७ ऑगस्ट, २०१०

मानसिक गर्भधारणा व प्रसुती:उगम, विकास, सद्यस्थिती


पहिली मानसिक प्रसुती कुठं झाली याच्या निश्चित नोंदी नसल्या तरी नाममात्र किंमतीत (काहीवेळा आग्रह करून फुकट) जी पुस्तकं मिळतात त्यांना त्या-त्या काळात झालेल्या प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्टस मानायला हरकत नाही. या मानसिक प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्ट आज पाहायला मिळत असले, तरी मुळात गर्भ राहिला कुणामुळे हेही पाहावं लागेल. तर गर्भ राहाण्याची कारणे तशी लक्षावधी आहेत. शरीरशास्त्राच्या दृष्टीने स्त्री हीच फक्त गर्भधारणा करीत असेल; पण मानसशास्त्राच्या दृष्टीने गर्भधारणेकरिता स्त्री-पुरूष एवढेच काय पण क्लिबसुध्दा सक्षम आहेत. जाणता अजाणता बोलणे, पाहाणे, ऐकणे, कल्पीणे घडत असताना संग घडून जातो; त्याची आठवण देखील राहात नाही, एवढंच काय पण मानसिक गर्भधारणा झाल्यानंतर आपण गर्भ वागवतोय हे सुध्दा जाणवत नाही. कधीतरी दिवस भरतात आणि हाती पडेल तो कागद-लेखणी वापरून आणि तेही उपलब्ध नसल्यास कुठल्याही मानव प्राण्यासमोर, ध्वनीवर्धकासमोर मुखावाटे शब्द करून मानसिक प्रसुती उरकली जाते. 
आता एकदा अशा मानसिक गर्भधारणा आणि प्रसुतीचा अनुभव गाठीस आला, तरी पुढच्या मानसिक गर्भधारणेचे काटेकोर व्यवस्थापन सहसा केले जात नाही. कारण स्पष्ट आहे. मानसिक संग करणे आणि मानसिक प्रसुती या संकल्पनाच एवढ्या सूक्ष्म आणि दृष्टी अगोचर आहेत की गर्भधारणा-वाढ-प्रसुती या प्रक्रियांचा आलेख काढण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. एक मार्ग असतो - पण तो प्रसुती पश्चात आणि क्रौर्यसंपन्न आहे. यात प्रसुती होऊ देऊन अपत्याचे मूल्यमापन करावे लागते आणि ते पसंतीस उतरले नाही तर आपोआपच हातून भ्रूणहत्त्या नव्हे तर बालहत्त्या घडते !
     रात्रन रात्र जागून, अनेक वेळा मानसिकदृष्ट्या प्रसूत होऊन, अनेक बालकांची हत्त्या करून जे असे व्यवस्थापन करतात त्यांची बाळे रंगीत वेष्टणात गुंडाळून अनेक प्रतींमध्ये विकली जातात. आता बाळ तुम्ही विकत घेतले असले, थोडक्यात दत्तक घेतले असले तरी तुम्ही त्याचे मातापिता नसल्याने तुम्ही त्याला समजून घेऊ शकालच अशी खात्री नसते. तर असा हा लोकव्यवहार अनादि काळापासून सुरू आहे. 
माणसाचे जग जस-जसे विकसीत होत गेले तस-तशी मानसिक गर्भधारणा-प्रसुतीची गरज वाढत गेली आणि या प्रक्रियेला आखीव-रेखीव रूप मिळाले. पूर्वी जो मानसिक गर्भधारणेचा कालावधी अमर्यादित होता, तो आता घटला. गेली तीस वर्षे गर्भवती राहून सहाशे (??) पृष्टांच्या बाळाची डिलेव्हरी झालेली मिशाळ माता आणि दररोज प्रसुत होणार्‍या दैनंदिनप्रसुतीकारांच्या तुलनेतून हीच परिस्थिती स्पष्ट होते. 
         शिवाय मानसिक गर्भवती/प्रसुत माता यांची संख्या अतोनात वाढल्याने, बाळ झालंय हे क्षणार्धात जगजाहिर करणारी, एकमेकांची बाळे एकाच जागी पटकन पाहुन घेण्याची यंत्रणा देखील अस्तित्वात आली. मानसिक गर्भधारणा-वाढ-प्रसुती ही एकत्रितपणेच रूग्णालयात व्हावी याही संकल्पनेने जोर धरल्याने चित्रविचित्र नावांची हास्पिटलेही या यंत्रणेपूर्वी आकाराला आली - पण तिथे जाणे अजूनही बर्‍याच मानसिक गर्भवती टाळतात. यामागे कारणे अनंत आहेत. बाळ झाल्यानंतर तिथे होणारे अतोनात कौतुक, होणारी अतोनात टीका आणि मानसिक गर्भपात, अनंत विषयोपभोगातून जन्मास येणारी लुळी-पांगळी-आंधळी अपत्ये, अस्फूट मानसिक गर्भधारणेतून चाललेला काथ्याकूट ही ह्रदयद्रावक परिस्थिती पाहून नवख्या माता सहसा या हॉस्पिटल्सच्या खिडकीतून डोकावतात जरूर, पण स्वत: मात्र तिथे प्रसूत होत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता मानसिक प्रसुतीशास्त्राचा उगम, विकास, सद्यस्थिती आणि संभाव्यता यात संशोधनाला भरपूर वाव आहे.  

६ ऑगस्ट, २०१०

शास्त्रज्ञ

मी ऐकलंय, एक शास्त्रज्ञ होता. मोठा शास्त्रज्ञ. विशेषकरून विद्युत-यंत्रांबाब त्याची विलक्षण क्षमता होती. तो आपल्या मोठ्या मुलीमुळं काळजीत होता. कारण एक मुलगा त्याच्या मुलीमागे लागला होता. जुन्या वळणाचा बाप असता तर त्यानं काठीनं मारून हाकलून दिलं असतं. पण तो जुन्या वळणाचा नव्हता, आधुनिक माणुस होता. पण आधुनिकता तर वरवरच राहाते ! अंतर्यामी तर जुनंच चालंत राहातं! तेव्हा अंतर्यामी तरी बाप वैतागायचा की हे काय... त्या मुलाला तो माकड म्हणायचा - की ते माकड कुठे आहे, पुन्हा आलं माकड वगैरे...
ते त्याला अगदी सहन होत नव्हतं. अन तो तासन तास दिवाणखाण्यात बसून त्या मुलीशी गप्पा मारायचा. मध्यरात्रीपर्यंत दोघं बसून गप्पा मारायचे. शेवटी सारं त्याच्या सहनशक्तीपलीकडे गेलं. तो खूप बेचैन व्हायला लागला की हे दोघं बसून करतात तरी काय ! आधुनिक बाप होता त्यामुळे मध्ये जाऊन उभादेखील राहू शकत नव्हता ! जुना जमाना तर गेला की मध्ये जाऊन उभं व्हावं..कारण त्यानं आधुनिकपण मरतं. लोक म्हणतात, "त्यात काय! मुलगी तर प्रेम करणारच !...अन माकड? माकड तर सारेच आहेत ! डार्विननं सिध्दच केलं आहे, तेव्हा त्यात काय ! सारी माकडाची अपत्यं आहेत!...तेव्हा हेदेखील ठीक!.. शिवाय मुलीला पसंत आहे मग तुमचं काय जातं!..."
तेव्हा त्यानं एक युक्ती शोधून काढली. तो मोठा शास्त्रज्ञ होता...त्यानं ज्या खोलीत मुलगी अन मुलगा बसून प्रेमालाप करत तिथे छताला एक यंत्र बसवून टाकलं अन आपल्या खोलीत एक रडारचा पडदा लावला. त्या यंत्रानं त्या पडद्यावर रंग उमटायचे. जर मुलानं मुलीचा हात धरला..साहाजिकपणे...दोघं तरूण होते, नुकतेच प्रेमात पडले होते...तेव्हा जेव्हा ते हात पकडायचे तेव्हा बरीच उष्णता निर्माण व्हायची..तेव्हा ते जे उष्णता निर्माण व्हायचं यंत्र होतं ते लगेच उष्णता पकडायचं...अन पडद्यावर लाल रंग उमटायचा! तेव्हा त्याला उमगायचं की, "हं ! माकडानं हात धरला वाटतं !" जर त्यांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तर हिरवा रंग यायचा !..."अस्सं ते माकड मुलीचं चुंबन घेतं आहे तर..." कधी ते मिठी मारायचे तर निळा रंग यायचा...तर त्यानं असे रंग बनवले होते.
एक दिवस, शास्त्रज्ञांची एक कॉन्फरन्स चालू होती तर त्याला जावं लागलं. तो अगदी नाईलाजानं गेला. कारण जेव्हा तो बाहेर पडत होता तेव्हा ते माकड आत शिरत होतं ! तेव्हा तो आपल्या लहान मुलाला म्हणाला की, "बेटा ! तू आत जाऊन बस. तिथे पडदा लावला आहे त्याकडे पाहात राहा. अन कागद घेऊन नोंद करत जा की कुठला रंग कुठल्या क्रमानं आला..."
मुलाला काही ठाऊक नव्हतं की या रंगाचा अर्थ काय आहे? मुलाला तर वाटलं की वडिलांनी एक काम सांगितलं आहे. तेव्हा तो अगदी उत्साहानं जाऊन बसला अन लिहू लागला की कुठला रंग आधी आला, कुठला मागुन आला, केव्हा कुठला रंग आला...अन बाप घाईनं कॉन्फरन्सला गेला की कशी तरी संपवून यायची..त्याला तर हीच काळजी होती की तिथे कुठले रंग येताहेत !
पण तो घरी यायच्या आतच मुलगा धावत कॉन्फरन्स-भवनात पोचला, बापानं विचारलं "की काय झालं? असा धावत का आलास?" तो म्हणाला बाबा ! कमाल झाली ! बापानं विचारलं, "काय झालं लौकर बोल !" तो म्हणाला, "अहो, इंद्रधनुष्य उमटलं आहे...!"
त्याला तर काही ठाऊक नव्हतं ! सारे रंग एकाच वेळी उमटत होते!

(साभार)
एस धम्मो सनंतनो
धम्मपद
रजनीश


३ ऑगस्ट, २०१०

For Mr. Vasudeo

Dear yashwant,

I think Rajnish had great ability in spirutual field but he sleeped on that way.What do u think?

Some Mr. Vasudeo has asked me this question on my post about Rajneesh. There is no weighing machine to figure out one’s ability in any field. It is certain that when we see a personality like Rajneesh we expect much from him – much more. Rajneesh is the most complex thing in the spiritual world.

Still from my personal experience on Rajneesh teachings, I feel myself in position comfortable discussing what he did, why he did & what has become of whole his business. When one comes to know the ultimate truth (as they say) there remains nothing on his part – he is finished there. Such person disappears totally still he remains as the catalytic agent means things will start happening around such person. His actions are no more motivated by the self. Whatever he does is as simple as any person’s actions but it has tremendous mass appeal.

Generally Enlightened person avoid talking much because there nothing left worth discussing on his part. But in case of Rajneesh he choose exactly contrary way – he discussed all, talked much more than anyone in the whole world, tried hard reading all types of mystics ever walked on this planet & he came forth with idea of Zorba the Buddha. Nothing is new under the sun. But this idea appealed to the Western world. Most of his Western followers were already living a life of Zorba & Rajneesh proposed them to add Buddhahood in their lives which had to gather tremendous appeal as one can guess where whole this venture is leading to. Before Rajneesh Swami Vivekananda, Paramhans Yogananda & lateron Maharshi Mahesh Yogi had introduced all Indian spiritual stuff to the West. But Rajneesh gathered much appeal as he has another product of Tantra & sexual practices which was prohibited for above three heralds by the traditional thinking.

Oregon, where Rajneesh was residing with his followers become a state of utopia which was a threat to USA & their policies. Now, Rajneesh must not be held responsible nor should be given credit for what happened in Oregon because he was just a catalytic agent in whole the business i.e. speaking against Christianity, USA policies on War etc. He was aware of the results of his blah blah. Even he proposed the idea of floating cities in the ocean – means a new world apart.

Up to this period Rajneesh himself had become Zorba the Buddha who had 92 Rolls Royce’s, Diamond wrist watches, private airport, plane & all types of luxuries. I even suspect that he was trying to keep his body intact for more years than a general human being which I gather from his usage of Nitrous Oxide. But this usage turned into an addiction for him.

Rajneesh’s long time followers who had came in line with Rajneesh in context of spiritual experiences, now started leaving him as they were interested in setting up themselves Zorba the Buddha & their own regimes. This resulted in a wave of Enlightened persons all over the globe & new spiritual market flourished in the West.

What became of Rajneesh followers & his teaching is world got many enlightened Masters including conmen who claimed enlightenment. Osho Internatioanal Foundation, Pune now a resort is another topic to discuss.

Some of unique personalities like U. G. Krishnmurty seeing whole the mess created by Rajneesh & other enlightened persons at large, rejected whole ideas of East including enlightenment, which was really a man apart. I think this answers most of your queries.

तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा

माझ्या आयुष्यावर परिणाम करून गेलेला तुकाराम हा एक जबरदस्त माणूस. तुम्ही लोक कसे आहेत हे हजार सांगू शकाल हो, पण तुम्ही स्वत: कसे आहात हे सांगायला तुकारामाचीच छाती लागते; आणि ती तिन्ही त्रिकाळ उघडी असावी लागते, तिच्यात येत असलेले उमाळे भडाभडा बाहेर पडू दिले नाहीत तर ते तसेच साठतात आणि दुर्गंध येऊ लागतो, सेप्टीकही होण्याची शक्यता असते. आता तुकाराम वरच्या अभंगात स्वत:लाच सांडा म्हणून घेतायत. सांड पाहिलाय का कधी? अगदी माझ्यासारखाच असतो! लोक जवळ जायला घाबरतात त्याच्या. कारण त्याचं काही सांगता येत नाही - कधी शिंगावरही घेईल, कधी धडकही देईल, तर कधी शांतपणे उभा राहील, चोंबाळू (आता हा शब्द कळायला खेड्यात जन्म घ्यावा लागतो) देईल. त्याच्याबद्दल तुम्ही काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही.

मग सांड एवढा भयानक असतानाही, पोरे आणि रांडा कशी काय त्याची विटंबना करू शकतात बरे? इथे थोडासा घोळ आहे. हे जरा समजून घ्यावं लागेल. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती असं तुकाराम म्हणालेत. दोन विरूध्द दिसणार्‍या गोष्टी जेव्हा चित्तात एकत्र येतात ना, तेव्हा तिथे एक रासायनिक प्रक्रिया घडते. जसं ३ + २ एकत्र केलात तर ५ होतात. आता या ५ मध्ये ३ नाहीत का? २ नाहीत का? आहेत ना. दोन्हीही आहे तिथं. पण हे दोन्ही असूनही ५ चं एक वेगळं अस्तित्व आहे. याच चालीवर विटंबना आणि सन्मानसुध्दा चित्तात एकत्र होतात, तेव्हा विटंबनाही तिचा गुण हरवून बसते आणि सन्मानही त्याचा गुण हरवून बसतो. या दोन्हीतुन एक वेगळंच रसायन तयार होतं - त्याचं नाव सेलिब्रेशन, उत्सव. आता सेलिब्रेशन-सेलिब्रेशन मध्येसुध्दा फरक आहेत. गुत्त्यात जाऊन दोन चपट्या आणि छटाक खारे शेंगदाणे आणि एकमेकांच्या अंगावर ओकायला ना न म्हणणारे मित्र यांच्यासोबतही जे होतं त्यालाही लोक सेलिब्रेट केलं म्हणतात. म्हणोत. पण तुकारामांच सेलिब्रेशन वेगळं आहे. ते चोवीस तास, श्वासा-श्वासातून, शब्दा-शब्दातून चालू असतं. नव्हे, तिथं फक्त सेलिब्रेशनच असतं. तिथे सन्मानही नसतो, विटंबनाही नसते. तरी तुकारामांनी "विटंबना" हा शब्द का वापरलाय? तर इतर पामरांच्या सोयीसाठी. तुकाराम हा कधीच फिनीश झालेला आहे. त्यांच्या जागी फक्त आता सेलिब्रेशन शिल्लक आहे. पण तरिही तुकारामांना सगळं दिसत असतं. या मुर्खांना आयुष्यात फक्त बिटंबनाच ओळखीची आहे - दे आर फॅमिलीअर विथ इट. त्यांना सांगितलं मी चोवीस तास ब्रम्हानंदात तल्लीन आहे तर त्यांच्या डोक्यात ते घुसेल की नाही याचा विचार तुकारामांनी केलेला असतो - म्हणून तुकाराम असे शब्द वापरतात. धीस इज ऑल मिस्टीसिझम. तुकारामांनी माझ्या जीवनावर या अर्थाने परिणाम केला की जणू ते सांगत असावेत - बाळ, तु तुझं तेवढं बघुन घे, बाकी जगाचं बघायला तो विठ्ठल समर्थ आहे. पण मला तुकारामांसारखं "काय माय झविली भुते, म्हणूनी हरि न ये मुखासी" असं काहीसं जबरदस्त लिहायचं होतं. पण हरिचा नि माझा तसा काही संबंध नव्हता, कोण हरि, कुठला हरि, काय त्याचा आणि माझा संबंध. आपलं हे असं आहे. जे माझ्या ह्रदयाच्या तारा झंकारू शकत नाही, ते माझं नाही - जे माझ्या ह्रदयाच्या तारांमधून थोडासाही नाद निर्माण करू शकतं ते माझंच आहे. तुकारामांनी लिहीलेलं "गायनाचे रंगी शक्ती अद्बुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी" हे जर बाबा महाराज सातारकरांच्या आवाजात मी ऐकलं ना, तर हार्ट अ‍ॅटॅक येऊन पडतो की काय एवढा मोठा उमाळा उसळतो ह्रदयात. होतं का असं कधी कुणाला?? मला होतं. आणि हे मलाच एकट्याला का होतंय? इतर लोकांना का होत नाही हा प्रश्न मला कधी पडत नाही. आपलं आपलं बघून घ्या, लोकांना त्यांचा मेंदू आहे, ह्रदय आहे, आता ते नसेल वाजत, नसेल उसळत तर तो लोकांचा प्रश्न आहे. तुका आपला देहूच्या रस्त्यांवर वीणा-चिपळ्यांच्या तालावर गातो आहे, नाचतोच आहे.

२ ऑगस्ट, २०१०

While Reading

While reading this write up never misunderstood yourself that you are able to understand this. If you are able to understand last sentence you will not read further. I am not sitting here with readymade stuff contained in my brain & not at all interested in injecting any ideas into your brain. This is life speaking. Never put me in line with you just because we are humans alike & we have some common traits. We are totally different, totally unique in every way. Just because you can identify words in this language, which is common trait between you and me, you do not get the privilege of UNDERSTANDING. Understanding is everyone’s private matter & it remains totally private whole the life. I cannot convey you what is understood by me & there is no way you are able to do it yourself. In the whole human history real language of communication never existed & will never exist. That’s why all the time there is great chaos around. What we use to say things are just some common signs i.e. words but there is no guarantee that we will be able to lead up to the destination using these signs. But there is full guarantee that these signs will totally mislead each other of us. You will suffocate if I go on writing this stuff. So enough now.

१ ऑगस्ट, २०१०

आजचे सिध्दयोगी

लहानपणीपासून आपण सर्वांनी सिध्द योग्यांच्या कथा ऐकल्या असतील. की अमुक हा सिध्दपुरूष हवेतून पैसे काढू शकतो (सत्यसाईबाबा* आठवू नका लगेच, तो एक मूर्ख माणूस आहे), हवेत उडू शकतो, मेलेला माणूस जीवंत करू शकतो इत्यादी इत्यादी. या सिध्दयोग्यांना जनरल पब्लिकमध्ये थोडा जास्त उच्चीचा दर्जा असतो; कारण सर्वसामान्य लोक जे करू शकत नाहीत ती गोष्ट ते सहजी करीत असतात. अर्थातच त्यांच्याबद्दल कुतूहल असते, ते गूढ वाटतात आणि त्यांच्यासारखंच आपल्यालाही करता आलं असतं तर किती बरं झालं असतं असे वाटून जाते. पण त्यांचे मार्ग भयानक असतात, त्यांनी कठोर साधना केलेली असते, तप केलेले असते असं आपण ऐकतो. थोडक्यात माणसांची ही जमात माणसांपासून वेगळी असते. पण अखिल पृथ्वीवर पसरलेल्या माणूस नावाच्या जातीत काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये आहेत. उदा. बुध्दी. वर उल्लेखिलेल्या योग्यांनी त्यांनी केलेल्या चमत्काराच्या बाबतीत उरलेल्या माणसांच्या बुध्दीला कुलूप लावलेले असते. जनरल पब्लिकला त्यातले सिक्रेट कळू शकत नाही. पण जनरल पब्लिकमध्ये सुद्धा असे अनेक
सिध्दयोगी असतात. उदा. इंजिनिअर्स, डॉक्टर्स, वकील, सुतार, लोहार, चांभार इ.
मानवी जीवनाची आध्यात्मिक आणि भौतिक अशी जी विभागणी केली जाते ती निखालस चुकीची आहे. पुण्यात कुठल्यातरी घरात यजमानाच्या वतीने मंत्रपठण करून घरात मांगल्याचे वातावरण निर्माण करीत असलेले गुरूजी आणि त्याच घरातून न्यूयॉर्कमध्ये जाऊन एखाद्या संगणकाच्या कंपनीमध्ये स्वत:ची बुध्दी वापरून यंत्राबळाच्या मदतीने गुरूजींचा आवाज रेकॉर्ड करू शकणारा इंजिनिअर यांच्यामध्ये कसला फरक आहे? फक्त गुरूजी जे करीत आहेत त्याबद्दल श्रध्दा (व्हेरी डेंजरस थिंग), त्यांच्या बडबडीतून कुठलातरी देव खूश होऊन आपले कोटकल्याण करील अशी खूळी आशा लोक का धरतात? हे इंजिनिअर लोक संगणक तयार करताना एवढी डोकेफोड करून प्रोग्रॅम लिहीतात, त्यातले अक्षर न अक्षर अचूक असले तरच ते आचरीत असलेल्या योगाचे फळ म्हणून तयार होणारा संगणक अचूकपणे काम करू शकतो ना? तो देखील विशेषप्रकारचा मंत्रपाठच आहे. माझ्यासारख्या काही लोकांना तो जमत नसला म्हणू आम्ही काही आमच्या घरचा संगणक दुरूस्त करायला येणार्‍या इंजिनिअरचा फोटो घरात लावत नाही. जुन्या पठडीतल्या योग्यांपेक्षा हे आजचे सिध्दयोगी लक्षावधीपटींनी जास्त प्रॉडक्टीव्ह आहेत, रिअलिस्टीक आहेत, ते करीत असलेली गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तरीही त्या बिचार्‍यांना कुठल्यातरी ज्योतिषाचे पाय धरावे वाटतात हे त्या ज्योतिषाचे भाग्य आहे आणि पाय धरणार्‍यांची बौध्दीक दिवाळखोरी ! या पाय धरण्यामागे माणसात असलेल्या भविष्यात डोकावण्याच्या औत्सुक्याने, त्याला वाटणार्‍या असुरक्षेने माणसात असलेल्या बुध्दीला टांग मारून ज्योतिषाच्या टांगांसमोर लोटांगण घेतलेले असते. मी पण असे लोटांगण घेण्याच्या तयारीत होतो. धोंडोपंत गवाह है. पण धोंडोपंतांनी त्यांच्या बॅंक खात्याचे तपशील दिले आणि मला सगळाच तपशील कळला ! (आता धोंडोपंतांनी मला कितीही शिव्या देवो मी आधीच सांगून ठेवतो की आय स्टील लाईक स्टोरी टेलींग स्टाईल, दी फर्मनेस इन स्टेटमेंटस ऑफ धोंडोपंत)

सत्यसाईबाबा*
सत्यसाईबाबा एकदा जाहीर कार्यक्रमात नेहमीप्रमाणे हवेतून स्वीस घड्याळ काढून दाखवत होते. पी.सी. सरकार हे विख्यात जादूगारही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तिकडे सत्यसाईबाबांनी हवेतून घड्याळ काढले आणि इकडे पी.सी. सरकार यांनी हवेतून कबूतर काढून दाखवले. बाबांचे भक्त सरकार यांना मारहाण करायला उठले.