ओशो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ओशो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३


Christopher Calder
Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

                  क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते.    
                  आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.
                 तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही?  तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो?
                   या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.
ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले कव्हरेज आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!

मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश



खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही

२० जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २

रजनीशांनी अज्ञाताच्या भांडवलावर आध्यात्माचा बाजार सुरु केला. हा माणूस स्वत:चा ब्रांड स्थापन होई पर्यात सुरुवातीला दिवसाचे बारा-अठरा तास वाचन करीत होता. तीच माहिती लोकांसमोर अशा खुबीने पेश करीत होता की क्या कहने. अर्थात यावर नाराज होण्याच काहीच कारण नाही. तक्रार ही आहे की त्याने कुणालाही उपलब्ध होऊ शकत असलेल्या या माहितीचा वापर स्वत:ची “एक जागृत झालेला माणूस” अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी अगदी बेमालूमपणे केला.
धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या ज्या शोषणाविरुद्ध त्याने जन्मभर कंठशोष केला त्याच शोषण शृंखलेचा  रजनीश हा पुढे चालून मुकुटमणी बनला, एवढा मोठा मुकुटमणी की या सम हाच! भारताच्या अनेक शहरांत ध्यान प्रसारासाठी एक साधी लुंगी व पंचा घालून पायपीट करणारे “आचार्य” रजनीश, विदेशी चेल्यांची थोडीशी संख्या वाढताच स्वघोषित “भगवान” बनून लगेच रोल्स राईस वापरताना दिसतात तेव्हा मजा वाटते.




त्यांनी ब्याण्णव रोल्स राईस व हिरे वापरले ही तक्रार नाहीच, तर “लोक माझ्याकडे असलेल्या या भौतिक गोष्टींची चर्चा करतात, त्यांना त्याचे आकर्षण आहे.. मला नाही.. लोकांना आकर्षीत करण्यासाठी हे आहे” या गोंडस सबबीखाली रजनीशांनी ते वापरले. त्यांना नायट्रस ऑक्साईड व Valium चे व्यसन असल्याचे आरोप त्यांच्याच सेक्रेटरीने केले. खरे पाहता ही व्यसने त्यांना डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधातून लागली. रजनीशांनी Books I Have Loved, Glimpses of a Golden Childhood, आणि  Notes of a Madman मधील पुस्तकाचा मजकूर नायट्रस ऑक्साईडच्या अमलाखाली कथन केला आहे, रजनीशांनीच त्या पुस्तकांत सांगितले आहे. या पुस्तकांच्या विचित्र कथन शैलीमुळे ही ते सहज लक्षात येते.      
अमेरिकन सरकारने त्यांची हकालपट्टी केल्यांनतर रोल्स राइस लिलावात काढल्या. त्यापूर्वी रोल्स राईसकडे केलेल्या चौकशीत कंपनीने सांगितले की रजनीश खरेदी करीत असलेल्या नव्या रोल्स राईसच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फोनवरून तासनतास सूचना देत बसत. त्या त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच रंगवून हव्या असत. त्यांच्या या रोल्स राईस प्रकरणावरच एक वेगळा लेख होऊ शकतो, पण रजनीश म्हणतात त्याप्रमाणे बिती ताही बिसार दे!


९२ रोल्स राईस पैकी एक

रजनीश अविवाहित होते. क्रिस्टीना वाल्फ नावाची ब्रिटीश महिला त्यांची प्रेयसी होती. रजनीशांच्या  लहानपणी त्यांची शशी नावाची प्रेयसी होती; ती लहानपणीच वारली. मरताना या शशीने परत येण्याचे वचन दिले होते व क्रिस्टीना वाल्फच्या रुपात जन्मून शशी परत आली आहे असे रजनीशांनी म्हटले. अमेरिकेतून रजनीशांच्या हकालपट्टीनंतर या क्रिस्टीना वाल्फने मुंबईच्या एका हॉटेलात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्या केली.


क्रिस्टीना वाल्फ उर्फ तथाकथित शशी, सन्यासी मा विवेक

जगभरातून लोक पुण्यातील कम्युन मध्ये येतात, पण पुण्यातील लोक मात्र इकडे फारसे फिरकत नाहीत असा प्रश्न व्याख्यानात त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पुणे शहर “एक मरी हुयी बस्ती” असल्याचे त्यांनी पुणे कम्युन मध्येच दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते, आणि पुण्यात त्यांनी सातशे वर्षांपूर्वी तप केले असल्याचा अगोदर  दावा केला होता. त्यांच्या मृत्युनंतर कम्युनमुळे पुणे हे जागतिक तीर्थक्षेत्र बनेल ही भविष्यवाणीही रजनीशांनीच केली होती.
बहुसंख्य लोक फिदा असतात ती रजनीशांची तर्कशक्ती व त्यांच्या साहित्यावर. वास्तविक प्रचंड रिपिटेशनशिवाय त्यात काहीही नाही. त्यांनी दिलेले एकनएक उत्तर एनलायटन्मेंटच्या प्रोडक्ट भोवती फिरत राहते. रजनीशांच्या आयुष्यातील विरोधाभास लिहायचे नाही असे ठरवले होते, कारण ते लक्षावधी आहेत, व ते चघळत बसण्याचे काहीच कारण नाही. पण अनुरूप वाटतील त्या ठळक गोष्टी मांडल्याशिवाय पर्याय नाही.    
सुरुवातीची अत्यंत थोडकी व्याख्याने सोडली तर इथून तिथून सगळे रजनीश साहित्य “ध्यान” आणि फक्त ध्यान याच मुद्यावर केंद्रित आहे. विविध थेरपीज असोत की तत्वज्ञान, मानसशास्त्र की जगातील कोणताही विषय, त्याचा कसा का होईना त्यांनी ध्यान व एनलायटन्मेंटशी संबध जोडला.  
रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा टीकाकार Christopher Calder ते जागृत पुरुष असल्याचे मान्य करतो, पण जागृत पुरुष स्खलनशील नसतात हे त्याला मान्य नाही. त्याच्या शब्दात –

Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body.  His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part.  The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven.  He had it all and he was giving it away for free!
   
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples.  Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real.  The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

पुढील भागात रजनीशांच्या शैलीचे विच्छेदन    
   
   
           

१८ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १

- यशवंत कुलकर्णी

सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या लेखमालेत रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून लिहिलेली ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे.
रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे.
त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे.
त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये.
मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला.
मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले.  
 तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले.    
  अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते.    



   
अज्ञाताचे भांडवल
जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...”  
त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.




(क्रमश:)

१५ जुलै, २०१०

दर्दी

वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल तेवढी किंवा जास्तीत जास्त बिदागी तो देत असे. पण तरीही संगीतकार यायला तयार नव्हता. वाजेद अली त्याच्याकडे आल्यावर संगीतकार म्हणाला, "मी येईन जरूर, पण तुम्ही माझी एक अट पूर्ण करायला हवी. माझी फक्त एकच अट आहे, आणि ती म्हणजे: मी वाजवत असताना किंवा गात असताना कुणीही मान हलवायची नाही."
वाजेद अली शाह म्हणाला, "ही काही फार काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. जे कुणी ऎकायला येणार असतील त्यांना मी आधीच बजावून ठेवील की, तुमची मान जर हलली, तर तिथंच ती उडवण्यात येईल!!" तो होताच असला बावळट - त्यानं खरंच मान उडवली पण असती. त्यानं खरोखर तशी तयारी पण केली. त्यानं पूर्ण लखनौ शहरात दवंडी पिटवली, "मैफिलीत येणार्‍यांनी यावे, पण ती जोखमीची आहे हे पण लक्षात ठेवावे. नंग्या तलवारी घेऊन सैनिक उभे राहतील आणि जो कुणी मुंडी हलवील, दाद देईल त्याची मान उडवण्यात येईल!!" एकट्या लखनौमध्ये संगीताचे किमान दहा हजार दर्दी होते - पण फक्त शंभर लोक आले. जीव द्यायचा होता का? डास गुणगुण करतोय म्हणून किंवा इतर काही कारणाने तुम्ही मुंडी हलवाल... संगीतकार महान आहे म्हणूनही तुम्ही मान हलवायची नाही हे विसराल आणि सतत ते लक्षात ठेवणंही कठीण आहे. संगीत ऐकून तर सापदेखील डोलू लागतात, नाचू लागतात. अवघड होती ही गोष्ट. त्यामुळे लोकांनी येणे टाळले, पण शंभर लोक आलेच! हे संगीताचे खरे दर्दी होते, त्यांची जीवाची जोखीम घेतली - ही जोखीम घेण्यासारखी होतीच. आणि सैनिक नंग्या तलवारी घेऊन उभे होते. अजब मैफिल जमली होती!
संगीतकारानं वाजवायला सुरूवात केली आणि पहिल्या पंधरा मिनिटातच काही माना हलू लागल्या. कारण संगीत होतंच तसं जबरदस्त. वाजेद अली शहा खूपच काळजीत पडला कारण खरंच उडवायला जावं तर एकच डोकं हलत नव्हतं: बरीच डोकी हलू लागली, थोड्या वेळात आणखी काही हलली अशी हलणारी डोकी वाढतच गेली. मग तर तो खूपच काळजीत पडला: "ही सगळीच्या सगळी डोकी उडवावी लागणार?" आणि पूर्ण राजधानीतील हे अत्यंत दर्दी लोक होते! त्यांना तो ओळखत होता; ते खरे-खुरे संगीतप्रेमी होते.
अर्ध्या रात्री संगीतकारानं वाजवणं थांबवलं तोपर्यंत सर्वच्या सर्व शंभर लोकांच्या माना हलू लागल्या होत्या. वाजेद अलीनं संगीतकाराला विचारलं, "आता आपण काय म्हणाल? या सर्वांची डोकी उडवू का नको? माझे सैनिक तयारच आहेत, आणि मी तुम्हाला वचन दिलंय, म्हणून मी ते पूर्ण करायला तयार आहे."
संगीतकार हसू लागला आणि म्हणाला, "काळजी करू नका! मी अट फक्त एवढ्यासाठीच घातली की फक्त संगीताचे खरे दर्दीच यावेत. याच लोकांकरिता मला वाजवायचं आणि गायचं आहे. तुमचे सैनिक हटवा! मी फक्त वाट पाहात होतो: मान न डोलावता काही लोक बसून राहिले असते, तर त्यांना मैफिलीतून बाहेर जावं लागलं असतं. आता मी वाजवतो, कारण सगळीच्या सगळी शंभर डोकी हलली आहेत. अशाच मैफिलीसाठी मी जन्मभर वाट पाहात होतो. हे लोक पूर्णत: विसरूनच गेले, जीव जाणार आहे हे पण विसरून गेले - जीवन आणि मरणाचा प्रश्न होता हा."


(अनुवादीत)
Philosophia Ultima
(Talks on Mandukyo Upnishad by Osho)

२८ मार्च, २०१०

रजनीश: ओशो: एक्सप्लेण्ड





या ब्लॊगवर गेल्यावेळी रजनीशांबद्दल मी मुद्दामच एका ति-हाईताच्या नजरेने लिहिले आहे. तेच आताही करतो आहे. कितीही काही म्हटले तरी जगावर छाप पाडणा-या या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील विसंगती स्वस्थ बसु देत नाही. तशी त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीत संगती ठेवली नव्हती. कधी येशु ख्रिस्तावर टीका, तर कधी बायबलमधील वचनांवर शिष्यांना नवे भान देणारी व्याख्याने, कधी गीतेच्या अठरा अध्यायांवर व्याख्याने देऊनही वर पुन्हा Krishna seems to be a playboy ! हे ठीक होते - हे समजुन घेता येते. पण किमान स्वत:च्या जीवनाबद्द्ल आपण जे सांगतोय, ते आपण आहोत तोपर्यंत कसेही संपादता येईल, पण आपण गेल्यावर काय? हा प्रश्न त्यांना पडला नसावा. मला रजनीश जसे कळले तसे मी इथे मांडतोय - कारण माझ्या आयुष्यातील बराच काळ मी या बाबावर (हो बाबाच! सोफास्टीकेटेड असला म्हणुन काय झाले) खर्च केलाय. काही काळ तर नुसतं वाचन करुनच पुरता सैरभैर झालो होतो. पण नंतर आपोआपच कळलं की हे प्रकरण नुसतं वाचुन संपत नाही. त्यांचे साहित्य वाचणा-या वाचकांना माहीत असेल, की रजनीशांची "सर्वकाही जाणलेला" अशी आपल्या मनात प्रतिमा निर्माण होते. तशी ती होऊ देत असत.
कधी कुणा श्रीमंत बाईला "मी तुमचा पूर्वजन्मातील मुलगा आहे", तर श्रोत्यांसमोर "सातशे वर्षापूर्वी मी पुण्यातच तप करीत होतो, एकवीस दिवसांच्या उपासानंतर माझ्या तपाची सांगता होणार होती, पण त्यापूर्वीच माझा खून झाला, पुन्हा जन्म घ्यायला मला सातशे वर्षे वाट पहावी लागली" तर कधी "बुध्द आणि मी काहीकाळ रस्त्याने सोबत चाललो होतो, नंतर तो त्याच्या वाटेने गेला, मी माझ्या वाटेने गेलो " तर कधी "बुध्दाच्या आत्म्याने माझ्या शरीरात प्रवेश केला आहे, माझी तब्येत सुधारली आहे" नंतर "बुध्दाला मी बाय-बाय केले, त्याची झोपताना हात उशाशी घेण्याची सवय मला त्रासदायक होत होती" असल्या भंपक कथा सांगुन ते नसते वलय निर्माण करीत. ज्या जुनाट भारतीय मानसिकतेवर त्यांनी जन्मभर आसूड ओढले त्याच मानसिकतेचे रजनीश हे अतिशुध्द, प्रच्छन्न रुप होते. हा माणूस निव्वळ भंपक होता असे मी म्हणत नाही, पण त्यांनी जाणतेपणी स्वत:बद्दल काही ग्रह पसरु दिले होते.
संबोधी किंवा निर्वाण किंवा एन्लायटनमेंट ही गोष्ट या जगात राहु इच्छिणाराच्या द्रुष्टीने काहीही महत्वाची नसते. ती शेवटची पायरी आहे. रजनीशांनी एन्लायटनमेंटची पध्दतशीत मार्केटींग केली. सर्व प्रकारच्या "कंडिशनिंग्ज" च्या विरोधात असणारे रजनीश मात्र काही बाबतीत "कडिशण्ड" होते:
रजनीशांची बोलण्याची पध्दत सुरुवातीला आक्रामक होती, ती नंतर श्रोत्यांना क्षणा-क्षणाबद्दल, त्या-त्या क्षणाबद्दल जागरुक करुन देणारी झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगात सर्वप्रथमच या प्रकारच्या बोलण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येत होता. ते जेव्हा बोलत, तेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये, जाणिवपूर्वक थांबा घेत, तो क्षण पिऊन घेत, श्रोत्यांनाही तो प्यायला लावीत आणि मग पुढे जात.
रजनीशांची देहबोली पूर्णत: Let Go प्रकारची होती - म्हणजे त्यामागे कसलाही अभिनिवेश नव्हता.
ध्यानाशी ज्याची ओळख नाही, जो सतत घाई-गडबडीत असतो, घाईत नसतो तेव्हा देखील त्याच्या मनात सतत विचार चालु असल्याने वर्तमान क्षणाकडे लक्ष नसते त्याच्यावर वरील प्रकारच्या बोलण्याचा आणि देहबोलीचा नक्कीच प्रभाव पडतो. ऎकणा-याला अनायास शांत वाटु लागते.
ध्यान देखील एक प्रकारचा निष्क्रिय सराव आहे - अत्यंत सूक्ष्म निष्क्रिय सराव. हा सराव तुम्ही, तुमचे विचार, तुमची देहस्थिती, मनात चालु असणारी वळवळ यांबद्दल जागरुक होण्याचा आहे. या निष्क्रिय सरावाचा जो परिणाम होतो तो थोडा अतर्क्य म्हणावा असा आहे. कारण या सरावाच्या परिणामाचे विज्ञानाने अजूनपर्यंत मूल्यांकन केलेले नाही. ध्यानाच्या शिखर अवस्थेत दुस-या व्यक्तीला विश्वास न बसेल अशा काही शारीरिक घटना घडतात. उदा. माकडहाडापासुन मेंदुकडे एक उष्ण प्रवाह सरकणे, हा प्रवाह पाठीवरील शिरांमध्येही प्रवाहीत होणे, पाठीच्या कण्यांत काही निवडक जागांवर गोल फिरल्यासारखे वाटणे. ही घटना घडते तेव्हा सहाजिकच आपण घाबरतो. कारण शरीराला ताठरता आलेली असते आणि ध्यान चालु असताना सर्व आधार क्षणिक नाहीसे झाल्यासारखे वाटत असतात. आपण पटकन ध्यानातुन बाहेर पडतो. पण एकदा का ही घटना घडली, की ती अनायास होत राहाते. पुढे डोळे तारवटतात (तेजस्वी होतात म्हटले तरी चालेल), भुवया आपोआप वर जायला लागतात, मनात काही विचार चालु नसल्याने आजुबाजुचे जग सुस्पष्ट दिसायला लागते. विचारांमध्ये सुसुत्रता येते, बोलणे पूर्वीपेक्षा सुस्पष्ट होऊ लागते. लोकांसोबत होत असणा-या संवादावर तुम्ही जास्त नियंत्रण राखु शकता, काही प्रमाणात लोकांना "मोनोपोलाईज"ही करू शकता. पुढे मग मन स्थिर होते, फालतू विचार येणे आणि त्यातच रंगुन जाणे, त्यांनी काही कारण नसताना बेजार होणे बंद होते. एकुणच माणूस स्वस्थ होतो, आनंदी आणि समाधानी राहु लागतो.
ही कोणत्याही माणसाच्या बाबतीत घडणारी अगदी सामान्य घटना आहे. पण याच घटनेला "अतिंद्रिय अनुभव", "तप" "मिस्टिसिझम" "साधना" असली बाष्कळ नावे पडल्याने त्याभोवती उगाच वलय निर्माण होते. रजनीशांनी हेच अगदी बेमालूमपणे स्वत:भोवती गोवले, त्याचा पद्धतशीर प्रचार केला. यात काही वाईट झाले असे मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि त्यात आश्चर्यकारक, अमानवी असे काही नाही. (क्रमश:)

आचार्य रजनीश उर्फ़ भगवान श्री रजनीश उर्फ़ ओशो






रजनीश:ओशो नावाचं गारुड समजुन घेताना आपण स्वत:लाच हरवुन बसतो. रजनीशांची व्याख्याने किंवा साहित्य हे भोव-या सारखं आहे. ते तुम्हाला आकर्षीत करतं, गरगर फिरवतं, घेरी आणतं, तुम्ही आजवर वाहात राहीलेली ओझी फेकायला लावतं. त्यांची व्याख्याने किंवा साहित्य या फक्त पाय-या आहेत - त्या अंतिमत: तुम्हाला ध्यानाकडे घेऊनच जातात.
रजनीशांकडे एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला पाहाता येत नाही. कारण त्यांनी स्वत:ला व्यक्तीत्वाच्या चौकटीत बांधुन घेतलेलं नाही आणि तुम्ही त्यांना त्या चौकटीत बांधुही शकत नाही. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० हा त्यांचे ५९ वर्षांचे आयुष्य. लहानपणीचा एक अवखळ मुलगा, तारुण्यातील एक झंझावाती व्याख्याता - विद्यापीठाचा गोल्डमेडलिस्ट, पुढे त्याच विद्यापीठातील प्राध्यापक, आपल्या व्याख्यानांतुन धर्मा-धर्मांमध्ये पसरलेल्या दांभिकतेवर, दांभिक गुरुंवर हल्ला करणारा बंडखोर, शहरा-शहरांतुन ध्यान शिबीरे घेणारा, देश-विदेशांतील तरूण-तुर्कांना वेड लाऊन सोडणारा आणि संभोग से समाधी की ओर या व्याख्यानमालेमुळे "सेक्स गुरु" या नावाने प्रसिद्धी पावलेला, रोल्स राईस ही महागडी कार आणि हि-यांची घड्याळे वापरणारा आध्यात्मिक गुरु, पुण्यातील आश्रमातुन निघुन अमेरिकेतील ओरेगॊन या परगण्यात गेलेला मसिहा, तिथुन हाकालपट्टी होऊन पुन्हा भारतात पुनरागमन असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
मला रजनीशांची ओळख पुस्तके, ध्वनी-चित्रफीती आणि इंटरनेट यावरून झाली. पण त्यांना ज्या-ज्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले त्यावरुन रजनीशांच्या भोवती खरंच एक गारुड, एक अद्भुतता होती असे दिसते. त्यांना वाचणारे साधक जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटत तेव्हा भावना अनावर होऊन ते हंबरडा फोडुन रजनीशांच्याकडे झेपावत, रडत (ओशो: एक प्रतिभावंत ध्यानयोगी, शिरिष पै, प्रतिक प्रकाशन). (इथे मला मायकल जैक्सनला पाहुन बेशुद्ध होणा-या मुली आठवतात).
रजनीश स्वत:ला बुध्द पुरुष म्हणवुन घेतात. बुध्द पुरुष म्हणजे आत्मानुभूती झालेला, स्वत:च्या अगदी तळापर्यंत जाऊन आलेला माणुस. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा तो माणुस शिल्लक राहात नाही - तो फक्त एक स्रोत म्हणुन उरतो, त्याला भुत-भविष्य -वर्तमान दिसु लागले, तो आकाशिक रेकोर्डस पाहु शकतो इ.इ.इ. अशा अनेक लंब्याचवड्या, भुलविणा-या आणि लोकांना ध्यानाकडे आकर्षित करणा-या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
पण एखाद्या माणसाचा सर्वोत्तम समिक्षक, टिकाकार म्हणजे त्याचेच आयुष्य असते. तुम्ही कितीही लोकांना भुलवु शकाल पण तुम्ही जे जसे जगाल ते लोकांना पहायला तसेच राहील ना? ते गरिबांना आणि गरिबीला सरळ झटकुनच टाकतात. गरिबीच्या प्रश्नाला "गरिबीची कारणे देशाच्या मानसिकतेत आहेत, गरिबांना आपल्या देशात दरिद्रनारायण म्हटले गेले आहे, त्यात त्यांच्या अहंकाराची पुर्ती होते म्हणुन ते गरिब राहातात" ते अशी बगल देतात पण ते स्वत: मात्र रोल्स राईस वापरत असत. ख्रिस्तोफर काल्डर हा त्यांचा एकेकाळचा संन्यासी आणि नंतरचा टीकाकार म्हणतो की, "मी (रजनीशांनी) शेकडो मुलींसोबत सेक्स केला आहे, असे रजनीशांनी अमेरिकन प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. भारतीय गुरूंनी कधी आपल्या शिष्यांसोबत असले प्रकार केल्याचे दिसत नाही...." ओशोवर्ल्ड डॊट कॊम वर संकलीत केलेल्या त्यांच्या चरित्रात असे वाचनात आले की "बुध्दत्व प्राप्तीनंतर मी सेक्स केलेला आहे, आणि चांगल्याप्रकारे केलेला आहे...सेक्समुळे बुध्दत्वावर काहीही परिणाम होत नाही..."
रजनीश नायट्रस ऒक्साईड (मादक पदार्थ) घेत. यावरुन ते स्वत:ला "रबर होज बुध्दा" असेही म्हणवुन घेतात.
रजनीश कधीच कुणाची भीड-भाड ठेवत नसत. म.गांधी, मदर तेरेसा, येशु ख्रिस्त, ख्रिश्चनिटी, हिंदु धर्म, तुलसीदास, वेद, राम या सर्वांवर रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानातुन ठिकठीकाणी ताशेरे ओढलेले दिसतात. "पूर्व आणि पश्चिम, आध्यात्म आणि भौतिकता, आत्मा आणि शरीर यातील दरी मिटवण्याचा माझा प्रयत्न आहे" असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
तशी रजनीशांनी लोकनिंदेची कधीच दखल घेतली नाही. लोकस्तुतीची मात्र त्यांनी निश्चितच दखल घेतली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. रजनीशांनी एका व्याख्यानात त्याची दखल घेतली होती.
विवेकानंदांवर तुम्ही का बोलत नाही? असे त्यांच्या शिष्याने रजनीशांना विचारले होते. तेव्हा व्याख्यानात "विवेकानंद हे काही जाग्रत पुरुष नव्हते, त्यांना महापंडित म्हणता येईल.... आणि या तथाकथित पंडितांवर माझे किती प्रेम आहे हे तुम्ही जाणताच. विवेकानंदांनी हिंदुधर्माच्या अहंकाराला खतपाणी मात्र घातले....मी विवेकानंदांच्या गुरुंवर (रामक्रष्ण परमहंस) बोलु शकतो, कारण ती गोष्टच वेगळी आहे...
विवेकानंदांचे अभिमानी दत्ता बाळ यांनी रजनीशांच्या या वक्तव्यावर टीका केली, तेव्हा मात्र रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात दत्ता बाळ यांची यथेच्छ टिंगल उडविली होती.
रजनीशांच्या विवाहसंस्थेला विरोध होता....विवाह हे सुरक्षीत वातावरण आहे, त्यात प्राण नाही, त्यात प्रेम नाही असे ते सांगतात.
रजनीश कितीही बाता मारत असले, तरी ते ठिकठिकाणी उघडे पडलेले दिसतात. रजनीशांनी विवाह केला नाही. त्यांची एक प्रेयसी मात्र होती. क्रिस्टिन वाल्फ़ या नावाची इंग्रज तरूणी. ती त्यांच्या पूर्व जन्मीची प्रेयसी आहे, त्यांनी तिला पुढच्या जन्मात भेटण्याचे वचन दिले होते असे रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले. पण पुढे या पूर्वजन्मीच्या प्रेयसीने मात्र मुंबईच्या एका हॊटेलमध्ये झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्त्या केली. महिनाभरानंतर रजनीशांनीही जगाचा निरोप घेतला. गेल्यावरसुद्धा या माणसा भोवती एक गारूड उभे आहे. पुण्यातील त्यांच्या आश्रमातील समाधीवर लिहिले आहे - OSHO NEVER BORN NEVER DIED. ONLY VISITED THIS PLANET EARTH BETWEEN 11 DECEMBER 1931 AND 19 JANUARY 1990. (क्रमश:)