५ एप्रिल, २०१०

आता नाय थांबायचं !


ऎवीतेवी आज ना उद्या मरायचंच आहे ना? कशाला मग स्वत:चे विचार दाबून ठेवता? तुम्ही खलास झालात तर तुमचे विचार पण तुमच्या सोबतच दफ़न होणार. कुणी सुद्धा विचारणार नाही की, "बाबू, तुझ्या मनात काय होतं?, काय म्हणंन काय होतं तुझं?"
पण विचारच लिहायचेत तर शेळी लेंड्या टाकत जाते तसे शब्द कशाला टाकायचे? काहीतरी बोचणारं, मेंदुला हजार व्होल्टचा झटका देणारं असायला पाहीजे.
साधा माणूस व्हायचं म्हणजे एक ताप आहे का? नजर जाते पार सोनेरी क्षिताजाच्याही पुढे, पण पायाखाली असते फसफसती घाण. ओ..जरा थांबा, त्या चिखलातच कमळं फुलण्याच्या गोष्टी बास झाल्या आता - पार गाभण झालो त्या पाणचट कथा ऎकून.
साला आता आपण एकच करणार - आपल्या मनाचे वारु दाहीदिशांना मोकाट उधळून देणार - मग त्या वारुच्या दौडीने कुणाच्या अंगावर घाण उडाली नाहीतर कुणी त्याखाली चेंगरून जखमी झाला तर होऊद्या - आता नाय थांबायचं !

३ टिप्पण्या: