३ एप्रिल, २०१०

चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा

हुये नाम वै बेनिशां कैसे-कैसे
जमीं खा गई नौजवां कैसे-कैसे
आज जवानी पर इतराने वाले काल पछतायेगा
चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
तु यहां मुसाफ़ीर है, ये सराय फ़ानी है
चार रोज की महेमां तेरी जिंदगानी है
जन-जनी, जर-जेवर कुछ ना साथ जायेगा
खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा
जान कर भी अनजाना बन रहा है दिवाने
अपनी उम्र फ़ानी पर, तन रहा है दिवाने
इस कदर तु खोया है, इस जहां के मेले में
तु खुदा को भुला है, फंस के इस झमेले में
आजतक ये देखा है, पानेवाला खोता है
जिंदगी को जो समझा, जिंदगी पे रोता है
मिटनेवाली दुनिया का ऎतबार करता है
क्या समझ के तु आखिर इससे प्यार करता है
अपनी-अपनी फिकरों में जो भी है वो उलझा है
जिंदगी हकिकत मे क्या है कौन समझा है
आज समझ ले, कल ये मौका हाथ न तेरे आयेगा
ओ गफ़लत की नींद में सोनेवाले धोका खायेगा
चढता सूरज धीरे-धीरे ढलता है, ढल जायेगा
मौत ने जमाने को, ये समां दिखा डाला
कैसे-कैसे रुस्तम को, खाक मे मिला डाला
याद रख सिकंदर के हौसले तो आली थे
जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे
अब ना वो हलाकु है, और न उसके साथी है
चंद जूं ओ पोरस है, और न उसके हाथी है
कल जो तन के चलते थे अपनी शानो शौकत पर
शम्मा तक नहीं जलती आज उनकी दुर्बत पर
अदना हो या आला हो, सबको लौट जाना है
मुफ़लिसों कवंदर का कब्र ही ठिकाना है
जैसी करनी-वैसी भरनी
आज किया कल पायेगा
सर को उठाकर चलनेवाला, इकदिन ठोकर खायेगा
चढता सूरज धीरे-धीरे ढलता है ढल जायेगा
मौत सबको आनी है, कौन इससे छुटा है
तु फ़ना नहिं होगा, ये खयाल झुठा है
सांस टुटते ही सब रिश्ते टुट जायेंगे
बाप, मां, बहन, बिबी, बच्चे छुट जायेंगे
तेरे जितने है भाई वक्त का चलन देंगे
छिन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे
जिनको अपना कहता है, कब ये तेरे साथी है
कब्र है तेरी मन्जिल और ये बाराती है
ला के कब्र में तुझको, मुर्दाबाद डालेंगे
अपने हाथों से तेरे मुंह पे खाक डालेंगे
तेरी सारी उल्फ़त को, खाक में मिला देंगे
तेरे चाहने वाले, कल तुझे भुला देंगे
इसलिये ये कहता हुं, खुब सोच ले दिलमें
क्यूं फसाये बैठा है, जान अपनी मुष्किल में
कर गुनाहों से तौबा आके बत संभल जाये
दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाये
मुठ्ठी बांध के आनेवाले हात पसारे जायेगा
धनदौलत जागिर से तुने क्या पाया क्या पायेगा
चढता सूरज धीरे-धीरे ढलता है ढल जायेगा
कव्वाल – अजिज नाजां

२८ मार्च, २०१०

रजनीश: ओशो: एक्सप्लेण्ड





या ब्लॊगवर गेल्यावेळी रजनीशांबद्दल मी मुद्दामच एका ति-हाईताच्या नजरेने लिहिले आहे. तेच आताही करतो आहे. कितीही काही म्हटले तरी जगावर छाप पाडणा-या या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील विसंगती स्वस्थ बसु देत नाही. तशी त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीत संगती ठेवली नव्हती. कधी येशु ख्रिस्तावर टीका, तर कधी बायबलमधील वचनांवर शिष्यांना नवे भान देणारी व्याख्याने, कधी गीतेच्या अठरा अध्यायांवर व्याख्याने देऊनही वर पुन्हा Krishna seems to be a playboy ! हे ठीक होते - हे समजुन घेता येते. पण किमान स्वत:च्या जीवनाबद्द्ल आपण जे सांगतोय, ते आपण आहोत तोपर्यंत कसेही संपादता येईल, पण आपण गेल्यावर काय? हा प्रश्न त्यांना पडला नसावा. मला रजनीश जसे कळले तसे मी इथे मांडतोय - कारण माझ्या आयुष्यातील बराच काळ मी या बाबावर (हो बाबाच! सोफास्टीकेटेड असला म्हणुन काय झाले) खर्च केलाय. काही काळ तर नुसतं वाचन करुनच पुरता सैरभैर झालो होतो. पण नंतर आपोआपच कळलं की हे प्रकरण नुसतं वाचुन संपत नाही. त्यांचे साहित्य वाचणा-या वाचकांना माहीत असेल, की रजनीशांची "सर्वकाही जाणलेला" अशी आपल्या मनात प्रतिमा निर्माण होते. तशी ती होऊ देत असत.
कधी कुणा श्रीमंत बाईला "मी तुमचा पूर्वजन्मातील मुलगा आहे", तर श्रोत्यांसमोर "सातशे वर्षापूर्वी मी पुण्यातच तप करीत होतो, एकवीस दिवसांच्या उपासानंतर माझ्या तपाची सांगता होणार होती, पण त्यापूर्वीच माझा खून झाला, पुन्हा जन्म घ्यायला मला सातशे वर्षे वाट पहावी लागली" तर कधी "बुध्द आणि मी काहीकाळ रस्त्याने सोबत चाललो होतो, नंतर तो त्याच्या वाटेने गेला, मी माझ्या वाटेने गेलो " तर कधी "बुध्दाच्या आत्म्याने माझ्या शरीरात प्रवेश केला आहे, माझी तब्येत सुधारली आहे" नंतर "बुध्दाला मी बाय-बाय केले, त्याची झोपताना हात उशाशी घेण्याची सवय मला त्रासदायक होत होती" असल्या भंपक कथा सांगुन ते नसते वलय निर्माण करीत. ज्या जुनाट भारतीय मानसिकतेवर त्यांनी जन्मभर आसूड ओढले त्याच मानसिकतेचे रजनीश हे अतिशुध्द, प्रच्छन्न रुप होते. हा माणूस निव्वळ भंपक होता असे मी म्हणत नाही, पण त्यांनी जाणतेपणी स्वत:बद्दल काही ग्रह पसरु दिले होते.
संबोधी किंवा निर्वाण किंवा एन्लायटनमेंट ही गोष्ट या जगात राहु इच्छिणाराच्या द्रुष्टीने काहीही महत्वाची नसते. ती शेवटची पायरी आहे. रजनीशांनी एन्लायटनमेंटची पध्दतशीत मार्केटींग केली. सर्व प्रकारच्या "कंडिशनिंग्ज" च्या विरोधात असणारे रजनीश मात्र काही बाबतीत "कडिशण्ड" होते:
रजनीशांची बोलण्याची पध्दत सुरुवातीला आक्रामक होती, ती नंतर श्रोत्यांना क्षणा-क्षणाबद्दल, त्या-त्या क्षणाबद्दल जागरुक करुन देणारी झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगात सर्वप्रथमच या प्रकारच्या बोलण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येत होता. ते जेव्हा बोलत, तेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये, जाणिवपूर्वक थांबा घेत, तो क्षण पिऊन घेत, श्रोत्यांनाही तो प्यायला लावीत आणि मग पुढे जात.
रजनीशांची देहबोली पूर्णत: Let Go प्रकारची होती - म्हणजे त्यामागे कसलाही अभिनिवेश नव्हता.
ध्यानाशी ज्याची ओळख नाही, जो सतत घाई-गडबडीत असतो, घाईत नसतो तेव्हा देखील त्याच्या मनात सतत विचार चालु असल्याने वर्तमान क्षणाकडे लक्ष नसते त्याच्यावर वरील प्रकारच्या बोलण्याचा आणि देहबोलीचा नक्कीच प्रभाव पडतो. ऎकणा-याला अनायास शांत वाटु लागते.
ध्यान देखील एक प्रकारचा निष्क्रिय सराव आहे - अत्यंत सूक्ष्म निष्क्रिय सराव. हा सराव तुम्ही, तुमचे विचार, तुमची देहस्थिती, मनात चालु असणारी वळवळ यांबद्दल जागरुक होण्याचा आहे. या निष्क्रिय सरावाचा जो परिणाम होतो तो थोडा अतर्क्य म्हणावा असा आहे. कारण या सरावाच्या परिणामाचे विज्ञानाने अजूनपर्यंत मूल्यांकन केलेले नाही. ध्यानाच्या शिखर अवस्थेत दुस-या व्यक्तीला विश्वास न बसेल अशा काही शारीरिक घटना घडतात. उदा. माकडहाडापासुन मेंदुकडे एक उष्ण प्रवाह सरकणे, हा प्रवाह पाठीवरील शिरांमध्येही प्रवाहीत होणे, पाठीच्या कण्यांत काही निवडक जागांवर गोल फिरल्यासारखे वाटणे. ही घटना घडते तेव्हा सहाजिकच आपण घाबरतो. कारण शरीराला ताठरता आलेली असते आणि ध्यान चालु असताना सर्व आधार क्षणिक नाहीसे झाल्यासारखे वाटत असतात. आपण पटकन ध्यानातुन बाहेर पडतो. पण एकदा का ही घटना घडली, की ती अनायास होत राहाते. पुढे डोळे तारवटतात (तेजस्वी होतात म्हटले तरी चालेल), भुवया आपोआप वर जायला लागतात, मनात काही विचार चालु नसल्याने आजुबाजुचे जग सुस्पष्ट दिसायला लागते. विचारांमध्ये सुसुत्रता येते, बोलणे पूर्वीपेक्षा सुस्पष्ट होऊ लागते. लोकांसोबत होत असणा-या संवादावर तुम्ही जास्त नियंत्रण राखु शकता, काही प्रमाणात लोकांना "मोनोपोलाईज"ही करू शकता. पुढे मग मन स्थिर होते, फालतू विचार येणे आणि त्यातच रंगुन जाणे, त्यांनी काही कारण नसताना बेजार होणे बंद होते. एकुणच माणूस स्वस्थ होतो, आनंदी आणि समाधानी राहु लागतो.
ही कोणत्याही माणसाच्या बाबतीत घडणारी अगदी सामान्य घटना आहे. पण याच घटनेला "अतिंद्रिय अनुभव", "तप" "मिस्टिसिझम" "साधना" असली बाष्कळ नावे पडल्याने त्याभोवती उगाच वलय निर्माण होते. रजनीशांनी हेच अगदी बेमालूमपणे स्वत:भोवती गोवले, त्याचा पद्धतशीर प्रचार केला. यात काही वाईट झाले असे मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि त्यात आश्चर्यकारक, अमानवी असे काही नाही. (क्रमश:)

आचार्य रजनीश उर्फ़ भगवान श्री रजनीश उर्फ़ ओशो






रजनीश:ओशो नावाचं गारुड समजुन घेताना आपण स्वत:लाच हरवुन बसतो. रजनीशांची व्याख्याने किंवा साहित्य हे भोव-या सारखं आहे. ते तुम्हाला आकर्षीत करतं, गरगर फिरवतं, घेरी आणतं, तुम्ही आजवर वाहात राहीलेली ओझी फेकायला लावतं. त्यांची व्याख्याने किंवा साहित्य या फक्त पाय-या आहेत - त्या अंतिमत: तुम्हाला ध्यानाकडे घेऊनच जातात.
रजनीशांकडे एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला पाहाता येत नाही. कारण त्यांनी स्वत:ला व्यक्तीत्वाच्या चौकटीत बांधुन घेतलेलं नाही आणि तुम्ही त्यांना त्या चौकटीत बांधुही शकत नाही. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० हा त्यांचे ५९ वर्षांचे आयुष्य. लहानपणीचा एक अवखळ मुलगा, तारुण्यातील एक झंझावाती व्याख्याता - विद्यापीठाचा गोल्डमेडलिस्ट, पुढे त्याच विद्यापीठातील प्राध्यापक, आपल्या व्याख्यानांतुन धर्मा-धर्मांमध्ये पसरलेल्या दांभिकतेवर, दांभिक गुरुंवर हल्ला करणारा बंडखोर, शहरा-शहरांतुन ध्यान शिबीरे घेणारा, देश-विदेशांतील तरूण-तुर्कांना वेड लाऊन सोडणारा आणि संभोग से समाधी की ओर या व्याख्यानमालेमुळे "सेक्स गुरु" या नावाने प्रसिद्धी पावलेला, रोल्स राईस ही महागडी कार आणि हि-यांची घड्याळे वापरणारा आध्यात्मिक गुरु, पुण्यातील आश्रमातुन निघुन अमेरिकेतील ओरेगॊन या परगण्यात गेलेला मसिहा, तिथुन हाकालपट्टी होऊन पुन्हा भारतात पुनरागमन असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
मला रजनीशांची ओळख पुस्तके, ध्वनी-चित्रफीती आणि इंटरनेट यावरून झाली. पण त्यांना ज्या-ज्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले त्यावरुन रजनीशांच्या भोवती खरंच एक गारुड, एक अद्भुतता होती असे दिसते. त्यांना वाचणारे साधक जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटत तेव्हा भावना अनावर होऊन ते हंबरडा फोडुन रजनीशांच्याकडे झेपावत, रडत (ओशो: एक प्रतिभावंत ध्यानयोगी, शिरिष पै, प्रतिक प्रकाशन). (इथे मला मायकल जैक्सनला पाहुन बेशुद्ध होणा-या मुली आठवतात).
रजनीश स्वत:ला बुध्द पुरुष म्हणवुन घेतात. बुध्द पुरुष म्हणजे आत्मानुभूती झालेला, स्वत:च्या अगदी तळापर्यंत जाऊन आलेला माणुस. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा तो माणुस शिल्लक राहात नाही - तो फक्त एक स्रोत म्हणुन उरतो, त्याला भुत-भविष्य -वर्तमान दिसु लागले, तो आकाशिक रेकोर्डस पाहु शकतो इ.इ.इ. अशा अनेक लंब्याचवड्या, भुलविणा-या आणि लोकांना ध्यानाकडे आकर्षित करणा-या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
पण एखाद्या माणसाचा सर्वोत्तम समिक्षक, टिकाकार म्हणजे त्याचेच आयुष्य असते. तुम्ही कितीही लोकांना भुलवु शकाल पण तुम्ही जे जसे जगाल ते लोकांना पहायला तसेच राहील ना? ते गरिबांना आणि गरिबीला सरळ झटकुनच टाकतात. गरिबीच्या प्रश्नाला "गरिबीची कारणे देशाच्या मानसिकतेत आहेत, गरिबांना आपल्या देशात दरिद्रनारायण म्हटले गेले आहे, त्यात त्यांच्या अहंकाराची पुर्ती होते म्हणुन ते गरिब राहातात" ते अशी बगल देतात पण ते स्वत: मात्र रोल्स राईस वापरत असत. ख्रिस्तोफर काल्डर हा त्यांचा एकेकाळचा संन्यासी आणि नंतरचा टीकाकार म्हणतो की, "मी (रजनीशांनी) शेकडो मुलींसोबत सेक्स केला आहे, असे रजनीशांनी अमेरिकन प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. भारतीय गुरूंनी कधी आपल्या शिष्यांसोबत असले प्रकार केल्याचे दिसत नाही...." ओशोवर्ल्ड डॊट कॊम वर संकलीत केलेल्या त्यांच्या चरित्रात असे वाचनात आले की "बुध्दत्व प्राप्तीनंतर मी सेक्स केलेला आहे, आणि चांगल्याप्रकारे केलेला आहे...सेक्समुळे बुध्दत्वावर काहीही परिणाम होत नाही..."
रजनीश नायट्रस ऒक्साईड (मादक पदार्थ) घेत. यावरुन ते स्वत:ला "रबर होज बुध्दा" असेही म्हणवुन घेतात.
रजनीश कधीच कुणाची भीड-भाड ठेवत नसत. म.गांधी, मदर तेरेसा, येशु ख्रिस्त, ख्रिश्चनिटी, हिंदु धर्म, तुलसीदास, वेद, राम या सर्वांवर रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानातुन ठिकठीकाणी ताशेरे ओढलेले दिसतात. "पूर्व आणि पश्चिम, आध्यात्म आणि भौतिकता, आत्मा आणि शरीर यातील दरी मिटवण्याचा माझा प्रयत्न आहे" असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
तशी रजनीशांनी लोकनिंदेची कधीच दखल घेतली नाही. लोकस्तुतीची मात्र त्यांनी निश्चितच दखल घेतली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. रजनीशांनी एका व्याख्यानात त्याची दखल घेतली होती.
विवेकानंदांवर तुम्ही का बोलत नाही? असे त्यांच्या शिष्याने रजनीशांना विचारले होते. तेव्हा व्याख्यानात "विवेकानंद हे काही जाग्रत पुरुष नव्हते, त्यांना महापंडित म्हणता येईल.... आणि या तथाकथित पंडितांवर माझे किती प्रेम आहे हे तुम्ही जाणताच. विवेकानंदांनी हिंदुधर्माच्या अहंकाराला खतपाणी मात्र घातले....मी विवेकानंदांच्या गुरुंवर (रामक्रष्ण परमहंस) बोलु शकतो, कारण ती गोष्टच वेगळी आहे...
विवेकानंदांचे अभिमानी दत्ता बाळ यांनी रजनीशांच्या या वक्तव्यावर टीका केली, तेव्हा मात्र रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात दत्ता बाळ यांची यथेच्छ टिंगल उडविली होती.
रजनीशांच्या विवाहसंस्थेला विरोध होता....विवाह हे सुरक्षीत वातावरण आहे, त्यात प्राण नाही, त्यात प्रेम नाही असे ते सांगतात.
रजनीश कितीही बाता मारत असले, तरी ते ठिकठिकाणी उघडे पडलेले दिसतात. रजनीशांनी विवाह केला नाही. त्यांची एक प्रेयसी मात्र होती. क्रिस्टिन वाल्फ़ या नावाची इंग्रज तरूणी. ती त्यांच्या पूर्व जन्मीची प्रेयसी आहे, त्यांनी तिला पुढच्या जन्मात भेटण्याचे वचन दिले होते असे रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले. पण पुढे या पूर्वजन्मीच्या प्रेयसीने मात्र मुंबईच्या एका हॊटेलमध्ये झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्त्या केली. महिनाभरानंतर रजनीशांनीही जगाचा निरोप घेतला. गेल्यावरसुद्धा या माणसा भोवती एक गारूड उभे आहे. पुण्यातील त्यांच्या आश्रमातील समाधीवर लिहिले आहे - OSHO NEVER BORN NEVER DIED. ONLY VISITED THIS PLANET EARTH BETWEEN 11 DECEMBER 1931 AND 19 JANUARY 1990. (क्रमश:)