दिसतात. त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण, अनुभव नवा असतो. ओळख-पाळख नसलेले लोक मान देतात - काही अपमानही करतात. संकेतस्‍थळावर मी कोण व तो कोण हे पुरेसं स्पष्‍ट नसताना झालेला मान किंवा अपमान वेगळा आणि प्रत्यक्ष समोरासमोर झालेला मान किंवा अपमान वेगळा. मान मिळाला तरी मनात त्याबद्दल गंड निर्माण न होऊ देता त्याला योग्य असेल तसं सामोरं जायचं - आणि अपमान झाला तरी तो समजून घेऊन मौन रहायचं, किंवा पुढं चालायचं - हा सुद्धा एक क्रमच होऊन बसतो. हे नव्याने आलटुन पालटुन रोजच. शूलपाणीसारख्‍या ठिकाणी तर परिक्रमीजवळ असलेली प्रत्येक गोष्‍ट लुटण्‍याचेही प्रकार होतात. जरुर तेवढेच कपडे अंगावर असताना सर्वहारा अवस्‍थेत काही किलोमीटर चालणे आणि त्यादरम्यान मनात सुरु असलेली प्रक्रिया यातून जो अनुभव येतो तो विरळा आहे.&lt;br /&gt;5. माणसात नैसर्गिकपणे असलेल्या, पण इतर रुटिनमध्‍ये अनुभवता न येणार्‍या जीव-ऊर्जेला नर्मदेच्या किनार्‍यावर उत्थापन मिळते. इनक्रीस्‍ड लेव्हल ऑफ एनर्जी. हे उत्थापन अर्थातच अवधानाचे विषय मर्यादित झाल्याने, तरीही त्यात नवेपणा, ताजेपणा असल्याने मिळते. आणखी सखोल सांगायचं तर, परिक्रमावासी एकाच दिशेने जाणार्‍या नर्मदेचे पाणी पितो - आणि नर्मदेचा प्रवाह ज्या दिशेने जात रहातो त्याच दिशेने शरीरातील पाण्‍यासगट माणूसही पुढे जात रहातो - हे गुजरातेतील भडोचजवळ नर्मदा सागरात जाईपर्यंत एका दिशेने चालू रहाते. नर्मदा सागराला जाऊन मिळाली तरी तिथून पुन्हा नर्मदेच्या उगमापर्यंत उलट परिक्रमा करीत यायचे असते. प्रवाही नर्मदा सागरात मिसळली तरी परिक्रमीच्या शरीरातील नर्मदा त्याच्यासोबतच उगमापर्यंत परत येते. उगमापर्यंतचा हा परिक्रमेतील प्रवास  नर्मदेभोवती केलेले हिंडणे न ठरता स्वत:च्याच अंतरात सर्व स्तरांवर केलेले परिक्रमण ठरते. याचे सुपरिणाम कुठल्याही विश्लेषणाच्या पार असतात असे अनेक अनुभव आहेत - होणारी प्रक्रिया गहन व बहुपेडी आहे.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-5265084645954943853?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/5265084645954943853/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_11.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/5265084645954943853'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/5265084645954943853'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post_11.html' title='परिक्रमेमागील तत्त्वे'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-4775844611332582573</id><published>2012-01-11T03:18:00.000+05:30</published><updated>2012-01-22T15:19:19.893+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मध्‍य प्रदेश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर्मदा परिक्रमा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Narmada Parikrama'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओमकारेश्वर'/><title type='text'>एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;मध्‍य प्रदेशात येऊन चार महिने उलटले तरी इंदुरातल्या सराफ्‍याशिवाय इतर कुठेही जाऊ शकलो नव्हतो. नव्या सालाच्या पहिल्याच दिवशी भारत भ्रमण करायला निघालेला आत्मशून्य इंदुरात येऊन पुढे जाणार होता. 12  ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या ओमकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे त्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तो रविवार 1 जानेवारी रोजी इंदुरात येऊन पोहोचला. मिपावर प्रतिसाद देताना दुसर्‍या उकाराचा अतोनात मारा करणारी ही वल्ली कोण याबद्दल उत्सुकता होतीच. आत्मशून्याच्या भेटीअंती तो केवळ प्रतिसाद लिहिताना फक्त दुसरा उकार वापरतो, मात्र 'ण' चा उच्चार बाणातल्या ण प्रमाणे शास्‍त्रशुद्ध पुणेरी पद्धतीने करतो असे दिसले.&lt;br /&gt;तसेच याचा एक पाय ट्रॅव्हलींग बस मध्‍ये झोपला असताना मुडपला असल्याचे त्याने गळाभेट घेताच जाहिर केले. तो लंगडत असलेला पाहून मला वेगळाच संशय आला होता. मग दुसर्‍या दिवशी आरामात त्याला मेडिकलवाल्याकडे घेऊन गेलो. मेडिकल वाल्याने थेट त्याच्या काऊंटरचा अडसर दूर करुन क्षतिग्रस्त पायाच्या निरीक्षणार्थ आशूला दुकानाच्या आत आमंत्रित केले. आशू पुण्‍यनगरीनिवासी असल्याने या प्रकारामुळे घाबरला. पण त्या मेडिकलवाल्यानेच आत्मशून्यच्या चेहेर्‍यावर उमटलेल्या सर्व शंका दूर केल्या. त्याला एका स्टूलावर स्‍थानापन्न केले. पायाचे निरीक्षण करताना आशूशी संवाद साधत पायाला झटका दिला. मग त्या मेडिकलवाल्याने त्याच्या लंबोळक्या दुकानात आशूच्या निर्दोष चालण्‍याची दोन चार वेळा तालीम घेऊन पुन्हा त्याच्या पायाला झटके दिले. आत्मशून्याने झटक्यांमुळे पायाच्या वेदनांत चाळीस टक्के फरक पडल्याची कबुली दिली. मग मेडिकलवाल्याने पायाला लावायला शास्त्रापुरत्या गोळ्या आणि एक मलम दिले. &lt;br /&gt;आत्मशून्याशी झालेल्या संवादातून कळले की तो इंदूरपासून 60 कि.मी.वर असलेल्या ओंकारेश्वरला जाणार आहे. मी काही देवदेव करणार्‍यांपैकी नाही. ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा... न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे मी कधीतरी ऐकले आहे. त्यामुळे आमच्या खात्यावर तीर्थाटन, देवदर्शन, पूजा-अर्चा नेहमीच सायडींगला पडलेले असते. तरीही, तीर्थाटनाने आनंदित होणार्‍या दोस्तांचे आपल्याला वावडे नाही. &lt;br /&gt;आत्मशून्य ओमकारेश्वरला जाणारच आहे तर अनायासे ओमकारेश्वर पाहुन घ्‍यावे असे ठरवले. तो आला त्या दिवशी सुटी असल्याने बाकायदा इंदुरातल्या सराफ्‍यावर आडवा हात मारला. सराफ्‍यातल्या खास व्यंजनांचे फोटो काढून मिपावर टाकले, तर त्या वासाने मिपाकर सराफ्‍यावर चाल करुन येतील आणि तो मराठी लोंढा आवरता आवरता मध्‍य प्रदेशातही नसता 'क्रायसिस' उद्भवेल असा संशय आल्याने सराफ्‍यात फोटो काढले नाहीत. माझ्‍याकडे सध्‍या कॅमेरा असलेला मोबाईल नाही ही खरी गोष्‍ट आहे. &lt;img alt="Wink" class="smiley-content" src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/Roving/wink.png" title="Wink" /&gt; आत्मशून्यही मोबाइल घरीच ठेऊन प्रवासाला निघाला होता.&lt;br /&gt;इंदूरात सध्‍या आमचा तंबू जिथे ठोकला आहे त्या लोकमान्य नगरच्या उशाशी असलेल्या, सतत पेंगत रहाणार्‍या ठेसनातून ओंकारेश्वरी जाता येते ही नवी माहिती विकीपिडीयानं दिली. एरव्ही रोज आम्ही चहा प्यायला याच स्‍टेशनबाहेर असलेल्या झोपडीरुपी रेस्‍टॉरंटमध्‍ये जात होतो. पण एवढ्‍या शांत स्‍टेशनातून कुठे जाता येत असेल यावर माझा विश्‍वास नव्हता. विकीपिडीयाच्या माहितीची स्‍टेशन मास्‍तरांकडून खात्री करुन घेणे आवश्‍यक होते. &lt;br /&gt;चहा पिऊन झाल्यावर आत्मशून्याला पुण्‍या-मुंबईसारखे बिलकुल नसणारे स्‍टेशन दाखवावे व ओमकारेश्वरच्या गाडीची 'पूछताछ' करावी असे ठरले. शक्यतोवर नियम पाळण्‍याकडे माझा कल असतो. फलाटावर जायचे म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट घ्‍यायला हवे. म्हणून खिडकीच्या आत विदाउट युनिफॉर्म बसलेल्या बाबांना प्लॅटफॉर्म तिकिट मागितले. तर ते म्हणाले, ''प्लॅटफॉर्म टिकट किसलिए चाहिये?'' मी म्हणालो प्लॅटफॉर्मवर जायचंय म्हणून. तर ते एकदम खेकसलेच.. फलाटपर जाने के लिए टिकट की क्या जरुरत म्हणणारा तो म्हातारा स्‍टेशनलाच खेटून असलेल्या झोपडीरुपी हॉटेलचा मालक आहे असा प्रकाश पडला.. आणि दोन रेल्वेंच्या मधल्या टायंबात यजमानाकडे जेऊन येणार्‍या पुलंच्या स्‍टेशन मास्‍तरची आठवण झाली. &lt;br /&gt;दररोज सकाळी 9 वाजता त्या स्टेशनमधून ओमकारेश्वरला रेल्वे जाते यावर त्या म्हातारबांच्या हॉटेल चालवणार्‍या अर्धांगिनीने सहमतीची मोहोर उठवली. ते ऐकून माझ्‍यापेक्षा आत्मशून्यच जास्त खूश झाला. कारण गाडी पकडण्‍याची पळापळ वाचली होती. रुमपासून या स्‍टेशनात पाच मिनीटांत जाता येते. &lt;br /&gt;आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे. हे गुपीत फोडले तर मी मित्रांसाठी विश्वासार्ह माणूस नसेल अशी तंबीही त्याने देऊन ठेवली आहे. कितीही काही असले तरी, कुणाला जाहीर होणे पसंत नसलेली गोष्‍ट मी उघड करीत आहे याबद्दल माझ्‍या मनात सल आहे.&lt;br /&gt;'युजींविषयी तुझ्‍यासोबत बोलायचंय.. म्हणून तुझ्‍याकडे येत आहे' असे सांगणारा आत्मशून्य इंदुरला आला तो वेगळाच संकल्प मनात घेऊन. एकमेकांची ओळख होऊन एकमेकांबद्दलचा नवेपणा संपल्यानंतर त्याने तो ओमकारेश्वराहून सध्‍या तरी एकट्याने पायी चालत, 'नर्मदा परिक्रमेला' निघणार असल्याचे त्याचे गुपीत माझ्‍यासमोर फोडले. ते ऐकून, त्याने सोबत आणलेली जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद यांची पुस्तके वाचून, इंटरनेटवरुन परिक्रमेबाबत 2 दिवस माहिती काढून मला सुद्धा त्याच्यासोबत परिक्रमेला जावे असे वाटायला लागले. पण माझ्‍यावर असलेल्या जबाबदार्‍यांमुळे मी ते करु शकलो नाही. या जबाबदार्‍या नाणेफेक करुन तूर्त टाळणे योग्य होईल काय याचाही प्रयत्न मी करुन पाहिला - पण ते होणे नव्हते. असो. &lt;br /&gt;शेवटी दिनांक 9 जानेवारी रोजी आम्ही लोकमान्य नगर स्‍थानकातून ओमकारेश्वरकडे जाणार्‍या खंडवा-अकोला-रतलाम रेल्वेत चढलो. मीटरगेजवरुन झुक् झु्क् करीत जाणार्‍या रेल्वेत आम्ही चढलो. शिटा रिकाम्या असूनही सगळा प्रवास उभे राहून, डोंगरदर्‍यांची रमणीय दृश्‍ये मीटरगेजच्या गतीने डोळेभरुन पहाता आली. डॉ. आंबेडकरांचं जन्मस्‍थान असलेले महूदेखील वाटेत लागले. मागील पावसाळ्यात दोन लोकांचा बळी गेलेल्या कुप्रसिद्ध ''पातालपानी'' हा विकराल धबधबा वाटेत भीती घालून गेला. सुमारे चार तासांनंतर गाडीने आम्हाला ओमकारेश्‍वर रोड उर्फ मोरटक्का स्टेशनवर सोडले. &lt;br /&gt;दुपारी दीडच्या दरम्यान नर्मदेच्या तीरावर ओबडधोबड पर्वतशिलांवर वसलेल्या ओमकारेश्वर येथे पोहोचलो. तिथल्या घाटांवर फिरुन झाल्यानंतर परिक्रमेपूर्वी नर्मदापूजन, प्रसादाच्या 'कढाई' साठी गुरुजी गाठणे आले.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/0i3ccqlImIdHekFbjdpnFtMTjNZETYmyPJy0liipFm0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="263" src="https://lh3.googleusercontent.com/-38unVBKRFTY/TwxbEpv0quI/AAAAAAAABJk/yzMawWG13sc/s400/Image18.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे फोटो काढल्या ठिकाणीच छापून मिळाले.. जे तंत्रज्ञान आयफेल टॉवरखाली तेच नर्मदेच्या तीरावर&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही परिक्रमा पूर्णत: शास्‍त्रोक्तपणे, सर्व नियमांचे पालन करुनच करायची असे आत्मशून्याने ठरवले होते. शेवटी कुंटेंच्याच पुस्तकात नाव दिलेल्या श्री. सुधाकरशास्‍त्री जोशी यांचा पत्ता काढत नर्मदेच्या पलिकडील तीरावरच्या ओमकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतर कुठल्याही तीर्थस्‍थानाप्रमाणे इथेही भोवती पंडित लोकांचा गराडा पडलाच. पण आम्हाला  श्री. सुधाकरशास्‍त्री हवे होते. सुधाकरशास्‍त्रीच हवे असण्‍याचे कारण म्हणजे, कुंट्‍यांनी लिहिल्याप्रमाणे ते महाराष्‍ट्रीय. त्या पुजार्‍यांनी सुधाकरशास्‍त्री हे 2003 मध्‍येच निधन पावल्याचे वर्तमान सांगितले. बाळाशास्‍त्री हे त्यांचे त्यांचे सुपूत्र भेटू शकतील असे सांगून त्यांचा मोबाइल नंबर आमच्या हातात पडला. पुढे गेल्यानंतर एका जॅकेटधारी पंडिताला बाळाशास्‍त्रींचा अतापता विचारला तर ''रुकें, अभी मिला देते है..वे भगवान के मुख्‍य पुजारियों मे से एक है..'' असे सांगून तो ओंकारेश्वर मंदीरातील गर्दीत अंतर्धान पावला. थोड्‍या वेळाने बाळाशास्‍त्री गर्दीतूनच कुठूनतरी समोर आले. महाराष्‍ट्रातून, कुंटेंच्या पुस्तकात नाव वाचून परिक्रमेसाठी आलोय म्हटल्यावर बाळाशास्‍त्री यांनी पूर्णपणे हिंदी लहेजाच्या कह्यात गेलेल्या मराठीत माहिती द्यायला सुरुवात केली.&lt;br /&gt;उद्या परिक्रमा सुरु करता येईल, आता थकला असाल, पलीकडच्या तीरावरच गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास असून तिथे आराम करा असे सुचवले. रात्री साडेसात-आठला ओंकारेश्वराची आरती असते तेव्हा परत एकदा या म्हणजे उद्या कढाईचा विधी करणार्‍या त्यांच्या बंधूराजांशी भेट घालून देता येईल असे सांगितले. &lt;br /&gt;गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास पाहून आम्ही चाट पडलो. अवघ्‍या 175 रुपयांत रात्रभरासाठी उत्तम दर्जाची खोली मराठी माणसांना महाराष्‍ट्राबाहेरही उपलब्ध करुन देण्‍याच्या प्रयत्नाला केवळ दंडवत घातला. ओळख सिद्ध करणारे पुरावे मात्र काऊंटरवर दाखवावे लागले. तिथे जेवणाचीही सोय आहे, पण आम्हाला फिरण्‍याच्या नादात वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे भक्त निवासात प्रसाद घेता आला नाही. &lt;br /&gt;तासभर आराम करुन भक्त निवासाच्या जवळच असलेल्या ममलेश्वराच्या दिशेने निघालो. घाट चढून गेल्यानंतर एका दुकानात भल्या मोठ्‍या अक्षरात पाटी लाऊन भांग विकली जात असल्याने 'अचंभा' वाटला. पण इंदूरमध्‍येच, आत्मशून्य आणि मी टपरीवर गेल्यानंतर त्याने चॉकलेटसारख्‍या गोळ्या पाहून ते काय आहे असे विचारले होते. सिगारेटींसाठी मी ज्या टपरीवर रोज जातो तिथे भांगेच्या गोळ्याही एका रुपयात एक या भावाने विकल्या जातात हे ज्ञान मला इंदुरात रहायला आल्यानंतर चार महिन्यांनी झाले होते.&lt;br /&gt;तेव्हा मजा म्हणून त्या स्वस्तातल्या भांगेच्या दोन गोळ्या रात्री झोपताना घेतल्या होत्या. दुसर्‍या दिवशी हपिसला ब्राम्हण घातला गेला. जागच दुपारी 12 वाजता आली. भांगेत मंद-मंद नशा उत्पन्न करुन अंमल असेपर्यंत माणसाला अवकाशगामी ठेवण्‍याची शक्ती आहे. पण 'दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्‍या कल्पना सुचतात' हे काही खरे नसावे. मला काहीही सुचले नाही. &lt;br /&gt;येताना एका दुकानात शेरलॉक होम्स सारखा ओढायचा 'पाइप' पाहिला होता. सुव्हेनियर म्हणून मला तो हवा होता. एक फुटला तर दुसरा म्हणून ते दोन पाइफ घेऊन आम्ही घाट उतरु लागलो. बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.&lt;br /&gt;(आत्मशून्यासोबत केलेल्या 12 कि.मी.च्या परिक्रमेचा वृत्तांत, वाटेत आलेले मजेदार प्रसंग उद्या)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-4775844611332582573?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/4775844611332582573/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/4775844611332582573'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/4775844611332582573'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/-38unVBKRFTY/TwxbEpv0quI/AAAAAAAABJk/yzMawWG13sc/s72-c/Image18.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-1305739240078946145</id><published>2011-12-06T00:28:00.000+05:30</published><updated>2011-12-06T00:28:48.491+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चंपाशष्‍ठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाड्या ओढणे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वारु'/><title type='text'>येळकोट येळकोट जय मल्हार</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. &lt;br /&gt;खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. &lt;br /&gt;खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं. &lt;br /&gt;तर ही सट म्हणजे काय आणि ती आमच्या गावाकडे कशी साजरी होते त्याचा हा फोटो वृत्तांत.&lt;br /&gt;चंपाशष्‍ठीपूर्वी आठ दिवसांपासूनच गावातले धनगर गडी खंडोबाच्या देवळात 'वारु' म्हणून बसलेले असत. खंडेराया, माझं हे कामं होऊ दी, म्होरल्या साली तुझा वारु म्हनून सेवा करीन असा नवस खंडोबासमोर बोलला आणि ते विविक्षीत काम झालं की वारु म्हणून बसणं आलंच.&amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;मग वारु म्हणून बसलेल्या लोकांचं सट होईपर्यंत पुजा-अर्चा, खाणं-पिणं, रहाणं सगळं खंडोबाच्याच मंदिरात. बाजाराचा दिवस म्हणजे बुधवार सटीच्या दिवशी येईल अशा बेतानं गावात हे वारु गाड्या ओढतात. या वारुंच्या अंगात आलेल्या खंडोबाकडून श्रद्धाळू धनगर आणि इतरही लोक चाबकाचे फटके खातात. &lt;br /&gt;सटीच्या दिवशी मग आजीकडून मल्हारी मामा नावाच्या एका धनगर आजोबाला बोलावणं जाई. नैवैद्य-वैश्वदेव झाल्यानंतर खंडोबाची तळी उचलायची असे. हे मल्हारी मामा मग त्यांच्यासोबत तळी आणि खंडोबा समोरच्या दिवट्याच्या काजळानं काळा कुळकुळीत झालेला विळा घेऊन घरी येत. तळीसमोर आरती झाली आणि ती विधीपूर्वक ती उचलली की विळ्यावरचं काजळ घरातल्या पोरासोरांच्या आणि गडी माणसांच्या डोळ्यांना लावलं जात असे. &lt;br /&gt;जेवणं उरकली की खंडोबाकडं पळायचं असे. गावभरातल्या बैलगाड्या खंडोबासमोर आणून ओळीनं एकामागे एक लावल्या जात. ओढताना मध्येच सुटु नये म्हणून त्या दोन्हीकडून सोलीनं पक्क्या बांधल्या जात. पार भोईवाडा, आखरापासून (गावचं मैदान) ते खंडोबाच्या पायरीपर्यंत या गाड्या ओढल्या जातात. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत दणाणून जाई आणि गाड्यांमध्ये बसायला पोरासोरांची झुंबड उडालेली असे. एरव्ही वर्षभरात कधीही जागा न बदलणारा बाजार सटीच्या दिवशी मात्र खंडोबाकडं भरलेला असे. वारु गाड्या ओढत असताना त्यात बसण्यात, वारुकडून माणसं कोरड्याचे फटके खाताना बघण्‍यात थरार असे. वर्षभरात चुकून हुकून घडलेलं पाप खंडोबाच्या कोरड्यानं फटके खाल्ले की धुवून निघतं असा समज. गावातले जख्ख म्हातारे झालेले धनगरही बाह्या सरसाऊन सुरकुतलेले हात अंगात आलेल्या आणि कोरडा घेऊन झुलणार्‍या वारु समोर धरायचे.. हातात धरायच्या ठिकाणी घुंगरं बांधलेला कोरडा रप्पकन त्या हातांवर पडायचा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. जास्तीत जास्त पाच कोरडे हातावर घेतले की माणूस खंडोबा अंगात आलेल्या वारुच्या पायावर लोटांगण घेत असे..&amp;nbsp; किंवा फारच श्रद्धाळू असला की कोरडे खाणाराच्याच अंगात येऊन तो तसाच गर्दीत झुलत राही.. मग चार-दोन लोक पुढे येऊन रक्ताळलेल्या हातांवर खंडोबाची हळद भरीत.. &lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;नगरप्रदक्षिणा व देवदर्शनासाठी निघालेले वारु&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/0Nci7R7jGLFrrbPmu2Jknc9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh4.googleusercontent.com/-MIfvBaq4Pu4/Tt0GfOZiidI/AAAAAAAABF4/c4M7ys2YKMY/s640/Pradakshina1.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;नगरप्रदक्षिणा&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/tm387sJmKhtG6E41m7mhs89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh5.googleusercontent.com/-AIOBPBxwNFE/Tt0GZREqUAI/AAAAAAAABFg/2OxFVj28e-I/s640/Pradakshina.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;प्रत्येक वारुला गाडी ओढावी लागते, प्रत्येक वेळी खंडोबाची आरती होते&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/2Bb_VDEC0xO8kVg4NCIPZM9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh5.googleusercontent.com/-cAXq3CI5RXM/Tt0GVM6_F-I/AAAAAAAABFI/kYF2Pt-LGSE/s640/Aarti1.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;From &lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;खंडोबाची आरती&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/9hBRBABdDQ-xIm1i7B81Nc9crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh4.googleusercontent.com/-bVRnwgtGjiw/Tt0GVkxM7nI/AAAAAAAABFM/bKCuOOM43Z4/s640/Aarti2.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;गाड्या ओढल्या जात असताना&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/w3U_iB3IJuRNb_7gCjNKa89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh3.googleusercontent.com/-mf7KbQdYX0E/Tt0GZQL4qAI/AAAAAAAABFk/lBbuRDf7L5Y/s640/Gadi1.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;गाड्या ओढल्या जात असताना&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/OadVKyCpy2h0icjq-R9PF89crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh5.googleusercontent.com/-oqFIyczT9h8/Tt0GXLV7Z7I/AAAAAAAABFU/kZbXfSi8MQM/s640/Gadi2.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;खंडोबा अंगात आलेले वारु कोरड्यानं स्वतःलाही झोडपून काढतात आणि इच्छुकांनाही&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/nmdKHmVpdkqWxGtszpXa189crJWZKZzXidEPdg7jPVg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="480" src="https://lh4.googleusercontent.com/-NrSIdE3TSPU/Tt0GZcVdTlI/AAAAAAAABFo/1Z_8GGqb1w8/s640/Korde.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/5December2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCMCG2cWg3ZPfRg&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-1305739240078946145?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/1305739240078946145/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1305739240078946145'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1305739240078946145'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='येळकोट येळकोट जय मल्हार'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh4.googleusercontent.com/-MIfvBaq4Pu4/Tt0GfOZiidI/AAAAAAAABF4/c4M7ys2YKMY/s72-c/Pradakshina1.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-8889016146375758397</id><published>2011-11-14T04:30:00.000+05:30</published><updated>2011-11-14T04:30:09.200+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शब्द़'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विचार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भाषा'/><title type='text'>शब्दावेगळे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर  आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा  उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग  यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट  संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं  मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.&lt;br /&gt;हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही. &lt;br /&gt;थोडक्यात जगाला जाणून घेण्‍यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्‍यात  शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा  शब्दांच्या माध्‍यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या  अवस्‍थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन  रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्‍णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी  केलेला शब्दांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते  आणि ती आ‍कर्षित करते. &lt;br /&gt;एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्‍तारलं आहे  आणि ज्या अफाट विस्‍ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या  प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्‍या किंवा ती प्रतिमा उभी राहण्‍यासाठी  आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!&lt;br /&gt;त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्‍यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे  आणि चिंध्‍या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या  लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय  आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.&lt;br /&gt;हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्‍यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्ष‍णीक अर्थाने शब्दावडंबर माजवात  जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय  आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्‍ट पद्धतीने जोडणे ही  झाली भाषा. पण मुळात शब्द म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्‍याचं कारण नाही. कारण शब्द हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच  शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो. शब्दाचा गळा दाबा, मनात कसलीही  प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी  कुठलाही शब्द घ्‍या. उदा. मुलगा. मुलगा या शब्दातून जी प्रतिमा मनात येते  ती फाडून टाकली, ती नष्‍ट करुन पाहिली तर 'मुलगा' हा एक निरर्थक, विनोदी  शब्द शिल्लक रहातो! प्रत्येक शब्द असा मनात नष्‍ट करुन नलीफाइड, व्हॉईड  केला तर हे लक्षात येऊ शकेल. &lt;br /&gt;शब्दांच्या मागील प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्‍यापुरतं शब्दावेगळे, शब्दमुक्त होऊ शकतो आणि याच शब्दातून निपजणार्‍या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्‍यापुरतंच होता येतं. विचारांचा  ब्रम्हराक्षस णआपण त्याच्या शब्दरुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत  नाही.  &lt;br /&gt;शब्द ही आपली शेवटची मर्यादा आहे. शब्द हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. शब्दांना जर ओेलांडून पुढे जाता आलं तर, शब्दावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचि‍त त्यामुळेच आध्‍यात्मात मौन राहून पाहिलं जातं असावं.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-8889016146375758397?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/8889016146375758397/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/11/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/8889016146375758397'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/8889016146375758397'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='शब्दावेगळे'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-6940461473503251874</id><published>2011-10-29T03:46:00.001+05:30</published><updated>2011-10-29T05:12:13.801+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पेपरातलं काम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><title type='text'>पेपरातलं काम</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;b&gt;&lt;a href="http://www.misalpav.com/node/19541"&gt;कालच्या धाग्याच्या&lt;/a&gt;&lt;/b&gt; निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो. &lt;br /&gt;आमचा संपादकीयशी संबंध यायचा, पण आम्‍ही केलेल्‍या जाहिराती, जाहिरात संपादकीय मजकुरापुरताच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, असतील-नसतील तेवढी मंत्रालये यांच्यासोबत खंडीभर सरकारी खात्यांच्या निविदा सूचना, शासकीय महत्वाच्या दिवशी येणार्‍या पान-अर्ध्‍या पानाच्या जाहिराती, जाहिरात संपादकीय, झालंच तर दररोजचे मराठीतून हिंदी-इंग्रजीत जाणारे, हिंदी-इंग्रजीतून मराठीत येणारे उठावणे (obiturial), अमुक फ्रेंडशीप क्लब, तमुक शक्तीदायक तेल, आमचे अशीलाचे शिलावर शिंतोडे उडवल्‍याबद्दल अॅड. फलाणे बिस्‍ताणेकडून रजीस्‍टर्ड नोटीस हा सगळा खुर्दा मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करणे हे आमचे काम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिले काही दिवस तर ते लोक माझी थट्टा करीत आहेत असा माझा वहीम होता. का? वाचा -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;h5&gt;''भारताच्या राष्‍ट्रपतींच्यावतीने &lt;span style="color: white;"&gt;(हे लिहायला लय भारी वाटायचं)&lt;/span&gt; आणि त्यांचेकरिता विभागीय नियंत्रक, उत्तर रेल्‍वे, डी.आर.एम. संकुल, तिसरा मजला, गोरखपूर यांच्याकडून उत्तर रेल्वेच्या गोरखपूर विभागात खालील बाबी वास्तविक काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत पूर्ततेसाठी दि.15 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत (निविदा प्राप्ती दिनांक) वरील कार्यालयात पोहोचतील अशा रितीने व दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वाजता (निविदा उघडण्‍याचा दिनांक) त्याच कार्यालयात उघडल्या जाण्‍यासाठी गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी रु. 15, 00, 000/- लाख (अक्षरी रुपये पंधरा लाख फक्त) निविदा मूल्‍याची अशाप्रकारची किमान तीन कामे निष्‍पादीत केलेल्या व सनदी लेखापरिक्षकाकडून मागील पाच वर्षांपासून वर्षनिहाय उलाढालीचे लेखापरिक्षित ताळेबंद सादर करू शकणार्‍या व डी.आर.एम. गोरखपूर यांच्याकडे नोंदणीकृत असणार्‍या नामांकित व अधिकारप्राप्त कंत्राटदारांकडून नोंदणीकृत टपालाने योग्य प्रकारे मोहोरबंद केलेल्या लिफाफा ''अ'' आणि ''ब'' मध्‍ये (लिफाफा अ मध्‍ये तांत्रिक बोली व लिफाफा ब मध्‍ये किंमत बोली) निविदा आमंत्रित करण्‍यात येत आहेत&lt;/h5&gt;&lt;h1&gt;.&lt;/h1&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असल्या करामती मला बिनचुकपणे दिवसाला किमान 4-5 वेळा करुन दाखवाव्या लागायच्या. नमुना म्हणून एक परिच्‍छेद दिलाय.. बाबींचे वर्णन दिले तर पुन्हा तुम्ही मी लिहिलेलं वाचायला शिल्‍लक राहणार नाही ही भीती आहे. रेल्‍वेच्या गोरखपूर भांडारात&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पूर्णविरामाचा तुडवडा होता, की तिथल्या आद्य हेड क्लार्कची पूर्णविरामाशी काही जानी दुष्‍मनी होती, की आद्य हेड क्लार्कने लिहिलेलाच ड्राफ्‍ट सुरु ठेवण्‍याची रेल्‍वेची खानदानी परंपरा पुढे सुरु होती हे मला नोकरी सोडेपर्यंत कळालं नाही. बरं एवढ्‍या मोठ्‍या परिच्छेदाला सुटी- सुटी वाक्यं लिहून पूर्णविरामानं तोडायला जावं तर लगेच रेल्‍वे शुद्धीपत्रक मागायची. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सोबत देशपांडे काका नावाचे सिनीयर होते. ते शिक्षणाधिकारी म्‍हणून निवृत्त होऊन सतत 13 वर्षांपासून&amp;nbsp;&amp;nbsp; भाषांतराचं काम करीत होते. ते सात वाजले की घरी निघायचे... नेमक्या त्यावेळी जाहिरात विभागातून जाहिरात घेऊन कुणी आलं तर सरळ हात जोडून म्हणायचे, ''आता मला माफ करा..''&lt;br /&gt;नोकरीवर रुजू झालो त्या दिवशी त्‍यांनी मला ऑफिसमध्‍ये सगळीकडे फिरवून लोकांच्या ओळखी करून दिल्या. प्रुफ रिडर्स उर्फ मुद्रीत शोधकांची ओळख करुन देताना त्यांनी 'हे आपल्या ऑफिसमधले फार विद्वान लोक आहेत बरं का..' असं ते म्‍हणाल्‍याचं मला आठवतं.&lt;br /&gt;डेस्‍कवर ओळीनं बसलेल्‍या त्या चार-पाच विद्वानांपैकी दोन जण भांडण लागल्‍यासारखं काहीतरी वाचत होते.. आणि त्यापैकी एक कागदावर चुका दुरुस्‍त करीत होता.&lt;br /&gt;पण मी या कामात रूळलो. सगळ्याच जाहिराती रेल्‍वेच्या नसायच्‍या. डिस्‍प्‍लेची जाहिरात असेल तर मजा यायची. जास्‍तीत जास्‍त 2 परिच्‍छेद, एक मथळा, उपमथळा आणि बोधवाक्‍य, ब्रीदवाक्य भाषांतरीत केलं की काम खलास! रेल्‍वेचं Serving Customers With A Smile ''ग्राहकांची सस्‍मित सेवा'' हे मराठीतलं बोधवाक्‍य कुठं वाचलंत तर ती आमचीच करामत आहे.. बरेच भाषांतरकार त्याचं ''हसतमुखाने ग्राहकांना सेवा देतात'' किंवा ''ग्राहकांची स्‍मितसह सेवा'' असलं काहीतरी अचाट करतात.. पण ते काही खरं नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा मात्र खैर झाली. काम करून रात्री घरी गेलो. सकाळी दहा साडेदहा वाजता हपीसचा फोन. &lt;br /&gt;''लवकर ये.. काय लिहीलंस जाहिरातीत कालच्‍या.. लोकांनी अंक जाळलेत आपले क्रांती चौकात..''&lt;br /&gt;गाडी काढून ऑफिसमध्‍ये पोचतोय तो गेटवर पोलीसांची जीप. म्हटलं असेल नेहमीसारखी.&lt;br /&gt;पण पुढं गेलो तर चार-पाच कॉन्‍स्‍टेबल दांडके-बंदुका घेऊन उभे.&lt;br /&gt;वर गेलो.&lt;br /&gt;काल एका महापुरुषाची जयंती होती. नेहमीप्रमाणं केंद्रीय मंत्रालयांच्या दोन अडीच पानं भरून जाहीराती आल्‍या होत्‍या. त्‍या मीच एकट्यानं केल्‍या होत्‍या.&lt;br /&gt;आमचे अंक जाळायला कारणीभूत झालेलं माझं वाक्‍य होतं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' &lt;br /&gt;हिंदी कॉपीत वापरलेला ''श्रद्धांजली'' हा शब्द मी मराठीतपण तसाच ठेवला होता. तो एकच शब्द. पण आमच्या नेत्याच्या जन्मदिनी&amp;nbsp; श्रद्धांजली वाहणारा कोण तो शहाणा म्हणून कार्यकर्त्यांनी आमचे अंक जाळले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;टेक्‍नीकली चूक झाली होती.&lt;br /&gt;आमचे जाहिरात व्यवस्‍थापक म्हणे तु कुठेही काही बोलायचं नाही. तुला यातलं काही माहित नाही. थोड्या वेळानं त्यांचा मोर्चा येईल. &lt;br /&gt;ते कार्यकारी संचालकांसोबत बोलतील.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;मी म्हटलं बरं. मला कुठे मार खायची हौस आहे.&lt;br /&gt;माझा या प्रकारातला सहभाग एवढाच.&lt;br /&gt;मी केलेली तीच जाहिरात आमच्या मुंबई आवृत्तीनंही छापली होती. पण तिथं कुणाला काही चूक वाटलं नव्हतं. अंक जाळणं वगैरे तर बिलकुल झालं नव्हतं.&lt;br /&gt;आमच्या अॅड मॅनेजरने तोपर्यंत ''कृतज्ञ राष्‍ट्र की विनम्र श्रद्धांजली!'' ही मूळ हिंदी कॉपी, मी केलेलं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' हे भाषांतर दोन्‍ही ताडून पाहिलं होतं.&amp;nbsp; &lt;br /&gt;मुद्रीत शोधकांशींही त्‍यांचं बोलणं झालं होतं.&lt;br /&gt;अॅड मॅनेजरने काय तो निर्णय घेतला. &lt;br /&gt;कार्यकर्ते आले. त्यांनी संचालकांसोबत चर्चा केली. जयंतीसाठी देणगी स्‍वीकारून ते शांत झाले म्हणे.&lt;br /&gt;भाषांतरकार म्हणून केलेल्या नोकरीत घडलेला हा असला एकच किस्सा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी किस्से पुन्हा कधीतरी...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-6940461473503251874?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/6940461473503251874/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/10/blog-post_29.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6940461473503251874'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6940461473503251874'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/10/blog-post_29.html' title='पेपरातलं काम'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-5125574651159496182</id><published>2011-10-09T14:52:00.000+05:30</published><updated>2011-10-09T14:52:10.704+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फिल्म दि मेसेज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इस्लाम ची जन्मकथा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रेषित मुहम्मद'/><title type='text'>फिल्म दि मेसेज</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/T6-e5ay95JYqLz0DTaYehQ?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="240" src="https://lh6.googleusercontent.com/-UTOwbOxErLk/TpFj2f4HlsI/AAAAAAAABCg/_DA9-XWdvo8/s800/0_62_112008_message.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते. प्रेषित मुहम्मद व इस्लामच्या जन्माबद्दलचा हा एक फारसा नसला तरी धाडसी चित्रपट म्हणावा लागेल. माझे खूप मुस्लिम मित्र असूनही त्या कुणाकडूनच कधी या चित्रपटाबद्दल ऐकले नव्हते - पण अचानक मिळून गेला. कथेला नायक असूनही तो शेवटपर्यंत न दाखवलेला कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. शिवाय या चित्रपटाबद्दल वाद झाल्याने (हो.. वाद होण्याचा किंवा 'घडवण्याचा' मक्ता काय फक्त बॉलीवूडने घेतलाय का) त्यातील प्रसंगांची इजिप्तच्या 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. चित्रपटात कुठेही प्रेषित किंवा त्यांचे नातेवाईक दाखवलेले नाहीत. &lt;br /&gt;विशेष म्हणजे ऊर्दूमध्ये डब झाल्याने या चित्रपटाची मजा आणखीच वाढलेली आहे. ऊर्दू भाषेला तिचे खास लोभस रूप आहेच व बॉलीवूडमधील ऊर्दू संवादलेखकांच्या कृपेकरून आपल्याला समजणारे ऊर्दू शब्द मजा आणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र यांना प्रेषित दूताकरवी 'इस्लाम कुबूल' करण्याचे फर्मान पाठवतात. इजिप्त वगळता सर्व राजे ते 'तुम बियाबानो से निकलकर हमे बताओगे की हमे किस खुदा को मानना चाहिये' वगैरे डायलॉग मारून फर्मान फाडून टाकतात किंवा नाकारतात. ही या चित्रपटाची सुरुवात. निवेदन-विवेचन पद्धतीने चित्रपटातील दृश्ये सुरु होतात.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;'मक्का बुतो का मस्कन' &lt;br /&gt;मक्केत अंदाधुंद मूर्तीपूजा सुरु असते. तिथले नेते व काबाचे पुजारी यांनी भोळ्याभाबड्या जनतेला देवाच्या नावे लुटायला सुरु केलेले असते.&lt;br /&gt;अर्थात हा चित्रपट माहितीपटाच्या अंगाने पुढे जात असल्याने कोणत्या देवांची आराधना सुरु होती? कधीपासून सुरु होती? हिंदू मूर्ती त्यात होत्या का? हे त्यात तपशीलवार आलेले नाही व तशी काही तथ्ये कदाचित उपलब्ध असतील तरी ते येऊ शकले नसते. फक्त 'हुबल' व 'लात' या दोन देवतांच्या मुर्ती दाखवणारे एक दृश्य आहे. या दोन देवता समृद्धी देणाऱ्या मानल्या जात.&lt;br /&gt;काबा व त्यातील देवतांच्या मूर्तींमुळे मक्का हे अरब मधील एक महत्वाचे गाव बनलेले असते. मक्केच्या आर्थिक नाड्या काबातील मूर्त्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे जेवढ्या जास्त मूर्ती तेवढी जास्त आमदनी असा सरळ हिशेब असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अद्याप प्रेषित न झालेले निरक्षर मुहम्मद हे सर्व पाहून व्यथित असतात व मक्केशेजारी असलेल्या पर्वतावरील गुहा (गार) ही त्यांच्या चिंतनाची जागा असते (वो गार में तन्हा थे). या गुहेत त्यांना 'जिब्रईल' या देवदुताचे दर्शन होते. मी देवदूत जिब्रईल असून तुम्ही खुदाचे प्रेषित मुहम्मद आहात हे सांगून&amp;nbsp; जिब्रईल त्यांना 'ए मुहम्मद.. पढ..' ( हीच कुरानाची सुरुवात) असा आदेश देतो. पण मुहम्मद त्याला मी निरक्षर आहे.. मी वाचू शकत नाही हे सांगतात. मग जिब्रईल 'पढ उस खुदा के नाम से जिसने इन्सान को खून की नाजूक बूंद से बनाया..' असे सांगतो.&lt;br /&gt;या प्रसंगानंतर मुहंमदांना प्रचंड ताप चढतो व ते झालेली घटना जवळच्या नातेवाईकांना सांगतात. इथून पुढे वेळोवेळी मुहमंदांवर खुदाच्या वहीचे नुजूल होते व मुहम्मद तो संदेश लोकांना ऐकवू लागतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या संदेशांत सर्वात महत्वाचा व मक्काधिपती आणि मुहम्मद यांच्यात (व ईस्लाम व अन्य धर्मांतही ) वितुष्ट घड्वून आणणारा संदेश असतो तो म्हणजे - "एकच देव आहे व मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत." (ला ईलाहा ईल्लला मुहम्मद रसूल्लीला (चु.भू.द्या.घ्या.) हा अरबी भाषेतील संदेश ऊर्दूमध्ये खुदा के सिवा कोई माबूद नहीं.. मुहम्मद खुदा के रसूल है असा दाखवण्यात आला आहे..&amp;nbsp; )&lt;br /&gt;&lt;br /&gt;मक्कावासियांच्या मनात उलथापालथ घडवून आणणारे इतर संदेशही (देव एकच आहे व तो मूर्तीत बांधला जाऊ शकत नाही..&amp;nbsp; त्यामुळे काबा मध्ये ठेवलेल्या मूर्ती व त्यांची आराधना निरर्थक आहे.. स्त्री ही पुरुषाएवढीच महत्वाची आहे.. मुलींची जन्मतःच हत्या करणं पाप आहे...) मुहम्मदांना मिळतात. हे सोड्ता इतर संदेशांमागची&amp;nbsp; सामाजिक पार्श्वभूमी&amp;nbsp; चित्रपटात तेवढ्या तपशीलवार येत नसल्यानं ते बिगर मुस्लिम प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाहीत. पण मुहम्मदांच्या या संदेशांकडे अनेक मक्कावासी आकर्षित होतात.. त्यांना ऐकण्यासाठी नियमीतपणे येऊ लागतात. &lt;br /&gt;मुहम्मदांच्या संदेशांना मानणार्‍या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे मक्काधिपतींचे धाबे दणाणते. मक्केतील गुलामसुध्दा मुहम्मदांच्या बाजूने होतात. मक्काधिपती मुहम्मदांच्या काका मार्फत त्यांना निरोप पाठवतात की आम्ही तुला अधिकार आणि पद देऊ.. पण तु तुझी शिकवण बंद कर. मुहम्मद ते नाकारतात. मग संघर्ष आणखीच तीव्र होतो. &lt;br /&gt;मुहम्मदांवर "खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.&lt;br /&gt;त्यातच मुहम्मदांना ईस्लाम जाहीर करण्याचा संदेश मिळतो व त्यांचे अनुयायी काबासमोर मोर्चा घेऊन धडकतात. तिथे मूर्तीपूजा मानणारे मक्कावासी व मुहम्मदांचे अनुयायी यांच्यात मारामारी होते. इथे&amp;nbsp; सिंहाचे शिकारी असणारे मुहम्मदांचे दुसरे एक काका हमजा (अँथनी क्वीन) मुहम्मदांची बाजू&amp;nbsp; घेतात व मुहम्मदांच्या अनुयायांवर दगडफेक करण्याचा आदेश देणार्‍या काबाच्या पुजार्‍याला एका झापडीत खाली पाडून जमावाला स्वतःसोबत लढण्याचे आव्हान देतात. जमाव गुपचूप पांगतो. हमजाने ईस्लाम&amp;nbsp; स्वीकारल्याने मुहम्मदांचा पक्ष थोडा मजबूत होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/yIcflHjvL3aopEe5MzNLhw?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="343" src="https://lh5.googleusercontent.com/-z9MHX-SrqXs/TpFkHpJ923I/AAAAAAAABCs/m20v0m6HcuA/s800/Hamza.jpg" width="450" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग मक्केचे नेते आणखी चिडून मुहम्मद व त्यांच्या अनुयायांना वाळीत टाकतात. त्यांची घरे लुटली जातात व काही लोकांची हत्याही होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी गुलाम व&amp;nbsp; काही लोकांना शेजारच्या "हबशाच्या बादशहा" च्या राज्यात पाठ्वण्यात येते. हा हबशाचा बादशहा ख्रिश्चन असतो. तिथेही मक्केचे नेते त्यांचे लोक पाठ्वून 'गुलाम और मजहब के बागी' परत मागतात.&amp;nbsp; इथे हबशाच्या बादशहासमोर झालेला कुराण वाचून दाखवण्याचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो. या काळात मुहम्मद मात्र मक्केतच असतात,&amp;nbsp; त्यांना त्यांच्या मोठ्या&amp;nbsp; काकांचा आधार असतो. मक्केच्या नेत्यांचे या काका मार्फत मुहम्मदांना समजाऊन सांगण्याचे प्रयत्न सुरु असतात. पण वृध्द झालेल्या काकांचा मृत्यू होतो.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये&amp;nbsp; रहायला&amp;nbsp; जातात. वाळवंटातील रस्त्यात एकट्या पडलेल्या मुहम्मदांवर मारेकरी पाठ्वले जातात. पण ते ज्या गुहेत लपलेले असतात तिच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहून इथे कुणी नसेल असे समजून मारेकरी परत फिरतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मदिनामध्ये मुहम्मदांच्या आगमनानंतर ईस्लामच्या पहिल्या मशीदीचे बांधकाम, एका काळ्या गुलामाला मशिदीतून पहिली बांग देण्यास प्रोत्साहन देणे, नमाजची वेळ झाल्यानंतर लोकांनी दुकान उघड्यावर टाकून ओस पडणारी मदिना वगैरे दृश्ये मस्त आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे मदिना वासियांना तीन वर्षातून एकदा मक्केची यात्रा करण्याचा मक्का-मदिनामध्ये करार होतो. प्रेषित मुहम्मदांसोबत खुदा सर्वप्रथम मक्केत 'हम कलाम' झाला असल्याने मादिनेतील मुस्लिमांच्या मनात मक्केबद्दल एक वेगळा आदर असतो.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/qILTIlPdiFkljttP5CfYKQ?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="274" src="https://lh6.googleusercontent.com/-KXgCy3PkPtc/TpFkB15RvTI/AAAAAAAABCo/p59U5T78Lqg/s640/the-message-muslim-warriors.jpg" width="640" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/9October2011?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;पण यात्रेकरूंवर मक्केच्या काही लोकांनी अचानक हल्ला केल्याने दोन्ही पक्षात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते व युद्ध होऊन मक्केचे बरेच महत्वाचे लोक मारले जातात. &lt;br /&gt;अबू सुफियान या मक्केतील बड्या असामीच्या बायकोचा (हिचं नाव 'हिंद' असं आहे ) भाऊ हमजाकडून मारला जातो. ती मग चिडून भाला फेकण्यात तरबेज असलेल्या गुलामाला नेमून हमजाचा काटा काढते.&lt;br /&gt;फार प्रभावी नसली तरी वाळवंटातील युध्दाची दृश्ये व वाळवंटात चित्रित झालेला हा एकूणच चित्रपट काहीतरी क्लासिक पहात असल्याची मजा देतो. वाळवंटातील दोन-तीन युध्दांचे प्रसंग चित्रपटातच पहाण्यासारखे आहेत.&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;मक्केवर मदिनावासियांचा विजय व मुहम्मदांनी काब्यावरुन दिलेला खुत्बा व संदेश यावर चित्रपट संपतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #999999;"&gt;&lt;em&gt;सर्व चित्रे जालावरुन साभार.&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-5125574651159496182?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/5125574651159496182/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/10/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/5125574651159496182'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/5125574651159496182'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/10/blog-post.html' title='फिल्म दि मेसेज'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh6.googleusercontent.com/-UTOwbOxErLk/TpFj2f4HlsI/AAAAAAAABCg/_DA9-XWdvo8/s72-c/0_62_112008_message.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-2793674835153602766</id><published>2011-07-22T06:48:00.001+05:30</published><updated>2011-07-22T08:06:00.972+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Rajneesh'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Osho'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आचार्य रजनीश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओशो'/><title type='text'>झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;Christopher Calder &lt;br /&gt;Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!&lt;br /&gt;Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही? &amp;nbsp;तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो? &lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.&lt;br /&gt;ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले &lt;a href="http://www.oregonlive.com/rajneesh/index.ssf/rajneesh_story_archive.html"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: red;"&gt;कव्हरेज&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/a&gt; आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.&lt;br /&gt;झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.blogger.com/%3Ctable%20style=" width:auto;"=""&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/9rWxiyxH9hdt6BCJSFvX5A?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="250" src="https://lh5.googleusercontent.com/-o87GGE12ydA/TijMZ1RtIMI/AAAAAAAAA-s/zjL8YJ4E_eM/s800/9480155-large.jpg" width="380" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/22July2011?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.blogger.com/%3Ctable%20style=" width:auto;"=""&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/vD6Ce50SVVDsCC_Eg8uUOQ?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="226" src="https://lh6.googleusercontent.com/-7Zv9TbhXthw/TijMVHyFGfI/AAAAAAAAA-o/WtFfDEZWXLY/s800/rajneesh-osho-arrest.gif" width="171" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/22July2011?authuser=0&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-2793674835153602766?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/2793674835153602766/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_22.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2793674835153602766'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2793674835153602766'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_22.html' title='झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh5.googleusercontent.com/-o87GGE12ydA/TijMZ1RtIMI/AAAAAAAAA-s/zjL8YJ4E_eM/s72-c/9480155-large.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-6141714813221812867</id><published>2011-07-20T07:53:00.000+05:30</published><updated>2011-07-20T07:53:10.324+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रोल्स  राइस'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आचार्य रजनीश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओशो'/><title type='text'>झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २</title><content type='html'>रजनीशांनी अज्ञाताच्या भांडवलावर आध्यात्माचा बाजार सुरु केला. हा माणूस स्वत:चा ब्रांड स्थापन होई पर्यात सुरुवातीला दिवसाचे बारा-अठरा तास वाचन करीत होता. तीच माहिती लोकांसमोर अशा खुबीने पेश करीत होता की क्या कहने. अर्थात यावर नाराज होण्याच काहीच कारण नाही. तक्रार ही आहे की त्याने कुणालाही उपलब्ध होऊ शकत असलेल्या या माहितीचा वापर स्वत:ची “एक जागृत झालेला माणूस” अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी अगदी बेमालूमपणे केला.&lt;br /&gt;धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या ज्या शोषणाविरुद्ध त्याने जन्मभर कंठशोष केला त्याच शोषण शृंखलेचा &amp;nbsp;रजनीश हा पुढे चालून मुकुटमणी बनला, एवढा मोठा मुकुटमणी की या सम हाच! भारताच्या अनेक शहरांत ध्यान प्रसारासाठी एक साधी लुंगी व पंचा घालून पायपीट करणारे “आचार्य” रजनीश, विदेशी चेल्यांची थोडीशी संख्या वाढताच स्वघोषित “भगवान” बनून लगेच रोल्स राईस वापरताना दिसतात तेव्हा मजा वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/vVmAmu2AOgWxrvF0Tz156aJGNGuRgBj0YqA06iSz-cM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="285" src="https://lh6.googleusercontent.com/-uixXeEYcRAU/TiY5OHWrI8I/AAAAAAAAA98/4k7rq1cN_F8/s800/Oshoinorangechair_sm.jpg" width="250" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/20Jul2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCJLd-4zHyLTsRA&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांनी ब्याण्णव रोल्स राईस व हिरे वापरले ही तक्रार नाहीच, तर “लोक माझ्याकडे असलेल्या या भौतिक गोष्टींची चर्चा करतात, त्यांना त्याचे आकर्षण आहे.. मला नाही.. लोकांना आकर्षीत करण्यासाठी हे आहे” या गोंडस सबबीखाली रजनीशांनी ते वापरले. त्यांना नायट्रस ऑक्साईड व Valium चे व्यसन असल्याचे आरोप त्यांच्याच सेक्रेटरीने केले. खरे पाहता ही व्यसने त्यांना डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधातून लागली. रजनीशांनी Books I Have Loved, Glimpses of a Golden Childhood, आणि &amp;nbsp;Notes of a Madman मधील पुस्तकाचा मजकूर नायट्रस ऑक्साईडच्या अमलाखाली कथन केला आहे, रजनीशांनीच त्या पुस्तकांत सांगितले आहे. या पुस्तकांच्या विचित्र कथन शैलीमुळे ही ते सहज लक्षात येते. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;अमेरिकन सरकारने त्यांची हकालपट्टी केल्यांनतर रोल्स राइस लिलावात काढल्या. त्यापूर्वी रोल्स राईसकडे केलेल्या चौकशीत कंपनीने सांगितले की रजनीश खरेदी करीत असलेल्या नव्या रोल्स राईसच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फोनवरून तासनतास सूचना देत बसत. त्या त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच रंगवून हव्या असत. त्यांच्या या रोल्स राईस प्रकरणावरच एक वेगळा लेख होऊ शकतो, पण रजनीश म्हणतात त्याप्रमाणे बिती ताही बिसार दे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="&amp;lt;table style=" width:auto;"="" /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/rDVAbrkK9m51sr-uO0QL4qJGNGuRgBj0YqA06iSz-cM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="307" src="https://lh6.googleusercontent.com/-vio2WldaXBA/TiY5GQXCyqI/AAAAAAAAA94/KGJFLR2m5YY/s800/79rollssilverwraithIIlimousine.jpg" width="540" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/20Jul2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCJLd-4zHyLTsRA&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;९२ रोल्स राईस पैकी एक&lt;br /&gt;&lt;br /&gt;रजनीश अविवाहित होते. क्रिस्टीना वाल्फ नावाची ब्रिटीश महिला त्यांची प्रेयसी होती. रजनीशांच्या &amp;nbsp;लहानपणी त्यांची शशी नावाची प्रेयसी होती; ती लहानपणीच वारली. मरताना या शशीने परत येण्याचे वचन दिले होते व क्रिस्टीना वाल्फच्या रुपात जन्मून शशी परत आली आहे असे रजनीशांनी म्हटले. अमेरिकेतून रजनीशांच्या हकालपट्टीनंतर या क्रिस्टीना वाल्फने मुंबईच्या एका हॉटेलात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्या केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="&amp;lt;table style=" width:auto;"="" /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/wfPmCTJKPIWilovfIs_V6aJGNGuRgBj0YqA06iSz-cM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="245" src="https://lh6.googleusercontent.com/-QEMF8dENO9o/TiY5VTUmbxI/AAAAAAAAA-A/aIZaUBnzYLA/s800/Vivek.jpg" width="206" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/20Jul2011?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCJLd-4zHyLTsRA&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;क्रिस्टीना वाल्फ उर्फ तथाकथित शशी, सन्यासी मा विवेक&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगभरातून लोक पुण्यातील कम्युन मध्ये येतात, पण पुण्यातील लोक मात्र इकडे फारसे फिरकत नाहीत असा प्रश्न व्याख्यानात त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पुणे शहर “एक मरी हुयी बस्ती” असल्याचे त्यांनी पुणे कम्युन मध्येच दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते, आणि पुण्यात त्यांनी सातशे वर्षांपूर्वी तप केले असल्याचा अगोदर &amp;nbsp;दावा केला होता. त्यांच्या मृत्युनंतर कम्युनमुळे पुणे हे जागतिक तीर्थक्षेत्र बनेल ही भविष्यवाणीही रजनीशांनीच केली होती.&lt;br /&gt;बहुसंख्य लोक फिदा असतात ती रजनीशांची तर्कशक्ती व त्यांच्या साहित्यावर. वास्तविक प्रचंड रिपिटेशनशिवाय त्यात काहीही नाही. त्यांनी दिलेले एकनएक उत्तर एनलायटन्मेंटच्या प्रोडक्ट भोवती फिरत राहते. रजनीशांच्या आयुष्यातील विरोधाभास लिहायचे नाही असे ठरवले होते, कारण ते लक्षावधी आहेत, व ते चघळत बसण्याचे काहीच कारण नाही. पण अनुरूप वाटतील त्या ठळक गोष्टी मांडल्याशिवाय पर्याय नाही. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;सुरुवातीची अत्यंत थोडकी व्याख्याने सोडली तर इथून तिथून सगळे रजनीश साहित्य “ध्यान” आणि फक्त ध्यान याच मुद्यावर केंद्रित आहे. विविध थेरपीज असोत की तत्वज्ञान, मानसशास्त्र की जगातील कोणताही विषय, त्याचा कसा का होईना त्यांनी ध्यान व एनलायटन्मेंटशी संबध जोडला. &amp;nbsp;&lt;br /&gt;रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा टीकाकार Christopher Calder ते जागृत पुरुष असल्याचे मान्य करतो, पण जागृत पुरुष स्खलनशील नसतात हे त्याला मान्य नाही. त्याच्या शब्दात –&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. &amp;nbsp;His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. &amp;nbsp;The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. &amp;nbsp;He had it all and he was giving it away for free!&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. &amp;nbsp;Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. &amp;nbsp;The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पुढील भागात रजनीशांच्या शैलीचे विच्छेदन &amp;nbsp; &amp;nbsp; &lt;/em&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-6141714813221812867?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/6141714813221812867/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_20.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6141714813221812867'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6141714813221812867'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_20.html' title='झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh6.googleusercontent.com/-uixXeEYcRAU/TiY5OHWrI8I/AAAAAAAAA98/4k7rq1cN_F8/s72-c/Oshoinorangechair_sm.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-3329718117966951322</id><published>2011-07-18T07:20:00.000+05:30</published><updated>2011-07-18T07:20:17.412+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भगवान श्री रजनीश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आचार्य रजनीश'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओशो'/><title type='text'>झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १</title><content type='html'>&lt;em&gt;- यशवंत कुलकर्णी&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या &lt;a href="http://www.misalpav.com/node/14811"&gt;&lt;strong&gt;लेखमालेत&lt;/strong&gt;&lt;/a&gt; रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून लिहिलेली ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे. &lt;br /&gt;रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे.&lt;br /&gt;त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे.&lt;br /&gt;त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये.&lt;br /&gt;मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला.&lt;br /&gt;मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले. &amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp;तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले. &amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp; अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/uV2nJ8FnSL4BKYy2RlcqoJLIwW99_X02fiMeZxrQViM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="336" src="https://lh4.googleusercontent.com/-NYfI7oXRi1k/TGCUhJ1ffsI/AAAAAAAAAXM/TqOuNiNMCUA/s800/rajneesh.at.his.best.jpg" width="511" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/YashwantKulkarni?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCOaoz6nKopyzQQ&amp;amp;feat=embedwebsite"&gt; &lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;span style="color: red;"&gt;&lt;strong&gt;अज्ञाताचे भांडवल&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...” &amp;nbsp; &lt;br /&gt;त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/toNwOpfYoXlel0QxZ_8KE5LIwW99_X02fiMeZxrQViM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="286" src="https://lh6.googleusercontent.com/-fOa7Jtnn3mI/TGCUa2TKqlI/AAAAAAAAAXE/d_yziFi2Iao/s800/Osho-34.jpg" width="350" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/YashwantKulkarni?authuser=0&amp;amp;authkey=Gv1sRgCOaoz6nKopyzQQ&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(क्रमश:)&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-3329718117966951322?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/3329718117966951322/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_18.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3329718117966951322'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3329718117966951322'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post_18.html' title='झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh4.googleusercontent.com/-NYfI7oXRi1k/TGCUhJ1ffsI/AAAAAAAAAXM/TqOuNiNMCUA/s72-c/rajneesh.at.his.best.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-1910544396610748986</id><published>2011-07-01T11:16:00.000+05:30</published><updated>2011-07-01T11:16:10.119+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नाना फडणवीस'/><title type='text'>नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे. &lt;br /&gt;मूळ नाव &amp;nbsp;बालाजी जनार्दन भानू असलेले &amp;nbsp;नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. &amp;nbsp;सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील &amp;nbsp;बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे. ब्रिटीश राजमध्ये मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे नानासाहेब फडणविसांच्या मुत्सद्देगिरीचे यश मानता येईल. नाना फडणवीस १३ मार्च १८०० रोजी वारले. &lt;br /&gt;त्यांच्या मृत्युनंतर भारताचा तत्कालीन गवर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने नानाबद्दल &amp;nbsp;""the able minister of Peshwa state, whose upright principles and honourable views and whose zeal for the welfare and prosperity, both of the dominions of his own immediate superiors and of other powers, were so justly celebrated" हे उद्गार काढले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोथबीने विकायला काढलेले चित्र त्यांच्या संकेतस्थळावरून: &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;http://www.sothebys.com&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्राची किंमत ७०,००० पौंड अपेक्षित आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बातमी सौजन्य : &lt;a href="http://tinyurl.com/6dcuff6"&gt;&lt;strong&gt;ईटी&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/Hkrmbj40fvIoNjkBssJwo7AAFAW6Dg1Pf5UO36gOlDg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="238" src="https://lh5.googleusercontent.com/-UOoDDmeM280/Tg1PJrRFupI/AAAAAAAAA74/KHzTGdrZua0/s800/nana%252520phadnis.jpg" width="235" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/yekulkarni/1Jul2011?authkey=Gv1sRgCKzQstGiqPK7LQ&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-1910544396610748986?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/1910544396610748986/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1910544396610748986'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1910544396610748986'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh5.googleusercontent.com/-UOoDDmeM280/Tg1PJrRFupI/AAAAAAAAA74/KHzTGdrZua0/s72-c/nana%252520phadnis.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-7836522561524489965</id><published>2011-01-23T14:41:00.001+05:30</published><updated>2011-01-23T14:48:48.862+05:30</updated><title type='text'>बाळासाहेब</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TTvsMuAnFII/AAAAAAAAA00/-8XfaOs49gY/s1600/bal-thackeray.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TTvsMuAnFII/AAAAAAAAA00/-8XfaOs49gY/s1600/bal-thackeray.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज ८५ वर्षांचे झाले! राजकारणातला असो नसो, शिवसेनेची भूमिका मानणारा असो नसो महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकानं क्षणभर थांबून या सम्राटाचं अभिष्टचिंतन करण्याचा हा दिवस आहे. कारणे स्पष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्रीय अस्मितेमधील बाळासाहेब ठाकरे हे मुकूटणी आहेत; बाळासाहेब हा एक संस्कार आहे! हे व्यक्तीमत्वच करिष्माई आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी निभावलेल्या भूमिकांबद्दल वाद असतील, पण तो बाळासाहेबांचा फक्त एक पैलू आहे; आणि त्यातूनही कुणाच्याही मनावर आक्रामकता, रोखठोकपणाचाच ठसा उमटतो.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;कुंचल्याच्या फटकार्‍यांतून विरोधकांना गारद करणारे बाळासाहेब, खींचो न कमान को न तलवार निकालो - जब तोप मुकाबील है तब अखबार निकालो म्हणणारे बाळासाहेब! लाखोंच्या सभेसमोर उभे राहून हात पसरून महाराष्ट्रातील माताभगिनी आणि तमाम मराठीजनांना आवाहन करणारे बाळासाहेब. कोणत्याही काळात, कोणत्याही देशात निर्माण होणार्‍या महानायकाचा एक महत्वाचा गुणविशेष मानला जातो तो हाच की त्या नेत्यामुळे, त्याच्यासोबतच्या आणि नंतरच्या पिढ्यांमध्येही प्राण फुंकला जातो. तो नेता, फक्त नेता राहात नाही तर सर्वांसाठीच ते एक संचित बनून जाते. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वात नक्कीच ही जादू आहे.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील जादू ही की, त्यांच्या टिकेचा विषय बनलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेमधून हुबेहुब जीवंत करून श्रोत्यांसमोर उभा करतात आणि तिथेच त्याची साले काढायला सुरूवात होते. मग अशा असंख्य उदाहरणांत बाळासाहेबांच्या मिष्किल अभिनयातून फटके खाणारे, सोनिया गांधींना तलवार दिल्याची आगळीक केलेले बाबासाहेब पुरंदरे &amp;nbsp;(या उद्याच्या पंतप्रधान, आम्हाला मॉं साहेबांसारख्या दिसत आहेत) असतील की काश्मीरच्या मढ्यावरचं लोणी खाणारे फारुख अब्दुल्ला &amp;nbsp;(गुलाबी, गुलाबी - बापाचा माल!) असतील. राज ठाकरे यांना विधायक कामासाठी पब्लिक एंटरटेन्मेंटमधून इमोशनल एनकॅशमेंट आज भलेही करता येत असेल पण तो संस्कार बाळासाहेबांचा आहे, हे ते सुध्दा मान्य करतील.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;मला, मलाच काय वक्तृत्व या अभिव्यक्तीचा अभ्यास करणार्‍या कुणालाही बाळासाहेब या व्यक्तीमत्वामधला नेहमीच आकर्षित करणारा गुणविशेष म्हणजे अगदी कमीत कमी वाक्यांमध्ये टिकाविषयाचा अचूक वेध घेणारी त्यांची शब्दफेक आणि खास ठाकरी शैलीतील बॉम्बफेक. मागे एकदा सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीचा दसरा मेळाव्यात समाचार घेताना एका मिष्किल, तिरकस आजोबांच्या शैलीत बाळासाहेब असेच काहीसे उद्गारले होते - "आजकाल हे एक आलंय नवं खूळ - रेव्ह पार्ट्या... जंगलात जायचं, एकमेकांना आवळायचं.." बस्स.. बस्स..बस्स !!! पुढे काही बोलण्याची गरजच नाही - समजणार्‍याला सगळं समजून येतं. &lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ही तोफ गावोगावच्या मैदानांवर कडाडत असताना प्रभु चावलांनी योग्य तो आदर राखून घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतील बाळासाहेब असोत की इंग्लिशमध्ये वीर सिंघवीच्या तिरकस, धाडस करून थेट विचारलेल्या प्रश्नांना छप्परफाड उत्तरे देणारे, मुलाखत संपताच "जय हिंद, जय महाराष्ट्र!" म्हणून पुढे क्षणभरही वाट न पाहता ताड्कन चालते होणारे बाळासाहेब असोत - बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील ती अदृश्य जादू आजही पंच्याऐंशीव्या वर्षीदेखील तेवढीच टिकून आहे.&lt;br /&gt;शेवटी एवढंच म्हणतो, आई भवानी बाळासाहेबांना अशाच प्रभावी वक्तृत्वाचं शतक ठोकण्याचं बळ देवो!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-7836522561524489965?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/7836522561524489965/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post_23.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7836522561524489965'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7836522561524489965'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post_23.html' title='बाळासाहेब'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TTvsMuAnFII/AAAAAAAAA00/-8XfaOs49gY/s72-c/bal-thackeray.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-3795378267275222723</id><published>2011-01-21T07:28:00.000+05:30</published><updated>2011-01-21T07:28:14.549+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='यु.जी. कृष्णमूर्ती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माईंड इज ए मिथ'/><title type='text'>माईंड इज ए मिथ</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;&lt;i&gt;यापूर्वी इथे यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच. पण ते वाचन इथल्या वाचकांनाही सहभागी करता आले तर आणखी आनंद होईल.&amp;nbsp;&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;&lt;i&gt;ज्यांनी पूर्वीची लेखमाला वाचलेली नसेल आणि वाचण्याची इच्छा असेल तर कृपया सर्व सातही भागाचे दुवे खाली दिले आहेत.&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: red;"&gt;&lt;i&gt;&lt;br /&gt;&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.misalpav.com/node/14724"&gt;&lt;strong&gt;१&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/14740"&gt;&lt;strong&gt;२&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/14750"&gt;&lt;strong&gt;३&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/14811"&gt;&lt;strong&gt;४&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/14982"&gt;&lt;strong&gt;५&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/14992"&gt;&lt;strong&gt;६&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.misalpav.com/node/15020"&gt;&lt;strong&gt;७&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table style="width: auto;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/TePyk4GHjS9_LipikHcjN5LIwW99_X02fiMeZxrQViM?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="328" src="http://lh6.ggpht.com/_OcnIuMGltns/TGCVE_YqpvI/AAAAAAAAAXU/ht7VawJoACY/s800/U.G..jpg" width="245" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td style="font-family: arial,sans-serif; font-size: 11px; text-align: right;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/yekulkarni/YashwantKulkarni?authkey=Gv1sRgCOaoz6nKopyzQQ&amp;amp;feat=embedwebsite"&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: red;"&gt;माईंड इज ए मिथ&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;यु.जी. कृष्णमूर्तींशी प्रश्नोत्तरे&lt;br /&gt;&lt;strong&gt;भाग एक&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: red;"&gt;सर्वकाही फोडून टाकणारी निश्चितता&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; मी कधीच व्यासपीठावर बसून बोलत नाही. किती कृत्रिम असते ते. काही गोष्टी गृहित धरून किंवा अस्पष्ट अर्थात समोर ठेऊन बसून बोलत राहाणे वेळेचा अपव्यय आहे. रागावलेला माणूस रागाबद्दल बोलत बसत नाही आणि रागाबद्दल मोठ्या आनंदाने संवादही साधत नाही; त्याचे माथे फिरलेले असते. त्यामुळे तु रागीट आहेस आणि म्हणून तुला अडचणी येतात हे मला सांगू नकोस. क्रोधाबद्दल बडबड कशाला हवीय? केव्हातरी, कसेतरी तुम्हाला राग येणे कायमचे थांबेल आशेवर तुम्ही जगता आणि त्यातच मरता. त्या आशेचेच ओझे तुमच्यावर आहे, आणि त्यात हे जीवन निरर्थक वाटले की तुम्ही पुनर्जन्माचा शोध लावता. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: ठीक आहे, तुमच्या बोलण्यातून कुणालाही आशा मिळते असे बिलकुल म्हणता येणार नाही. मग सांत्वन किंवा सूचना द्यायच्या नसूनही तुम्ही का बोलत राहाता?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; मग मी करावे तरी काय? तुम्ही येता, मी बोलतो. तुम्हाला दगड फेकून मारून मी तुमच्यावर टिका करत राहावी हे तुम्हाला हवे आहे? ते निरर्थक आहे कारण तुमच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही कारण तुमच्याभोवती एक अभेद्य चिलखत उभे आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला तुमची स्थिती समजून घेता येत नसल्याने, तुम्ही विचारांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देता ज्यात तुमच्या कल्पना आणि मन्तव्य असते. विचार ही प्रतिक्रिया असते. तुम्ही ज्या वेदनांतून जात आहात त्या वेदना, त्यांचा अनुभव न घेता इथे माझ्यात प्रतिबिंबीत होत आहेत. इथे त्यांचा बिलकुल अनुभव नाही. बस्स, तेवढेच. या नैसर्गिक स्थितीत तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवतात, मग तुम्ही त्यांना व्यक्तिश: ओळखत असाल किंवा नसाल. अलिकडेच माझा सर्वात मोठा मुलगा जवळच्याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे मरणासन्न होता. मी ही त्याच परिसरात होतो आणि त्याला नेहमी भेटायला जात असे. माझे मित्र सांगतात की तो मरेपर्यंत मी मलासुद्धा तशाच तीव्र वेदना होत होत्या. मी काहीही करू शकत नाही. वेदना ही जीवनाचीच एक अभिव्यक्ती आहे. त्याच्या कॅन्सरवर मी कसलातरी उपाय करावा असे त्यांना वाटत होते. मी जर ट्यूमरला हात लावला तर तो आणखी वाढेल. कॅन्सर ही पेशींची वाढ, जीवनाची आणखी एक अभिव्यक्ती असते, आणि त्यात मी काही केले तर तो आणखी मजबूत होईल. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: तर मग तुम्हाला इतरांच्या वेदना कळतात तरी तुम्ही त्यापासून बाजूला असता असेच ना?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; वेदना हा एक अनुभव आहे, आणि इथे (स्वत:कडे बोट दाखवून) कसलाही अनुभव नाही. तुम्ही एक गोष्ट आहात आणि जीवन दुसरी एक गोष्ट आहे असे नाही. ती एकच एक सबंध हालचाल आहे आणि त्याबद्दल मी काहीही सांगितले तरी ते चुकीचे, गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही एक "व्यक्ती", एक "वस्तू", किंवा "इतर" गोष्टींनी व्यापलेली स्वतंत्र आकृती नाही आहात. ही एकच एक, सबंध हालचाल तुम्हाला अनुभवता येणारी गोष्ट नसते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण अनुभवाला येत नसतानाच जगत असणे आमच्या मनाला अतार्किक वाटते.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी: &lt;/strong&gt;मी जे बोलतोय त्यामुळे तुमच्या तार्किक चौकटीत गोंधळ उडतो. ती विभक्त बांधणी तशीच अबाधीत ठेवण्यासाठी तुम्ही तर्क वापरत आहात, बाकी काही नाही. तुमचे प्रश्न हे पुन्हा एकदा विचारच आहेत आणि प्रतिक्रियात्मक आहेत. सगळे विचार प्रतिक्रियात्मक असतात. तुम्ही जीव तोडून हे विचारांचे चिलखत वाचवत आहात, आणि जीवनाच्या हालचालीमुळे तुमचा आधार नष्ट होईल अशी भीती तुम्हाला वाटतेय. जीवन हे खळाळत वाहाणार्‍या नदीसारखे, तिला घालून दिलेल्या सीमांना मोडून टाकील अशा प्रकारे दोन्ही तीरांवर आदळत असते. तुमच्या विचारांची रचना आणि तुमची वास्तविक मानसिक चौकट मर्यादीत आहे, पण जीवन मात्र तसे मर्यादीत नाही. त्यामुळेच स्वतंत्र्यातील जीवन हे शरीराला वेदनादायक असते; इथे होत असणारा ऊर्जेचा प्रचंड खळखळाट शरीरासाठी वेदनादायक आहे, तो होत राहातो तशी प्रत्येक पेशी फुटत जाते. तुमच्या अत्यंत विचित्र स्वप्नातही तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही. त्यामुळेच मी ते कसेही सांगितले तरी ते चुकीचेच होईल. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: गुरू आणि पुरोहितदेखील आम्हाला हेच शिकवतात की वेगळी अशी काही रचना नाही आणि आमच्या प्रश्नांचा तोच उगम आहे. तुम्ही वेगळे काय सांगू शकाल?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी: &lt;/strong&gt; तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही, ते फक्त ठणठणीत कोरडे शब्द आहेत. जीवनाच्या एकच एक सबंध हालचालीत तुमचा विश्वास हा फक्त एक निराधार विश्वास असतो, त्यात निश्चितता नसते. गुरू आणि धर्मग्रंथातून तुम्हाला जे शिकवले गेलेय ते तुम्ही अत्यंत हुशारीने तर्कात बांधले आहे. तुमचे विश्वास हे, ते सांगणार्‍या व्यक्तीकडून आंधळ्यासारखे स्वीकारलेले आहेत, सगळा वापरलेला माल. तुम्ही तुमच्या विश्वासापेक्षा वेगळे नाही. जेव्हा तुमचे मौल्यवान विश्वास आणि भ्रम समाप्त व्हायला येतात, तेव्हा तुमचाही शेवट येतो. माझे बोलणे हे तुमच्या वेदनेला दिलेल्या प्रतिसादापेक्षा जास्त काहीही नाही, त्या वेदना तुम्ही तुमचे प्रश्न, तर्कपूर्ण युक्तीवाद आणि इतर मन्तव्यांतून व्यक्त करताय.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण तुम्ही इथे बसून तासामागून तास बोलत राहाताय त्यातून निश्चितच हे दिसून येते की तुमचेही एक तत्वज्ञान, एक संदेश आहे, जरी तो ऐकणार्‍यांना नीट समजत नसला तरी.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; &amp;nbsp;बिलकुल नाही. इथे बोलणारा, सल्ला देणारा, वेदना अनुभवणारा किंवा काहीही अनुभवून घेणारा कुणीही नाही. एखादा बॉल भिंतीवर फेकला की तो परत विरूध्द बाजूला फेकला जातो, फक्त तेवढेच. माझे बोलणे हे तुमच्या प्रश्नाचा थेट परिणाम आहे. माझे स्वत:चे इथे काहीही नाही, कोणताही सुस्पष्ट किंवा लपलेला अजेंडा नाही, कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही, कसल्याही शस्त्राला मी धार लावत नाही आणि काहीही सिध्द करीत नाहीय.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण शरीर हे क्षणभंगुर असते, आणि आपल्या सगळ्यांना कसलेतरी अमरत्व हवे असते. साहाजिकच आपण एका मोठ्या तत्वज्ञानाकडे, धर्माकडे, आध्यात्माकडे वळत असतो. निश्चितच, जर..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी: &lt;/strong&gt;शरीर फक्त अमर असते. वैद्यकिय मृत्यू झाल्यानंतर नवीन आकारात जीवनाच्या प्रवाहात राहून ते त्याचे रूप बदलते. शरीराला "पुनर्जन्म" किंवा कसल्याही प्रकारच्या अमरत्वाशी काही घेणेदेणे नाही. त्याचा आत्ता, या क्षणी जीवंत राहाण्यासाठी आणि वाढण्यासाठी संघर्ष चालू असतो. भीतीमुळे विचारातून तयार केलेला बनावट "पैलतीर" हीच खरी, तसलेच आणखी पुढेही चालू राहाण्याची मागणी आहे. त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होण्याची ही मागणी हीच अमरत्वाची मागणी आहे. असले अमरत्व शरीराला नको आहे. कायम टिकून राहाण्याची विचाराची मागणी शरीराची घुसमट करून दृष्टीकोन धूसर करीत आहे. विचार हा स्वत:च स्वत:चे रक्षण करीत स्वत:ला टिकवून ठेवण्यापुरते पाहाण्यासोबतच, शरीरही टिकवायला पाहातो. दोन्हीही पूर्णत: चुकीचे आहेत.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: असे दिसते की मूळापासूनच कसलातरी पूर्णत: बदल व्हायला हवा, पण तशी इच्छा मध्ये येत नसेल तर...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; जर ते तुमच्या शक्तीच्या बाहेर घडले, तर खेळ खलास. ते थांबवण्याचा, ती परिस्थिती बदलण्याचा तुमच्याकडे कसलाच मार्ग नसेल. त्यातून जाण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. वास्तवावर प्रश्नचिन्ह उभे करून काहीच साधणार नाही. त्यापेक्षा तुमची ध्येये, तुमच्या श्रध्दा आणि मान्यतांवर प्रश्नचिन्ह उभे करा. त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हायला हवे, वास्तवापासून नव्हे. तुम्ही विचारत असणारे हे बिनबुडाचे प्रश्न तुमची ध्येये आपोआप सुटली की गायब होतील. ते एकमेकांवर अवलंबून आहे. यातला एक दुसर्‍याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: हे एवढे दृश्यच भयंकर आहे. आम्हाला अराजक, पूर्णत: नाश ओढवण्याची भीती वाटते.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; जर तुमच्या नाकातोंडात पाणी जात असेल, तर जाऊ द्या. तुम्ही बुडणार नाही. पण मी खात्री दिल्याने काय होणार आहे? मला वाटते, ते निरर्थक असेल. तुम्ही जे करताय ते तुम्ही करीत राहाल; त्यातील निरर्थकता तर तुमच्या लक्षातही येत नाही. मी तुम्हाला सांगतो, आशा आणि सातत्याच्या इच्छेतून होत असलेल्या गोष्टी करणे तुम्ही थांबवता तेव्हा, त्यासोबतच तुम्ही करीत असलेल्या सर्व गोष्टी थांबतात. तुम्ही तरंगत राहाल. पण तरीही तिथे आशा राहातेच; "कदाचित काहीतरी मार्ग असावा, कदाचित मी योग्यप्रकारे करीत नसेल." दुसर्‍या शब्दांत, कशावरही अवलंबून राहाण्याचा मूर्खपणा आपल्याला स्वीकारावा लागतो. आपल्या अगतिकतेचा सामना आपण करायलाच हवा.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: आमच्या प्रश्नांवर काहीतरी उपाय असेल असे वाटून घेण्याशिवाय काहीच हाती नाही.&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; तुमचे प्रश्न तसेच राहातात ते तुम्ही शोधलेल्या चुकीच्या उपायांमुळे. उत्तरे जर तिथे नसतील, तर प्रश्नही तिथे राहू शकणार नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत; तुमचे प्रश्न आणि त्यावरचे उपाय एकत्रच जातात. तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी निश्चित उत्तरे तुम्हाला वापरायची असल्याने, ते प्रश्न तसेच टिकून राहातात. या सर्व धार्मिक आणि पवित्र लोकांनी, मानशास्त्रज्ञ, राजकारण्यांनी सांगितलेले असंख्य उपाय, ही काही खरीखुरी उत्तरे नव्हेत. तेवढे तरी निश्चित आहे. ती लागू पडणारी उत्तरे असती, तर प्रश्न आतापर्यंत शिल्लक राहिले नसते. ते फक्त आणखी कसून प्रयत्न करायला, आणखी ध्यान करायला, आणखी विनम्र व्हायला, तुमच्या डोक्यावर उभे राहायला आणि असल्याच अगणित गोष्टी करायला सांगतात. ते तेवढेच करू शकतात. या तथाकथित उत्तरांसोबतच शिक्षक, गुरू किंवा नेत्याने सांगितलेल उपायदेखील तेवढेच चुकीचे आहेत. ते काही प्रामाणिकपणे काम करीत नाहीत, फक्त बाजारात उभे राहून भिकार, तकलादू वस्तू विकत आहेत. तुमची आशा, भीती आणि भाबडेपणा दूर सारून त्या मूर्खांना बिझिनेसमन सारखी वागणूक दिली तर ते कोणताही माल देत नाहीत, आणि कधीच देऊ शकणार नाहीत हे तुम्हाला दिसेल. पण तज्ञ व्यक्तींनी दिलेल्या बोगस वस्तू तुम्ही विकत घेत जाता.. घेत जाता. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण पूर्ण क्षेत्रच एवढे गुंतागुंतीचे आहे की आत्मजागरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी काळजीपूर्वक अभ्यास करून जीवन अर्पण केलेल्या व्यक्तींवर अवलंबून राहाणे आवश्यक वाटते.&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; त्यांचे सर्व तत्वज्ञान प्रत्येकाच्या शरीरातच असलेल्या ज्ञानाच्या पासंगालाही पुरणार नाही. ते सांगत असलेली मानसिक कृती, आध्यात्मिक कृती, भावनिक कृती आणि भावना ह्या सर्व गोष्टी एकच एक सबंध प्रक्रिया आहे. शरीर हे अत्यंत हुशार आहे आणि या वैज्ञानिक आणी धार्मिक शिकवणुकीची त्याला टिकून राहाण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी काहीच गरज नाही. जीवन, मृत्यू आणि मुक्तीबद्दलच्या तुमच्या सर्व रंगीबेरंगी कल्पना बाजूला सारा आणि शरीर अबाधीत, स्वरबध्दपणे कार्य करीत राहिल. त्याला माझी किंवा तुमची गरज नाही. तुम्हाला काहीएक गोष्ट करायची गरज नाही. अमरत्व, पुनर्जन्म किंवा मृत्यूबद्दलचे मूर्खपणाचे प्रश्न त्यानंतर तुम्ही कधीही विचारणार नाही. शरीर अमर आहे. &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: आम्हाला दिलासा, नियंत्रण मिळण्याची प्रत्येक शक्यता तुम्ही निर्दयपणे छाटून टाकलीत, दु:खापासून पळण्याची धूसर आशाही शिल्लक ठेवली नाहीत. स्वत:चा नाश करून घेण्याशिवाय काहीही हातात नाही असे वाटते. मग आत्महत्या का करू नये?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; तुम्ही आत्महत्या केलीत, तरी परिस्थितीत कसलाच फरक पडणार नाही. आत्महत्या झाल्यानंतर काही क्षणातच शरीर सडायला लागून, जीवनाच्या इतर प्रकारे संघटीत रूपांत रूपांतरीत होईल, त्यामुळे काहीही संपणार नाही. जीवनाला सुरूवातही नाही आणि शेवटही. मृत आणि सडणारे शरीरावत थडग्यातील मुंग्यांची भूक भागेल आणि सडणार्‍या प्रेतांतून मृदा समृध्द होणारी रसायने मिळून जीवनाच्या इतर रूपांचे पोषण होईल. तुम्ही तुमचे जीवन संपवू शकत नाही, ते अशक्य आहे. शरीर हे अमर आहे आणि "अमरत्व आहे काय?" वगैरे मूर्खपणाचे प्रश्न ते विचारत नाही. त्याला माहित असते की विशिष्ट रूपात समाप्त होऊन ते इतर रूपात टिकून राहिल. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचे प्रश्न हे नेहमीच भीतीतून विचारले जातात. तुमच्या "आध्यात्मिक जीवनाचे" नेतृत्व घेतलेले ते नेते कधीच या गोष्टींबाबत प्रामाणिकपणे बोलणार नाहीत, कारण ते भीती, भविष्यातील जीवनाबद्दलचे अंदाज आणि मृत्यूच्या "गूढावर" स्वत:ची उपजिवीका चालवितात.&lt;br /&gt;आणि तुम्ही, त्यांचे चेले, तुम्हाला काही खरोखर माणसाच्या भविष्याबद्दल घेणेदेणे नाही, तुम्हाला फक्त तुमच्या स्वत:च्या क्षुल्लक चिंता आहेत. मानवता, दया, करूणा आणि इतर गोष्टींबद्दल तासन तास बोलत राहून तुम्ही फक्त एक विधी पार पाडता. तुम्हाला रूचि असते ती तुमच्या स्वत:मध्ये, नसता तुमची भविष्यातील जीवने आणि तुमच्या सुनिश्चित मृत्यूबद्दल असले पोरकट प्रश्न उभे राहिले नसते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण आमच्यापैकी बहुतेकांसाठी जीवन ही एक पवित्र गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोराबाळांचे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आणखी युध्दे टाळण्यासाठी संघर्ष करतो..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; तुम्ही सगळे माथेफिरू लोक आहात. तुम्ही जनन दरावरील नियंत्रणाविरोधात बोलता, अमूल्य जीवनाबद्दल आणि त्यानंतर बॉम्ब्ज आणि नरसंहाराबद्दल बडबडत राहाता. किती हास्यास्पद आहे. तुम्ही बॉम्बफेक, उपासमार, गरीबी आणि दहशतवाद यातून हजारो लोक मारत असतानाच तुम्हाला अजून जन्म न झालेल्या जीवनाबद्दल चिंता आहे. तुमची जीवनाबद्दलची "चिंता" फक्त त्यातून राजकिय मुद्दा उकरून काढण्यापुरतीच आहे. ती फक्त सुशिक्षित लोकांची एक चर्चा आहे. मला त्यात रूची नाही. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: होय, पण आमच्यापैकी अनेकजण हे पाहातात आणि या गोष्टी बदलण्याचीही त्यांची इच्छा असते. हा काही आमचा फक्त अहंकार नाही.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; खरंच तुम्हाला त्यात रूची आहे? तुम्हाला मानवाच्या भविष्यात खरंच रूची आहे? राग, खरेपणा आणि काळजी या तुमच्या अभिव्यक्तींना माझ्याकडे काहीही किंमत नाही. ते फक्त विधी आहेत. तुम्ही बसता आणि बोलता, बस्स तेवढेच. तुम्ही बिलकुल चिडलेले नाही आहात. तुम्ही या क्षणी खरोखर चिडलेले असता तर हा प्रश्न तुम्ही स्वत:ला देखील विचारला नसता. तुम्ही अखंडीतपणे रागाबद्दल बोलत राहाता. रागावलेला माणूस, त्याबद्दल बोलणार नाही. त्या रागाच्या बाबतीत तो सामावून घेऊन शरीराने अगोदरच त्याची कृती करून टाकलेली असते. राग तिथल्या तिथे जळून जाऊन संपतो. तुम्ही काही करीत नाही; शरीर फक्त तो सामावून घेते. बस्स, तेवढेच. तुमच्यासाठी हे फारच जास्त असेल, त्यामुळे ताण येत असेल तर, कधीच धार्मिक माणसांकडे जाऊ नका. गोळ्या खा, काहीही करा, पण पवित्र धंद्यातून तुम्हाला मदत मिळण्याची अपेक्षा करू नका. तो वेळेचा अपव्यय आहे.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: तुम्ही मला सगळंच सोडायला लावताय, सगळाच त्याग..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; जोपर्यंत तुम्हाला त्याग करण्यासारखे, सोडून देण्यासारखे काही आहे असे वाटेल तोपर्यंत तुम्ही हरवलेले आहात. पैशांचा आणि जीवनातील गरजांचा विचारही न करणे हा एक आजार आहे. जीवनाच्या मूलभूत गरजाही स्वत:ला नाकारणे हे दमन आहे. स्वत: ओढवून घेतलेल्या निष्कांचनपणामुळे तुम्हाला जागरूकता वाढविता येऊन ती जागरूकता सुखी होण्यासाठी वापरता येईल असे तुम्हाला वाटते. विसरा रे. जागरूकतेबद्दलच्या सर्व संकल्पना टाकून दिल्यानंतर आणि कॉम्प्युटरसारखे काम करणे सुरू केल्यानंतर तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही एक यंत्र असायला हवे, या जगात आपोआप कार्य करायला हवे, तुमच्या कृत्यांबद्दल ते होण्यापूर्वी, होताना किंवा झाल्यानंतर प्रश्नच पडायला नकोत.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: योगातील पध्दती, धार्मिक परित्याग किंवा नैतिक पोषणाचे मूल्य तुम्ही नाकारत आहात काय? माणूस निश्चितच यंत्रापेक्षा काहीतरी जास्त आहे.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; सर्व नैतिक, आध्यात्मिक, तात्विक मूल्ये खोटी आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणारे मानसशास्त्रज्ञ आता थकले आहेत आणि उत्तरांसाठी आध्यात्मिक धेंडांकडे वळायला त्यांनी सुरूवात केलीय. ते हरवले आहेत, आणि तरीही उत्तरे ही त्यांच्याकडूनच यायला हवीत, बुरसटलेल्या निरूपयोगी धार्मिक परंपरा आणि पवित्र धंद्यातून नव्हे.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: या सर्व परिस्थितीतून फक्त हताशा येतेय. मसिहा, महात्मा आणि प्रेषितांवर लोक अवलंबून राहिले यात काहीच आश्चर्य नाही.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी: &lt;/strong&gt;या तथाकथित मसिहा आणि प्रेषितांनी जगात फक्त दु:ख मागे ठेवले आहे. एखादा आधुनिक मसिहा तुमच्यासमोर आला, तर त्याला तुम्हाला कसलीही मदत करता येणार नाही. आणि त्याला मदत करता आली नाही, तर कुणालाच मदत करता येणार नाही.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: एखादी अभिषिक्त व्यक्ती, उदाहरणार्थ एखादा तारणहार किंवा ऋषिला काहीच करता येण्यासारखे नसेल, तर धर्मग्रंथ म्हणतात त्याप्रमाणे, आपण "सत्य जाणून घ्यायला हवे आणि सत्य आपणा सर्वांना मुक्त करील." &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; सत्य ही एक हालचाल असते. तुम्ही ते कैद करू शकत नाही, साठ्वू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही अथवा तुमचे हेतू साध्य करण्यासाठी वापरूही शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही सत्य कैद करता, ते सत्य राहात नाही. माझ्यासाठी जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला देता येत नाही. इथे असणारी निश्चितता दुसर्‍याकडे सोपवता येत नाही. याच कारणामुळे गुरूगिरीचा सर्व धंदा पूर्णत: एक फाजीलपणा आहे. नेहमीच हे असेच असत आले आहे, आत्ताच असे आहे असे नाही. पुरोहित, गुरूंना समृध्द करण्यासाठी तुम्ही काटकसर करता. तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा दाबून टाकता आणि तो माणूस मात्र रोल्स रॉयस कारमध्ये फिरतो, राजासारखा खातो आणि महाराजासारखा वागवला जातो. तो आणि पवित्र धंद्यातील दुसरे लोक इतरांचा मूर्खपणा आणि भोळेपणावर पोसले जातात. असेच, राजकारणी सुध्दा माणसाच्या भुक्कडपणावर जगतात. सगळीकडे हे असेच आहे. &lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: तुमचा जोर नेहमीच नकारात्मक बाजूवर आहे, प्राचिन "नेति नेति" या दृष्टीकोनावर. आपला नैसर्गिक जन्मसिध्द हक्क असणारी स्थिती एखाद्याने शोधण्यासाठी धर्मग्रंथ, गुरू आणि अधिकारी व्यक्तींसह सर्व अतिरिक्त पसारा फेकून देण्याकडे तुमचा इशारा आहे ना?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; नाही. मुक्तीसाठी गुरू, मंदिरे आणि पवित्र ग्रंथांपासून फारकत घेणे ही पूर्व अट असणे चमत्कारिक आहे. फक्त तुमच्या अडचणी, वेदना टाळण्यासाठी तुम्ही उत्तरे शोधत असता. जन्म झालेली प्रत्येक गोष्ट वेदनादायी आहे. ते तसे का आहे हे विचारण्याचा काहीही उपयोग नाही. ते तसे आहे. गुरू आणि अधिकारी व्यक्तींना नाकारून तुम्ही कसल्यातरी दैवी वेदना सहन कराल; वेदना सहन केल्याने तुम्हाला कसलीही आध्यात्मिक मदत मिळू शकणार नाही. कसलाही मार्ग नाही.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण आम्ही तुम्हाला एक अतिवादी, एक मानवद्वेष्टा म्हणून ओळखतो. तुम्ही फक्त माणसाच्या सध्याच्या हाल अपेष्टांवर टिकाच करीत नाहीय तर त्याच्या वेगळ्याच नियतीकडे निर्देश करताय, नाही?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; &amp;nbsp;तुमच्या प्रश्नांसाठी एक उपाय आहे - मृत्यू. तुम्हाला ज्या मुक्तीमध्ये रूची आहे ती मुक्ती फक्त मरताना मिळेल. प्रत्येकाला शेवटी मोक्ष मिळतो, कारण मोक्षामध्ये नेहमीच मृत्यूची सावली आहे, आणि प्रत्येकजण मरण पावतो.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण मला वाटते तुम्ही कोणत्याही काव्यात्म किंवा काल्पनिक अर्थाने मृत्यूकडे पाहात नाही आहात. तुम्ही वर्णन करीत असणारा मृत्यू हा मानसिक, कल्पित किंवा अस्पष्ट रूप असलेला मृत्यू नाही तर खरोखर, वास्तविक शारीरिक मृत्यू आहे, होय ना? &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; होय. तुम्ही मरता तेव्हा शरीर हे पसरलेल्या स्थितीत असते आणि कार्य करणे थांबवते, आणि तोच शेवट आहे. पण या बाबतीत शरीराने स्वत:ला कसेतरी पुनरूज्जीवीत केले आहे. आता ते नेहमीसारखे दररोजच होते; ही सर्व प्रक्रिया स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागली. माझ्यासाठी आता जीवन आणि मृत्यू एकच आहेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी फक्त एवढाच इशारा देतो की तुमचे ध्येय असणारा मोक्ष खरोखर आला, तर तुम्ही मराला. शारीरिक मृत्यू होईल, कारण त्या स्थितीत जाण्यासाठी शारीरिक मृत्यू व्हायलाच हवा. तुम्हाला मजा वाट्ते म्हणून तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवत खेळ खेळला जातो. पण तुम्ही जास्तवेळ श्वास रोखून ठेवला तर मरण ओढवते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: त्यामुळे आपल्या ध्यानाचा विषय करून, त्याला अशा काल्पनिक, गूढ प्रकारे मानून मृत्यूबद्दल जागरूक व्हायला हवे. नाही का?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; त्या स्थितीचे ध्यानातील पूर्ण जागरूकता असलेली स्थिती म्हणून वर्णन करणे कल्पित, निरर्थक गोष्ट आहे. जागरूकता! स्वत:ला आणि इतरांना मूर्ख बनवण्यासाठी वापरण्यात येणारी किती चमत्कारिक युक्ती! तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक होऊ शकत नाही, झालात तर तुम्ही फक्त आत्मकेंद्रीत आणि बावळट बनता. जहाजचालक असणारा एक माणूस मला एकदा भेटला. तो "निष्क्रिय जागरूकता" याबद्दल वाचत होता आणि त्याने तसे प्रत्यक्ष वागण्याचा प्रयत्न केला. तो चालवत असलेल्या जहाजाच्या, त्याने आयुष्यात पहिल्यांदाच चिंध्या केल्या. आपोआप चालत राहून तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक राहाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला वेड लागेल. ध्यानाच्या पायर्‍या कसल्या शोधताय? जेवढे आहे तेवढे पुरे. ध्यानस्थ स्थिती सर्वात खराब आहे.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण आपण पवित्र मानलेली प्रत्येक गोष्टच आपल्याला सोडून देता येत नाही.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; निश्चितच, मला सोडून देऊ शकतो; तो फक्त रोमॅण्टीक पसारा आहे. मी तुम्हाला दिलेला कोणताही उपाय तुमच्या शोधाचा भाग बनेल; म्हणजेच आणखी रोमॅण्टीक पसारा. त्यामुळेच मी कधीच सांगताना थकत नाही की माझ्याकडे विकण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, एखादी चांगली पध्दतही नाही ज्यातून तुम्हाला तुमचा शोध पुढे चालु ठेवता येईल. मी त्या पूर्ण शोधाचीच वैधता नाकारतो. तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. इतर कुठेतरी तुमचे नशीब अजमावून पाहा.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रश्न: पण निश्चितच तुम्ही पण एक माणूस आहात आणि मानवतेच्या कामी पडू ईच्छिता, दया म्हणून तरी?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युजी:&lt;/strong&gt; &amp;nbsp;तारणहार म्हणून माझी कुणी निवड केलीय? तुमची सेवा करू इच्छिणारे असंख्य संत, प्रेषित आणि त्राते तुमच्याकडे आहेत. आणखी एकाची भर कशाला टाकता? येशू म्हणाला, "वाजवा म्हणजे दार उघडेल. माझ्या मागून या." काही कारणामुळे मी ते करू शकत नाही. आपण बरेच रान पळालो आहोत. आपण हा संवाद उद्या पुढे चालू ठेवला तर बरे होईल.&lt;br /&gt;प्रश्न: मग उद्यापर्यंत..&lt;br /&gt;युजी: धन्यवाद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;( मराठी अनुवाद - यशवंत कुलकर्णी &amp;nbsp;)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-3795378267275222723?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/3795378267275222723/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post_21.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3795378267275222723'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/3795378267275222723'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post_21.html' title='माईंड इज ए मिथ'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_OcnIuMGltns/TGCVE_YqpvI/AAAAAAAAAXU/ht7VawJoACY/s72-c/U.G..jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-1818037309184942333</id><published>2011-01-03T04:00:00.004+05:30</published><updated>2011-06-23T02:21:14.354+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गुंज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बाबूकाका'/><title type='text'>बाबूकाका</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 14px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते. घरातील कुणीतरी बाबूकाका आज/उद्या येणार असं बोलत असताना ऐकलं की तो शाळा सुटताच बाबूकाका यायची वाट पाहात स्टॅण्डवरच थांबून राही. कधीकधी बाबूकाकासोबत रमाकाकू सुध्दा यायच्या. अशावेळी मात्र त्यांचा गडी चांदपाशासुध्दा गाडीबैल बसस्टॅंडजवळच्या एखाद्या झाडाखाली सोडून तिथेच बीडी फुंकत बसलेला दिसे. एस्ट्यावर एस्ट्या थांबत आणि त्यातून बाबूकाका-रमाकाकू बाहेर न पडताच निघुन जात. मग साडेसहा पावणेसात वाजता चांदपाशानं गाडी जुपून गावाकडे वळवली की तो पोरगा मागून चालत्या बैलगाडीत उडी मारून गाडीत चढे आणि चांदपाशाजवळ जाऊन बसे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"य्या:!! ...हूं॒:!!! ... सांगायचं नाही व्हयं गाडी थांबव म्हनून? पल्डं, र्‍हायलं म्हंजी? नसलेली बला.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बैलगाडीचा कासरा सांभाळताना खरोखर आलेला राग त्या हूं:!!! मधून दाखवत त्या पोराकडं पाहून चांदपाशा म्हणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"काही पडत नाही मी चांदपाशामामू.. ते जाऊ द्या.. बाबूकाका कधी येतो म्हणले होते?"&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"बाबूशेट आज पंधरादी जालन्याला गेले व्हते तव्हा ह्या सुक्कीरवारी यतो म्हनून निरोप देल्ता... आजूक पत्ता नाई... येतेन उद्या.. सनवार आन रैवारी सुट्टीबी अस्ती.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"हो!!!! उद्या बाबूकाका येणारच मग.. उद्या शनीवार.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग तो पोरगा शनीवारी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा स्टॅण्डवर जाऊन बसे. बाबूकाका आणि रमाकाकूची खूप वेळ वाट पाहून कंटाळून जाई. आणि अचानक कुठल्यातरी एसटीतून बाबूकाका आणि डोक्यावर पदर घेतलेल्या रमाकाकू उतरताना दिसत. चेहेर्‍यावर खूप मोठं हसू घेऊन तो एस्टीतून उतरलेल्या बाबूकाकाच्या दिशेनं पळे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"ह्हे:!!!!! पप्पुशेठ.. गाडीलेट.. गाडीचा नंबर एटीएट!!! ..." बाबूकाका त्या पोराकडं पाहून ओरडत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"तुमी तर कालच येणार होता... चांदपाशा न मी वाट पाहून घरी वापस गेलो काल..."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"येणार होतो रे.. पण सुट्टीच मिळाली नाही.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;तेवढ्यात गावात कोतवालकी करणारा देवर्‍या कुणीही न सांगता पुढे येऊन काकांची ब्रीफकेस हातात घेई आणि रूमालाची चुंबळ डोक्यावर ठेऊन काकूची मोठी सूटकेस डोक्यावर घेऊन घराकडे चालू लागे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग बाबूकाकाच्या हातात हात घातलेला तो पोरगा, रमाकाकू असे सगळेजण पायीपायीच घराकडे चालू लागत. बाबूकाकासोबत हातात हात घालून चालताना त्या पाचवी सहावीतल्या पोराला खूप मजा वाटे. रस्त्यात भेटणारे, धोतर, टोपी घातलेले लोक मध्येच थांबून बाबूकाकाला रामराम! असं म्हणून रामराम घालत. बाबूकाकापण रामराम! रामराम! म्हणून प्रतिसाद देत. असं होता होता मारवाड्याचं दुकानं येई आणि तिथं बाबूकाका मुद्दाम थांबून दुकानात गिर्‍हाईकांच्या मालाची पट्टी करीत उभ्या असलेल्या बाबूशेठला "जयगोपाल शेटजी!!" म्हणत. ते ऐकताच आडदांड आकाराचे बाबूशेठ चष्यातून वर पाहात बोलत -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"अरे! तुम्ही आलात? चांदपाशा आला नाही का गाडीबैल घेऊन?.. आज कापूस वेचायला बाया लावल्यात.. तिकडं गेला असल.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"हो, तुम्हाला बोललो होतो शुक्रवारी येईल म्हणून.. पण रजाच मिळाली नाही.. आज शेवटी निघालोच.. येतो रात्री निवांत.." असं म्हणून बाबूकाका पुढे चालू लागत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;घराकजवळ येताच त्या पोराची आजी हातात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन थांबलेली दिसे. शेजारच्या ओट्यावरच सामान वाहून थकल्याने हाश्श..हुश्श करत देवर्‍या बसलेला.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"देवर्‍यानं सामान आणून टेकवलं कीच मी म्हणले, माय‌‍ऽऽ बाबू राव आले जणू... रमा, किती खराब झालात गं.." असं म्हणीत आजी बाबूकाका आणि रमाकाकूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकी आणि चूळ भरायला पाण्यानं भरलेला तांब्या हातात देई.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकाका मोठ्या दारातच चूळ भरून पायावर पाणी घेत आणि लगेच वाट पाहात उभ्या राहिलेल्या देवर्‍याच्या हातावर तिथल्या तिथेच दहा रूपयाची कडक नोट ठेवत. डोक्याला हात लावत देवर्‍या पुन्हा बसस्टॅण्डकडे चालू लागे. पटकन मग तो लहानसा पोरगा त्याच्या शाळेच्य वह्या बाहेर काढी आणि बाबूकाकाला दाखवायला निघे -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"काका, हे बघा, मला आता इंग्लिश वाचता येतंय...."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"हो? पाचवीलाच इंग्लीश? दाखव.." म्हणून काका त्या पोराची वही हातात घेत. तो पोरगा वही काकांच्या हातात देऊन इंग्रजीचं पुस्तक हातात धरून धडा वाचायला सुरूवात करी.. निघोज इज ए वंडरफुल प्लेस सिच्युएटेड ऑन दी बॅंक्स ऑफ रिव्हर घोड.. रिव्हर घोड हॅज क्रिएटेड मेनी पॅथहोल्स इन दी रॉक्स सराऊंडींग इट्स बोथ साईड्स..."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"ए‌ऽऽऽ इथं हे मराठीत लिहीलेलंय..." काका म्हणत..&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"हो.. मला दादांनी आधी मराठीत इंग्रजी वाक्यं लिहून वाचायला शिकवलंय.." तो पोरगा त्याची बाजू सांभाळी.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"तुझे दादा काही ती जुनी पध्दत सोडणार नाहीत.. कुठे गेले दादा..?" बाबूकाका विचारत. हे दादा म्हणजे बाबूकाकाचेच सावत्र पण मोठे भाऊ.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"गायवाड्याकडं गेले असतेल.." तो पोरगा बाबूकाकाला सांगत असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"पप्प्या, जा बोलावून आण तुझ्या दादाला.. बाबूराव आले म्हणाव.." त्याची आजी त्याला म्हणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकांच्या हातात वाफाळलेल्या चहाची कपबशी देत आजी म्हणे. तो पोरगा गायवाड्याकडं पळे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;त्या पोरासाठी बाबूकाका म्हणजे नेहमीच लांबच्या गावाहून येणारं अत्यंत जवळचं, अत्यंत लाड करणारं आणि आकर्षण वाटणारं माणूस असे. बाबूकाकाबद्दल गावातल्या प्रत्येक माणसाला आदरयुक्त भीती असे, प्रत्येक माणूस कधी ना कधी त्यांना सल्ला विचारायला येत असे. बाबूकाका हे पुणे, जालन्याच्या पोलिसांच्या शाळांमध्ये पोलिसांना कायदे शिकवणारे वकील होते. पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत जालन्याच्या आर.पी.टी.एस. मध्ये बाबूकाकांकडे राहायला तो मुलगा जेव्हा गेला, तेव्हा गेट भोवती आणि घराभोवती बंदुका हातात घेऊन उभे असलेले पोलिस पाहून त्याला बाबूकाका हे कुणीतरी खूपच मोठे असल्याबद्दल खात्रीच पटली होती.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकाका म्हणजे कायदेकानू कोळून प्यालेला माणूस. कधीही कुणासमोरही खाली पाहाणार नाही. झालेच तर लोकांवर उपकार करतील, पण फुकट कुणाकडून ग्लासभर पाणीसुद्धा घेणार नाहीत. बेकार हिंडणार्‍या पोरांना काहीतरी किल्ल्या वापरून पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी द्यायचा अधिकार हातात असला तरी, कायद्यानं आखलेल्या मर्यादेबाहेर जाऊन कधी कुणावर उपकार केला नाही. शिकायचं आहे ना, मग शिका - पैसा लागला तर मी देतो, पण परिक्षा पास होऊनच नोकरीत या - वशिल्याचे फालतू धंदे माझ्याच्यानं होणार नाहीत - हे त्यांच्याकडं नोकरीकरीता येणार्‍या गावातल्या तरूण लोकांना स्वच्छ सांगणं असे. त्यांच्या आश्रयानं राहून अनेक होतकरू पोरं फौजदार, सरकारी वकील या हुद्द्यावर गेली. आणि जी जावू शकली नाहीत, ती "वकील लई खडूस हाये.. साधा कॉन्स्टेबल म्हणूनपण कधी कुणा बेकार पोराला लावणार नाही" म्हणू लागली.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकाका आणि रमाकाकू येत तेव्हा न चुकता त्या मुलासाठी खार्‍या शेंगदाण्याच्या पुड्या आणत, दिवाळीत हजार रूपयांचे फटाके विकत घेऊन देत, कपडे, पुस्तके आणि तसलाच अनेक प्रकारचा लाड पुरवत. पण या बाबूकाका आणि रमाकाकूंना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी कुणीही नव्हते. ते स्वत:च्या पुतण्याच्या, भावाच्या मुलांना असे प्रेम लावत. आणि मग त्या खेड्यात "आता बाबू वकील अमुक च्या मुलाला दत्तक घेणार!!" अशी अफवा उठे. बाबूकांकांचा दरारा, चार औतं, पाच-सहा गड्यांचा बारदाना आणि पन्नास-साठ एक्कर जमीन पण त्यांच्या वंशाला नसलेला नसलेला दिवा हाच एक गावातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गावातले लोक मध्येच कधीतरी त्या मुलाला पकडून म्हणत -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"पप्पुशेठ, नीट र्‍हा, शिका.. बाबूमालक तुमाला काई कमी पडू देणार न्हाईत.. सोनं होईल आयुष्याचं.." त्या पाचवी सहावीतल्या पोराला त्यातलं काही कळत नसे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग बाबूकाका चहापाणी आटोपून ओट्यावर बसत. तेवढ्यात शेताकडून कापसाच्या भोतांनी लादलेली बैलगाडी घेऊन चांदपाशा येई. आल्याआल्याच "मालक आले जणू!" म्हणून पटकन कापूस चार खणात टाकून बाबूकाका या त्याच्या मालकांसमोर येऊन बसे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"वाट पाहून चार वाजता गेलो मी गारूडात... कापसाला बाया लावल्यात आज.." असं सांगून बैलगाडी घेऊन बसस्टॅण्डवर हजर नसल्याबद्दल सारवासारव करी.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"देवर्‍या होता बसस्टॅण्डवर.. आम्ही आलो पायीपायी.. बाबूशेठनं आत्ताच दुकानात सांगितलं कापसाचं.. किती होईल यंदा कापूस?" बाबूकाका चांदपाशाला विचारत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"अं! छातीइतकं हाये एक एक झाड आवंदा.., ईस पंचीस कुंटल उतार होईनच...तूर बी तशीच हाये.. उद्या येढ्याला तुमीच पाहा.." चांदपाशा म्हणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग ओट्यावर बाबूकाका, चांदपाशा आणि रानातून आलेल्या गड्यांच्या गप्पा होत त्यावेळी वाड्यासमोरच्या आवारात रातकिडे चमकू लागलेले असत आणि बेडकांची डरांवऽऽ डरावं‍ऽऽ सुरू झालेली असे. गड्यांसोबत बाबूकाकांचा पुन्हा एकदा चहा होई.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"जा आता घरी, भाकरी खाऊन घ्या..." शेवटी बाबूकाका गड्यांना सांगत आणि जेवणखाण आटोपून बाबूशेठ्च्या दुकानाकडं निघत. तिथे त्यांच्या दोस्तांचा जमाव रात्रीच्या रमीच्या डावाची जमवाजमव करीत बाबूकाकांची वाट पाहात असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;सकाळी "बाबू काल रात्री अडीच वाजता आला घरी" असं दादा म्हणत असताना ऐकू येई आणि तो पोरगा जागा होई.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग चार सहा दिवस असेच बाबूकाकासोबत, रमाकाकूसोबत गप्पा करताना, त्यांचं बोलणं ऐकताना कसे वार्‍यासारखे भुर्रर्र उडून जात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"वन्सं, माझा सपीटाचा उंडा किती काळा पडलाय हो... पप्पुशा अभ्यास करतोस की नाही नीट?" रमाकाकू आजीला बोलत असताना त्या पोराला जवळ घेत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"गंगंच्या काठंचं वारं रमा इथं, इथं कुठं तुमच्या जालन्यासारखं मशीनीतून येणारं वारं? घेऊन जा त्याला जालन्याला... महिन्यात सपीटासारखा दिसल" आजी रमाकाकूला म्हणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मग गुरूवार येई आणि गुंजाला निघायची तयारी होई. तो मुलगा आणि त्याची बहीण नमी सगळ्यात अगोदर तयार होऊन गाडीत चढत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;असेच दिवस, वर्षे उलटत गेली. तो मुलगा कळता होऊ लागला. चुकत माकत शिकला, चार अक्षरं गिरवू लागला. पाखरांच्या पिलांना पंख आले की ती जास्त काळ घरट्यात थांबत नाहीत. तो ही कुठंतरी दूर उडून गेला. या काळात बाबूकाका रिटायर झाले. गावाकडे राहायला आले. आता इतकी वर्षं शहरात राहिलो, आता गावातच राहून स्वत: शेती पाहाणार म्हणाले - काही वर्षे गुंजाच्या वार्‍या करीत स्वत: शेती पाहिलीसुध्दा. एवढा सरकारी वकील माणूस पण खेड्यागावात राहून शेती पाहातोय, गावची मोडकळीला आलेली मंदीरं पुन्हा उभारतोय हे पाहून गावातल्या लोकांना बाबूकाकांचं आणखीनच अप्रूप वाटू लागलं.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;तशी बाबूकाकाची प्रकृती पहिल्यापासूनच तोळामासा. थोडं काही झालं की बाबूकाकांची तब्येत खालावत असे. गावचं राहाणं, लोकांकडून होणार्‍या दत्तकाबद्दल होणार्‍या खुदर्‍याबुदर्‍या यांत बाबूकाकांनी त्याबद्दल काहीच ठरवलं नाही. स्वत:च्या दुसर्‍या सख्ख्या भावाची मुलं, मुलीही आता कळते सवरते झाले होते. बाबूकाकांनी त्यांना शिकवलं, डॉक्टर, प्राध्यापक केलं. जालन्यात असताना भावाची मुलगी स्वत:कडे शिकायला ठेऊन घेतली - तिला पोटच्या पोरीसारखाच जीव लावला. तिचं लग्न लाऊन दिलं - आणि तेव्हापासूनच त्यांची तोळामासा प्रकृती दर सहा महिन्यांना आणखी ढासळू लागली. अन्न समोर आलं की उलट्या होऊ लागल्या.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;असाच आजार सरकारी वकीलाची नोकरी लागलेली असताना त्यांना झाला होता असं दादा कित्येक वेळा बोलताना त्या पोराला आठवे. पण तो काळ जुना होता. तेव्हा गुंजाचे महाराज हयात होते. ते महाराज दत्तकृपा असलेले नैष्ठीक ब्रम्हचारी होते. बाबूकाका त्यांच्या संस्थानातले मानकरी होते. रमाकाकूंनी महाराजांसमोर पदर पसरून भीक मागितल्यानंतर त्यांनी बाबूकाकांना जगवलं होतं. कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कुणाचा पैसा खाऊ नका, नेकीनं सरकारची चाकरी करा अशा अटी घालून त्यांनी बाबूकाकांना जीवनदान दिल्याचं खुद्द बाबूकाकाच मानत होते. महाराजांनी सांगितलेले नियम आणि गुरूवारची दत्तमहाराजांची वारी व रोजची पंचपदी, पाठ चुकवत नव्हते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;पण आता काळ बदलला होता. वय वाढल्यानंतर पुन्हा प्रकृतीच्या त्याच तक्रारी बाबूकाकाला सतावू लागल्या. आता गुंजाचे महाराजही नव्हते. डॉक्टर झाले, वैद्य झाले, महिना महिना हॉस्पीटलमध्ये राहून झालं. चार आठ महिने बाबूकाकांना बरं वाटे आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;तो पोरगा बाबूकाकांना म्हणे -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"काका, तुम्ही कशाला त्या गावात राहून शेती पाहाण्याच्या फालतू भानगडीत पडता.. चांगला बंगला घ्या, कार घ्या.. शहरात राहा.. काय पडलंय त्या शेतीत आणि हवीय कशाला आता ती शेती? सरळ विकून टाका.. आजारी पडलात तर कार करून शहरापर्यंत यावं लागतं... तुम्ही नकाच राहू तिथं.." बाबूकाका हो! हो! म्हणत पण ऐकत नसत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;शेवटी महिनाभर बाबूकाकांनी अन्न सोडलं. सगळे डॉक्टर, वैद्य झाले. जुन्या महाराजांच्या जागेवर आलेल्या महाराजांनी दिलेला अंगारा, तीर्थ वगैरे झाले.. पण बाबूकाकांची अन्नावर वासना होईना. डॉक्टरांनी आठ दिवस ठेऊन घेतले आणि एके दिवशी प्रकृतीत फरक पडल्यावर काहीही शारीरिक आजार नाही, अन्न खायला लागा म्हणून डिस्चार्ज दिला. सख्ख्या भावाचा पुतण्या, सावत्र भावाचा पुतण्या, बायको त्यांचा तो पोरगा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये राहिले. डिस्चार्ज मिळून गावाकडे गेल्यावर, शेवटी बाबूकाकांनी नेहमीच्या शिरस्त्यानुसार गुंजाच्या वारीला न्यायचा हट्ट धरला. अन्न जात नव्हतंच. तिथं गेले, रात्रीचे बारा वाजेपर्यंत गुरूवारची पंचपदी झाली, सकाळी काकड आरती झाली..&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकाका सोबत असलेल्या, डॉक्टर पुतण्याला म्हणाले -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"अरे, दत्त महाराजांचं तीर्थ आणि अंगारा दे..."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;ते झालं. सकाळी साडेसहाला बाबूकाकांचा श्वास थांबला आणि अन्नावाचून जर्जर झालेला देह शिल्लक राहिला. प्रतिगाणगापूर मानल्या जात असलेल्या गुंज गावात बाबूकांकांनी देह ठेवला.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 14px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;बाबूकाका गेले आणि त्या पोराला हे सगळं आठवलं...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गावी जाणार्‍या रेल्वेमध्ये हे पोरंगं का रडतंय ते अनोळखी प्रवाशांना कळत नव्हतं&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-1818037309184942333?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/1818037309184942333/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1818037309184942333'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/1818037309184942333'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='बाबूकाका'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-2766641118504467312</id><published>2010-12-17T10:24:00.000+05:30</published><updated>2010-12-17T10:24:15.655+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिलखुलास'/><title type='text'>दिलखुलास</title><content type='html'>नमस्कार वाचकहो!&lt;br /&gt;आजची पोस्ट तुमच्यासाठीच आहे. हा ब्लॉग सुरू होऊन जवळपास सात आठ महिने झालेत. या ब्लॉगवरची प्रत्येक पोस्ट या ना त्या रूपात वाचकांशी संवाद साधण्यासाठीच असली तरी आजच्यासारखा थेट संवाद सुरू करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. सुरूवातीला मी या ब्लॉगपुरताच मर्यादीत होतो. नंतर मग मिसळपाव डॉट कॉम, मायबोली, मीमराठी या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतले आणि तिथे नियमीत लिहू लागलो; त्यामुळं ब्लॉगकडे येणं फक्त पोस्ट टाकण्यापुरतंच होऊ लागलं. अधेमध्ये पोस्ट आवडून गेल्याचे अनेक वाचकांचे मेल्सही आले; पण ते तेवढ्यापुरतंच. ब्लॉगवर वाचकांशी संवाद असा झालाच नाही. त्या-त्या पोस्टवर एखाददुसरी प्रतिक्रिया आली तरी मी ब्लॉग नेहमी पाहात नसल्याने, प्रतिक्रिया येऊन बरेच दिवस उलटलेले असत आणि मला त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला कंटाळा होत असे. कदाचित यामुळेही वाचकांनी फक्त ब्लॉग वाचून लगेच इथून कल्टी मारणे पसंत केले असावे ;-) हरकत नाही. योगेशसारखा एखादा पक्का वाचक मात्र, उत्तर येवो न येवो नेहमीच प्रतिक्रिया देत आला आहे. पण एक उगी किडा म्हणून मला आता वाटतंय की हा ब्लॉग तुम्ही किती लोक वाचत आहात? तुमचे ब्लॉग कोणते आहेत? तुम्ही काय लिहीतायत? तुम्ही कुठले आहेत? वगैरे कळालं तर बरं होईल ! पण हे कळायला आपला संवाद तर झाला पाहिजे ना? इव्हन हा ब्लॉग कुणी वाचत आहे की नाही याबद्दलही मला काही कल्पना नाही. ते पेजव्ह्युज आणि टेहळणीचा नकाशा आपला कामापुरता आहे.&lt;br /&gt;असतील तर (!) या ब्लॉगच्या नियमीत वाचकांनीही त्या-त्या पोस्टवरच त्यांना काय वाटलं ते रोखठोकपणे सांगितलं तर फार बरं होईल.&lt;br /&gt;तर आता प्लीज हा ब्लॉग आवडत असेल/नसेल तरीही "टिप्पणी पोस्ट करा" या बटणाचा आजच्या दिवस का होईना आणि तुम्हाला शक्य झाल्यास नेहमीच वापर करा आणि दिलखोल के जे हवं ते बोला. कसं म्हणता? &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-2766641118504467312?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/2766641118504467312/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post_17.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2766641118504467312'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/2766641118504467312'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post_17.html' title='दिलखुलास'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-8958049236624697846</id><published>2010-12-15T09:22:00.002+05:30</published><updated>2011-06-23T02:22:25.878+05:30</updated><title type='text'>कासाराचा गोईंदा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="content" style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; font-family: CDAC-GISTYogesh, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा. त्याच्या कटलरी सामानापेक्षाही गोईंदाच्या घोड्याचं आम्हाला आकर्षण. कारण गोविंदकाकाच प्रत्येक घोडं गुणाचं होतं.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गावातल्या लोकांची सकाळची गडबड सुरू असताना गोईंदाची वेगळीच गडबड सुरू असायची. चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू या सगळ्या वस्तू पडशी नावाच्या दोन गाठोड्यांत भरून त्या दोन्ही पडशा घोड्याच्या पाठीवर दोन्ही बाजूने लादायचा गोईंदाचा कार्यक्रम सकाळीसकाळी ऐन रंगात आलेला असायचा. हे सामान त्या घोड्याच्या पाठीवर लादून गोईंदानं वर मांड ठोकली की ते घोडमं त्याचा गुण दाखवायला सुरूवात करी. ते पुढे न जाता रिव्हर्स गिअरमध्ये त्याला वाट्टेल तितकं मागे, मागे, मागेच जाऊ लागे - मागे पार कुपाट्या आल्या तरी ते घोडं रिव्हर्स गिअर थांबवत नसे. मग गोईंद आणि त्याचे सामान कुपाट्यात पडे! असं दोन-चारदा झाल्यानं गोविंदा ते घोडं नीट चालायला लागेपर्यंत कुणालाही त्या घोड्यामागं एक फोक घेऊन उभं राहायला सांगे. हे काम मी मोठ्या आवडीनं करायचो. घोड्यानं रिव्हर्स गिअर टाकायचा अवकाश की त्याच्या मागच्या पायावर मी फटाफट फोकारे ओढायला सुरूवात करी. मग मात्र ते घोडं पुढे पाऊल टाकी आणि बाजारस्ता आला, की लगेच पुन्हा एकदा घोडं रिव्हर्स गिअरमध्ये यायला लागे! तिथं मात्र घोड्याचे पाय झोडपायला कुणी भेटलं तर ठीक, नाहीतर घोडं सामान आणि गोविंदाला तिकडेच फेकून घरी पळून येई. गोविंदाला सकाळी सकाळी टमरेल घेऊन घराकडे परत येणार्‍या लोकांचे सल्ले ऐकावे लागत.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"अरं काय मर्दा गोईंद, असली ब्याद घेतानाच नीट बघून इकत घेऊ नै व्हय?"&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"हाना, हाना - मी बसतो, पुलापस्तोरच हाना.. मग नाई येत ते मागं.."&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मी तो संतराम किंवा असाच कुणीतरी धोंड्या त्या घोड्याचे मागचे पाय झोडपून काढी आणि गोविंदकाका एकदाचा मार्गस्थ होई!&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गोईंदाही मुलखाचा चिकट होता. चांगले दहावीस हजार रूपये खर्चून अस्सल घोडा विकत आणायचा तर चार-पाच हजारात एखादा असलाच गुणी घोडा तो शोधून आणी. बुलेट गाडी घेण्याइतका पैसा पदरी बाळगत असूनही तो साधी सायकलसुध्दा वापरायचा नाही. पांढरा लेंगा, तसाच पांढरा शर्ट आणि एका डोळ्याभोवतीची कातडी काळी झालेला त्याचा डोळा. आवाज गेंगाणा- चिरका.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;घोड्याचा ताप फार वाढला की तो घोडं बदलीत असे. मग नव्या घोड्याचे नवे गुण! असाच माऊली नावाचा एक घोडा त्यानं कुठूनतरी शोधून आणला. या घोड्याची खोड वेगळी होती. या घोड्यासमोर कुणीही अचानक जाऊन उभा राहिला की हे घोडं त्याचे पुढचे दोन पाय समोरच्या माणसाच्या खांद्यावर टाकी. बाजारात गोविंदाच्या दुकानाशेजारी दुकान लावणार्‍या बोकडासारख्या दाढीच्या मणेर्‍याचीही त्या घोड्यानं एकदा अशीच गळाभेट घेतली होती.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"मेरे कू कुछ नही करिंगा वो घोडा, गोईंदऽऽऽ मैने भोत खच्चरोंको ठीक किया है"&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;असा नाद लावून त्यानं हट्टानं गोविंदाकडून घोड्याचा लगाम मागून घेतला, आणि थोड्यावेळानं गपगार गंगाकडे जाऊन स्वत:चे भरलेले कपडे धूवून आला!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मी गोविंदकाकाच्या खनपटीलाच बसत असे. त्या घोड्याला खरारा कर, त्याला वैरण टाक, दुपारच्या वेळेस जाऊन चोंबाळ असं करून मी त्या घोड्याची मैत्री संपादन केली. काही दिवसांनी गोविंदासमोर माझी आणि घोड्याची मैत्री सिध्द करून दाखवून त्याचा लगामही हस्तगत केला. मला पण त्या घोड्यानं चार-सहा वेळा पाडलं - पण मी गोविंदकाकाला त्याचा पत्ता लागू देत नसे. तो सकाळीसकाळी नवं सामान भरायला तालुक्याला जाताना पाच वाजता बसस्टॅण्डवर घोडा घेऊन यायचा निरोप तो त्याच्या बायकोकडे म्हणजे रमाकाकूकडे ठेवून जाई. तासभर आधीच घोडा घेऊन मी लंपास होई आणि त्या घोड्याच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्याला गंगेच्या वाळूतून पिदडून काढी. जोपर्यंत व्यापार केला तोपर्यंत गोविंदकाकानं घोडं सोडलं नाही. गोविंदकाका गावातला एक विक्षिप्त माणूस होता. कधीच कुणाला आपण होऊन बोलत नसे. त्याला मित्रही नव्हतेच. आपण भलं, आपला बाजार भला आणि आपलं घोडं भलं असं मानणारा गोईंदा कासार. दररोज देवदर्शन, विठ्ठलमंदीरातला हरिपाठ मात्र चुकवत नसे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;तो बाजार करून येताना रानातून घोड्यासाठी गवत आणत असे. कुणीतरी रस्त्यात विचारी -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"काय गोविंदराव.. कुनीकडून आणलं गवत?"&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"लांबून" गोविंदा एकाच शब्दात उत्तर देऊन घोडा पुढे रेटीत असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;कधीतरी कुणीतरी विचारी -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"किती वाजले गोईंदा?"&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"बख्खळ" !!&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;त्याच्या गावोगावच्या बाजारातल्या गिर्‍हाईकांना मात्र तो पोपटासारखा बोलायचा. बाजार ऐन भरात आलेला असे. गावच्या भोयांनी झणझणीत लसण घातलेला चिवडा, जिलेबी, मासे यांचा बाजारात घमघमाट सुटलेला असे आणि आम्ही पोरं चिंचेच्या पारावरून बाजाराची शोभा पाहात असू. खालीच गोविंदाचा पाल ठोकलेला असायचा -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"केवढ्याला देता बुटाड गोईंद महाराज, पटकन बोला" जेरीला आलेलं गिर्‍हाईक म्हणायचं.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"लास्ट सत्तर रूपै.. नाई.. नाई.. माल बघा ना तुम्ही...पिवर नायलॉनय.." अत्यंत भोळाभाबडा चेहेरा करून, दुसरीकडेच बघत गोईंदकासार उत्तर देई.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"अरे हॅट!! पिवर नायलॉन म्हनं! सा म्हैन्यात चुरा व्हतो ह्याचा.. ह्याचे सत्तर रूपै ??" गिर्‍हाईक चवताळत असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"मग किती देता?.. गिर्‍हाईक&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"चाळीस रूपये देतो बघ ह्याचे..पटत असंल तर बघ.. नाहीतर पाथरीहून आणतो चांगला बूट उद्या..."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"चाळीसला हे घ्या ना मग.. पस्तीसला घ्या.. पाच कमी करतो पाटील तुमच्यासाठी" दुसरा एक बेक्कार बूट समोर ठेऊन गोविंदा म्हणे!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गिर्‍हाईक पुन्हा एकदा तो नवा बूट खालीवर करून बघे.. दोन्ही बूट समोर ठेऊन पाही आणि सत्तर रूपै वाल्या बुटाचेच पन्नास रूपये द्यायला तयार होई.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"पन्नासमध्ये मला पन आला नाही माल पाटील.. सत्तर लास्ट.. तुम्ही माल बघा की.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"आता लई झालं तुव्हं.. पंचावन रूपै देतो बघ" असं म्हणून पाटील एकदम उठून धोतर झटकीत असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"साठ रूपये देऊन टाका जाऊद्या..." गोविंदा बूट कागदात बांधत म्हणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"आता पंचावन घी.. पुढच्या बाजारी पाच रूपै देईन..ओऽ?" गिर्‍हाईक पैसे समोर करी&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;गोविंदा पट्कन पैसे घेऊन त्याच्या लोखंडी गल्ल्यात टाकून देत असे. वर्षानुवर्ष तीच गिर्‍हाईकं, तीच गावं आणि बाजारातली त्याची तीच ठरलेली जागा आणि दुकानाच्या त्याच निळ्या तंबूखाली गोविंदकासाराचा व्यापार चालत होता. त्यावरच त्यानं एका मुलीचं लग्न केलं - गल्लीच्या हमरस्त्यावर एक नवं पत्र्याचं शेड बांधलं आणि रमाकाकूला वेगळं बांगड्यांचं दुकान काढून दिलं. स्वत:चा घोडा आणि गावोगावचे बाजार मात्र सोडले नाहीत.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; line-height: 22px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मध्ये एका उन्हाळ्यात त्याच्या शेडसमोरच वाडा असणार्‍या मधूआण्णासोबत रमाकाकूच्या काहीतरी कुरबुरी झाल्या. आणि एका रात्री त्यांच्या त्या पत्र्याच्या शेडनंच आतून पेट घेतला. गोविंदकासाराचे सत्तरऐंशी हजार रूपये त्या रात्रीच्या तीन ते साडेसहा वाजेदरम्यान राख झाले !&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;सरपन्या केशवला दारू पाजवून, पाचशे रूपये देऊन मधूअण्णानंच दुकान पेटवून द्यायला लावलं अशी चार-सहा महिन्यानं अफवा उठली होती.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;त्या झटक्यानं त्या कुटूंबानं गावंच सोडलं. रमाकाकू गोविंदकाकाला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली. तिथं नवं दुकान टाकलं.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;तर त्या गोविंदकाकाचा मुलगा गजा काल फोनवर सांगत होता -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;"मी पुण्यात एमबीए करतोय.. हॉस्टेलवर असतो... पप्पा न आई आजोळीच असतात.. पप्पाला दिसत नाही व्यवस्थित आजकाल.."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;मी गज्याला काहीच बोललो नाही. फक्त इकडच्यातिकडच्या, पुण्याच्या गप्पा केल्या.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom-width: 0px; border-color: initial; border-color: initial; border-left-width: 0px; border-right-width: 0px; border-style: initial; border-style: initial; border-top-width: 0px; margin-bottom: 15px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 15px; padding-bottom: 0px; padding-left: 0px; padding-right: 0px; padding-top: 0px; vertical-align: baseline;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: white;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 30px;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-8958049236624697846?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/8958049236624697846/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post_15.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/8958049236624697846'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/8958049236624697846'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post_15.html' title='कासाराचा गोईंदा'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-4232980027995542924</id><published>2010-12-07T13:55:00.000+05:30</published><updated>2010-12-07T13:55:47.388+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हॉलीवूड'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोअर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सिनेमा'/><title type='text'>कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)</title><content type='html'>&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत. तर बाकी चर्चा करण्याआधी या सिनेमाची स्टोरीलाईन खेचून घेऊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TKi3EziI/AAAAAAAAArM/MSSmq5ceIiY/s1600/rome.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TKi3EziI/AAAAAAAAArM/MSSmq5ceIiY/s1600/rome.png" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;थोडक्यात कथा अशी की पृथ्वीचा आतला गाभा आणि त्याच्यावर असलेला तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काय असेल ते अचानक फिरणे बंद होते. का? अर्थातच अमेरिका नावाच्या महाभयानक डोकेबाजी करणार्‍या देशाने कामाला लावलेल्या संशोधकामुळे. सिनेमात हे थोडसं पुसटपणेच सूचीत केलंय; पण केलंय. झिमिन्स्की नावाचा भूगर्भ शास्त्रज्ञ पृथ्वीला झटके देऊन पृथ्वीवर भूकंप उत्पन्न करण्याचं मोठ्ठं यंत्र उभारतो. हे प्रलयंकारी यंत्र उभं करण्यामागची कल्पना अर्थातच अमेरिकेच्या शत्रुंपेक्षाही (म्हणजे अमेरिकेचे शत्रु तिकडून भूकंपाचा झटका देणार, अमेरिकाही त्यांच्यापेक्षा जास्त मोठा झटका इकडून देणार, आणि पृथ्वी व पृथ्वीवरचे लोक मात्र मधल्यामध्ये फुकट मरणार! पण हे सिनेमात दाखवलेलं नाही) वरचढ शस्त्र तयार करणे ही असते. "इफ वी वील नॉट डू इट, दे वील डू इट" या जगप्रसिध्द सूत्राचे पाठबळ त्याला असायला हवेच, ते तसे असते. तर हा चित्रपट उत्पन्न होण्याचे चित्रपटातील पुसट पण आपल्याला दिसणारे सुस्पष्ट कारण म्हणजे झिमिन्स्कीने दिलेल्या झटक्यामुळे पृथ्वीच्या गाभ्यावर काही मैल पसरलेल्या गाभ्यावरचा तो तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काही असेल ते आपण कॉफी ढवळतो तसे फिरणे अचानक थांबते.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;त्यामुळे सूर्यापासून किंवा अवकाशातून येणारे अतिनील चुंबकीय किरण हळूहळू पृथ्वीचा बोर्‍या वाजवायला सुरू करतात. अर्थातच चित्रपट हॉलीवूडचा असल्याने सर्वात आधी बोर्‍या वाजतो तो अमेरिकेतल्या लोकांचा. म्हणजे आकाशातून येणार्‍या त्या विद्युत चुंबकीय तरंगांमुळे सर्वात आधी पेसमेकर बसवलेले तीस-बत्तीस लोक भर चौकात एकामागून एक अचानक पटापट माना टाकतात. मग लंडनच्या ट्रॅफल्गार चौकातील कबुतरं किंवा स्थलांतरप्रिय पक्षी वाटेल तसे उडायला लागतात आणि दणादण दुकानांच्या, मोटारींच्या काचांवर, लोकांच्या तोंडावर जाऊन आदळू लागतात. या पक्षांच्या मेंदूत त्यांना लांबचा पल्ला गाठताना मार्गदर्शन करणारे कसलेतरी इलेक्ट्रॉनिक आयन्स असतात त्यामुळे असे होते म्हणे. इथे येतात अ‍ॅरॉन एकहार्ट आणि चेकी कार्यो! अ‍ॅरॉन हा शिकागो विद्यापीठात भूगर्भ रचनेचा हुशार प्रोफेसर असतो. चेकी अणु शास्त्रज्ञ. मग त्याला पकडून जनरल समोर हजर करणं आलंच. त्याला सीआयएवाले भर वर्गातून धरून आणतात आणि सेक्युरिटी जनरल लोक पटापट का उडाले ते अ‍ॅरॉनकडून समजून घेतो. हा दहशतवादी हल्ला नाही हे स्पष्ट झाल्याने सेक्युरिटी जनरल निर्धास्त होतो आणि अ‍ॅरॉनने पाजळलेले शिल्लक ज्ञान ऐकून घेऊनही त्याला कल्टी मारतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TKaabkKI/AAAAAAAAArI/PW4G3qPapCE/s1600/dj.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TKaabkKI/AAAAAAAAArI/PW4G3qPapCE/s1600/dj.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;तिकडे रोमवर आलेल्या चुंबकीय ढगांमुळे अर्ध्यापेक्षाही जास्त रोम शहराचा बुकणा वाजतो - अचानक विजा कोसळू लागतात, इमारती ढासळू लागतात, विद्युतसुवाहक धातुला स्पर्श करणार्‍या लोकांना वीजेचे झटके बसू लागतात आणि पृथ्वीवर हाहाकार माजायला सुरूवात होते. उंच वर अवकाशात अमेरिकेचे एंडेव्हर हे अवकाशयान उडत असते त्याची खाली पृथ्वीवर उतरण्याची वेळ झालेली असते. पण पृथ्वीवर मध्येच ही भानगड उपटल्यामुळे ते उतरायला जाते एकीकडे आणि उतरते भलतीकडेच. हॉलीवूडची शपथ, ते अवकाशयान, हो, हो अवकाशयान लॉस एंजेलीस जवळच्या नदीत सुखरूप उतरवले जाते! ते उतरवणारा/री पायलट/कमांडर कुणीतरी असायलाच हवं - तर एक असतो आल्फ्रे वूडार्ड आणि दुसरी असते हिलरी स्वॅंक. रस्ता भटकलेल्या, लॉस एंजेलीस शहराच्या रस्त्यांवर आदळू शकणार्‍या अवकाशयानाला नदीत घुसवण्याची आयडीया शेवटच्या सेकंदाला हिलरीनेच यानाच्या कमांडरला सुचवलेली असते. ती यशस्वी झाल्याने कमांडरने तिच्यावर खार खायला हवा, तसा आल्फ्रे वूडार्ड खातो. नदीतल्या पुलाच्या खांबाना घासून अवकाशयानाचे पंख तुटतात. अमेरिकेसारख्या चौकशीप्रेमी देशात या प्राणहानी न झालेल्या अपघाताची चौकशी व्हायला हवीच, तशी ती होते. अमेरिकेचा सेक्युरीटी जनरल किंवा सरसेनापती तिला झालेल्या घटनेबद्दल चार शब्द ऐकवतो. &amp;nbsp;भोवतीची यंत्रणा बिघडलीय हे तोपर्यंत स्पष्ट झालेले नसते. ते जेव्हा लक्षात येते तेव्हा बाकायदा हिलरीला आणखी एक चांगले काम सोपवले जाते. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;तोपर्यंत भूगर्भाचा प्रोफेसर असलेल्या अ‍ॅरॉन एकहार्टने काहीतरी डोके लावलेले असते आणि सुरू झालेली सगळी भानगड समजून घेऊन झिमिंस्की नावाच्या सेलिब्रीटी शास्त्रज्ञासमोर मांडलेली असतो. हा झिमिंस्की सेलिब्रीटी शास्त्रज्ञ असला तरी बर्‍याच भानगडी करून, लोकांची संशोधनं चोरून ती स्वत:च्या नावावर खपवून वर चढलेला असतो. कारण डेलरॉय लिंडो (हा वाळवंटात संशोधन करणारा झक्की शास्त्रज्ञ आहे) झिमिंस्कीला पाहिल्यापाहिल्याच म्हणतो - "तु अजून मेला नाहीस? तु माझं संशोधन चोरून स्वत:च्या नावावर खपवल्याला आता वीस वर्षे झालीत, वीस वर्षांनंतर मी तुझं तोंड पहिल्यांदाच पाहातोय." तर झिमिंस्की सगळी भानगड अमेरिकेचा सेक्युरिटी जनरल आणि टेबलाभोवती बसणार्‍या लोकांसमोर मांडतो आणि पुन्हा एकदा अ‍ॅरॉन एकहार्टला उचलून सेक्युरिटी काऊंसिलसमोर उभे केले जाते. हुशार आहेस ना, सांग मग काय होतंय ते! तो रूमफ्रेशनर मागवतो व एक फळ मधोमध कापून सगळी कथा तिथल्या लोकांसमोर मांडतो. मग आता पुढे काय होणार ते लोक त्याला विचारतात. रूम फ्रेशनरचा फवारा त्या फळावर सोडून तो त्या फळाला आग लावतो. सूर्याकडून येणार्‍या अशाच आगीच्या फवार्‍यात पृथ्वी जळून खाक होणार हे अ‍ॅरॉन जाहीर करतो. मग ही दुर्घटना थांबवणं आलंच. त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील फक्त नऊ मैलांपर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे आणि तिथंही एक लहानसा शाफ्ट्च जाऊ शकलाय हेही जाहीर होतं. फक्त वर्षभराच्या आत पृथ्वी जळून राख होईल हे अ‍ॅरॉन स्पष्ट करतो; झिमिंस्की त्याला मध्येमध्ये तोंड मारून स्वत:च त्या विषयावरील प्रभुत्व सिध्द करीत दुजोरा देत राहातो. या एका वर्षाच्या काळात नैसर्गिक प्रकोप वाढत्या प्रमाणात सहन करावा लागेल आणि त्यातच जगाचा अंत आहे हे मनावर बिंबतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TK_Lr1FI/AAAAAAAAArQ/H5LMKHrK__o/s1600/delroy.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TK_Lr1FI/AAAAAAAAArQ/H5LMKHrK__o/s1600/delroy.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;मग येतो डेलरॉय लिंडो. या पठ्ठ्यानं लेजर किरण वापरून पहाडाला भोक पाडणारे एक यंत्र आणि लेजर किरणांच्या मार्‍यात उंदीर (कोणताही जीव) आत जीवंत राहिल असा धातू शोधलेला असतो. हा खरा हाडाचा शास्त्रज्ञ असतो. स्वत:च्या चष्याच्या काड्यांना सूत गुंडाळून हा वीस वर्षांपासून ते पहाडाला भोक पाडणारं यंत्र उभं करण्यात गुंतलेला असतो. शेवटी सेक्युरिटी जनरल आणि उपरोल्लेखीत सर्व गॅंग या डेलरॉय लिंडोच्या वाळवंटात असलेल्या बेसवर जाऊन धडकते. हॉलीवूडचा चित्रपट म्हटल्यावर हेलिकॉफ्टर्स, चकचकीत कार्स वगैरे लवाजामा आलाच. तोही दिसून जातो. डेलरॉय त्या यंत्राचं आणि धातूचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्यानं बांधलेलं यानसुध्दा दाखवतो. त्याला जनरलकडून उपकरण पूर्ण कधी होईल त्याबद्दल विचारणा होते. डेलरॉय दहा ते बारा वर्षे लागतील हे सांगतो. मग पुन्हा जनरल डेलरॉयला तीन महिन्यात यान उभ करायला सांगतो; पन्नास अब्ज डॉलर्स खर्च द्यायला तयार होतो.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;हे यान बांधण्यामागची कल्पना अशी की - रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळ्या होणार्‍या सात कंपार्टमेंटस तो नवीन धातू वापरून बांधायच्या. यानाच्या तोंडावर लेसर किरणांचा मारा करणारे व्हील बसवायचे. यान पृथ्वीला भोक पाडीत तिच्या गाभ्यापर्यंत जाणार. तिथे गेल्यावर यानात सोबत घेऊन &amp;nbsp; गेलेल्या अणुबॉम्बचे स्फोट करायचे आणि गोलाकार असलेल्या त्या लाव्ह्याला गती देऊन आतलं वर्तुळ पुन्हा एकदा सुरू करायचं!&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;अ‍ॅरॉन एकहार्ट, चेकी कार्यो, ब्रुस ग्रीनवूड, हिलरी स्वॅंक, झिमिन्स्की, डेलरॉय लिंडो आणि हो, डीजे क्वाल्स हा आत्ताच चरख्यातून पिळून काढल्यासारखा दिसणारा हॅकर या सर्वांची टीम तयार करण्यात येते. डीजे क्वाल्सने चौसष्ट वेळा हॅकींग करून फ्रॉड केलेले असते. तोही त्याच्या क्षेत्रातला महागुरूच! पण काम करायला लवकर तयार होत नाही. बोलणी चालू असताना तो एका मिनीटातच अ‍ॅरॉनच्या मोबाईलवर लाईफटाईम एसटीडी कॉल्स फ्री करून देतो. त्याच्याकडे संपूर्ण जगातले इंटरनेट्च हॅक करण्याचे काम दिले जाते. म्हणजे या प्रकल्पाबाबत एक शब्द देखील इंटरनेट्वर दिसू द्यायचा नाही.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;अ‍ॅरॉनला या यानाचा चीफ करण्यात येते. कारण झिमिन्स्कीच्या वर उल्लेख आलेल्या डेस्टीनी नावाच्या उद्योगामुळे झिमिन्स्कीची अक्कल जनरलला कळालेली असते. जगभरातील शास्त्रज्ञ समुदायासमोर प्रवक्ता म्हणून बोलू देऊन भाव खाऊ देण्यासाठीही झिमिन्स्की जनरलकडे तड्फड करतो; पण त्याची डाळ शिजत नाही. एकूण प्रकल्प सुरू होतो; सिम्युलेशनद्वारे यानाच्या चालकांना हे जमिनीत घुसत जाणारे यान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;अ‍ॅरॉन या यानाचा भूगर्भातील वाटाड्या होतो, हिलरी आणि ब्रुस हे चालक होतात, झिमिन्स्की काहीच न करता चुकीचा सल्ला छातीठोकपणे द्यायचे काम स्वीकारतो, चेकी कार्योकडे अणुबॉम्बच्या स्फोटाचे काम असते, डेलरॉय लिंडोचे तर पूर्ण यानच असते. समुद्रात यान खाली तोंड करून उभे केले जाते आणि काऊंट्डाऊन पूर्ण होताच समुद्रतळाकडे मुसंडी मारून आत घुसत जाते. यानाशी संपर्क, नियंत्रण वगैरे सांभाळण्यासाठी नेहमीचेच निनावी यशस्वी कलाकार कुठल्यातरी नियंत्रण कक्षात बसतात.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;अ‍ॅरॉन आणि हिलरी हेच सिनेमाचे हिरो-हिरॉईन असल्याने फक्त तेच दोघे शेवटी जीवंत परत येतात. यानातील बाकी सब लोग दुनिया बचाने के लिये कुर्बान हो जाते है. यान गाभ्यापर्यंत कसे जाते, गाभ्यावरचा लाव्हा अत्यंत तरल असल्याने स्फोट करणे रद्द होऊन त्यांना परत फिरण्याची ऑर्डर येणे, शिल्लक राहिलेल्यांमधील बेबनाव, मध्येच काय-काय अडचणी येतात वगैरे दृश्ये मनोरंजन करून जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हॉलीवूडचा कोणताही सिनेमा पाहिल्यानंतर मला पडणारे सनातन प्रश्न:-&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष)&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते?&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम ये कर सकते हो..&lt;br /&gt;नय...चार्ली..छोडो भी&lt;br /&gt;असली आणि असलीच कितीतरी निरर्थक वाक्ये हिंदी आवाजात कोण डब करतात?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-4232980027995542924?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/4232980027995542924/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/4232980027995542924'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/4232980027995542924'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_OcnIuMGltns/TP3TKi3EziI/AAAAAAAAArM/MSSmq5ceIiY/s72-c/rome.png' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-6299648747022594582</id><published>2010-11-23T10:16:00.000+05:30</published><updated>2010-11-23T10:16:28.106+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्राम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चिंतामणी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गुंज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='योगानंद महाराज'/><title type='text'>गुंजग्रामीचे दिवस</title><content type='html'>&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी. माडीवर मोठ्या दाराशेजारून निघणार्‍या पायर्‍या. दोन्हीकडच्या पायर्‍यांवर बसलेली एक-एक महाभयानक गावठी कुत्री. घरात या ना त्या कारणाने होणारी गड्यांची वर्दळ - त्यात मग चांदपाशा मामू, आमजा, गफूरभाई, सरदार, निजाम, प्रकाशकाका, सावकारमामा, गुलाब भाऊ, भांडेवाली शरीफा किंवा ल्याखत - तिच्या जोहरा आणि सायरा या मुली, जावेद, वाहेद ही मुलं! एवढे सगळे लोक घरात, रानात लागायचेच कारण दीड-दोनशे एक्कर रान - त्यातली औतं आणि बारदाना - गावाच्या एका कडेला असलेला आमचा भलामोठा गायवाडा, त्यात अधेमधे खोदलेली पेवं, एका कोपर्‍यात ओळीने लावलेल्या कडब्याच्या वळह्या, गायबैल, वासरं, आंडील गोरे - लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;आता फक्त गुंजाच्या दिवसांबद्दल. तर पाठ म्हणजे पंचपदीत जी ठराविक कवनं केलेली असतात ती दररोज एकवीस वेळा स्नान झाल्याझाल्या म्हणायची, पंचपदी करायची. मग रात्री निवांत जेवणं वगैरे झाल्यावर घंटा ! म्हणजे पुढचा तासभर सगळ्यांचा नुसता हातवार्‍यांवर कारभार! ज्याचा घंटा चालु आहे त्याचे बोलणे नाहीच. म्हणजे तासभर नुसता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मनातल्या मनात जप करायचा. हे मी स्वत: करीत नव्हतो आणि ते वयही नव्हते कारण ही कामं ज्यानं गुरूमंत्र घेतला आहे त्यालाच फक्त मस्ट! इतरांना त्यातून सूट. काही आगाऊ काट्टी जमेस धरून, घरातील सगळ्यांनीच गुरूमंत्र घेतलेला. आठवडाभर हा सकाळ-संध्याकाळचा नेटवर्क कार्यक्रम आणि गुरूवारी गुंजाच्या मंदिरातील पंचपदीला उपस्थिती मस्ट म्हणजे मस्टच! घरातील किमान एकाचीतरी. बरेच जण जायचे.&lt;br /&gt;&lt;span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"&gt; &lt;/span&gt;बुधवारी रात्रीच चांदपाशा मामू आणि कंपनी गुरूवारचं टिपण घेत असताना - म्हणजे गुरूवारी शेतात करायच्या कामाची प्लॅनिंग काका किंवा तात्याकडून ऐकून घेत असताना सर्वात शेवटी त्याला प्रश्न जायचा -&lt;br /&gt;"उद्या गुरूवार आहे बरं! कोण येतंय उद्या मग गाडीवर?"&lt;br /&gt;"जाता क्या? " पायरीखाली रूमालाची घडी करून टेकून बसलेल्या सरदारकडं बघून चांदपाशा त्याला विचारायचा.&lt;br /&gt;"त्रॉक्क.. वो बईल मेरे अकेलेकू नई संभलते !!" सरदार आलेल्या आफतीतून अंग काढून घ्यायचा.&lt;br /&gt;हा चांदपाशा म्हणजे आमचा मुनीम. गडी, त्यांचे काम, बैल-बारदाना, औतं, रोजानं लावलेल्या बाया, शेतातली लहानसहान देणीघेणी, चंदी, घरचा किराणा भरणे वगरे कामांची पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी याच्याकडं. सरदार हे चांदपाशाचेच सर्वात लहान शेंडेफळ. सरदारनं नुकतंच साल धरलेलं. चांदपाशा त्याला हलकी कामं द्यायचा. म्हणजे गुरूवारी नुसतंच गाडी जुपून मालक-पोराटोरांसोबत गुंजाला जायचं, तिथं गेलं की गाडी सोडायची, जेवून घ्यायचं आणि कुठंतरी सावलीला पडायचं. आम्ही मंदिरात. हा इकडं. शुक्रवारी सकाळी गाडी जुपून पुन्हा परत. पण बैल मारके असल्यानं सरदारला ते सोपं कामही नको वाटायचं. मग चांदपाशा गफूरभाईला थेट हुकूम सोडायचा -&lt;br /&gt;"गफूर, सुबू कू बाडे पे गाडी लाव जल्दी से - इसकू टंगालता मै बारबिगी में "&lt;br /&gt;सरदारकडं रागारागानं बघत चांदपाशा त्याला बारबिगी नावाच्या शेतात ताबडून घेण्याची धमकी द्यायचा आणि काका किंवा तात्याकडं हळूच बघुन घ्यायचा. सरदारला आमच्यासोबत पाठवण्याचा चांदपाशाचा आणखी एक छुपा हेतू म्हणजे - पोरगं जाता येताना मालकासोबत राहिल - बैलगाडी हाकताना चार जवळीकीच्या गोष्टी होतील. पुढं त्यालाच मुनीमकी करणं आहे. पण सरदारच्या टकुर्‍यात या गोष्टी शिरायच्या नाहीत. तो आपलं बैलांना भ्यायचा - आणि त्याच्या मालकांनाही. कारण हे बारबापे बैल (मी गायवाड्यात ऐकलेली ही त्याचीच शिवी) मध्येच शिवळावर पडायचे - एक बैल एका बाजूला ओढायचा दुसरा दुसर्‍या बाजूला! मध्येच गंगा ओलांडताना एखादा बैल जी पाण्यात फतकल मारून बसायचा की बास - दहा कोरडे ओढले तरी भरल्या गंगेतून जागचा उठायचा नाही. गंगेचं पाणी गाडीत शिरायचं आणि काका सरदारला शिव्या घालू लागायचे. अशावेळी गफर्‍याच (भाऊंनी नाहीतर तात्यांनी गफूरला बहाल केलेलं हे खास संबोधन) पाहिजे.&lt;br /&gt;तर दुसर्‍या दिवशी गफूर गाडी-बैल घेऊन वाड्यासमोर हजर व्हायचा. नुसत्या रिकाम्या बैलगाडीत खाली कडब्याच्या पेंड्या टाकलेल्या असायच्या. मग त्यावर गादी. गाडीला छत वगैरे फक्त घरातलं महिलामंडळ सोबत येणार असेल तरच - एरव्ही नाही. गफूरने मस्त गाडीची चाके जिथे जोडलेली असतात तिथल्या आखाला लांब तारेने वंगण चोपडून घेतलेले असायचे. तो काळ्याकुट्ट वंगणाचा मोठ्या पोकळ वेळू (बांबू) पासून बनवलेला नळा गाडीच्या साट्यालाच हमेशा अडकवून ठेवलेला असे. बाबुकाका, मी, राजूकाका, योगूकाका, झालंच तर गाडीत येण्यासाठी रडारड करून आमची नमी गाडीत चढायचे. मी आणि नमी आधी गफूरच्या शेजारची जागा धरायचो. कारण तिथून समोर बसून पाय खाली सोडता यायचे आणि गफूरकडून बैलगाडीचा कासराही हातात घ्यायला मिळायचा. बाकीचे सगळे बाजारस्त्यातल्या मारूतीच्या देवळापासून बसायचे.&lt;br /&gt;भोईवाड्याकडून खंडोबाकडे अशी अर्धी नगरप्रदक्षिणा घालत आमची गाडी सरईच्या ओढ्यात एकदाची शिरायची - गुंजाला निघाल्याचा खरा फील सरईच्या ओढ्यातून सुरू व्हायचा. कुठेतरी लुप्त की गुप्त झालेली शरयू नदी आमच्या गावच्या उशाशी उगम पावली असे समजले जात असे &amp;nbsp;- तिचे गावठी नाव सरई! ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते. तिच्या त्या भल्यामोठ्या ओढ्यातल्या चिखलातून चाकं फसवीत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कंबरेपर्यंत कलत गाडीबैल आणि आमची जत्रा पुढे सरकायची. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच बाभळी. त्यांना लटकलेली आग्या मोहोळं. चित्रविचित्र पक्ष्यांचे आवाज. मध्येच समोरून येणार्‍या दुसर्‍या बैलगाड्यांना आमची गाडी कुठंतरी काट्याकुपाट्यात घालून साईड देणे वगैरे प्रकारात गफूर निष्णात. होता होता इद्दुस्वामीचा मळा यायचा. इथं पाण्याचा एक मोठ्ठा पाईप आणि एक हौद रस्त्याच्या कडेला बांधलेला असे. इथं बैलगाडी थोडा दम खात असे. बैलांना पाणी दाखवले जाई. आम्ही सगळे खाली उतरून पाय मोकळे करीत. तेवढ्यात नमी नाहीतर मी ओरडे -&lt;br /&gt;"ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!"&lt;br /&gt;काळ्या लाल्या या आमच्या कुत्र्यांना कुणीही न बोलावता ते गाडीमागं गुंजापर्यंत येत - दुसर्‍या दिवशी पुन्हा बैलगाडीसोबत परत.&lt;br /&gt;"दत्तदर्शनला जायाचं जायाचं जायाचं‌ऽऽऽ आनंद पोटात माझ्या माईनाऽऽ माईना" त्या कुत्र्यांकडं बघत योगू काका गाणं म्हणे.&lt;br /&gt;बाबूकाका योगूकाकाला छेडत-&lt;br /&gt;"योगानंद महाराज - कुठं ऐकलंत हे गाणं?"&lt;br /&gt;"अहो ती नाही का मी कॅसेट आणलीय नवीन - तिच्यात आहे" योगूकाका.&lt;br /&gt;"आंऽऽ योगूमालक हे गानं इतक्यांदा म्हन्तात की मलाबी पाट झालंय आता" गफूरही मध्येच त्यांच्या बोलण्यात सहभागी होई. &lt;br /&gt;गफूर पुन्हा मग गाडी जुपून त्याच्या भाषेत बैलांशी संवाद साधू लागे -&lt;br /&gt;"व्वा रे बईल!!" असं म्हणून शेपटी पिरगाळी.&lt;br /&gt;मग पुन्हा एकदा सुरूमगावच्या ओढ्यात गाडी शिरे. तिथे थोडे गचके-आदळे खाऊन, त्या गावच्या मारूतीला वेढा घालून आमची बैलगाडी एकदाची गंगेत शिरे. गंगा ओलांडली की आलंच गुंज! तापलेल्या वाळूत बैलगाडीची चाकं शिरली की सर्रर्रर्रर्र आवाज होई आणि वाळू उडे. तेवढ्यात गंगेच्या वरच्या बाजूला दिसणार्‍या निशाणाच्या दिशेनं सगळ्यांचे हात जोडले जात. तिथे गुरूमहाराजांच्या समाधीचे मंदीर उन्हात चमकताना दिसे. बाबुकाका, राजूकाका गाडीच्या खाली उतरत. आणि गंगेच्या पाण्यात गाडी शिरली, की एक बैल त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं पाण्यात फतकल मारून बसे! गफूर सरळ पाण्यात उतरून बैलाची शेपूट हातात घेऊन तिला कडकडून चावा घेई - तोपर्यंत कासरा योगूमालकांनी धरलेला असे. शेपूट चावले की दण्णकन बैल उठून चालायला लागे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग पुन्हा गाडी सोडा. वडीलधारे लोक कृष्णा आत्याकडं जात. ही बाबुकाकांची बहिण. आमची आज्जीच. हे तिचंही गाव होतंच. गफूर शिवळा-जोती, कासरा आत्याच्या घरी ठेऊन बाहेर फिरायला निघून जाई. नमी, मी थेट मंदिरासमोरच्या वड-लिंबाच्या बनाकडे धूम ठोकत असू. कारण तिथे गुंज संस्थानचा खराखुरा, अगडबंब हत्ती बांधलेला असे. बारा वाजत आलेले असत आणि त्या हत्तीला झुल चढवून, घागरमाळांनी मढवून वर अंबारी ठेवण्याचे काम पाहायला खूप मजा येई. हाच हत्ती दत्ताची आरती चालू असताना थोड्यावेळानं उंचावर असलेल्या मंदीराच्या उंबर्‍याशी आणला जाई. उंचच उंच पायर्‍या. मंदिराचे टोलेजंग बांधकाम. संगमरवराचा भलामोठा सभामंडप आणि गुरूवारच्या आरतीला जमलेली भरगच्च गर्दी. एका कोपर्‍यात वाजणारा सनई-चौघडा. नमीची आणि माझी जागा सनई-चौघड्यावाल्या बाबांच्या शेजारी. कारण ती पण एक मजा असे. आरतीच्या गूढ, गंभीर ताला सुरात हत्तीच्यापण किंकाळ्या मिसळून जात. &lt;br /&gt;मग ती भलीमोठी आरती ठरलेल्या ठिकाणी ठेऊन दिली जाई आणि लोक रांगेने आरती घेत. ती रांग तशीच पुढे पाकशाळेकडे सरकत असे. अगडबंब देहाच्या ब्राम्हणांच्या पंगती लागत आणि तशाच उघड्याबंब, गलेलठ्ठ देहाचे, छाती-पोटावर भरघोस केस, जानवी वागवणारे सेवेकरी पत्रावळी वाढायला घेत. चविष्ट अन्न. मंदिराच्या विहीरीचे पाणी मात्र खारे असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुरूदेव दत्त दत्त दत, समर्थ सदगुरू योगानंद महाराज की जय, परमपूज्य चिंतामणी महाराज की जय! अस जयघोष झाली की चित्रावती घालून पंगत अन्नग्रहण सुरू करीत असे. मध्येच पंगतीच्या एका कोपर्‍यातून नुकतीच मुंज झालेल्या श्रीपाद नाहीतर अवधूतचा श्लोकाचा बारीक आवाज उठत असे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोडी सावळी सानुताप सबळे ऽऽऽ सत्सेवी संतुष्टलाऽऽऽऽ &amp;nbsp;&lt;br /&gt;साधी साधन साष्टांग निगुती ऽऽऽऽऽऽ योगे तपे कष्टलाऽऽऽऽऽ&lt;br /&gt;कर्मोपासक ज्ञानसूर्य गमतो वैराग्य द्विमर्धूनीऽऽऽऽऽऽ&lt;br /&gt;श्रीमद्सद्गुरू पादपद्मह्र्दयी ऽऽऽऽ सिध्दाग्र चिंतामणीऽऽऽ&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग पुन्हा एकदा जयजयकार होई. एखादा तयारीचा ब्राम्हण खास ठेवणीतला श्लोक काढी -&lt;br /&gt;&lt;br /&gt;सासु कस्पट सासरा तृणजसाऽऽऽ भ्रतार दासापरिऽऽऽ&lt;br /&gt;ऐशी कन्या ज्या नरासी मिळतसे त्याने भजावा हरिऽऽऽ&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वांना यथेच्छ अन्नदान करण्यासाठी वाढपी ब्राम्हणांची नुसतील धावपळ सुरू असे. श्लोकांच्या अशा जुगलबंदीत, हास्यविनोदात प्रसादग्रहण होई आणि लांब पाट काढलेल्या विहीरीवर हात वगैरे धुवून लोक सभामंडप, मंदिराचे आवार, खालचे झाडांचे बन इत्यादी ठिकाणी पांगत.&lt;br /&gt;नमी आणि माझं आणखी एक आकर्षण पाहायचं राहिलेलं असे - संस्थानची भलीमोठी, उंचच्या उंच अ‍ॅम्बासॅडर कार, तसलाच मोठठा ट्रॅक्टर. त्या कारला झटायचे नाही. कारण ती चिंतामणी महाराजांची कार असे. तिला हार, गंध वगैरे लावलेले असे. लोक कारलाही नमस्कार करीत. आम्हीही हात जोडून घेत असू; पण त्या कारजवळून लवकर हलत नसू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर. तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत-&lt;br /&gt;"काय रे, कितवीला आहेस यंदा? किती टक्के पडले गेल्यावर्षी?"&lt;br /&gt;"सहावीला आहे. गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले."&lt;br /&gt;"आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?"&lt;br /&gt;"मी कुठं पोहोत होतो हो? मी न नमी हत्ती पाहायला गेलो होतो"&lt;br /&gt;"अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी.. खोटं बोलू नको"&lt;br /&gt;मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे. मग अशीच दुपारच्या चहाची वेळ. मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे, तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे.&lt;br /&gt;नमीचे ए पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे.&lt;br /&gt;आणि रात्री दहा वाजता पंचपदी!&lt;br /&gt;मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम-तोम-नोम-तोम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत.&lt;br /&gt;पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;जय योगीश्वर दत्तदयाळ, तुच एक जगमां प्रतिपाळ...&lt;br /&gt;अत्र्यनुसूया करि निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित&lt;br /&gt;ब्रम्हा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार&lt;br /&gt;अंतर्यामी सदचित्सुख, बहार सद्गुरू द्विभूज सुमुख&lt;br /&gt;झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय&lt;br /&gt;क्वायं चतुर्भुज षडभुजसार, अनंत बाहु तु निर्धार&lt;br /&gt;आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशीच सुंदर सुंदर पदे पेटी, तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात, दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे. काही-काही पदं ऐकताना-म्हणताना खूप भरून येई. खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत: त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते. एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत-&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला&lt;br /&gt;गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला&lt;br /&gt;स्मित रम्यवदन काषाय वसन धारी&lt;br /&gt;पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी&lt;br /&gt;निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला&lt;br /&gt;&lt;br /&gt;बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी&lt;br /&gt;घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ&lt;br /&gt;करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला&lt;br /&gt;मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ&lt;br /&gt;श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती&lt;br /&gt;भूधेनू कली भये चाटीत चरणाला&lt;br /&gt;करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ&lt;br /&gt;झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ&lt;br /&gt;नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ&lt;br /&gt;गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत. झोपेतच आरती घेणे, घरी येणे, पुन्हा झोपणे.&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी सकाळी आमची बैलगाडी गंगा ओलांडून गावाकडे परत निघाली की बाबुकाका सांगत -&lt;br /&gt;"अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....."&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुंजग्रामीचे ते दिवस फार मजेत जात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-6299648747022594582?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/6299648747022594582/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/11/blog-post_23.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6299648747022594582'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/6299648747022594582'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/11/blog-post_23.html' title='गुंजग्रामीचे दिवस'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-7785610079841089124</id><published>2010-11-08T01:46:00.000+05:30</published><updated>2010-11-08T01:46:02.370+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मॅड'/><title type='text'>मॅड</title><content type='html'>दिवाळीची धामधूम. लोक गल्लीत फटाके, फुलबाज्या वाजवत आहेत. बहिणी भावाला ओवाळत आहेत, &amp;nbsp;उत्सवी वातावरण! जीव कसा हरखून जातो ना?? माझाही जात होता. &amp;nbsp;पण काल-पर्वाचे अ‍ॅटमबॉम्ब तसेच पडलेले असूनही मला ते वाजवावे वाटेनात. उगाच फालतू आवाज कशाला काढायचे. नुकताच गाडीवर दीड-दोनशे किलोमीटर जाऊन आलो होतो. त्यामुळे आपल्यालाही शरीर आहे हे जाणवत होते. आ:!!!! मॉम~!!!! अर्धाकप चहा दे बरं ! खिडकीतून गल्लीतला फटाक्यांचा नजारा पहात-पहात आपसूकच मातोश्रींना ऑर्डर गेली. तेवढ्यात बाहेर वेगळेच आवाज होऊ लागले होते.&lt;br /&gt;धाड्ड...धाड्ड.. फड्ड्ड...फड्ड्द..&lt;br /&gt;काय आहे म्हणून बघायला बाहेर पडलो. गल्लीतील सगळ्यांची दारं फडाफड बंद झाली होती; आणि खिडक्यांच्या गजांना तोंड लाऊन लोक गल्लीत डोकावत होते.&lt;br /&gt;एऽऽऽऽ पोलीसांना फोन लावा रे! सगळ्या मूडचा सत्त्यानाश साला.&lt;br /&gt;"ओ कुलकर्णी, आत जा.. मरायचं आहे का?" खिडकीतून कुणीतरी ओरडले.&lt;br /&gt;माझ्याएवढाच एक मुलगा होता. हातात एक लांबसर फरशी घेऊन तो कुणाच्यातरी दारावर जोरजोरात मारत होता. आयला ! काय झालंय ते त्याला विचारावं म्हणून त्याच्या दिशेने गेलो. दारावर फरशी मारमारून त्यानं दारावरची नक्षी पार उखडून टाकली होती. त्याच्या अंगात संचारलेल्या त्या अद्भुत शक्तीनिशी तो दारावर फटके देत होता. ते फटके मारताना त्याला बाकी जगाची काहीच तमा नव्हती. व्हाट ए ब्युटीफूल व्हायोलन्स ! पण कशाचं काय, ते वाक्य मनात चमकून विझले नसेल तेवढ्याच एका क्षणभरात माझ्या दिशेनं असलेली त्याची पाठ वळली आणि डोळे माझ्यावर रोखले.&lt;br /&gt;"व्हीफ्ह्ह्हऽऽऽऽ व्हीफ्ह्.... जवळ येऊ नको.. दगड डोक्यात घालील हांऽ.."&lt;br /&gt;त्याच्या नाकपुड्यांतून प्रचंड शक्तीने आतबाहेर होत असणारा श्वास आणि त्याचा तो भयानक पवित्रा पाहुन मला काहीच सुचलं नाही आणि "एऽऽ‌ऽ मारू नको.. मारू नको‌ऽऽऽ" एवढेच शब्द तोंडातून बाहेर पडून मी परत घराकडे पळालो आणि दारात उभा राहून पुढे काय होतंय ते पाहू लागलो.&lt;br /&gt;"घरात हो रे गाढवा!~! त्याचं डोकं फिरलंय, जवळ जाऊ नको त्याच्या, दार लाऊन घे पटकन!" हातात कप घेऊन आलेली आई ओरडली.&lt;br /&gt;"थांब गं तुऽ.. पाहु दे मला.."&lt;br /&gt;तो पुन्हा एकदा त्या दारावर दगडाचे फटके देत होता. त्या दाराच्या आतले लोक लिहून दाखवता येणार नाही अशा भेदरलेल्या आवाजात मोठमोठ्यानं ओरड्त होते. दार कोयंड्याच्या एकाच खिळ्यावर तटून राहिले होते आणि दगडाचे फटके बसताच "दाण्ण!! दाण्ण!!" असे आवाज निघत होते. तेवढ्यात कुणीतरी बहाद्दर एका लांबक्या फरशीचा तुकडा हातात घेऊन त्या पोराच्या दिशेनं धावला.&lt;br /&gt;"दगड खाली टाक साल्या‍ऽऽऽ दगड खाली टाक म्हणतो ना‌‍ऽऽऽ..." फरशी त्या पोरावर उगारत तो धमकवू लागला.&lt;br /&gt;"तुम्हाला काय करायचंय?? जा तुम्ही...जाऽऽ" &lt;br /&gt;एवढ्यात आणखी चार-पाच जण घराबाहेर पडले आणि त्या सगळ्यांनी त्या पोराभोवती कोंडाळे केले. मी पण त्यात घुसलो. आरडाओरड्यात कुणीतरी त्याच्या हातातली फरशी खेचून दूर फेकली आणि मग ते चारपाच जण त्याला धरून बुकलू लागले.&lt;br /&gt;"मॅड झालंय सालंऽऽ आईचा जीव घेत होतं स्वत:च्या‌ऽऽऽ ठोका साल्याला... ए शैलेश, दोरी आणऽऽ.. दोरी आण म्हणतो ना‍ऽऽऽ "&lt;br /&gt;"तुम्हाला काय करायचंय??.. मी तुम्हाला काही करतोय का?"&lt;br /&gt;"साल्या इथं आमची लेकरं खेळत होती..डोक्यात फरशी घातली असतीस म्हणजे.." या माणसानं फटाफट त्याच्या थोबाडीत लगावल्या.&lt;br /&gt;"पैशे देतो ना मी तुम्हाला... देऊन टाकतो तुमचे पाच हजार रूपये‌ऽऽ"&lt;br /&gt;"बांधा रे आधी त्याला.."&lt;br /&gt;"हो‍ऽऽ होऽऽऽ आधी त्याला बांधून टाका.. मरायचं कुणी च्यायला.."&lt;br /&gt;"मी काही करीत नाही कुणाला.. तुमी जा इथून.. मी आत जाऊन बसतो.."&lt;br /&gt;"पोलीसला फोन लावा‌‍ऽऽ याचा काही भरवसा नाही‍ऽऽ.. तोपर्यंत बांधून टाका आधी याला "&lt;br /&gt;बांधाण्याचे नाव ऐकताच त्याच्या भोवती जमलेल्या कोंड्याळ्याला धक्का देत, त्याला धरू पाहाणार्‍या लोकांच्या हातांत नख खूपसून रक्त काढीत तो कोंडाळ्यातून बाहेर पडला आणि शेजारीच असलेल्या त्याच्या दोन खोल्यांत पळाला. लटलट उडणारे माझे काळीज आता नॉर्मल झाले होते आणि आता मलाही धैर्य आले होते. त्याच्या खोलीच्या बंद होत असलेल्या दारावर मी धडक दिली आणि आत घुसलो.&lt;br /&gt;"बाहेर हो‍ऽऽ बाहेर हो म्हणतो ना साल्या.. बाहेर निघ आधी.."&lt;br /&gt;"तु जा उगं इथून.. पहार घालीन डोक्यात तुझ्या.." त्याच्या ओठातून आलेलं रक्त मनगटानं पुशीत तो म्हणाला.&lt;br /&gt;"हे बघ.. एकटा आत बसू नकोस.. बाहेर चल..माझ्याघरी चल... "&lt;br /&gt;"जा त्याला घेऊन तुमच्या घरी च्यायची पिडा.."&lt;br /&gt;"हा कुलकर्णी पण मॅड्च आहे..त्याला कशाला घरी घेऊन जातो रे.. आधी त्याला बांधा आणि इथंच पडू द्या पोलीस येईपर्यंत.."&lt;br /&gt;"ओ मालक, पंधरा मिनीटात तुमची दोरी सोडील तो.. आणि हा उद्या फॅनला लटकलेला दिसला ना मग विचारीन तुम्हा सगळ्यांना मी.." मी पण आता चेकाळलो होतो.&lt;br /&gt;आता लोक हादरले. त्याला बाहेर घ्या, बाहेर घ्या म्हणू लागले आणि त्याला सगळ्यांनी बाहेर काढायला सुरूवात केली.&lt;br /&gt;शेवटी त्याच्या घरासमोरच्या फ्लोअरींगवर तो जाऊन बसला आणि दोन पांयात डोके लपवून ढसाढसा रडू लागला.&lt;br /&gt;"रडतंय कसं आता, दारूफिरू पिऊन आलंय का बघा..." माझ्या शेजारीच उभे असलेले कुणीतरी ओरडले. जरा जवळ गेलो तर याच महाशयांच्या तोंडातून दारूचा बेक्कार वास येत होता.&lt;br /&gt;"तुम्ही जा इथून.. मी काही करीत नाही कोणाला, पैशे देऊन टाकतो मीऽऽ "&lt;br /&gt;"स्वत:च्या आईचा जीव घेत होतास साल्या‍ऽऽ तु काय पैसे देणार रेऽऽ दार मोडलंस माझं.. " हे त्याचे घरमालक होते.&lt;br /&gt;"देतो ना तुम्हाला पाच हजार रूपये‍ऽऽ " रडतारडता तो म्हणाला.&lt;br /&gt;गर्दीतल्या टग्यांनी अर्वाच्य शिव्या देत त्याच्यावर आणखी एकदा हात मोकळा करून घेतला. तोपर्यंत कुणीतरी दोरीपण घेऊन आले होते.&lt;br /&gt;"असं करा, त्याला बांधाच. नको उगं पीडा मोकळी." आसाराम बापू स्टाईल दाढीमिशा असलेला एक म्हातारा म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुन्हा एकदा जबरदस्तीने त्याला त्याच्या घरात नेण्यात आलं आणि कॉटवर आडवा झोपवून हात, पाय पक्की बांधण्यात आले.&lt;br /&gt;"बघून घेतो एकएकाला.. बघुन घेतो.."&lt;br /&gt;"मॅड झालंयऽऽ बार्‍हाळेकडं न्या त्याला"&lt;br /&gt;"कोण नेईल बॉ‌ऽऽ गळाफिळा दाबायचं रस्त्यात आपलाच"&lt;br /&gt;"पडू द्या त्याला इथंच.. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग गर्दी काय झालं होतं कशामुळं झालं होतं वगैरे चर्चा करण्यात गुंतली. काही लोक उगाच मधूनमधून त्या खोलीत चकरा मारू लागले.&lt;br /&gt;मला मात्र नेमकं कुणाचं डोकं सरकलंय ते कळेना. &amp;nbsp;नुसता मतांचा हलकल्लोळ माजला होता. डोकं दुखू लागलं.&lt;br /&gt;घरी परत आलो. कॉम्पुटरसमोर ठेवलेल्या चहावर आता साय आली होती. &amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3211638496746276093-7785610079841089124?l=yekulkarni.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://yekulkarni.blogspot.com/feeds/7785610079841089124/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/11/blog-post_08.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7785610079841089124'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3211638496746276093/posts/default/7785610079841089124'/><link rel='alternate' type='text/html' href='http://yekulkarni.blogspot.com/2010/11/blog-post_08.html' title='मॅड'/><author><name>Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator</name><uri>https://profiles.google.com/117800048368896743642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh4.googleusercontent.com/-sHHMYjYqN2U/AAAAAAAAAAI/AAAAAAAAA54/2PqUCjnmt4c/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3211638496746276093.post-4019252207317557044</id><published>2010-11-06T03:20:00.001+05:30</published><updated>2010-11-06T03:22:24.782+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी'/><title type='text'>बुरा ना मानो दिवाली है!!</title><content type='html'>&lt;div class="post-body entry-content" style="width: 530px;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 22px;"&gt;उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. &amp;nbsp;अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 22px;"&gt;सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही. पण कामात मन गुंतलं असताना, कशात तरी तंद्री लागलेली असताना मध्येच मोठ्ठा धड्डाम्म्म!! असा आवाज झाला तर कोण चिडणार नाही?? मी पण चिडलो होतो. एकतर समोरा-समोर दारं. तीस-चाळीस फूटांचं अंतर. शेजारी त्याच्या घराबाहेर फटाके, अ‍ॅटम बॉम्ब वाजवणार म्हणजे रस्त्याच्या मधोमध माझ्या घरापासून बारा पंधरा फूटांवर ! माय गॉड! घरात लहान बाळं आहेत - दिवाळी म्हणजे काय त्यांना अजून माहितही नाही. ती बिचारी इवले-इवले हात गाला-खांद्यांशी घेऊन झोपलेली असतात... इकडेतिकडे टुकूटूकू पाहात असतात...मध्येच भड्डाम्म्म!!!! आवाज &amp;nbsp;झाला की फूटभर उंच उडून केकाटायला लागतात ना ती? पर दिवाली है!! चालायचंच!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 22px;"&gt;पण अ‍ॅटम बॉम्ब फारच जोरात वाजत होते. घरातही ठिणग्या उडून येत होत्या.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 22px;"&gt;शेवटी उठलोच.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="line-height: 22px;"&gt;"ए‌‍ऽऽऽ ये बम वगैरा अपने घर में बजाओ..हम भी दिवाली मना रहे है.. कहांसे लाये ये बम?? धमाके से घर चौंक रहा है..."&lt;/span&gt;&lt
