युजी कृष्णमूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
युजी कृष्णमूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

५ ऑक्टोबर, २०१०

युजी कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

आतापर्यंतचा युजींचा प्रवास रेखाटून झाल्यानंतर आणि या लेखमालेत “त्या स्फोटाचा” ओझरता का होईना पण संदर्भ आल्यानंतर युजी ज्याला कॅलॅमिटी:चक्रीवादळ म्हणतात ते नेमके काय हे पाहाणे मनोरंजक आहे. सुदैवाने युजींच्या या प्रवासाबद्दल मिनीट-टू-मिनीट नोंदी उपलब्ध आहेत, खुद्द युजींच्याच तोंडून नेमके काय आणि कसे घडले त्याचा वृत्तांत उपलब्ध आहे आणि आजही जिज्ञासूंना तो ऐकायला, वाचायला मिळतो.  “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” हा प्रश्न काही काळ शरीराच्या रोमरोमात भिनला, पेटून उठला आणि तो प्रश्नच युजींचे अस्तित्व बनून गरगरत राहिला, गरगरत राहिला आणि अचानक गायब झाला. युजींमध्ये निर्माण झालेल्या या मूलभूत प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते किंवा ज्या स्थितीत ते खेचले गेले ती स्थितीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणावे वाटते. उत्तरच नाहीय असे दिसल्यानंतर तो मूलभूत प्रश्न गायब होण्याची परिणिती शरीराच्या आत, बाहेर आणि एकूणच युजी म्हणून जी कुणी व्यक्ती होती तिचा मानवी इतिहासात कधीही कुणाचा झाला नाही अशा कायापालटात झाली. याबद्दल बोलताना म्हणतात युजी म्हणतात, “तो आत अचानक झालेला एक “स्फोट” होता ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक धमणी आणि प्रत्येक ग्रंथी त्या स्फोटात भाजून निघाली, भडकून उठली. या स्फोटासोबतच विचार सतत टिकून असतो, आत कुठेतरी केंद्र असते हा भ्रम नाहीसा झाला आणि विचारांची जोडाजोड करणारा “मी” त्यानंतर तिथे राहिला नाही.” युजी पुढे सांगतात:
त्यानंतर विचार टिकून राहून त्याची जुळणी होऊन तो उभा राहू शकत नव्हता. विचाराची जुळवाजुळव खंडीत होते, आणि एकदा ती तशी खंडीत झाली की खेळ, खलास! या एकाच वेळी विचाराचा स्फोट होतो असे नव्हे, तर त्यानंतर ज्या-ज्या वेळी विचार उमटतो, त्याचा स्फोट होऊन तो नाहीसा होतो. त्यामुळे हे सातत्य संपून जाते आणि विचार त्याच्या नैसर्गिक तालात पडतो.
तेव्हापासून, या घटनेपासून मला कसलेही प्रश्न पडत नाहीत, कारण प्रश्न तिथे राहूच शकत नाहीत. मला पडणारे सर्वसाधारण प्रश्न उदाहरणार्थ “हैदराबादला कसे जायला लागेल?” असल्या प्रकारचे साधेसुधे प्रश्न असतात जे जगात चालण्याबोलण्यासाठी, साध्यासुध्या कामासाठी आवश्यक असतात. आणि असल्या प्रश्नांना लोकांकडे उत्तरे असतात. पण त्या तसल्या प्रश्नांना (“आध्यात्मिक” किंवा “आधिभौतिक” ) कुणाकडेच, कुठलीही उत्तरे नसतात. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.
डोक्यात असणारी प्रत्येक गोष्ट भयानकपणे ताणली गेली होती – दुसर्‍या कुठल्याच गोष्टीला तसूभरही वाव राहिला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मला सर्वकाही “खचाखच” भरून घट्ट झालेल्या माझ्या डोक्याची जाणीव झाली होती. या वासना (पूर्व संस्कार) किंवा तुम्हाला जे संबोधन योग्य वाटते ते घ्या, त्या काहीवेळा डोके वर काढू पाहातात, पण मेंदूतील पेशी एवढ्या “घट्ट” होतात की वासनांमध्ये गुंतण्याची संधीच मिळत नाही. दुभागणी (पूर्व संस्कार आणि विचारांच्या रूपातून झालेली) तिथे राहू शकत नाही. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणत असतो की, हा “स्फोट” घडून येतो तेव्हा (मी हा शब्द वापरतो कारण ते अणुस्फोटासारखे असते), त्यातून प्रतिक्रियांची साखळी मागे सुटते. शरीरातील प्रत्येक पेशी, हाडाच्या कोषांची प्रत्येक पेशीला या “बदलातून” जावे लागते – मला ते शब्द वापरायचे नाहीत – पण हा एक कधीही न पुसला जाणारा बदल आहे, कसलीतरी अल्केमी आहे.
ते आण्विक स्फोटासारखेच असते. त्यातून संपूर्ण शरीर विखरून जाते. ती साधी गोष्ट नाही; तो माणसाचा शेवट असतो. त्या क्षणांतून जाताना मला भयंकर शारीरिक यातना झाल्या आहेत. तुम्ही तो स्फोट अनुभवू शकता असे नव्हे, तर फक्त त्याचे नंतरचे परिणाम भयानकपणे जाणवतात. या “कायापालटातून” शरीराचे पूर्ण रसायनशास्त्रच बदलते.
त्या (स्फोटा) नंतरचा परिणाम म्हणजे, आता इंद्रिये कोणत्याही समन्वयकाशिवाय किंवा केंद्राशिवाय संचालित होत आहेत – एवढेच मी सांगू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे: शरीराचे रसायनशास्त्र बदललेय – मी सांगू शकतो की रसायनशास्त्रात या बदल घडल्याशिवाय, विचारापासून, विचाराच्या सातत्यापासून ही घडण मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे, त्यावेळपासून विचाराचे सातत्य नसल्याने, काहीतरी घडलेय असे तुम्ही सहज सांगू शकता, पण खरंच, तंतोतंत काय घडलेय, ते अनुभवण्याचा मला कोणताच वाव नाही.


ही गोष्ट मला अपेक्षित होते, मी कल्पना रंगवल्या होत्या, मला बदलायचे होते त्या क्षेत्राबाहेर घडाली आहे. त्यामुळे मी याला “बदल” म्हणत नाही. माझ्यासोबत काय घडलय ते मला खरंच माहीत नाही. मी आता जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त माझे कार्य कसे चालतेय त्याबद्दलचे बोलणे आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कार्य करताय आणि मी ज्या पध्दतीने करतोय त्यात काहीसा फरक वाटू शकतो, पण मूलत: त्यात कसलाही फरक असू शकत नाही. तुमच्यात आणि माझ्यात कसला फरक असू शकतो? कसलाही नाही. पण आपण ज्या पध्दतीने स्वत:ला व्यक्त करतोय, त्यात काहीसा फरक दिसतो. काहीतरी फरक आहे असे मला जाणवतेय आणि तो काय आहे ते मी समजून घेतोय.
या “स्फोटा”दरम्यानच्या आठवड्यात युजींना त्यांच्या इंद्रियांच्या कार्यात काही मूलभूत बदल आढळून आले. शेवटच्या, सातव्या दिवशी त्यांचे शरीर “शारीरिक मृत्यूच्या” प्रक्रियेतून बाहेर पडले आणि त्यानंतरचे बदल ही कायम टिकून राहाणारी वैशिष्ट्ये बनली.
शेवटी: बदलांना सुरूवात झाली. सात दिवसांपर्यंत, प्रत्येक दिवशी बदल घडत गेला. युजींना आढळले की त्यांची त्वचा अत्यंत मुलायम झालीय, डोळ्यांची उघडझाप थांबलीय आणि स्वाद, गंध आणि ऐकण्याच्या संवेदनांत बदल घडलाय.
पहिल्या दिवशी त्यांना आढळून आले, त्वचा की मलमली वस्रासारखी मऊ झालीय आणि त्यावर विचित्र चमक, सोनेरी चमक आलीय. “मी दाढी करत होतो, आणि प्रत्येक वेळी रेझर फिरवताना, ते घसरू लागले. मी ब्लेडस बदलल्या, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या चेहेर्‍याला स्पर्श केला. माझी स्पर्शाची संवेदना वेगळी होती.” युजींनी या गोष्टीला कोणतेही अवास्तव महत्व चिकटवेले नाही. त्यांनी फक्त ही निरिक्षणे केली आहेत.
दुसर्‍या दिवशी त्यांना सर्वप्रथमच आढळून आले की त्यांचे मन, ते नेहमी जो शब्द वापरतात त्याप्रमाणे “पकडमुक्त स्थितीत” आहे. युजी वर असलेल्या किचनमध्ये होते आणि आणि व्हॅलेण्टाईनने काहीतरी टोमॅटो सूप बनवले होते. त्यांनी ते पाहिले आणि ते काय आहे ते त्यांना कळेना. ते सूप आहे असे व्हॅलेण्टाईनेने सांगितले. त्यांनी त्याची चव घेतली आणि मग ते समजले, “टोमॅटो सूपची चव अशी असते तर!.” त्यांनी सूप चाखले आणि परत ते मनाच्या त्या विचित्र चौकटीत शिरले, नव्हे तर ती “मनोमुक्त” स्थिती होती. त्यांनी व्हॅलेण्टाईनला पुन्हा विचारले “हे काय आहे?” पुन्हा व्हॅलेण्टाईन म्हणाली ते सूप आहे. पुन्हा युजींनी चव घेतली, ते गिळले आणि पुन्हा एकदा ते काय होते ते विसरून गेले. माझी काहीकाळ अशी मजा झाली. मजेशीरच होते ते सगळे – ती “पकडमुक्त स्थिती.”
आता युजींसाठी ती स्थिती सामान्य झाली होती. ते म्हणतात आता ते बिलकुल कल्पनारंजन, काळजी, संकल्पना मांडणे किंवा इतर लोक एकटे असताना करतात तसे कोणतेही विचार करीत नाहीत. फक्त गरज असेल तेव्हाच त्यांचे मन उभे राहाते, उदाहरणार्थ, कुणीतरी प्रश्न विचारला किंवा त्यांना टेपरेकॉर्डर दुरुस्त करायचा असेल तेव्हा. अशी गरज संपते तेव्हा, तिथे मन राहात नाही, विचारही राहात नाही. फक्त जीवन राहाते.


तिसर्‍या दिवशी, युजींच्या काही मित्रांना त्यांनी जेवणासाठी बोलावले होते. स्वत: स्वयंपाक करायला ते कबूल झालेले होते. पण त्यांना नेहेमीसारखा गंधही घेता येईना आणि चवही घेता येईना. “या दोन संवेदना रूपांतरीत झाल्या आहेत याबद्दल मला जाणीव झाली. प्रत्येकवेळी माझ्या नाकपुड्यांत कोणताही गंध शिरला तेव्हा  त्यामुळे गंध घेण्याच्या केंद्राला त्रास होऊ लागला – मग तो गंध महागड्या अत्तराचा असो की गायीच्या शेणाचा असो. आणि त्यानंतर मी कधीही कशाची चव घेतली तेव्हा, मला फक्त त्यात जास्त प्रमाणात असलेला घटकच जाणवत असे – इतर घटकांची चव थोडीशी उशीरा जाणवू लागली. त्या क्षणापासून पुढे मला कसल्याही परफ्युमचे काही वाटेना आणि चमचमीत जेवणाबद्दलही काही वाटेना. मला त्यात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाचीच चव जाणवू लागली – तिखट किंवा जे काही टाकले असेल ते.”
चौथ्या दिवशी, त्यांच्या डोळ्यांबाबत काहीतरी झाले. युजी आणि त्यांचे मित्र गेस्टाड मधील रियाल्टो रेस्टॉरंटमध्ये बसले होते. याच ठिकाणी त्यांना बर्हिवक्र भिंगासारख्या प्रचंड “दृष्टी केंद्रणाची” जाणीव झाली. “माझ्या दिशेने येत असलेल्या गोष्टी, माझ्या आत शिरत असल्यासारखे दिसत होते. आणि माझ्या जवळून दूर जाणार्‍या गोष्टी माझ्या आतून बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. मी एवढा कोड्यात सापडलो होतो – माझे डोळे महाप्रचंड कॅमेर्‍याप्रमाणे झाल्यासारखे वाटत होते, आणि मी काही न करता ते त्यांचा अवधान बिंदू बदलत होते. आता मला या विचित्रपणाची सवय झालीय. आजकाल मी असाच पाहात असतो. तुम्ही मला तुमच्या कारमध्ये बसवून घेऊन जाता, तेव्हा माझी कॅमेरा सरसावून हिंडत असलेल्या कॅमेरामन सारखी स्थिती असते. समोरून येणार्‍या कार माझ्या आत शिरत असतात, आणि आपल्याला मागे टाकून पुढे जाणार्‍या कार माझ्यातून बाहेर पडत असतात. माझे डोळे कशावर तरी रोखले जातात, तेव्हा पूर्ण अवधानासह ते तिथे चिकटतात, कॅमेर्‍यासारखे.”
रेस्टॉरंटमधून युजी परत आल्यानंतर त्यादिवशी आरशात पाहात असताना त्यांच्या डोळ्याबाबत त्यांना आढळले की ते “स्थिर” झाले आहेत. ते खूपवेळ आरशासमोर थांबून राहिले आणि निरिक्षण केले तर त्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नव्हती. जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते आरशात पाहात राहिले – पण एकदाही पापण्यांची उघडझाप दिसली नाही! “उपजतपणे होणारी माझी पापण्यांची उघडझाप कायमची संपली होती. ”
पाचव्या दिवशी युजींना त्यांच्या श्रवणेंद्रियात झालेला बदल जाणवला. कुत्रा भुंकत असताना त्यांना ऐकू आले तेव्हा, कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.
पाच दिवसांत पाच इंद्रिये बदलली. सहाव्या दिवशी युजी सोफ्यावर निवांत पडून होते. व्हॅलेण्टाईन किचनमध्ये होती.
“आणि अचानक माझे शरीर अदृश्य झाले. माझ्यासाठी, तिथे शरीर नव्हते. मी माझा हात पाहिला.. “हा हात माझा आहे?” असा प्रश्न नव्हता, पण ती पूर्ण स्थितीच काहीशी तशी होती. स्पर्श वगळता, संपर्काचा बिंदू सोडता इतर काही तिथे आहे असे मला जाणवेना. मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि तिला विचारले “तुला माझे शरीर सोफ्यावर दिसतेय का? ” माझ्या आतून मला काहीच जाणवत नाही की हे शरीर माझे आहे म्हणून. तिने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाली, “हे तुझे शरीर आहे.” आणि तिच्याकडून खात्री करून घेतली तरीही मला बरे वाटेना, माझे समाधान झाले नाही. मी स्वत:ला म्हणालो, “काय गंमत चाललीय ही? माझे शरीर हरवलेय. माझे शरीर सोडून गेले होते, आणि ते कधीही परत आलेले नाही.”
आता त्यांच्या शरीराच्या बाबतीत, युजींकडे फक्त स्पर्श होणारे बिंदूच तेवढे शिल्लक आहेत, कारण, ते म्हणतात दृष्टीची संवेदना ही स्पर्शाच्या संवेदनेपासून विभक्त आहे. त्यांच्या स्वत:च्या शरीराची संपूर्ण प्रतिमा तयार करणे त्यांना शक्य नाही, कारण स्पर्शाच्या संवेदनेच्या अनुपस्थितीत, त्यांच्या अवधानात संबंधीत बिंदू हरवलेले असतात.
आणि सर्वात शेवटी सातव्या दिवशी, युजी त्याच सोफ्यावर पडून होते, आराम करीत होते, “पकडमुक्त स्थिती”ची मजा घेत होते. व्हॅलेण्टाईन आत यायची, तेव्हा ती व्हॅलेण्टाईन आहे हे ते ओळखायचे. ती खोलीबाहेर जायची. त्यानंतर, फिनीश, कोरेपणा – कसलीही व्हॅलेण्टाईन कुठेच नाही. “हे काय आहे नेमके?” व्हॅलेण्टाईन कशी दिसते ती कल्पनाही मी करू शकत नाहीय”, त्यांना वाटायचे. ते किचनमधून येणारे आवाज ऐकत आणि स्वत:ला विचारत, “माझ्या आतून हे कसले आवाज येत आहेत?” पण मला त्या आवाजांशी संबंध काही जोडता येत नसे.” त्यांना आढळून आले की त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या आतल्या समन्वय साधणार्‍या यंत्रणेशिवाय काम करीत आहेत: समन्वयक हरवला होता. आणि तेव्हाच... 
माझ्या शरीरात काहीतरी घडत असल्याचे जाणवले: शरीराच्या विविध भागांतून जीवन ऊर्जा एका दृश्य केंद्राकडे जात होती. मी स्वत:ला म्हणालो, “आता तुझे आयुष्य संपले. तु मरणार आहेस.” तेव्हा मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि म्हणालो, “मी मरतोय व्हॅलेण्टाईन आणि तुला या शरीराचे नंतर काहीतरी करावे लागणार आहे. हे डॉक्टरांना देऊन टाक, कदाचित त्यांना त्याचा वापर होईल. माझा दहन किंवा दफन क्रियेवर विश्वास नाही. तुला हवी तशी या शरीराची विल्हेवाट लावावी लागेलच. एकदिवस यातून दुर्गंध येऊ लागेल. त्यामुळे, ते देऊन टाक कुणाला तरी, व्हॅलेण्टाईन म्हणाली, “युजी, तुम्ही एक परदेशी माणूस आहात. स्वीस सरकार तुमचे शरीर स्वीकारणार नाही. विसरा त्याबद्दल.”   

त्यांचे जीवन बल भयानकपणे एका दृश्य बिंदूवर येऊन पोचले होते. व्हॅलेण्टाईनचे बेड रिकामेच होते. ते त्या बेडवर जाऊन पडले, मरायला तयार होऊन. ते जे बोलत होते त्याकडे व्हॅलेण्टाईनने, निश्चितच दुर्लक्ष केले होते. पण तिथून जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, “एक दिवस तुम्ही म्हणता ही गोष्ट बदललीय,  दुसर्‍या दिवशी म्हणता आणखी दुसरंच काही बदललंय, तर तिसर्‍या दिवशी आणखी तिसरंच काहीतरी बदलतं. काय चालु आहे नेमकं? आता तर तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहात. तुम्ही काही मरणार वगैरे नाही. तुम्ही ठिकठाक आहात, एकदम ठणठणीत” असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. युजी त्यांची आपबिती पुढे सांगतात:
नंतर एक असा बिंदू आला जसे एखाद्या कॅमेर्‍याच्या अपार्चरचा पडदा स्वत:ला बंद करून घेत असावा. ही एकच उपमा मला सुचते. मी आता जे वर्णन करीत आहे ते आणि वास्तविक जसे घडले त्यात फरक आहे कारण त्यावेळी याप्रकारे विचार करायला तिथे कुणीच नव्हते. हा सर्व माझ्या अनुभवाचा भाग असला पाहिजे, नाहीतर मला त्याबद्दल बोलता आले नसते. तर, अपार्चर स्वत:ला बंद करून घेत होते, आणि आणखी काहीतरी होते जे तो पडदा उघडा ठेऊ पाहात होते. त्यानंतर थोड्यावेळाने काहीही करण्याची इच्छा राहिली नाही, ते अपार्चर बंद होणे रोखावेही वाटत नव्हते. अचानक, जसे झाले त्याप्रमाणे, ते बंद झाले. त्यानंतर काय झाले ते मला माहित नाही.
ही प्रक्रिया – ही मरण्याची प्रक्रिया एकोणपन्नास मिनीटे चालू राहिली. तो शारीरिक मृत्यू होता. युजी म्हणतात की अजूनही त्यांना तसे होते:
माझे हात आणि पाय थंड पडतात, शरीर ताठते, हृदयाचे ठोके मंदावतात, श्वास मंद होतो आणि श्वास घ्यायची मारामार होते. एका बिंदूपर्यंत तुम्ही तिथे असता, तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेता आणि मग, फिनीश. त्यानंतर काय घडते ते कुणालाही माहीत नाही.
युजी त्या प्रक्रियेतून बाहेर आले तेव्हा व्हॅलेण्टाईनने त्यांच्यासाठी कुणाचा तरी कॉल आला असल्याचे सांगितले. गोंधळलेल्या स्थितीत ते फोन घेण्यासाठी खाली गेले. काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. ते शारीरिक मृत्यूमधून बाहेर पडले होते. ते कशामुळे परत जगात आले, त्यांना माहित नाही. कितीकाळ तो मृत्यू टिकून राहिला, त्यांना माहित नाही. “मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण अनुभव घेणाराच समाप्त झाला होता: त्या मृत्यूचा अनुभव घेणाराच तिथे बिलकुल नव्हता...”
इथे, या “कॅलॅमिटी”चा एकमेव साक्षीदार डग्लस रोजस्टोन काय म्हणतो ते पाहाणे अगदी सुयोग्य होईल:
चोवीस उन्हाळे उलटले आहेत आता या गोष्टीला, जेव्हा सर्व रूपांतरणांत अत्यंत दुर्मिळ असणार्‍या, हे एकच खरे रूपांतरण आहे असे वाद ज्याबद्दल आहेत त्या रूपांतरणाचा – एका सामान्या माणसाच्या मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा मला साक्षीदार होता आले.  हा माणूस “देव माणूस”, “निवड झालेला” किंवा जगदगुरू असण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस होता. जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी १९६६ च्या उन्हाळ्यात मी सानेनला गेलो होतो तेव्हा या सगळ्याची सुरूवात झाली. त्या दिवशी मी गेस्टाड येथील माझ्या अपार्टमेंटमध्ये होतो. सायंकाळची वेळ होती. चंद्र नुकताच क्षितीजावर आला होता. कशामुळे तरी मला युजींना, त्यांच्या चॅलेटमध्ये कॉल करावा वाटला. मी केला. घराच्या मालकिणीने फोन घेतला. तिने मारलेली “युजीऽऽऽ तुमच्यासाठी फोना आहेऽऽऽ” अशी हाक मला फोनमधून ऐकू आली. तिच्या आवाजावरून व्हॅलेण्टाईनचे काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. ती म्हणाली, “युजींना काहीतरी होतंय, त्यांचं शरीर हलू शकत नाहीय. कदाचित ते मरत असतील.” मी म्हणालो, “जा आणि युजीला बोलवा, मी त्यांना बोलतो.” व्हॅलेण्टाईन म्हणाली, “ते येतील असे मला वाटत नाही.” पण मी अडूनच बसलो. आणि तेव्हा युजी फोनवर आले. त्यांचा आवाज फार दूरून येत आहे असे वाटत होते, “डग्लस, तुच इकडे ये आणि काय होतंय ते पाहा,” एका मेलेल्या माणसाला पाहायला येण्याचे ते आमंत्रण होते. मी पळालो. त्यावेळी रेल्वे चालू नव्हत्या. गेस्टाड आणि सानेनमधील अंतर तीन किलोमीटर आहे. मी चॅलेटमध्ये शिरलो आणि युजींच्या खोलीकडे गेलो. मला ते दृश्य अजूनही चांगलेच आठवते:व्हॅलेण्टाईन भीतीने पांढरीफटक पडली होती, आणि युजी कोचावर होते, शुध्दीवर नव्हते. त्यांचे शरीर धनुष्याकृती सारखे वाकले होते. नुकताच डोंगरावरून चंद्र वर आला होता. मी युजींना उठवू लागलो आणि खिडकीकडे घेऊन गेलो. त्यांनी चंद्राकडे ज्या पध्दतीने पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या खोलीत काहीतरी विचित्र प्रकार चालला होता. मी त्यांना विचारले, “काय होतंय?” ते म्हणाले, “हा शेवटचा मृत्यू आहे.”
महेश भट आणि मित्रांसमोर डग्लसने हे कथन केले आहे. युजींच्या मित्रांपैकीच एक, डग्लसचे आतापर्यंतचे ऐकणारे श्री. मूर्ती डग्लसला मध्येच थांबवत विचारतात, “म्हणजे ते मरणार आहेत असं ते सांगत होते असे तुला म्हणायचे आहे का?” डग्लस, “नाही, ते आधीच घडून गेले होते. युजी म्हणाले माझा फोन आल्याने ते परत येऊ शकले.” मूर्ती विचारतात, “तुझा काय प्रतिसाद होता डग्लस?” “मला खूप आनंद झाला होता; त्यांच्यामुळे मला खूपच आनंद झाला.”
त्यांच्यात काही उल्लेखनीय बदल दिसत होते काय?
“त्यांचे व्यक्तिमत्व बदलले नव्हते. ते नेहमीसारखेच हाताळायला विचित्र असणारा माणूस दिसत होते. पण त्यांच्यावर कसलाच तणाव जाणवत नव्हता. ”














(उद्याच्या भागात कॅलॅमिटी नंतर युजींचे लोकांशी झालेले बोलणे )

६ सप्टेंबर, २०१०

वाचा आणि शोधा

१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.
पाश्वभूमी: युजी कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.

३० जुलै, २०१०

उपसंहार

मराठी शब्दकोषाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काहीही असो, हा शब्द या ब्लॉगसाठी संहारक ठरणार आहे. ब्लॉगच्या समाप्तीची पोस्ट टाकल्यापासून मृताच्या घरी जसे लोक जातात आणि अबोलपणे परततात तसे वाचक या ब्लॉगवर येऊन परत जाताना पाहून मजा वाटत होती. खरोखरचा मृत्यू येण्यापूर्वीची एक चुणूक ! युजी, आय टेल यू - एव्हरीबडी रॉटस लाईक ए गार्डन स्लग व्हेन ही ऑर शी डाईज, बट यू हॅड दॅट एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू स्टेट इट व्हेन यू वेअर अलाईव्ह. आणि म्हातारबा, तेच तुझं सौंदर्य आहे. मी नेहमीच वास्तवावर प्रेम केलं आहे; आणि कुणाही विचार करू शकणार्‍या जीवाचा जसा प्रश्न असू शकतो तसा
माझाही होता - माझं वास्तव काय? मी म्हणजे काय? आणि असे प्रश्न खरोखर
जेव्हा पडतात तेव्हा कुठल्याही पुस्तकी व्याख्या कामी पडत नाहीत.
असा प्रश्न माझ्यात निर्माण करण्याची भूमिका रजनीशांच्या साहित्यानं निभावली आणि हा प्रश्न उखडून फेकण्याची भूमिका यूजींच्या आभासी सहवासानं निभावली. युजी आणि रजनीश हे विचारांच्या (आणि शिकवणुकीच्याही (सॉरी युजी तुमची काहीच शिकवणूक नव्हती, तरीही हा शब्द वापरतोय) दृष्टीनं दोन ध्रुव असले तरी ते एकाच पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत - एकमेकांशी एवढ्या घट्टपणे जोडलेले तरीही एकमेकांपासून कितीतरी दूरवर. रजनीशांची भूमिका अखिल मानवजातीच्या संचितावर हक्क सांगणारी -
तर युजी अगदी दूरवर एकटेच अबोलपणे उभे. थोडक्यात रजनीश म्हणजे जगाच्या बाजारात ओरडून परमात्म्याचा प्रसाद विकणारे, प्रसादावरही प्राईस टॅग ठेवणारे तर युजी परमात्माही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे त्याचा प्रसादही नाही असं निक्षून बजावणारे. तरीही दोघांच्याही हातून परमात्म्याच्या प्रसादाचे तेवढ्याच प्रमाणात वाटप झाले याचा मी साक्षीदार आहे. माझ्या ब्लॉगवरील रजनीशांवरची पोस्ट वाचलेल्या वाचकांना ही पोस्ट म्हणजे घूमजाव वाटू शकतो.
पण आहे हे असं आहे. रजनीश एवढे का बोलले? युजी गप्प का राहिले? तर परमात्मा हा चराचरात व्यापून आहे - ज्याने तो अनुभवला त्याच्यात तो आहेच आहे; पण ज्याला अजून अनुभवायला मिळाला नाही त्याच्यातही आहेच; फक्त त्याला त्याची जाणीव नाही; आणि ही जाणीव त्याच्यात येण्यासाठी त्याने शक्य त्या सार्‍या प्रयत्नांचा अवलंब करायला हवा. ध्यान करायला हवं, विपश्यना करायला हवी, सूफी व्हर्लींग करायला हवी - अगदी संभोगातूनही समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा अशी भूमिका असणा
रे रजनीश. तर हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत (युजींनी ते केले होते), ही बुध्दत्व विकण्याची मार्केटींग आहे, मला हा पवित्र धंदा करण्यात रस नाही, जग हे जसे असायला हवे, अगदी तसेच आहे, त्यात काडीचाही बदल करण्याची गरज नाही असे जन्मभर सांगत राहाणारे युजी. या दोघांमध्येही फार मजेशीर साम्यस्थळे आहेत. उदा. रजनीश आयुष्यभर रोज आहारात एकच-एक पदार्थ घेत असत. एकच पदार्थ रोज! त्यात काहीही बदल नाही. युजींचेही असेच. बुध्दपुरूषांच्या बाबत असे शक्य आहे कारण त्यांच्यात कोणताही अनुभव साठत नाही, चवीचाही नाही. क्षण उलटला की अनुभवही पुसून जातो आणि पुन्हा एकदा आरसा स्वच्छ होतो.

दोघांच्याही उपस्थितीत करिष्मा होता. दोघांकडेही लोकांची रिघ लागलेली असे. रजनीशांचा वावर अत्यंत यांत्रिक वाटणारा, ताठर, संथ तर युजींसोबतचे बोलणे म्हणजे लहान मुले आपल्या आजोंबासोबत बसून जेवढ्या सहज गप्पा मारू शकतात तेवढे सहज! रजनीश लोकांशी अंतर राखून बोलतील, "दर्शनाची" वेळ देतील, मी महत्वाचा आहे, माझा आदर राखायलाच हवा हे लोकांच्या मनात ठसवतील. हे वर्णन कल्प-कल्पांतापर्यंत चालू शकेल. हेच नेति नेति. हे थांबण अशक्य आहे. ब्लॉग थांबला, न थांबला तरी!

२१ जुलै, २०१०

वेगळा


नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ।

असं कुठल्यातरी उपनिषदात सांगण्यात आलंय. म्हणजे माझा आत्मा मी कितीही प्रवचने ऐकली, कितीही बुध्दीला ताण दिला कुणाच्याही कितीही बाता ऐकल्या तरी तो मला मिळू शकत नाही. मला संस्कृत कळत नाही. आणि मी आत्मा काय आहे त्याचा हिशेबही इथं मांडत नाहीय. युट्यूबवर युजी कृष्णमूर्तींकडून वरचे वचन ऐकले; आणि युट्य़ूबवर पाहाता येतील तेवढ्या क्लिप्स पाहिल्या. हे युजी कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) वेगळे आणि जे कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) वेगळे. साध्या सोप्या शब्दांत यांची ओळख म्हणजे, तुम्ही जर यांना ऐकलंत तर तुमच्यासमोर फक्त एकच पर्याय शि
ल्लक राहातो: स्वत:ला दोरीच्या मदतीने कुठल्यातरी उंच झाडाला टांगून घेणे (दोरी मानेभोवती असणे आवश्यक). तुम्ही तेवढे संवेदनशील आणि कच्च्या दिलाचे असाल तर दुसरा पर्यायच शिल्लक राहात नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा पुढचा शोध जपूनच घ्या. एवढं सगळं असेल तर मी हा मजकूर लिहायला शिल्लक कसा? मी हे का लिहीतोय? कारणे तीन: १. मी शिल्लक आहे कारण मी कच्च्या दिलाचा नाही आणि २. मराठीत अजून कुठल्या ब्लॉगकारानं किंवा वेबसाईटवाल्यानं त्यांच्यावर काही लिहील्याचं बाबा गुगलनाथ दाखवत नाही. फक्त लोकसत्तानं त्यांच्या मृत्यूची काय ती बातमी छापलीय. अगदी परवा, २००७ मध्ये गेले ते. ३. मला हा माणूस आवडला.
मला रजनीशपण आवडले होते - पण रजनीश एवढा बोललाय, एवढा बो
ललाय की त्याचे बोलणे ऐकण्यातला आणि त्याचे बोलणे ऐकून-ऐकून माझ्याच बोलण्यातला इंट्रेस्ट निघून गेलाय! बट युजी इज अ डिफरंट मॅन. एन्लायटन्मेंट, ध्यान, धर्म, जीवन, साधना याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना युजींचा आपल्याला ऐकू येणारा सूर तद्दन नकाराचा, टोकाचा निराशावादी! थोडक्यात त्यांना स्पिरिच्युअल टेररीस्ट म्हणता येईल. युजी स्पष्टपणे सांगतात - माझ्या संदेशावर (तुम्हाला हाच शब्द वापरायचा असेल तर) कॉपीराईट नाही. तुम्ही त्याचा अर्थ लावा-गैर अर्थ लावा, विश्लेषण करा-गैर विश्लेषण करा, एवढंच काय तुम्ही स्वत:च त्याचे लेखक आहात असे म्हणा, त्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.
भारताच्या आतापर्यंतच्या धार्मिक, आध्यात्मिक संचिताच्या अगदी टोकाची, तीव्र विरोधाची युजींची भूमिका आहे.
एन्लायटन्मेंट्ला युजी कॅलामिटी (चक्रीवादळ, विनाश) म्हणतात. मारूतीच्या बेंबीत गार लागतंय, असे बेंबीत बोट घालून विंचू चावून घेणारे सगळेच म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतो - हा विनाश आहे, एन्लायटनमेंटच्या मागे असणार्‍या लोकांच्या कल्पनेतही नसेल अशी ही गोष्ट आहे. ही कुणालाही नको असेल; पण तिच्याच मागे लोक पागल झाले आहेत असे युजी सांगतात.
युजींची वचने:-
बुध्दा वॉज ए बिग्गेस्ट बास्टर्ड !
जीसस सेड "आय अ‍ॅम दि वे" अ‍ॅण्ड ऑल दि फूल्स लॉस्ट देअर वे !
वेदकालीन लोकांनी सोमरस पिऊन बडबड केली आहे. अहं ब्रम्हास्मि !
गॉड अ‍ॅण्ड सेक्स गो टुगेदर. इफ गॉड गोज, सेक्स गोज टू!
मसिहा म्हणजे स्वत:च्या मागे गबाळ ठेऊन जाणारा माणूस.
गुरू सामाजिक भूमिका निभावतात, वेश्यासुध्दा तेच करतात!
जीसस, बुद्ध आणि कृष्ण यासारख्या मॉडेल्सकडे पाहून निसर्ग आणखी सुंदर मॉडेल्स बाहेर फेकू शकतो हेच आपण विसरलो आहोत.
मी तुम्हाला फक्त एवढीच खात्री देऊ शकतो की तुम्ही जोपर्यंत सुख शोधत राहाल, तोपर्यंत ते मिळूच शकणार नाही.
तुम्ही कल्पना खाता अन्न नव्हे, तुम्ही उपाध्या आणि लेबल्स पांघरता, कपडे घालत नाही.
निखळ सत्य म्हणजे, तुम्हाला काहीही अडचण नसताना तुम्ही अडचणी उभ्या करता. तुम्हाला प्रश्न पडत नाही तेव्हा तुम्ही जीवंत आहात हे तुम्ही मानतच नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रदुषणाने माणसे खंगून गेली आहेत, वातावरणाचे प्रदुषण किस झाड की पत्ती!
निसर्ग अद्वितीय माणसे तयार करण्यात गुंतला आहे, तर संस्कृतीने एकच साचा शोधला
आहे आणि त्यात सर्वांनी स्वत:ला ठोकून बसवायचं!
तुम्ही जे पाहात आहात त्याबद्दलची अक्कल वापरूनच तुम्ही त्या गोष्टींकडे पाहात असता, त्यामुळे ती गोष्ट खरी कशी आहे ते कळणं कधीच शक्य नाही - कारण तुमची अक्कल नेहमीच मध्ये डोकावणार.
माझं बोलणं म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे.
तुमच्या अकलेवर उभा असलेला अनुभव हा आभास आहे.
तुम्हाला काही कळत नसूनही तुम्ही बडबड करता, जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही काहीच बोलू शकत नाही.
मी लोक जागरणाच्या पवित्र धंद्यात नाही - इथून तुमचे तोंड काळे करा (प्रश्न विचारायला आलेल्या लोकांना बोलताना).
ज्यादिवशी माणसाला जाणीव कळली त्या दिवशीपासूनच तो स्वत:ला तीसमारखां समजू लागला आणि तो तोडला जाऊन तिथंच त्यानं स्वत:च्या विनाशाची बीजं रूजवली.
माणूस मेल्यानंतर निसर्ग त्याच्या शरीरातील घटकांचा पुनर्वापर करतो; त्या अर्थानं माणूस अमर आहे.
गुरू हे छा-छू अनुभव देणार्‍या कल्याणकारी(??) संस्था आहेत. तो एक फायदेशीर धंदा आहे. वर्षात दोन अब्ज डॉलर्स कमवून दाखवा बरं दुसर्‍या धंद्यात!

अशी अगाध वचनं सांगणारे युजी त्यांच्याकडे आलेल्या लोकांना अक्षरश: रडवून सोडत. कंम्प्लिट डिस्पेअर, क्लिनीकल डेथ इज नीडेड! त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वत:भोवती कोणती संस्था उभी राहू दिली नाही. वेळ पडेल तेव्हा सगळ्या गुरूंना झोडपून काढले. सुरूवातीला गबाळ गुरूंना झोडपून ते रजनीशांसारखे महागुरू बनले नाहीत. ते त्यांनीच केलेल्या विधानाला पुढच्या विधानात खोडून काढत; आणि खांदे उडवून आ
हे हे असंच आहे असे सांगत. त्यांनी कितीही हाकलले तरी देश-विदेशातील लोक त्यांच्याकडे जात असत; आणि मार खात असत.
मी काही महिन्यांपूर्वी युजींना युट्य़ूबवर ऐकले, तेव्हा त्यांची आक्रस्ताळी शैली पाहून तात्काळ क्लिप बंद केली होती. जो एवढ्या मोठ्यानं ओरडतोय, एवढा कर्कश्श्य आहे त्याला काय माती कळलं असणार असे वाटले होते. आणि ते दिसतातही भयानक (तुम्ही आणखी भयानक माणसं पाहिली असतील तर ती गोष्ट वेगळी!). त्यांच्यावरच्या एका वेबसाईटवर तर चक्क लिहीलंय की या माणसाचा नुसता फोटो पाहिलात, काही शब्द वाचले तरी तो तुमच्यामध्ये व्हायरस सारखा घुसेल; आणि मेंदुतल्या सगळ्या रचना पोखरून काढील.
युजी हा माणूस खरंच उपयुक्त आहे की नाही, त्यांच्या बोलण्यामुळे आत्महत्त्या करून घ्यावी लागेल, तर वाचा कशाला? असा विचार मी करू शकत नाही. कारण माझा प्रश्न वेगळा आहे. ध्यानाच्या दुष्टचक्रातून मला बाहेर पडायचं आहे; आणि ते सोपं नाही. त्यासाठी अत्यंत टोकाची निराशा हवी आहे. निश्चितच, परिणाम मला माहीत नाहीत. रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही! काही दोस्त मिळाले तर उत्तमच.

सिनेनिर्माते महेश भट यांनी युजींचं चरित्र लिहीलंय. रजनीशांच्या गुरूगिरीला कदरून जाऊन (आणि कदाचित युजींना भेटल्यामुळे) महेश भट यांनी रजनीशांच्या माळेचे तुकडे करून ती संडासात फेकली. बेशर्त प्रेमाच्या बाता मारणार्‍या रजनीशांनी महेश भट यांना "मला सोडून जाऊ नकोस, वाटोळे करून टाकीन" अशी धमकी दिली होती. रजनीश हा असा मादरचोद देवमाणूस होता. मला खरंच रजनीशांबद्दल लिहीताना स्वत:ला आवरता येत नाही राव.
लिहीण्यासारखं पुष्कळ आहे - पण ड्राईव्ह टिकत नाही.
चलो. पुढचे आठ दिवस एवढं पुरेल. बाय!