१७ डिसेंबर, २०१०

दिलखुलास

नमस्कार वाचकहो!
आजची पोस्ट तुमच्यासाठीच आहे. हा ब्लॉग सुरू होऊन जवळपास सात आठ महिने झालेत. या ब्लॉगवरची प्रत्येक पोस्ट या ना त्या रूपात वाचकांशी संवाद साधण्यासाठीच असली तरी आजच्यासारखा थेट संवाद सुरू करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. सुरूवातीला मी या ब्लॉगपुरताच मर्यादीत होतो. नंतर मग मिसळपाव डॉट कॉम, मायबोली, मीमराठी या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतले आणि तिथे नियमीत लिहू लागलो; त्यामुळं ब्लॉगकडे येणं फक्त पोस्ट टाकण्यापुरतंच होऊ लागलं. अधेमध्ये पोस्ट आवडून गेल्याचे अनेक वाचकांचे मेल्सही आले; पण ते तेवढ्यापुरतंच. ब्लॉगवर वाचकांशी संवाद असा झालाच नाही. त्या-त्या पोस्टवर एखाददुसरी प्रतिक्रिया आली तरी मी ब्लॉग नेहमी पाहात नसल्याने, प्रतिक्रिया येऊन बरेच दिवस उलटलेले असत आणि मला त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला कंटाळा होत असे. कदाचित यामुळेही वाचकांनी फक्त ब्लॉग वाचून लगेच इथून कल्टी मारणे पसंत केले असावे ;-) हरकत नाही. योगेशसारखा एखादा पक्का वाचक मात्र, उत्तर येवो न येवो नेहमीच प्रतिक्रिया देत आला आहे. पण एक उगी किडा म्हणून मला आता वाटतंय की हा ब्लॉग तुम्ही किती लोक वाचत आहात? तुमचे ब्लॉग कोणते आहेत? तुम्ही काय लिहीतायत? तुम्ही कुठले आहेत? वगैरे कळालं तर बरं होईल ! पण हे कळायला आपला संवाद तर झाला पाहिजे ना? इव्हन हा ब्लॉग कुणी वाचत आहे की नाही याबद्दलही मला काही कल्पना नाही. ते पेजव्ह्युज आणि टेहळणीचा नकाशा आपला कामापुरता आहे.
असतील तर (!) या ब्लॉगच्या नियमीत वाचकांनीही त्या-त्या पोस्टवरच त्यांना काय वाटलं ते रोखठोकपणे सांगितलं तर फार बरं होईल.
तर आता प्लीज हा ब्लॉग आवडत असेल/नसेल तरीही "टिप्पणी पोस्ट करा" या बटणाचा आजच्या दिवस का होईना आणि तुम्हाला शक्य झाल्यास नेहमीच वापर करा आणि दिलखोल के जे हवं ते बोला. कसं म्हणता?    

1 टिप्पणी: